महाराष्ट्रातील रुम मालकांसाठी आनंदाची बातमी, फक्त फ्लॅटच नव्हे त सोसायटीच्या जमिनीतही मिळणार हिस्सा!

महाराष्ट्रातील रुम मालकांसाठी आनंदाची बातमी, फक्त फ्लॅटच नव्हे त सोसायटीच्या जमिनीतही मिळणार हिस्सा!


Vertical Property Card: आता फ्लॅट घेतला की फक्त छत नव्हे, तर खालची जमीनही तुमचीच! महाराष्ट्र सरकार लवकरच ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ आणत आहे. यामुळे 50-100 मजली इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाला इमारतीखालच्या जमिनीतील त्याचा नेमका हिस्सा कायदेशीर कागदावर मिळेल. सातबारा उताऱ्यावरही तुमचे नाव चढणार आहे. काय आहे नेमका हा कायदा?

Add Zee News as a Preferred Source

आतापर्यंत काय होते?

तुम्ही 50 लाखांचा फ्लॅट घेतला तरी जमिनीचा मालकीहक्क सोसायटीच्या नावावर किंवा 100 जणांच्या संयुक्त नावावर असायचा. बँक लोन, विक्री, वारसाहक्क यात प्रचंड गोंधळ! ‘माझी जमीन किती?’ हे कोणालाच सांगता येत नव्हते.

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारने आज देशातील सर्वात मोठी संपत्ती-क्रांती जाहीर केली. आता प्रत्येक फ्लॅटमालकाला ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार असून, त्यात फ्लॅटसह खालच्या जमिनीचा वैयक्तिक हिस्सा कायमचा नोंदवला जाणार आहे!“आजपासून फ्लॅट म्हणजे फक्त छत नव्हे, तर जमिनीचा मालक!” असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.या कार्डमध्ये इमारतीचे एकूण क्षेत्रफळ, तुमचा नेमका हिस्सा (उदा. 1/150 हिस्सा) आणि QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्यावर तुमचे नाव शेतकऱ्याप्रमाणे चढणार आहे. नवीन फ्लॅटना 1 जानेवारी 2026 पासून हे कार्ड सक्तीचे, तर जुन्या 2 कोटी फ्लॅटमालकांना केवळ 500 रुपयांत 2027 पर्यंत मिळेल. बँक लोन, रिडेव्हलपमेंट, वारसाहक्क आता 48 तासांत मिळेल.“60 वर्षांची गुंतागुंत एका कार्डाने संपली. महाराष्ट्राने देशाला नवा आदर्श दिल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नवीन कार्ड काय देणार?  

मुख्य प्रॉपर्टी कार्डसोबतच तुम्हाला वैयक्तिक ‘व्हर्टिकल कार्ड’चे फायदे मिळतील. उदाहरणार्थ इमारतीखालील एकूण चटई क्षेत्रफळ 10 हजार चौ.फूट आहे.   त्यात तुमचा नेमका हिस्सा 99.25 चौ.फूट जमीन अधिक 800 चौ.फूट हवेतला भाग असेल.  यात QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असल्याने छेडछाड अशक्य आहे.

सातबारा उताऱ्यावर नाव

आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याप्रमाणे मुंबई-पुण्यातल्या फ्लॅटमालकाचाही सातबारा उताऱ्यावर हिस्सा दिसेल! ‘गट नं. 456/2, हिस्सा 1/120’ असे लिहिले जाईल. वारसनोंद, विक्री, गहाण ठेवणे सोपे होणार.

का आणली ही क्रांती?  

रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर फसवणूक करायचे. बँका लोन देण्यास नकार द्यायच्या. न्यायालयात १५-२० वर्षे खटले चालायचे अशा विविध कारणांमुळे 2 कोटींहून जास्त फ्लॅटमालक हैराण होते 

कधी मिळणार?

उच्चस्तरीय समितीचा अहवाल डिसेंबर 2025 पर्यंत येणार. जानेवारी 2026 पासून नवीन फ्लॅटना तरतूद सक्तीची, जुन्या इमारतींना 2 वर्षांत अपडेट करता येणार. अवघ्या ₹500 शुल्कात तुमची जमीन तुमच्या नावावर!आता फ्लॅट म्हणजे खरोखरच ‘माझ्या मालकीची जमीन + त्यावरचे माझे घर’! सरकारने 60 वर्षांची गुंतागुंत एका कार्डाने संपवली आहे.  

FAQ

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड१. प्रश्न: व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नेमके काय आहे?

उत्तर: हे एक स्वतंत्र कायदेशीर कागदपत्र आहे जे तुम्हाला तुमच्या फ्लॅटसह इमारतीखालच्या जमिनीतील तुमचा नेमका हिस्सा (उदा. १/१०० किंवा ९९.५० चौ.फूट) कायमस्वरूपी देते. हे मुख्य प्रॉपर्टी कार्डला जोडलेले असते आणि QR कोडसह डिजिटल स्वाक्षरी असते.

प्रश्न: माझ्या जुन्या फ्लॅटला हे कार्ड कधी आणि कसे मिळेल?

उत्तर: जानेवारी २०२६ पासून नवीन इमारतींना हे कार्ड सक्तीचे होईल. जुन्या सोसायट्यांना २ वर्षांत (डिसेंबर २०२७ पर्यंत) फक्त ₹५०० शुल्क भरून सोसायटीमार्फत अर्ज करता येईल. सातबारा उताऱ्यावरही तुमचे नाव आपोआप चढेल.

प्रश्न: याचा मला काय फायदा होईल?

उत्तर:  बँक लोन त्वरित मिळेल.रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर फसवू शकणार नाही. विक्री-वारसाहक्क २ दिवसांत पूर्ण होईल.न्यायालयात खटला चालण्याची वेळ १५ वर्षांऐवजी १५ दिवस! तुम्ही खरोखरच “जमिनीचे मालक” व्हाल, फक्त “फ्लॅटचे” नव्हे!





Source link

बॉयफ्रेण्डकडून 12 वर्षाच्या पोटच्या लेकीचं करुन घेतलं लैगिक शोषण, आईचं कृत्य ऐकून येईल संताप!

बॉयफ्रेण्डकडून 12 वर्षाच्या पोटच्या लेकीचं करुन घेतलं लैगिक शोषण, आईचं कृत्य ऐकून येईल संताप!


Kerala Crime: आई म्हणजे मुलीला जगाची ओळख करुन देणारी पहिली हक्काची मैत्रिण. जगात कसं वावरायला हवं? काय बरोबर? काय चूक? याबद्दल आई लेकीला वेळोवेळी समज देत असते. लेकीच्या भल्यासाठी आयुष्यभर झटत असते. पण आईच आपल्या लेकीच्या लैंगिक शोषणासाठी कारणीभूत ठरत असेल तर?  केरळच्या मंजेरी येथे आई-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय.  

Add Zee News as a Preferred Source

केरळमधील विशेष पोस्को न्यायालयाने एका आईला लैंगिक शोषणासाठी 180 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अशरफ ए.एम. यांनी हे गुन्हेगार पोस्को कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवले. प्रत्येक घटनांसाठी 40 वर्षे तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांचा दंड असे एकूण 11.75 लाखांचे दंड ठोठावले. दंड न भरल्यास अतिरिक्त 20 महिने तुरुंगसेवा भोगावी लागेल. 

मुलीचे बालपण उद्ध्वस्त

तिरुवनंतपुरम येथे पती आणि मुलीसोबत सुखी जीवन जगणारी 30 वर्षीय महिला फोनद्वारे एका 33 वर्षीय पुरुषाशी मैत्री करून 2019 मध्ये घर सोडून पळून गेली. पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील भाड्याच्या घरात ती मुलीसह राहू लागली. डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 या काळात बॉयफ्रेण्डने मुलीवर अनेकदा बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आईने यात सक्रिय सहभाग घेतला. तिने मुलीला मद्य पाजण्यास भाग पाडले, अश्लील व्हिडिओ दाखवले आणि सर्व जगजाहीर करेन अशी धमकी दिली तसेच मुलीला त्यांच्या लैंगिक क्रियांचे साक्षीदार होण्यास भाग पाडले, ज्यामुळे तिच्या निष्पाप मनावर कायमची जखम बसली.

न्यायालय काय म्हणाले? 

‘जेव्हा आईचे स्नेहभावनाही वासनेच्या आगीत भस्म होतात, तेव्हा बालक कोणावर अवलंबून राहू शकते?’ असे न्यायाधीश अशरफ ए.एम. यांनी म्हटले. विशेष सरकारी वकील सोमसुंदरन ए. यांनी सांगितले की, ही महिलेला पोस्को प्रकरणात दिलेली सर्वात कठोर शिक्षा आहे. आईने केवळ पाहिले नाही तर गुन्ह्यात भागीदार होऊन मुलीला शांत ठेवण्यासाठी भयाच्या जाळ्यात अडकवल्याचे यात दिसून आले. 

गुपित उघडकीस कसे आले? 

2021 मध्ये मलप्पुरम येथील वनिता पोलिस ठाण्यात महिलेच्या पालकांशी वाद होऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांना समुपदेशनासाठी पाठवताना शेजाऱ्यांनी मुलीला योग्य जेवणही न मिळाल्याची खबर दिली. मुलीची दुर्दैवी स्थिती पाहून आजी-आजोबांनी चाइल्ड हेल्पलाइनला कळवले. आश्रयगृहात नेल्यानंतर मुलीने संपूर्ण कथा सांगितली, ज्यामुळे तपास सुरू झाला.

FAQ 

१. केरळमधील आई आणि सहजिवयाला किती वर्षांची शिक्षा झाली?

विशेष पोक्सो न्यायालयाने दोघांना एकूण १८० वर्षे सक्तमजुरी आणि ११.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. प्रत्येक गुन्ह्यासाठी ४० वर्षे तुरुंगवास आणि २ लाख दंड आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त २० महिने तुरुंगवास भोगावा लागेल.

२. गुन्हा कसा उघडकीस आला?

महिलेने मलप्पुरम पोलिसांत पालकांविरुद्ध तक्रार केली. पोलिस समुपदेशनासाठी गेले असता शेजाऱ्यांनी मुलीला जेवणही न मिळाल्याची माहिती दिली. आजी-आजोबांनी चाइल्डलाइनला कळवले आणि स्नेहिता आश्रयगृहात मुलीने संपूर्ण सत्य सांगितले.

३. न्यायालयाने दंडाची रक्कम काय ठरवली?

दंडाची संपूर्ण ११.७५ लाख रुपये रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी हे प्रकरण ‘मातृत्वाच्या सन्मानावर खोल जखम’ म्हटले आणि समाजासाठी भयावह इशारा असल्याचे नोंदवले.





Source link

उष्मा धारण करणार रौद्र रुप; 'इथं' काळ्या ढगांपुढं सूर्यकिरणं घेणार माघार… पुढील 24 तासांत हवामानाचे तालरंग बदलणार

उष्मा धारण करणार रौद्र रुप; 'इथं' काळ्या ढगांपुढं सूर्यकिरणं घेणार माघार… पुढील 24 तासांत हवामानाचे तालरंग बदलणार


Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशातून माघार घेतली असली तरीही महाराष्ट्राच्या काही भागांमधून मात्र पावसानं अद्यापही काढता पाय घेतला नाही. भर दिवसा, अगदी सूर्यकिरणांना दूर लोटूनही हे पावसाचे ढग येऊन क्षणात सारंकाही ओलंचिंब करून जात आहेत. ज्यामुळं आता ही रिपरिप अनेकांनाच नकोशी झाली आहे. त्यातच आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्यानं पावसानं आतातरी थांबावं असंच गाऱ्हाणं जो- तो घालताना दिसत आहे. मात्र पाऊस कोणापुढंही नमतं घेण्यात तयार नसल्याचं एकंदर परिस्थिती आणि हवामान अंदाज पाहता लक्षात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या (Mumbai Weather) मुंबई शाखेनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पुढील 24 तासांसह पुढील चार दिवसांसाठीही राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता असून, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याच्या लातूर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली विरुन जात असतानाच राज्यात आता काही अंशी पावसाचा जोर ओसलण्यास सुरुवात झाल्यानं हे दिलासादायक वृत्त ठरत आहे. दरम्यान यामुळं तापमानात होणारे चढ – उतार मात्र टाळता येणार नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बदलणारी वाऱ्याची दिशा आणि एकंदर चित्र पाहता त्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचीसुद्धा हजेरी असेल. 

तापमानवाढ बेजार करणार; पण कुठं?

मान्सूननं एक्झिट घेऊनही हा पाऊस गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात कोसळला, आता त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही त्याची पूर्णत: माघार मात्र अद्यापही प्रतिक्षेत आहे. या विचित्र स्थितीमुळं पुढील काही दिवस तापमानात सातत्यानं चढ – उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये उकाडा वाढेल, दुपारच्या वेळी उष्मा अधिक भासेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे, प्रत्यक्षात तापमान सरासरीइतकं असलं तरीही वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली आहे असं कारण हवामान निरीक्षकांनी दिलं आहे.

FAQ

महाराष्ट्रात मान्सूनची माघार घेतली आहे का?
होय, मान्सूनने देशातून माघार घेतली आहे, परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस कोसळत होता आणि आता त्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.

पावसामुळे लोकांना काय त्रास होत आहे?
सततच्या रिपरिप पावसामुळे लोकांना नकोशी वाटत आहे. आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्याने लोक पावसाने आता थांबावे असे गाऱ्हाणे घालत आहेत. 

हवामान विभागाचा पावसाबाबतचा अंदाज काय आहे?
उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असू शकतो. पुढील 24 तास आणि चार दिवसांसाठी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे पावसाची शक्यता आहे.





Source link

GK : 16,000 एअरपोर्ट असलेला जगातील एकमेव देश; इथून जगाच्या कानाकोपऱ्यात जायला मिळते विमान

GK : 16,000 एअरपोर्ट असलेला जगातील एकमेव देश; इथून जगाच्या कानाकोपऱ्यात जायला मिळते विमान


Most Airports in World: विमान प्रवास हा जलद आणि सर्वात सुलभ प्रवासाचे माध्यम आहे. जवळपास सर्वच देशात विमानतळं आहेत. जगात एक असा एक देश आहे जिथे तुम्ही जवळजवळ प्रत्येक गावातून किंवा लहान शहरातून सहजपणे विमान विमान मिळते. या देशात 16,000 हून अधिक विमानतळ असलेला हा जगातील एकमेव देश आहे. 

Add Zee News as a Preferred Source

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे हवाई प्रवास केवळ मेट्रो शहरांपुरता मर्यादित नाही. या देशात 16,116 विमानतळ आहेत. येथून कुठेही विमानाने प्रवास करण्याची परवानगी मिळते. अमेरिकेचा भौगोलिक आकार आणि विविध लोकसंख्या पाहता, इतके विशाल नेटवर्क आवश्यक मानले जाते. CIA.gov च्या अहवालानुसार, ही विमानतळे व्यावसायिक, वैयक्तिक आणि लष्करी उद्देशांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे, अंदाजे 5,297 विमानतळांसह. ब्राझीलचा आकारही खूप मोठा आहे आणि अनेक भागात रस्त्याने पोहोचणे कठीण आहे. परिणामी, लहान हवाई पट्ट्या आणि स्थानिक विमानतळ लोकांना जोडण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे  यादीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2,257 विमानतळ आहेत. कमी लोकसंख्या असूनही, ऑस्ट्रेलियाचा भूभाग प्रचंड आहे. त्याच्या लहान शहरे आणि बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा आहे.  ऑस्ट्रेलियाचे स्थानिक विमानतळ केवळ देशांतर्गतच नव्हे तर पर्यटन क्षेत्रालाही मदत करते.

मेक्सिको 1,580 विमानतळांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तथापि, यापैकी फक्त काही विमानतळांवर नियमित व्यावसायिक उड्डाणे चालतात. तरीही, इतक्या मोठ्या संख्येने विमानतळांची उपस्थिती हे दर्शवते की देश त्याच्या विविध प्रदेशांना जोडण्यासाठी हवाई कनेक्टिव्हिटीला किती महत्त्व देतो. कॅनडामध्ये 1,459 विमानतळ आहेत, जे त्याच्या विस्तीर्ण आणि विरळ लोकसंख्येच्या प्रदेशासाठी महत्त्वाचे आहेत. दुर्गम आणि बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी, हवाई प्रवास हा वाहतुकीचा सर्वात विश्वासार्ह आणि जलद मार्ग आहे. हे नेटवर्क केवळ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील सुलभ करते.

1,218 विमानतळांसह फ्रान्स सहाव्या क्रमांकावर आहे. 1,057  विमानतळांसह युनायटेड किंग्डम सातव्या क्रमांकावर आहे. पॅरिसचे चार्ल्स डी गॉल विमानतळ आणि लंडनचे हीथ्रो यासारख्या प्रमुख केंद्रांमुळे ही दोन्ही विमानतळे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये समाविष्ट आहेत. या देशांमध्ये पर्यटन आणि व्यापार वाढवण्यात लहान प्रादेशिक विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

भारतात सध्या अंदाजे 487 विमानतळ आणि हवाई पट्टे आहेत. त्यापैकी अंदाजे 147 विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे चालवले जातात. ही संख्या पाश्चात्य देशांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. तथापि, गेल्या 11 वर्षांत ही संख्या सातत्याने वाढत आहे. 2014 मध्ये देशात फक्त 74 सक्रिय विमानतळ होते, परंतु आता ही संख्या 150 पेक्षा जास्त झाली आहे, जे भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या हवाई प्रवेश आणि प्रादेशिक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

FAQ

1 जगातील सर्वाधिक विमानतळ असलेला देश कोणता आहे?
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा जगातील सर्वाधिक विमानतळ असलेला देश आहे. येथे १६,११६ विमानतळ आहेत. 
अमेरिकेचा भौगोलिक आकार आणि विविध लोकसंख्या पाहता, इतके विशाल नेटवर्क आवश्यक आहे. अहवालानुसार, ही विमानतळे व्यावसायिक, वैयक्तिक आणि लष्करी उद्देशांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

2 दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता आणि किती विमानतळ आहेत?
ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे अंदाजे ५,२९७ विमानतळ आहेत. ब्राझीलचा आकार मोठा असल्याने आणि अनेक भागात रस्त्याने पोहोचणे कठीण असल्याने, लहान हवाई पट्ट्या आणि स्थानिक विमानतळ लोकांना जोडण्याचे महत्त्वाचे साधन आहेत.

3 तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता?ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे २,२५७ विमानतळ आहेत. 
कमी लोकसंख्या असूनही, ऑस्ट्रेलियाचा भूभाग प्रचंड आहे. लहान शहरे आणि बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा आहे. हे विमानतळ देशांतर्गत आणि पर्यटन क्षेत्रालाही मदत करतात.

