by Hansraj Agrawal | Aug 11, 2023 | Trending News
Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 11, 2023 | Trending News
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 10, 2023 | Trending News
पुढील
बातमी
ऐन गणेशोत्सवात कांदा रडवणार, गृहिणींचे बजेट कोलमडणार; किती असेल भाववाढ?
Source link
by Hansraj Agrawal | Aug 10, 2023 | Trending News
Maharashtra Rain : यंदाच्या वर्षी पावसानं महाराष्ट्र निर्धारित तारखेपेक्षा उशिरानं गाठला. त्यातही जून महिन्यात तो काही फारसा बरसला नाही. पण, जुलै महिना मात्र पावसानंच गाजवला. ऑगस्ट महिन्यात हा मोसमी पाहुणा पुन्हा एकदा लपंडाव खेळताना दिसला. आता ऑगस्ट महिना सुरु होऊन पहिले दहा दिवसही ओलांडले तरी राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं.
मधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीनं अनेकांची त्रेधातिरपीट उडवली खरी पण, ही सर पाणीटंचाईसारख्या समस्या मिटवण्यास पुरेशी नाही हीच वस्तुस्थिती. राज्यात आता पुढचे काही दिवस नेमकं कसं पर्जन्यमान असेल यांची अनेकांनाच चिंता लागून राहिलेली असताना आता नव्यानं हवामानाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर येत्या काही दिवसांत पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आठवडी सुट्टी पाऊस गाजवणार…
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पुढील दोन दिवसांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आला आहे.
तिथं विदर्भातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात येणाऱ्या सातारा, कोल्हापूर भागातही पावसाची हजेरी असेल असं सांगिण्यात आलं आहे. ज्यामुळं या आठवड्याचा शेवट पावसानं होईल हे आता स्पष्ट होत आहे.
उत्तर भारतात पावसाचा जोर…
तिथं उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं चांलगा जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळं सखल भागांमध्ये असणाऱ्या गावांना याचा पटका बसताना दिसत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 9, 2023 | Trending News
Ahmednagar Crime News : CID या क्राईम शो मध्ये कोणताही पुरावा नसताना CID ची टीम आरोपींचा छडा लावतात. CID पेक्षा भारी Investigation अमहमदनगरच्या राजूर पोलिसांनी केले आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरुन खुनी शोधला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्याचा छडा पोलिसांनी लावला. एका सॅनेटरी पॅडमुळे पोलीसांना हे शक्य झाले आहे.
नेमकं काय घडलं?
अमहमदनगरच्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परीसरात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलीसांना आढळून आला होता. महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मृतदेहाती ओळख पोलिसांना पटली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
सॅनिटरी पॅडवरुन असा सापडला खुनी
महिलेच्या मृतदेहाजवळ पोलीसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. ही महिला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असून या महिलेचे नाव कल्याणी महेश जाधव असल्याचे पोलिसांना समजले. जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीसांनी या महिलेच्या घराता पत्ता तसेच इतर माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले आणि तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पतीनेच केली हत्या
आरोपीने आधी पोलिसांना उडवाउडीवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून पती महेश जाधव आणी त्याचा भाचा मयूर साळवे यांनी खुन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीसांनी दोघांनाही गजाआड केले असून पोलीसांनी केवळ सॅनेटरी पॅडच्या माध्यमातून केलेल्या तपासामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरफोडी करून मुंबई, ठाणे,नवी मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना अटक
मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्याचबरोबर डोंबिवली शहरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघां सराईत चोरट्यांना डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख आणि नौशाद आलम असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. मौजमजा करण्यासाठी हे दोघे घरफोडया करायचे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 200 ग्रॅम वजनाचे सोने, त्याचबरोबर 20 लाखांपेक्षा जास्त रोकड हस्तगत केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस बंद घर हेरून त्या घरांमध्ये ते घरफोडी करून पोबारा करायचे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 8, 2023 | Trending News
Narayan Rane On Arvind Sawant: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन (No Confidence Motion) जोरदार घमासान पहायला मिळालं. चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचे दोन खासदारांच्या हमरीतुमरी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे चांगलेच बरसले. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना चांगलंच फटकारलं. औकात शब्दांचा उल्लेख राणे यांनी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ (Narayan Rane Video) शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे दाखवताना दिसत आहे, असं म्हणत चतुर्वेदी यांनी सडकून टीका केली आहे. अरविंद सावंत यांनी यापुढे भाजप आणि पंतप्रधानजी आणि अमितजी शाह यांच्यावर बोट जरी उगारलं तर तुमची औकात मी काढेल.. काय खरं आहे ते मी बाहेर काढेल, असं नारायण राणे (Narayan Rane On Arvind Sawant) यांनी म्हटलं आहे.
पाहा Video
अविश्वास प्रस्तावावर बोलताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना, हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता. त्यावरून राणे यांनी पुढचा मोर्चा सांभाळला.
आणखी वाचा – ‘अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं….’, चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले तेव्हा तुम्हाला हिंदुत्व नाही आठवलं का? पक्ष वाढवायला पण ताकद लागते, असं नारायण राणे म्हणाले. त्यावेळी नारायण राणे यांनी अरविंद सावंत यांना शिंगावर घेतलं. हा शिवसेनेत कधी आला? मी 1966 चा शिवसैनिक आहे… अरे बस खाली बस, असं म्हणत असताना संसदेचा पारा चढला. त्यावेळी त्यांनी औकात शब्दाचा वापर करत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. त्यानंतर मोठा वाद झाल्याचं दिसून आलं.
Source link