Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट


Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

राज्यात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र कोकणात मात्र हवामान अतिशय कोरडं पाहायला मिळणार आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD च्या अंदाजानुसार, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात २४ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेली काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवला गेला आहे तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.





Source link

शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू


Honey Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. लातुरमधील निलंगा तालुक्यातील ममदापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

शेताकडे जात असताना बारा वर्षीय बालकावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यात बालक आणी वृध्द हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर, त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकरी विश्वभंर बिराजदार यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये जखमी झालेला मुलगा आणि आजाेबावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील ही धक्कादायक घटना घडली आहे.

अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला;  मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळाले

भंडा-यामध्ये मधमाशांनी नागरिकांवर हल्ला चढवलाय. यात तब्बल 200 नागरिक जखमी झालेत. तुमसर तालुक्यातील बाम्हणी इथल्या वैनगंगा नदीकाठी हा प्रकार घडलाय. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या  अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांनी हा हल्ला चढवलाय. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला… मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळू लागले. अखेर आनेकांनी मधमाशांपासून सुटका करून घेण्यासाठी नदीत उड्या मारल्या. यावेळी काही तरुणांनी मोठ्या हिमतीनं पार्थिव नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात हरदोली-झंझाळ इथं स्मशानभूमीत मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळीच हा प्रकार घडला. चितेला अग्नी देताच जवळच्याच झाडावरील मधमाशांचा थवा आक्रमक झाला आणि त्यांनी तिथं जमलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. यात गेल्या काही दिवसातील भंडारा जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. 

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. मधमाशांच्या हल्ल्यात 20 ते 25 पर्यटक जखमी झाले असून त्यातील एक जण बेशुद्ध पडलाय. सुवेळा माची परिसरात ही घटना घडलीये.. अचानक मधमाशांच्या थव्यानं हल्ला केल्यानं किल्ल्यावर एकच धावपळ उडाली. मधमाशांपासून वाचण्यासाठी काही पर्यटक गवतात लपून बसले.

गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला

गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. हिर्डोशी गावात नीरा देवधर धरणाच्या काठावर गणपती विसर्जनासाठी नागरिक आले होते. आरती करत असताना अचानक मधमाशांना ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. अखेर विसर्जन न करताच ग्रामस्थांवर तिथून निघून जाण्याची वेळ ओढवली. मधमाशा गेल्यानंतर मग काही ग्रामस्थांनी काठावर जात विसर्जन पार पाडलं.





Source link

'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला


अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावले होती. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी महोत्सवाचे आयोजक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या संदर्भात मी संदर्भात मी बरच ऐकलं. राज्याच्या उपराजधानीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलावंत इथं येतात. सुप्त कलागुणांना वाव देण्याचा एक व्यासपीठ इथं उपलब्ध करून देतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरात अनेक मोठे कार्यक्रम होतात. मात्र नागपूर सारख्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कलावंत आणून त्यांचे कार्यक्रम होते त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभिनंदन करतो. आपला आग्रह म्हणजे प्रेमाचा आदेशच असतो. मलाही इथे उपस्थित राहताल यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.

“गडकरी साहेब जसे दर्दी आहे तसे खवय्ये सुद्धा आहेत. गडकरी यांचं बोलणं हे सावजीच्या रस्या सारखा झणझणीत असतं. त्यामुळे आपण बोलवल्यानंतर मी काय देवेंद्रजी काय नाही कसं म्हणू शकतो. आपल्या विभागामार्फत जे काम करत आहे देशभरात जे रस्त्याचं जाळ निर्माण करत आहे. ते देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. आपलं फार मोठे योगदान त्यात आहे. मला एम एस आर डी सी हे खाता जेव्हा दिल त्यावेळेस गंमत सांगायचं म्हणजे हे खातं साडेसहा कोटीने तोट्यात होतं. मला तेव्हा असं सांगण्यात आलं हे खात गडकरी साहेबांनी चालवलं. बाळासाहेबांच्या संकल्पनेतील एक्स्प्रेस हायवे त्यांनी पूर्ण केला. अनेक उड्डाणपूल बांधले. त्यावेळेस अनेक लोक म्हणतात हे कशासाठी. मात्र आज त्यांची दूरदृष्टी पाहता ते उपयोगी पडत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“मला देवेंद्रजी म्हणाले एमएसआरडीसी हे डब्यात गेलेले खातं शिंदे साहेब तुम्ही पाहा. शिंदे साहेब बघा लक्षात ठेवा तुम्ही बघा एमएसआरडीसीला इतका मोठे करू की तुम्ही एमएसआरडीसी हे खाते सोडणारच नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना समृद्धीसारखा महामार्ग झाला. अनेक प्रकल्प झाले. नितीन गडकरी आपण देशभरात रस्त्याचं जाळ निर्माण करताय. विकास पुरुष म्हणून आपली छबी निर्माण झालेली आहे. या महोत्सवातून राज्याची परंपरा संस्कृती जोपासत आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

“नितीन गडकरी पण कलाकार आहेत. त्यांनी मुझसे नाराज नही हे गाणं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझा सूर एकच आहे. पण त्यांनी गायलेलं श्रीवल्ली हे गाणं फार व्हायरल झाल आहे. दोन्ही नागपूरकर (फडणवीस, गडकरी) अस्सल कलाकार सुद्धा आहे. म्हणून राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात. आजकाल राजकीय प्रदूषण वाढलेले आहे. मी त्यावर बोलणार नाही. मात्र नितीन गडकरींसारख्या माणसांचा खेळीमेळीच्या वातावरणात हलक फुलक बोलून राजकीय प्रदूषण दूर करण्यात त्यांचा हातखंडा आहे,” असे म्हणत मुख्यंत्र्यांना टोला लगावला.





Source link

'कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल

'कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल


Maratha Reservaiton : कलंक लागलेला मंत्री, दंगली भडकवणारा, वाया गेलेला म्हणजे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) असा जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर हल्ला चढवला. सभेच्या सुरुवातीपासूनच जरांगेंनी भुजबळांवर चौफेर टीका केली. त्याचवेळी भुजबळांच्या दबावात येऊन आरक्षण (Reservation) रोखाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. तसंच 2 दिवसांत अंतरवालीमधले आणि एका महिन्यात महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली. जालन्यात मनोज जरांगेंची सभा झाली. या सभेतून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. 17 डिसेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांची बैठक होणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. 

छगन भुजबळ हे बुरसटलेल्या विचारांचा नकल्या आहेत, नकला करणं भुजबळांचा धंदाच आहे. ज्यांनी मोठे केलं त्यांनाच भुजबळांनी पायाखाली तुडवलं, अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केलीय..

जालन्यात जाहीर सभा
मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात जाहीर सभा पार पडली. जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली . महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला या सभेपासून सुरूवात होत असून, मराठवाडा, खान्देश, विदर्भ असा दौरा ते करणार आहेत..या सभेला लाखो मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. जरांगेंचं व्यासपीठावर आगमन होताच गर्दीतल्या लोकांनी मोबाईलचा टॉर्च पेटवून त्यांचं स्वागत केलं. 

भुजबळ यांच्यावर बोचरी टीका
भाषणाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उडवली. आता ते काही झोपत नाहीत असं म्हणज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. घटनेच्या पदावर बसतो आणि महापुरुशांचे जाती काढणारा कलंक म्हणजे भुजबळ, ओबीसी आणि मराठा एकत्र राहत असताना दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे भुजबळ,  इतक्या खालच्या दर्जाचा मंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात झाला नाही, राज द्रोहा सारखा प्रकार हा करतो असा हल्लाबोल जरांगेंनी केली. मराठ्यांच्या नोंदी शासकीय आहेत तरी ही मराठयांना आरक्षण न देण्याचा चंग भुजबळ यांनी बांधला आहे. मराठयांना आरक्षण भुजबळ यांनी मिळू दिलं नाही, सरकार यांच्या दबावाखाली आल्यानं मराठ्यांच्या नोंदी दाबल्या असा आरोप जरांगेंनी केला.

 हे मला शत्रू दुष्मन मानतात, मी  माझ्या जातीच्या वेदना मांडल्या. आरक्षण नसल्याचा त्रास मी मांडला. जास्तीच आरक्षण तू खातो आमचं आम्हाला दे ही गरिबांसाठी मागणी केली, तू मराठा समाजला दुष्मन मानत असेल तर काय करायचं ते कर आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही,  जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला बाथरूम देखील उघडता येणार नाही असा इशाराच जरागेंनी दिलाय.  गरीबांशी दगाफटका करू नका. त्याच्या एकट्याच्या दबावाखाली येऊन काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही असा इशाराही सरकारला दिला आहे. सरकारने यापुढे विशेष करून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अजित पवार यांनी याच्या दबावात येऊन मराठ्यांचा घात केला तर तुमची गाठ मराठा समाजाशी आहे असं जरांगेंनी म्हटलंय. 

तुम्ही मागणी केली म्हणून 24 डिसेंबर तारीख दिली.आता डेंजर आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे,गृहमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या वतीने 3 मंत्री आले होते यांनी सांगीतलं संगळे गुन्हे मागे घेऊ कुणालाही अटक करणार नाही मग का अटक केली असा सवाल जरांगेंनी विचारला आहे.  आमच्या लोकांना का अटक केली.?आमचे लोक न्यायालयीन कोठडीत असताना नंतर पोलीस कोठडी का दिली.? तुम्ही विश्वास घातकी सरकार आहात असा आरोप जरांगेंनी केलाय.

24 डिसेंबरच्या आत आम्हाला आरक्षण द्या,अन्यथा जड जाईल याची दखल घ्या,  24 तारखेनंतर  गुन्हे मागे घेतले नाहीत, आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रतील मराठा समाजाची 17 डिसेंबर अंतरवाली किंवा अन्य ठिकाणी बैठक घेऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय.  उद्यापासून सगळ्या गावात साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन जरांगेंनी केलंय.





Source link

Weather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या ‘या’ भागात हिमवृष्टीचा अंदाज

Weather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या ‘या’ भागात हिमवृष्टीचा अंदाज


पुढील
बातमी

कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन





Source link

‘भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल’ मनोज जरांगेंची बोचरी टीका

‘भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल’ मनोज जरांगेंची बोचरी टीका



Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp