शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत

शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत



अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत. 



Source link

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण… कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण… कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार


Kalyan News : कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी महापालिका रुग्णालयाने चक्क नकार दिला. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली. 

कल्याण स्कायवॉकवर राबिया साधू सिद नावाच्या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरिकांनी तसंच स्टेशनवरच्या हमालांनी पोलिसांच्या मदतीने एका हातगाडीवर या महिलेला मनपा रुग्णालयात आणलं. मात्र तिथल्या डॉक्टर्सनी या महिलेला दाखल करुन करुनही घेतलं नाही.. तसंच स्टाफ नसल्याचं सांगत प्रसुती करण्यासही नकार दिला. अगदी पोलिसांची विनंतीही रुग्णालयाने धुडकावून लावली. अखेर महिलेची प्रसुती रुग्णालयबाहेर झाली आणि तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.. मात्र रुग्णालयाच्या या मुजोर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

ठाकरे गट आणि मनसे आक्रमक

कल्याणच्या रुक्मिणीबाई महापालिका रुग्णालयात आता ठाकरे गट आणि मनसेनं ठिय्या आंदोलन केले. या रुग्णालयाने एका गरोदर महिलेच्या प्रसुतीला नकार दिला होता. त्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती झाली. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालीय. जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ठाकरे गट आणि मनसेने दिला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण स्कायवॉकवर एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी हमालाच्या मदतीने तातडीने त्या महिलेला हातगाडीवर टाकून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने रुग्णालयात स्टाफ नसल्याचे कारण देत तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिस आणि हमालांनी विनंती करुन देखील रुग्णालयाने महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही.अखेरी त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली आहे. प्रसूती झालेल्या महिलेचे नाव राबिया साधू सिद असे आहे. तिला मुलगी झाली आहे. या घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

राबिया सीद ही महिला गराेदर होती. तिला स्टेशन परिसरातील स्कायवॉकर प्रसूतीच्या वेदना सुरु होताच हा प्रकार नागरीकांनी पाहिला. तिची अवस्था पाहून नागरीकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉकगाठला. तिची अवघडलेली अवस्था पासून तातडीने तिला हातगाडीवर ठेवले. हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुक्णीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती पश्चातही रुग्णालय बधले नाही.

या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले. 
दरम्यान घडल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणाला बांधिल नाही. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणाला उत्तरे देणार नाही. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार नकार दिला. 

 





Source link

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं

इंद्रायणी भाताच्या बोगस बियाणांची विक्री, शेतकरी देशोधडीला… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं



Bogus Seeds of Indrayani Rice : बोगस बियाणांचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पसरलंय. मावळमध्ये चक्क इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकण्यात आलं. त्यामुळं शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान कसं झालं असून गरीब शेतकरी देशोधडीला लागला आहे. 



Source link

शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी पोहोचली? वाचा न ऐकलेला इतिहास!

शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी पोहोचली? वाचा न ऐकलेला इतिहास!



Sudhir Mungantiwar On Waghnakh : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला जाणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी वाघनखांसाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे.



Source link

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना


निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Malegaon Police) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

पावरलूमच्या तराशण यंत्रात ओढणी अडकून सादिया इसाक अहमद या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नाशिकच्या मालेगावातील बडा कब्रस्थान भागात समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात ही महिला तराशण मशीनवर काम करीत असताना रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यंत्रमागासाठी धागा भरण्याच्या तराशण यंत्रामध्ये ओढणी अडकून झालेल्या दुर्घटनेत सादिया इसाक अहमद या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत सादिया इसाक अहमद यांचा  स्वतःच्या यंत्रमाग कारखाना आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेण्याच्या सुमारास त्या तराशण मशीनवर काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

वर्षभरात घडतात 8 ते 10 घटना

यंत्रमाग हा मालेगावचा प्रमुख व्यवसाय असून, अनेक गोरगरीब महिला तराशण  भरण्याच्या कामासाठी जातात. ताराशण पट्ट्यात ओढणी व किंवा साडी अडकून महिला गंभीर जखमी होतात. अनेकदा बळी देखील जातो. वर्षभरात अशा 8 ते 10 दुर्घटना होऊन कुटुंब उघड्यावर येत आहेत.  या दुर्घटना टाळण्यासाठी काम करणाऱ्यांकडून कारखानदारांनी ऑटो कट व सेन्सर असलेल्या मशीन खरेदी करण्याची मागणी होत आहे.

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीच्या चिमुकल्याचा मृत्यू 

पावसाने शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा नामदास या सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात घडली. मेंढपाळ असलेले नामदास कुटुंबीयाचा तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात वास्तव्य होते. मेंढ्या आवरत असताना केदा बराच वेळ दिसून न आल्याने त्याची शोधाशोध केली असता शेतामध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आढळून आला. तात्काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला होता. एकुलत्या एक चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.





Source link

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी


Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे…काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की सुरूच ठेवायचं याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

त्यानंतर  वंशावळीत कुणबीचा उल्लेख असेल त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं. या जीआरची प्रत माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी मनोज जरांगे यांना सोपवली. जीआरची प्रत देऊन जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. 

उपोषणावर ठाम
पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच  सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार चर्चा करण्यासाठी जरांगे शिष्टमंडळ पाठवणार आहेत. मात्र सुधारणेबाबत जरांगे ठाम आहेत. त्यामुळे सरकार सुधारणा करणार का याकडे लक्ष आहे

दुसरीकडे सरकारने काढलेल्या जीआरमधून मनोज जरांगे यांनी दोन शब्द बदलण्याची मागणी केलीय. वंशावळीत कुणबी नोंद असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतलाय. वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. अध्यादेशातले ‘वंशावळ असल्यास’ हे शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. सुधारणा केलेला अध्यादेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं अशी मागणी त्यांनी केली. 

तर इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी आज पुन्हा एकदा दिली. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करण्याचं काम सुरू आहे… त्यामुळं मराठा आरक्षण द्यावं, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करू, असंही त्यांनी सांगितलं… 

जरांगेच्या तब्येतीची माहिती
मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ लागला आहे असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. त्यांच्या रक्तातली नायट्रोजन लेव्हल वाढलीय असं डॉक्टर म्हणाले. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp