When we almost died

When we almost died


How would things be if we had never been there? A convoluted question, indeed, but nevertheless, an intriguing one.

It’s not a frivolous question though. According to a study, between 8,13,000 and 9,30,000 years ago, the ancestors of human species almost became extinct.

Those two-legged ancestors of ours, who were hunter-gatherers and were technologically advanced-enough to control fire for their use and make tools, were called homo erectus.

But they were almost gone — almost all them.

A recent study published in Science has found that only around 1,280 individuals capable of breeding were left on earth, during what is called a ‘bottleneck’ period. And this bottleneck was not brief — it lasted for 1,17,000 years, the study shows. The researchers, mainly geneticists and paleoanthropologists, wanted to predict past human population sizes from over 3,000 present-day human genomes. “The bottleneck is congruent with a substantial chronological gap in the available African and Eurasian fossil record,” the authors say.

Why the population plunged, the researchers could only theorize. It was the middle of the Pleistocene period, and the world was very, very cold. Looks like most of the chaps couldn’t take it. But those did, would leave behind a lot of consequence.

We are 8 billion today.





Source link

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; ‘या’ योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; ‘या’ योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी


Mhada Pune Lottery 2023 :  म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांच्या बंपर लॉटरीची घोषणा केली होती. म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.  पुण्यासह पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे म्हाडाची ही घरं असणार आहेत. 

कोणत्या जिल्ह्यात किती सदनिका? 

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक  गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
18 ऑक्टोबर 2023 रोजी याची संगणकीय सोडत निघणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी 

पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून 5863 नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीप्रती आपले उत्तरदायित्व अधिक ठरत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

नूतन IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने ज्याप्रमाणे सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली. अशाच प्रकारची अंमलबजावणी पुणे मंडळाच्या सोडतीतही करुन सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या सुलभ, लोकाभिमुख, प्रशासकीय कार्यप्रणालीची प्रचिती द्यावी, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 अशी आहे लॉटरीची पूर्ण प्रक्रिया    

 पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 5 सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक 9 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे-हरकती 12 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

 





Source link

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!



Gautami Patil father Passed away : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Ravindra Patil) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.
 



Source link

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?


Who Is Manoj Jarange: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एका घटनेनं ढवळून निघालं आहे. ही घटना म्हणजे जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर केलेला लाठी चार्ज. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी हा लाठी चार्ज झाला तिथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक आंदोलन करत होते. लाठी चार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यासारखे नेते मागील 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे यांना भेटू आले आहेत. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्व आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे आहेत तरी कोण?

मराठा आंदोलनासाठी जमीन विकली

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.

मागील एका दशकाहून अधिक काळापासून संघर्ष

पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली. मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

काही काळ काँग्रेसमध्ये काम केलं

मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगेच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप झाले.

मोर्चे, आंदोलने, चळवळ

मराठा आरक्षणासाठी मनोज यांनी आतापर्यंत 30 ते 40 आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहागडपासून मंत्रालयावर 60 किमीपर्यंत मोठा मोर्चाही त्यांनी नेला होता. या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची राज्यभर चर्चा झालेली.  त्यांनी अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण का गरजेचं आहे याबद्दल माहिती देऊन मराठ्यांना एकत्र केले. अनेकदा त्यांनी आपली निवेदने आणि मागण्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठेही झिजवले आहेत. ते अनेकदा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावरही गेले.  मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या सांगण्यानुसार, या माणसाचं आजपर्यंतच निम्मं आयुष्य हे मोर्चे, आंदोलने, चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यात गेलं.





Source link

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम


Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. तर मागण्यांसाठी एक महिन्यांचा वेळ देण्याची विनंती गिरीश महाजनांकडून करण्यात आली. तेव्हा जालन्यातलं उपोषण सुरुच राहणार असल्याचं समजते.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलीय. मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत औरंगाबाद विभागीय आयुक्त तसंच जालना, नांदेड, लाहूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होतील. 

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे  प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची बैठक

जालनातल्या आंदोलनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आल आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे  प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. महसूल मंत्री राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांच्या दालनात ही बैठक आयोजीत करण्यात आलीय..प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता येण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधलाय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती फडणवीसांनी जरांगेंना दिलीय. पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला पाहिजे होते.. सरकार पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत नसल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलंय.. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय. मराठा आंदोलकांची लवकरच सरकारसोबत बैठकही होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू

जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. तसंच सभा, मिरवणुका आणि मोर्चावरही बंदी असेल. अप्पर जिल्हाधिका-यांनी हे आदेश लागू केलेत. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश काढण्यात आलेत. 4 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. पोलीस अधिक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका आणि मोर्चाला हे आदेश लागू नसतील.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp