by Hansraj Agrawal | Jan 15, 2024 | Trending News
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 14, 2024 | Trending News
पुढील
बातमी
‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र
Source link
by Hansraj Agrawal | Jan 14, 2024 | Trending News
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचे. म्हणजेच लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे?
“पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुक्ताफळे उधळली. घराणेशाहीबद्दल ते बोलले. हा थेट सर्वसामान्य लोकांचा, तुमचा आमचा अपमान आहे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण हे मात्र घरगडी समजतात. तुच्छ, नोकर समजतात. म्हणून त्यांची ही गत झाली आहे. सर्व सोडून गेले आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार मोडले. बाळासाहेब असते तर आता जोड्याने मारले असते. शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? आमच्यासारख्या फाटक्या लोकांनी रक्ताचे पाणी केले. शिवसेना वाढवली. आयत्या बिळावर नागोबा होण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. बाळासाहेब म्हणायचे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे म्हणतात, मी आहे म्हणून तुम्ही आहात. हे तुम्हाला मान्य आहे का?” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही. कोणाचीही मूर्ती लावतील. नाव अटल सेतू पण अटलजींची फोटोच नाही. त्यामुळे कृपा करा की त्या मंदिरात स्वःताची नव्हे तर प्रभू श्रीरामाची मूर्ती लावा. प्रभूरामचंद्र दशरथ राजाचे पूत्र होते. त्यावेळी सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याबद्दल पंतप्रधान बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
शरद पवारांचीही टीका
“पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होती. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असं शरद पवार म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 13, 2024 | Trending News
पुढील
बातमी
आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण…; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर
Source link
by Hansraj Agrawal | Jan 12, 2024 | Trending News
कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 12, 2024 | Trending News
सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सरकारी कामकाजात सर्वसामान्यांना कायमच वाट पाहावी लागते. यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांवरही हीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. आधीच वेदना सहन कराव्या लागत असताना रुग्णाने आपण जीवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी सरकारी कार्यालयापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत प्रवास केला आहे.
पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो. तो हयातीचा दाखल मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत एका जेष्ठ नागरिकाला ॲम्बुलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिराव लागलंय.
सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला होता. त्यासाठी त्यांना येलूर येथील बँक कर्मचाऱ्यांनी युवराज बनसोडे यांनी सांगलीतील ट्रेझरी ( कोषागार ) कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले. हे कार्यालया बॅंकेपासून तब्बल 50 किमी लांब होतं.
जिवंत असल्याचा पुरावा मिळण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असतानाही सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागले आहेत. बनसोडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्समधून सांगलीतल्या ट्रेझरी कार्यालयात आणलं होतं. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय.
“पेन्शनच्या कामासाठी ट्रेझरीमध्ये आलो होता. बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मला इथे पाठवलं होतं. रुग्ण पॅरिलिसीस असून त्याचा खुबा मोडलेला आहे. रुग्णाला महिन्याभरापासून उठता बसता येत नाही. रुग्णाला आम्ही बॅंकेत घेऊन गेलो होतो. तेव्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी ट्रेझरीला घेून जाण्यास सांगितलं,” असे रुग्णाचे नातेवाईक संभाजी बनसोडे यांनी सांगितले.
पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतो. शासनाकडून शाळांना पुरवलं जाणार धान्य निकृष्ट दर्जाचं पाहायला मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यान भोजनासाठी येणार धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. शाळेत ठेकेदाराकडूनच धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं जातं असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. पालघर मधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 2377 शाळांना साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडून धान्य पुरवठा होतो. चालू शैक्षणिक वर्षाचं धान्य पुरवठा करण्याचा ठेका साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडे आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या कडून कारवाईच आश्वासन देण्यात आले आहे.
Source link