शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत विसंगती; दानवे, जाधवांच्या भूमिकेत विरोधाभास!


Shaktipith Mahamarg: शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत विसंगती पाहायला मिळतेय.कारण एका बाजूला अंबादास दानवे हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताय. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव हे या महामार्गाला पाठिंबा देताय.

शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय.नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला भास्कर जाधव यांनी समर्थन दिलं आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटंलय.

भास्कर जाधव यांनी शक्तिपीठ महामार्गाला दिलेल्या समर्थनानंतर शक्तिपीठ महामार्गाचे गिरीश फोंडे यांनी भास्कर जाधवांवर टीका केलीय. भास्कर जाधव अज्ञानी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

विकासाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, सत्तेत बसलेले लोकच या महामार्गाला विरोध करत होते.आता तेच लोक निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतय, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.दरम्यान ज्या शक्तीपीठ महामार्गावरुन वाद निर्माण होतोय..
तो शक्तिपीठ महामार्गाचं प्रकरण काय.

शक्तिपीठ महामार्गाचा काय आहे वाद!

नागपूर ते गोवा शक्तीपीठी महामार्गाची लांबी ही 802 किलोमीटर आहे. प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च सुमारे 86 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची  तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी या तीन शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. शक्तिपीठ महामार्ग एकूण 12 देवस्थानांना जोडणार आहे. या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसंच राज्यातील अनेक पक्षांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय.मात्र, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत या महामार्गाबाबत नेत्यांचं एकमत नसल्याचं समोर आलंय.





Source link

सुनील तटकरेंची औरंगजेबाशी तुलना, शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्याने महायुतीत वाद


Mahendra Thorve On Sunil Tatkare : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले हे दोघेही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खबबळ उडाली आहे. 

शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत. त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे. आमच्या आमदारांमुळे ते खासदार झाले आहेत. आता लोकसभा आम्ही लढवणार आहोत. सुनील तटकरे यांना ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही असे आव्हान थेट सुनील तटकरे यांना महेंद्र थोरवे यांनी दिलं आहे. अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते

यावेळी क्रिकेटचे उदाहरण देत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीका केली. क्रिकेटच्या खेळात पंचांचा निर्णय अंतिम असतो. कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते असं ते म्हणाले. जरी कॅप्टन कूल असला तरी त्याने सोबतच्या खेळाडूंना प्राधान्य देणे गरजेचे असते. त्यामुळे आपण कॅप्टन व्हायला चाललो आहे. माझीच मुलगी खेळाडू, माझाच मुलगा खेळाडू, सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात असं चालणार नाही. पंचांनी निर्णय दिला असला तरी आज क्रिकेट पुढे गेलं असून यामध्ये थर्ड अंपायर आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. 

आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजीत केलेल्‍या दमदार आमदार चषक क्रिकेट स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी आमदार बांगर बॅट घेवून मैदानात उतरले. यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. आमदार महेंद्र थोरवे यांनी गोलंदाजी केली. स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. 





Source link

विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग खडतर, भास्कर जाधवांच्या नावाला महायुतीचा विरोध


Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेता होण्याची वाट बिकट होताना दिसतेय. भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास महायुती फारशी अनुकूल दिसत नाही. दुसरीकडं विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के संख्याबळाच्या नियमावर विधानसभा अध्यक्षांनी बोट ठेवल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता अधिकच धुसर झालीये. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेत्यांची निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस केली होती. पण भास्कर जाधव यांच्या नावाला महायुती सरकारमधून विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे.

भास्कर जाधवांच्या नावाला महायुतीचा विरोध

तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांना निलंबित केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यावर भास्कर जाधव यांनी टोकाची टीका केली होती. 
आक्रमक भास्कर जाधव महायुतीला डोईजड होण्याची भीती आहे. महायुतीचे नेते भास्कर जाधव यांना जाहीर विरोध करताना दिसत नाहीत. मात्र भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

संख्याबळाच्या मुद्यावर विरोधकांची अडचण

काही दिवसांपूर्वी विधिमंडळ कार्यालयानं संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद ठरत नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण राज्य सरकारनं केंद्राच्या 2006 च्या कायद्याचा हवाला देत संख्याबळाच्या आधारे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असे संकेत दिले होते. भास्कर जाधव विरोधी पक्षनेते व्हावेत ही सत्ताधाऱ्यांची इच्छा दिसत नाही असं  वाटू लागलं आहे. हे कमी की काय महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमधूनही भास्कर जाधव यांच्या नावासाठी फार आग्रह होताना दिसत नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद हे भास्कर जाधव आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी मृगजळ ठरेल असंच वाटू लागलं आहे.





Source link

Weather Update : ऊन, वारा, पाऊस, बर्फ… देशात प्रत्येक दिशेला वेगळा ऋतू; महाराष्ट्रासाठी हवामानाचा गंभीर इशारा


Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानाशास्त्र विभागाच्या माहितीनुसार अर्थात आयएमडीनं पुढील 24 ते 48 तासांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यानुसार देश स्तरावर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल इथं सोसाट्याचे वारे वाहतील. शेतकऱ्यांना यामुळं काही नुकसाचा सामना करावा लागू शकतो. 

दरम्यानच्या काळात देशात हिमालय क्षेत्रामध्ये एक पश्चिमी झंझावात नव्यानं प्रवेश करणार आहे. त्यामुळं ज्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागावर पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या मध्य भागात पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 35 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नजीकच्या राज्यांमध्ये उकाडा तुलनेनं कमी जाणवेल. 

महाराष्ट्रात सूर्य आग ओकणार… 

फेब्रुवारीपासूनच राज्यात तापमानाचा आकडा वाढला असून, त्यामुळं यंदाचा उकाडा मोठ्या मुक्कामाला आलाय हेच स्पष्ट झालं. उन्हाळ्याच्या धर्तीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा 37 अंशांपलिकडे पोहोचला आहे. तर, सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर इथं करण्यात आली आहे. राज्यात तूर्तास या उकाड्यापासून दिलासा मिळणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला असून, विदर्भामध्ये उष्मा अधिक जाणवत असून, तापमान 36 अंशांच्या घरात असलं तरीही त्याचा दाह मात्र चाळीशीपार असणाऱ्या तापमानाइतका जाणवू लागला आहे. 

 

पश्चिम महाराष्ट्रातही स्थिती वेगळी नसून इथं सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाडा क्षेत्रातही सूर्य आक ओकत असल्याचं जाणवणार आहे. किनारपट्टी क्षेत्रांमध्ये दमट वातावरणात वाढ होणार असून, मुंबईची होरपळही इतक्यात कमी होणार नसल्याचा गंभीर इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. 

अचानकच का दाटून येतात ढग? 

उकाडा वाढत असतानाच काही प्रसंगी सूर्य झाकोळल्याचंही पाहायला मिळत आहे. इथं बाष्पीभवनाची प्रक्रिया कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम असेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं हा उकाडा इतक्यात पाठ सोडणार नाही हेच खरं! 





Source link

Crime: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत होणार मोठा खुलासा


Pune Swargate Rape Case: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पोलिस तपासादरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. आरोपी खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे. 

26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. बलात्कारानंतर आरोपी दत्ता गाडे हा फरार झाला होता. पोलिसांनी 77 तासानंतर आरोपीला त्याच्या गुनाट या गावातुन अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर या प्ररणात रोज नविन अपडेट समोर येत आहे. पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला.  इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. 

दरम्यान या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. आरोपी दत्ता गाडे खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे. 

आरोपीची डीएनए चाचणी देखील पूर्ण झाली आहे.  बसमध्ये आढळलेल्या केसांच्या नमुन्याच्या मदतीने चाचणी घेण्यात आली.  बसमध्ये आढळलेल्या केसांचे नमुने आणि दत्ता गाडेच्या केसांच्या नमुन्यांची मॅचिंग करण्यात आलंय. लवकरच पुणे पोलिसांना चाचणीचा अहवाल मिळेल. डीएनए चाचणीच्या अहवालातून प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल.  

पीडित तरुणीचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती केली.  दादा मला जीवे मारू नको अशी  पीडित तरुणीची दत्ता गाडेला विनंती केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची  धमकी दिली होती. तरुणीचं फलटणला जायचं तिकीट पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केले आहे. 

आरोपी दत्तात्रय गाडेने आधीही असे गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे गाडेविरोधात ज्यांची तक्रार असेल त्यांनी पुढे यावं असं आवाहन गुन्हे शाखेने केले आहे. गाडेवर याआधीही महिलांसोबत गैरवर्तणूक केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडूनही याचाही तपास सुरू आहे. 
 





Source link

'शंभूराजांची बदनामी करणा-या साहित्यावर बंदी घाला', मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 'कायमचं हद्दपार करा'



छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं साहित्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 



Source link