TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी


Thane Municipality Job: ठाणे महानगरपालिकेअंतर्गत काही दिवसांपुर्वी ज्युनिअर रेसिडन्स पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 1 महिला आणि 5 पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक पदे भरली जातील. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठविणे आवश्यत आहे. 

ही भरती  तात्पुरत्या स्वरूपाची असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने 6 महिन्याकरिता काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्याचे काम बघून किंवा तेथील कामाची गरज ओळखून हा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचे उमेदवारांना पालन करावे लागेल. 

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करताना बंद लिफाफ्यावर ‘जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता’ असे ठळक अक्षरात नमूद करावे. 

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

उमेदवारांनी आपले अर्ज नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. दिलेल्या मुदतीनंतर आणि चुकीच्या पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

ठाणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ‘शिका आणि कमवा’

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये  पदवीधर अप्रेंटिस,  डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या तब्बल 647 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.  23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 





Source link

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?


प्रशांत परदेषी, झी मीडिया, नंदुरबार :  शाहरुखच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा महाराष्ट्रात आहे.  नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या 4 वर्षापासून दुर्घटना होत आहेत. जोवर सरकार उपाययोजना करत नाही तोवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे (Nandurbar Baradhara Waterfall).

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक पर्यटनाची संधी

गुजरात राज्य नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा परिसर पर्यटन पंढरी म्हणून विकसित करीत आहे. मात्र, याच सरोवराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या महाराष्ट्राला या निसर्गाच्या उधळणीचा आणि सरोवराच्या पाण्याचा लाभ घेता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवरा लगत स्टॅचू ऑफ युनिटी उभारला आणि त्याच भागात जागतिक पर्यटन केंद्र विकसित केले. तशीच किंबहुना त्याहून सरस नैसर्गिक पर्यटनाची संधी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मात्र महाराष्ट्र सरकाराच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे या भागातील पर्यटन विकासाकडे लक्ष दिले गेलेलं नाही. 

पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी

गुजरात सरकार आणि त्याच्या मदतीला केंद्र सरकार सरोवराच्या शेजारी ज्या पद्धतीने मोठ्या उद्योजकांना पूरक भूमिका घेऊन केवडीया परिसरात एकामोगोमाग एक पर्यटन केंद्र विकसित करीत आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात उद्योग धार्जिणे धोरण न अंमलात आणता स्थानिकांना सोबत घेऊन त्यांची उन्नती होईल या विचाराने पर्यटन विकास केला गेला तर या भागातील स्थलांतर, कुपोषण, बेरोजगारी , निरक्षरता असे सर्व प्रश्न निकाली निघणार आहेत.  सातपुड्याच्या या डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ, डाब हि थंड हवेची ठिकाणे आहेत. शेकडो मैल नर्मदेचे अडवलेले पाणी आहे.  बिलगावचा ऐतिहासिक धबधबा याच भागात आहे. महूची फुल .. औषधी वनस्पती .. असं निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर नेहमी पर्यटन विकासापासून लांब राहिला आहे.  

12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा प्रवाहित होतो

बिलगावच्या या धबधब्याला बारामुखी धबधबा ही म्हटलं जातं. उदय नदी वर असलेला हा धबधबा पावसाळ्यामध्ये सर्व पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. 12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा वाहण्याच बहुदा हे देशातलं एकमेव ठिकाण असेल. एकाच डोंगरावरून बारा ठिकाणावरून कोसळणारा हा धबधबा आपलं रौद्ररूप धारण करतो, तेव्हा चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडतो. 

धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा 

अभिनेता शाहरुख खान यांचा स्वदेश चित्रपट याच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी नर्मदा सरोवराच्या याच धबधब्यावर  ऊर्जा  प्रकल्प उभारला असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र आता या प्रकल्पाचे कुठले अवशेष त्या ठिकाणी नसले, तरी हा धबधबा मात्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. हा धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा देखील आहे. या ठिकाणी धबधब्याच सुंदर रूप पाहून अनेक जणांना पाण्यात उतरण्याचा मोह टाळला जात नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण या ठिकाणी बळी पडतात. हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक ग्रामस्थांनी आता या धबधब्यावर सुरक्षा कठळे निर्माण होत नाही तोवर पर्यटकांना बंदी घातली आहे. शासनाने या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पर्यटन या ठिकाणी सुरू होऊ शकेल आणि या भागातल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचे एक नाव साधन उपलब्ध होईल.  





Source link

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्… लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्… लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी



Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.



Source link

…तर मी अमेरिकेला निघून जाईन; ‘तो’ विषय काढताच बच्चू कडू चिडले

…तर मी अमेरिकेला निघून जाईन; ‘तो’ विषय काढताच बच्चू कडू चिडले


Bacchu Kadu : भाजपचे बडे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्य मंत्रीमडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑगस्ट महिन्यातच  शिंदे-फडणवीस-अजित पवार या महायुतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादील 9 मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप तसेच शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अपक्ष आमदार   बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये – बच्चू कडू यांची भूमिका

मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केलीय. सरकारनं आता मंत्रिमंडळ विस्तार करू नये. मंत्रीमंडळ विस्तार केलाच तर अमेरिकेला निघून जाईन, अशी खदखद आमदार कडू यांनी बोलून दाखवलीय. यापुढे सरकानं आणखी चार जणांना दुखावू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर आमच्यात कुणीही नाराज नाही आणि असलंच तर त्यांची समजूत घातली जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल आहे. 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार? 

15 ऑगस्टआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाहांसोबतच्या बैठक पार पडली. या बैठकीत विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय.. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच पालकमंत्री घोषित होतील अशीही माहिती मिळत आहे. 

तुम्ही खूप उशीर केलात – अजित पवार यांच्याबाबत अमित शाह यांचे मोठं विधान 

अजितदादा तुम्ही ब-याच काळानं योग्य ठिकाणी बसलात, खरं तर तुम्ही खूप उशीर केलात असं मोठं विधान अमित शाहांनी केलंय. पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शाहांनी जाहीरपणे हे विधान केलाय. अजितदादा तुमची जागा इथेच आहे असंही अमित शाहांनी म्हंटलंय.

जयंत पाटील अमित शाहांना भेटल्याची चर्चा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अमित शाहांना भेटले अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती मात्र या चर्चांना खुद्द पाटलांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, आपण भाजपसोबत जाणार नाही. अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. जयंत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतली अशा चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला. तर, दुसरीकडे सुमन पाटील यादेखील शरद पवारांच्या गटातच आहेत. त्या राष्ट्रवादी सोडणार नाहीत असं स्पष्टीकरण त्यांचे सुपत्र रोहित पाटील यांनी दिले. 





Source link

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा


Cabinet Expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा 15 ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात नुकतीच यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ते केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्याहस्ते केंद्रीय सहकार संस्थेनं निर्माण केलेलं पोर्टलचं लॉन्चिंग होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातं आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडुंची नाराजी 

तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं बोललं जातं आहे. मात्र यावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याची खदखद बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. 

आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जस आहे तस चालू ठेवावे. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखावू नये, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आता जे मंत्री आहे ते सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार खरच होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

Nitin Desai News: ‘माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना…’, नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!

Nitin Desai News: ‘माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना…’, नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!


Manasi Desai On Nitin Desai Death: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येनंतर आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नितीन देसाई यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असताना आता नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाईने (Nitin Desai’s daughter) भावनिक आवाहन केलं आहे. एएनआयला प्रतिक्रिया देताना मानसी देसाई भावूक झाल्याचं दिसून आली. 

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स (ECL finanace) कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा झालाय. खालापूर पोलीस ठाण्यात कलम 306 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झालीये, अशातच आता माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.

नेमकं काय म्हणाली मानसी देसाई?

माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता, असं मानसी देसाई म्हणते. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला, कर्ज फेडण्यासाठी दोन वर्ष त्यांनी कंपनीसोबत मिटिंग घेतल्या होत्या. लोन सेटलमेंट किंवा रीस्ट्रक्चर बाबत कंपनीने आश्वासन देखील दिलं होतं. इन्व्हेस्टर बाबांची मदत करायला तयार होते, मात्र त्यांनी त्यांना मदत करु दिली नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.

माझ्या बाबांनी खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे. त्यांनी खूप कष्टाने त्यांचं नाव कमवलंय, त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं मानसी नाईक म्हणते. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं. त्याचबरोबर त्यांच्या शेवटच्या इच्छानुसार, सरकारने या स्टुडियोचा ताबा घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा, असं आवाहन मानसी देसाईने केलं आहे.

दरम्यान, चित्रपटसृष्टीत नितीन देसाई उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही ओळखले जायचे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp