उद्धव ठाकरेंची साथ सोडून राज सत्तेत सहभागी होणार? 'त्या' विधानाने खळबळ; 'परफेक्ट फिगर'ही जुळणार?

उद्धव ठाकरेंची साथ सोडून राज सत्तेत सहभागी होणार? 'त्या' विधानाने खळबळ; 'परफेक्ट फिगर'ही जुळणार?


Maharashtra Municipal Corporation Election: राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत आज निघत असतानाच दुसरीकडे महापालिकांमध्ये कोणता पक्ष बहुमतात आहे आणि कोण या महापौरपदावर दावा सांगणार यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तर एकत्र निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपलाच महापौर बसवण्यावरुन एवढी चुरस होती की अखेर शिंदेंनी ज्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध निवडणूक लढली त्यांचाच पाठिंबा घेतला आहे.

Add Zee News as a Preferred Source

राज ठाकरेंच्या मनसेनं हा पाठिंबा दिल्याने दुसरीकडे उद्धव ठाकरे दुखावले असून राज ठाकरेंनीही खासदार संजय राऊतांशी संवाद साधताना हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. कल्याण-डोंबिवली पॅटर्नमुळे मुंबई महानगरातील 10 महानगरपालिकांमध्ये अगदी एकमेकांविरोधात लढलेल्या पक्षांचीही युती होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत की काय अशी चर्चा असतानाच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनाही असेच संकेत दिले आहेत. 

नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांशी संवाद साधताना नांदगावकरांना, “कल्याण-डोंबिवलीत झालं ते मुंबईत घडणार नाही?” असा सवाल विचारण्यात आला. यावर नांदगावकरांनी, “त्यावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही कारण राजकारणात काहीही घडू शकतं. चंद्रपूरला भाजपा आणि काँग्रेस एकत्र आहे. कोकणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र आहेत,” असं उत्तर दिलं. 

‘ज्यांच्याविरोधात लढला त्यांच्यासोबत…’

“ज्यांच्याविरोधात लढला त्यांच्यासोबत जात आहात,” असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर नांदगावकरांनी, “आम्ही कुठे गेलो त्यांच्यासोबत? तो निर्णय स्थानिक स्तरावर झाला आहे. तिथल्या नेत्याला अधिकार दिलेले तसा निर्णय त्यांनी घेतला आहे,” असं उत्तर दिलं. “कुठे कोणते निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले.

मनसे शिंदे आणि भाजपासोबत जाणार?

नांदगावकरांनी केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच ठाकरेंची युती तोडून 6 जागांसहीत राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीप्रमाणे सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपा आणि शिंदे सेनेला पाठिंबा देणार का अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या भाजपाकडे 89 आणि शिंदेंकडे 29 जागा आहेत. म्हणजेच बहुमतापासून युती 108 जागांसहीत अवघ्या 6 जागा दूर आहे. या सहा जागा मनसेच्या माध्यमातून मिळू शकतात. 

मुंबईतील संख्याबळाची स्थिती काय?

भारतीय जनता पक्ष (BJP): 89 जागा (सर्वात मोठा पक्ष)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे – UBT): 65 जागा (एका बंडखोरीमुळे संख्या 64 वर)
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 29 जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress): 24 जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 6 जागा
एआयएमआयएम (AIMIM) – 8 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 3 जागा
समाजवादी पक्ष (SP)- 2 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 1 जागा

मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकूण 227 पैकी 114 जागांची गरज आहे.





Source link

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाकडून प्रस्ताव, मातोश्रीवरील बैठकीत मोठा निर्णय

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाकडून प्रस्ताव, मातोश्रीवरील बैठकीत मोठा निर्णय


Uddhav Thackeray Shivsena ready for alliance with BJP Eknath Shinde: कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकच आम्ही भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. जर सन्मानजक प्रस्ताव आला तर आम्ही विचार करुन असं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. मातोश्रीबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. 

Add Zee News as a Preferred Source

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. गटनेते उमेश बोरगावकर यांनी भेटीनंतर सांगितलं की, “आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. निवडणुकीनंतर सर्वांची भेटण्याची इच्छा होती. पुढील वाटचाल कशी असायला पाहिजे या संदर्भात चर्चा केली व साहेबांनी मार्गदर्शन केलं”. 

“जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने प्रस्ताव दिला आणि तो सन्मानपूर्वक तर त्याबाबत विचार कसा करावा याबाबत चर्चा झाली,” अशी माहिती त्यांनी दिली. इतर पक्षांनी आमच्याशी संपर्क साधल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली. 

‘भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क साधला’

ते म्हणाले की, “पाठिंबा मागण्यासाठी आमच्याशी भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क साधला आहे. जर सन्मान होत असेल तर त्या प्रस्तावाचा विचार करु”. शिदेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता त्यांनी तसा प्रस्ताव येऊ द्या असं म्हटलं. प्रस्ताव आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पातळीवर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

‘भाजपाकडून प्रस्ताव आला आहे’

आमची यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. अन्यथा सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकतो असं ते म्हणाले आहेत. “आम्हाला शिंदेंसोबत जाण्याचं काही वावडं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. आमची दीपेश म्हात्रेंसोबत चर्चा झाली असून, त्यांनी प्रस्ताव दिला आहे. भाजपाकडून प्रस्ताव आला आहे. त्याबाबत चर्चा सुरु असून, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ,” असं त्यांनी सांगितलं. 

“जे नॉट रिचेबल आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे. गटनेता म्हणून मी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांचं सदस्यत्व पद धोक्यात आलं आहे. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण काही झालेला नाही. आता ते लपलेत, किडनॅप केलंय की अन्य काही हे येत्या काही दिवसांत उघड होईल,” असं त्यांनी सांगितलं आहे. 

चार नगरसेवक ‘नॉट रीचेबल’

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे ,कीर्ती ढोणे ,राहुल कोट, स्वप्नाली केणे हे नवनिर्वाचिक नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने कल्याण डोंबिवलीतील सस्पेन्स वाढला आहे. 

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यासंदर्भात महायुतीचा महापौर, भाजपाचा दावा

या सर्व घडामोडींदरम्यान भाजपाने मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात भाजप शिवसेना महायुतीचाच महापौर होणार असा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दौऱ्यावरून परतल्यावर भाजप नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच सविस्तर चर्चा झाली होती.





Source link

'थर्ड मुंबई'साठी थेट दावोसमधून गुंतवणूक; CM फडणवीसांच्या पुढाकारानं रायगडमधील 'या' भागाच्या विकासाला आणखी वेग

'थर्ड मुंबई'साठी थेट दावोसमधून गुंतवणूक; CM फडणवीसांच्या पुढाकारानं रायगडमधील 'या' भागाच्या विकासाला आणखी वेग



Devendra Fadnavis Davos 2026 : कोणत्या कंपन्यांनी केलीय गुंतवणूक? काय आहे या कंपन्यांची इच्छा, कसं असेल विकासाचं स्वरुप आणि कोणाला होणार याचा फायदा? जाणून घ्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममधील महत्त्वाची बातमी… 
 



Source link

कल्याणच्या राजकारणात उलथापालथ, ठाकरे-शिंदेंचे जिल्हाप्रमुख एकमेकांना भेटले; काय घडलंय नेमकं?

कल्याणच्या राजकारणात उलथापालथ, ठाकरे-शिंदेंचे जिल्हाप्रमुख एकमेकांना भेटले; काय घडलंय नेमकं?


Kalyan Politics: महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू झालीय. कल्याण-डोंबिवली महापालिकेत (केडीएमसी) बहुमत मिळवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात तीव्र स्पर्धा दिसतेय. येथे एकूण 62 नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. शिंदे गटाकडे 53, तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाकडे 11 आणि मनसेकडे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. या स्थितीत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसते. यामुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ता कुणाच्या हाती जाईल? याबाबत उत्सुकता वाढलीय. दरम्यानच्या काळात काय घडलंय? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

राजकीय गोंधळ वाढला 

केडीएमसीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्याकडून ठाकरे गट व मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचे आरोप होत आहेत. या प्रयत्नांमुळे ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अचानक अज्ञात ठिकाणी गेल्याची बातमी समोर आली आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. यामुळे राजकीय गोंधळ वाढला असून, नगरसेवकांची पळापळ सुरू झाली आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी, विरोधकांकडून संपर्क होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशा स्थितीत, महापालिकेत स्थिरता कशी येईल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्काबाहेर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले की, हे दोघे ठाकरे यांच्याच संपर्कात आहेत. यामुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले असून, पुढील काही तासांत निर्णय होईल, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील म्हणाले. 

राजकीय वर्तुळात चर्चा 

शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली. ही भेट आशीर्वाद घेण्यासाठी आणि कौटुंबिक असल्याचे दोघांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाचे नॉट रिचेबल नगरसेवक ठाकरेंच्याच संपर्कात आहेत. मात्र शरद पाटील यांनी या भेटीला कौटुंबिक म्हटले आणि नगरसेवकांवर कारवाईचा उल्लेख केला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा 

केडीएमसीमध्ये सत्ता कुणाकडे जाईल, याबाबत अनिश्चितता आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वर्चस्वाची लढाई असली तरी, ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या हालचालींमुळे तणाव वाढलाय. नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याने पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा पुढे आलाय. यामुळे महापौर निवडीसाठीचे प्रयत्न अधिक जोरदार होत आहेत. राजकीय नेते सतर्क असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?

सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?



महापालिकांचे निकाल लागताच आता सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिलाय.. 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.



Source link

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'


Ekanth Shinde on Mayor of Mumbai: मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर आता, मुंबईचा महापौर कोण होणार? याचे सर्वांना वेध लागले आहेत. महापौरपदासाठी भाजपा उद्धव ठाकरेंसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे दावे केले जात आहेत. एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपा मुंबईत रणनिती आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपा मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असंही त्यांनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईमध्ये महानगर निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले. 

यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितलं.

“आम्ही बहुमताचा आदर करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुंबईत सध्या अफवा, अपप्रचार सुरु असून त्याला मी उत्तर देताना इतकंच सांगतो की, महायुतीला बहुमत दिलं असून महायुतीच महापौर होईल. ठाणे, कल्याण डोंबिंवली, उल्हासनगर तसंच राज्यातील इतर शहरात जिथे एकत्र लढलो आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो. काही महापालिका सोडल्या तर महायुतीची एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. लोकांनी विकासाला स्विकारलं आहे. भावनिक मुद्द्यांनाही लोकांनाही नाकारलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आदर करण्याचं काम महायुती करणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“विरोधकच चर्चा पसरवत आहेत. हारल्यानंतरही टांग उपर अशी स्थिती आहे. खोट्या अफवा पसरवणं, आरोप करणं हेच त्यांचं काम आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाची आवश्यकता नाही. शिवसेना आणि भाजपा अनेक ठिकाणी बहुमतात आहोत. त्यामुळे नगरसेवक पळण्याची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल,” असं त्यांना ठामपणे सांगितलं आहे. 

“बार्गेनिंग करणं, महापौरपदाबद्दल कोणताही वाद, संभ्रम नाही. मुख्यमंत्री आता दावोसला आहेत, आल्यावर चर्चा होईल. चर्चेनंतर समन्वयाने निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणताही दावा केलेला नाही. सत्ता आणि खुर्ची नाही तर विकास हेच आमचं ध्येय आहे. मुंबईला काय देणार, मुंबईचा विकास कसा करणार हे ध्येय आहे. सर्व अफवा आहेत त्याकडे लक्ष दिलं जाऊ नये,” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

“नवीन नगरसेवक निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं. कसं काम करायचं, आदर्श वॉर्ड यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. उद्या गट स्थापन झाल्यानंतर आपल्या वॉर्डात जातील. आमच्या नगरसेवकरांवर अविश्वास दाखवण्याची गरज नाही. उलट जे अफवा पसरवत आहेत त्यांनी आपल्या नगरसेवकांची चिंता करावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp