जालनाः क्राइम स्टोरी पाहून दोन मुलांनी सात वर्षांच्या चिमुरड्याला संपवले, रात्रभर मृतदेहाशेजारी…; कारण ऐकून पोलिसही हादरले

जालनाः क्राइम स्टोरी पाहून दोन मुलांनी सात वर्षांच्या चिमुरड्याला संपवले, रात्रभर मृतदेहाशेजारी…; कारण ऐकून पोलिसही हादरले


Jalna Crime News: जालनात्यातील एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती इंग्लिश स्कुलच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आणि दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच हॉस्टेलमधील दोन अल्पवयीन बालकांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन आरोपींनी मोबाईलवर क्राईम स्टोरीज पाहून हा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन दोन बालकांना ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी केलीय. 

जालन्यातील भोकरदनच्या याच गणपती विद्यालयात दुसरी च्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या बालवीर पवारचा रात्रीच्या वेळी दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनं भोकरदन शहर आणि तालुका हादरून गेला होता. दोन दिवसांपूर्वी बालवीरचा हॉस्टेलच्या परीसरात मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आणि पोलीस तपास सुरू झाला. बालवीरच्या हत्येप्रकरणी तपासा दरम्यान पोलिसांनी याच शाळेच्या हॉस्टेलमधून एक 14 आणि दुसऱ्या 8 वर्षाच्या अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतलं आणि या दोन्हीही मुलांनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली

पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना या हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. अल्पवयीन दोन्हीही आरोपींचे बालवीरसोबत शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून भांडण होत होतं. तसेच हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी दोन कप्प्यांचे बेड असल्यानं वर झोपलेल्या बालकाकडून पेन्सिल अथवा पेन सतत खाली पडण्यावरून देखील त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे या दोन अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केला. हा खून केल्यानंतर अल्पवयीन आरोपी रात्रभर बालवीरच्या पार्थिवावर ब्लॅंकेट टाकून या पार्थिवा शेजारी देखील बसून राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. विशेष म्हणजे या तपासा दरम्यान या अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा खून मोबाईलमध्ये क्राईम स्टोरी पाहून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यामुळे पालकांनी आपली लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात याकडे लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय

भोकरदनमध्ये 2 रीच्या वर्गात शिकणाऱ्या बालविरच्या हत्येनं सध्या भोकरदन शहर सुन्न झालंय. या खुनाच्या घटनेने बालविरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शाळा अथवा हॉस्टेलमध्ये लहान मुलांच्या भांडणांच्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे या घटनेने अधोरेखीत केलंय





Source link

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? विकासकामांना मंजुरीआधी मान्यता घेण्याच्या सूचना?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? विकासकामांना मंजुरीआधी मान्यता घेण्याच्या सूचना?



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हातात निर्बंधांची छडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास खात्याला कोणत्याही योजनेसाठी परस्पर निधी देता येणार नाही. कोणताही निधी मंजूर करताना एकनाथ शिंदेंनाही फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.



Source link

पुण्यानंतर ठाण्यात खळबळ! तलवारीने हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक

पुण्यानंतर ठाण्यात खळबळ! तलवारीने हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक



ठाण्यात तलवारीने हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 



Source link

मुंबईच्या सावली बारवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलं! मंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावाने डान्सबार सुरु केल्याचा आरोप

मुंबईच्या सावली बारवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलं! मंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावाने डान्सबार सुरु केल्याचा आरोप



मुंबईतील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा मुद्दा शिवसेना UBTच्या अनिल परब यांनी पुन्हा उचलून धरला. अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांना खडे बोल सुनावलेत.



Source link

'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO

'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO


Manikrao Kokate New Video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण आयुष्यात कधीच रमी खेळलो नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?”.

“विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

कोकाटेंनी काय म्हटलं आहे?

“हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं,” असा दावा माणिकराव कोकाटेंनी केला आहे. 

“मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 





Source link

संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी नामदेव' कसे झाले? शीख धर्मावर काय आहे प्रभाव

संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी नामदेव' कसे झाले? शीख धर्मावर काय आहे प्रभाव


संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील संत पण पंचाबमध्ये ते ‘बाबाजी’ कसे झाले? महाराष्ट्र ते पंजाब हा प्रवास नेमका कसा होता. महाराष्ट्रातील संत पंजाबमध्ये भगत नामदेव किंवा बाबाजी कसे झाले? हे पाहूया. 

संत नामदेवांचा पंजाबशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी पंजाबमध्ये बराच काळ घालवला, विशेषतः गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमानमध्ये, जिथे ते सुमारे वीस वर्षे राहिले. तेथे त्यांनी भक्ती आणि कीर्तनाद्वारे लोकांना प्रबोधन केले, ज्यामुळे ते “बाबा नामदेव” म्हणून लोकप्रिय झाले. संत नामदेवां यांचे पंजाब येथील घुमानमधील निवासस्थान आहे. संत नामदेवांनी घुमानला त्यांची कर्मभूमी बनवले आणि तेथे एक मंदिर देखील आहे जे त्यांची समाधी म्हणून ओळखले जाते.

त्यांनी पंजाबी भाषा शिकली आणि ती त्यांच्या प्रवचनांमध्ये आणि भजनांमध्ये वापरली, ज्यामुळे स्थानिक लोक त्यांच्याशी जोडले गेले. एवढेच नव्हे तर संत नामदेवांनी घुमानमधील लोकांना वाईट सवयी आणि व्यसनांपासून दूर राहण्यास प्रेरित केले, ज्यामुळे गावात सकारात्मक बदल झाला.
संत नामदेवांच्या काही स्तोत्रांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये देखील आहे, जो त्यांचा प्रभाव दर्शवितो.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध प्रस्थापित करण्यात संत नामदेवांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये प्रेम आणि एकता वाढली. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख संत होते, ज्यांनी महाराष्ट्रात भक्ती चळवळ लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शिखांसाठी पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांचे ६१ श्लोक समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी दोन्ही राज्यांमध्ये एक मजबूत संबंध प्रस्थापित केला आणि आजही त्यांना पंजाबमध्ये “बाबा नामदेव” म्हणून ओळखले जातात. संत नामदेवांनी धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला आणि त्यांच्या शिकवणी आजही लोक पाळतात. संत नामदेवांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये कविता रचल्या आणि त्यांच्या काही श्लोकांचा गुरु ग्रंथ साहिबमध्येही समावेश आहे.





Source link