by Hansraj Agrawal | Nov 29, 2023 | Trending News
Chhagan Bhujbal Controversy : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मुद्यावर अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांनी विरोध केला. एवढंच नव्हे तर कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीवरच त्यांनी आक्षेप घेतला. न्या. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केल्यानं सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं आता सरकारमधील ज्येष्ठ भाजप मंत्र्यानं थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
याआधी हसन मुश्रीफ आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांनीही भुजबळांच्या मागणीला विरोध केला होता. आता विखे पाटलांनी थेट भुजबळांचा राजीनामा मागितल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी विखेंचं कौतुक केलं. तर, भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही असा टोला मनोज जरांगेंनी लगावला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, यासाठी छगन भुजबळांनी ओबीसी मेळावे घेण्यास सुरूवात केलीय.. त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय. मंत्रीपदावर असलेल्या नेत्यांना जबाबदारीनं वागावं लागतं. जातीय तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र भुजबळांना त्याचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळंच पक्ष आणि सरकारमध्ये भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र सध्या दिसतंय.
मनोज जरांगे विरूद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पेटलेला असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे तंबी दिलीय. आरक्षणावरून वातावरण चिघळेल अशी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांवर निशाना साधल्यांची चर्चा आहे. दरम्यान आपल्याला कुणी तंबी दिली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.
जालन्याच्या सभेतून भुजबळांना उत्तर नाही, उत्तर देण्याएवढे भुजबळ मोठे नाहीत अशी टीका मनोज जरांगें यांनी केलीय. भुजबळ दोन जातीत तेढ निर्माण करतात असा आरोपही मनोज जरांगेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांवर आपला पूर्णपणे विश्वास असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटलंय.
मनोज जरांगेंच्या चौथ्या टप्प्याच्या दौ-याच्या सुरुवात जालनातल्या सभेपासून
लायकी शब्दावरून छगन भुजबळांनी जरांगेना घेरल्यानंतर आता जरांगेंच्या जालना येथील सभेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झालाय. जालन्यात 1 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होतेय.. 60 एकरवर होणारी ही सभा जिल्हा पातळीवरची सर्वात मोठी सभा असेल असा दावा संयोजकांनी केलाय.. या सभेसाठी 140 जेसीबींनी फुलांची उधळण होणार असून सभा सुरू होण्यापूर्वी 101 तोफांनी आतषबाजी केली जाईल. 50 हजार चौरस फूट जिल्ह्यात बॅनर लावण्यात आलेत.. शहर ते सभास्थळापर्यंत 10 हजार दुचाकींद्वारे मिरवणूक काढण्यात येणार आहे. 100 एकरवर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आलीये..आजपर्यंत जरांगे पाटील यांच्या सभेसाठीच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांचेच छायाचित्र असायचे. सध्या वातावरण निर्मितीसाठी जे बॅनर आणि होर्डिंग लावले जातायत त्यावर सर्वच महापुरुषांची छायाचित्र आहेत. जालन्याच्या सभेतून धार्मिक आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजकांनी म्हटलंय. त्यामुळे जालन्याच्या सभेतून जरांगेंचा पॅटर्न कसा बदलणार आणि ते कोणावर प्रहार करणार हेच पाहायचं.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 29, 2023 | Trending News
Nerul Crime News: नेरूळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. डीवाय पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाचा चौघांनी गाडीतून खेचून मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 28, 2023 | Trending News
पुण्यात एका तरुणाची समलैंगिक संबधातून हत्या करण्यात आली आहे. पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 28, 2023 | Trending News
Abhijeet Bichukale Milking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. संसदेची इमारत साधारण 100 वर्षे जुनी असून त्यात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. दरम्यान नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. या दोन घटनांचा एकमेकांशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून सातारा येथे अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. नव्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती. यामुळे साताऱ्यातील आरपीआय गटाने हा निर्णय घेतला. भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहाला बाबासाहेबांचे नाव देणारा नेता, अभिनेता हा सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या दुग्धाभिषेकानंतर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात नवी संसद उभारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव नव्या संसदेला द्यावे, असे पत्र मी पंतप्रधान मोदींना लिहिले. अशी मागणी करणारा मी पहिला भारतीय आहे. यामुळे माझ्या नकळत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने माझा दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. दुग्धाभिषेकाला स्मरुन मी सांगतो, माझा लढा सुरु झाला आहे. नवीन संसद भवनाला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, यासाठी मी उरुन पुरुणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिजित बिचुकले यांचे कौतूक केले जात आहे. आज अभिजीत बिचुकले सारख्या नेतृत्वाची देशाला आणि लोकशाहीला वाचवू शकते, अशा कमेंट लिहिल्या गेल्या आहेत.
तसेच मागणी खूप सुंदर आहे. नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव दिलं पाहिजे. पण त्यांच्याच पुतळ्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर दूध टाकून असा अभिषेक करणे हे चुकीचे आहे. नक्कीच तुमच्या मागणीला यश लाभो ही प्रार्थना करतो. पण कृपया करून बाबासाहेबांचे नाव घेऊन अशी स्टंटबाजी करू नये, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने लिहिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 27, 2023 | Trending News
बोरिवली रेल्वे स्थानकात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 27, 2023 | Trending News
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.
देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे. तवेरा गाडीतून हे सर्वजण रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. मात्र त्याआधीच कन्नड घाटात त्यांची गाडी दरीत कोसळली. गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मालेगावातील हे सर्वजण तवेरा गाडीने अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री गाडीने सर्वजण मालेगावला येत होते. मात्र कन्नड घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे.
मृतांची नावे –
प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
पूर्वा गणेश देशमुख, वय -08
दरम्यान, रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला होता. कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते.
Source link