 





Source link

Nanoparticle-coated fibres, the new step in water purification

Nanoparticle-coated fibres, the new step in water purification


Tests showed that they removed toxic metals from water
| Photo Credit:
iStockphoto

Microfibre-based filters are a good choice for household water purification because they remove germs and pollutants, last long, and hold large amounts of contaminants. Their versatility increases when coated with nanoparticles — enabling them to absorb heavy metals, dyes, or even serve as wound dressings, depending on the coating used. 

The conventional way of coating involves dipping fibres into a nanoparticle solution. This is slow, equipment-heavy, and leads to uneven coating, leaving parts of the fibre bare and lowering efficiency. 

Insights from study

Researchers at IIT Bombay, led by Prof. Venkat Gundabala and Prof. Rajdip Bandyopadhyaya, have now developed a microfluidic method to make uniformly nanoparticle-coated fibres in a single step. In this process, a polymer solution flows through a fine glass capillary while a nanoparticle dispersion surrounds it. As the solvent diffuses out, the polymer solidifies into fibres, while nanoparticles evenly coat their surface.

The team demonstrated this using magnesium oxide (MgO) nanoparticles, which bond strongly with the polymer, producing high-performance fibres. Tests showed that they effectively removed toxic metals like lead, cadmium, and arsenic from water.

These fibres can be packed into filter cartridges for household, portable, or modular units. Beyond water purification, nanoparticle-coated fibres can act as sensors, antibacterial dressings, food packaging, or even drug-delivery systems. Depending on the coating, they can also remove microplastics and organic pollutants from water. 

Published on October 6, 2025



Source link

'इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो', फडणवीसांच्या समर्थनार्थ जरांगेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी

'इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो', फडणवीसांच्या समर्थनार्थ जरांगेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी


Manoj Jarange Vs Devendra Fadnavis: मनोज जरांगे यांच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरबाजीने उत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर लावत जरांगे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. 

Add Zee News as a Preferred Source

मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत धडकणार आहेत. दरम्यान त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी मनोज जरांगेंविरोधात मोर्चा उघडलाय. भाजपनं जरांगेंविरोधात बॅनरबाजी केली आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आईसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्याच वक्तव्यावरून आता भाजपनं जरांगे पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिव्यांना नाही अशा आशयाचे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत.

‘काही लोक फडणवीसांच्या कुटुंबाबत गलिच्छ बोलतात’

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील नाव न घेता मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच त्यांच्या कुटुंबासंदर्भात गलिच्छ वक्तव्य केली जातायत. त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचं बावनकुळे
यांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांबाबत बोलताना मनोज जरांगे यांची जीभ घसरली

मुंबईकडे कूच करण्याआधी बीडमध्ये जरांगे पाटलांनी इशारा सभा घेतली होती. दरम्यान यासभेत त्यांनी फडणवीसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी आताच्या आंदोलनात देखील फडणवीसांनाच टार्गेट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजप नेते देखील जरांगे पाटलांविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे मुंबईत धडकण्याआधीच भाजपनं जरांगे पाटलांना बॅनरबाजीच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

FAQ

1. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपने बॅनरबाजीने कसे उत्तर दिले आहे?

भाजपने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत, ज्यामध्ये “इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही” असा मजकूर आहे. हे बॅनर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून लावण्यात आले आहेत.

2. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांबद्दल कोणते वादग्रस्त वक्तव्य केले?

बीड येथील एका सभेत मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, ज्यामुळे भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे यांनी नंतर हे वक्तव्य मागे घेतले आणि कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागितली, परंतु त्यांनी फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणात अडथळे आणल्याचा आरोप कायम ठेवला.

3. भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याला कसा प्रतिसाद दिला? 

 चंद्रशेखर बावनकुळे (महसूलमंत्री): त्यांनी जरांगे यांचे नाव न घेता फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर गलिच्छ वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे म्हटले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की फडणवीस यांनाच का नेहमी टार्गेट केले जाते?
 





Source link