by Hansraj Agrawal | Apr 13, 2026 | Trending News
Todays Weather News : वादळ, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि उष्णता यांचा मारा सध्या देशाच्या विविध राज्यांमध्ये विविध प्रमाणात पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल ते अगदी आसाम, केरळ, त्रिपुरा आणि नागालँड इथपर्यंत हवामान बदलांचं हे सत्र सध्या नागरिकांना बेजार करताना दिसत आहे. याचदरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीवर पोहोचत असल्या कारणानं या बदलांचा वेग आणखी वाढणार असल्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला आहे.
Add Zee News as a Preferred Source
महाराष्ट्रावर उष्णतेचा मारा
सूर्याचा मारा आणखी तीव्र होत असल्यामुळं महाराष्ट्रात तापमानवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत ही तापमानवाढ सोसवेनाशी होत आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातही दमट हवामानामुळं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात दिवसाची सुरुवातच उष्ण वाऱ्यांनी होत असून, दुपारची वेळ अधिकच तापदायक ठरत आहे. ज्यामुळं नागरिकांना अती उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर, सांगलीमध्ये उष्ण आणि दमट हवामानात वाढ होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ असेल तर मुंबई शहरासह उपनगरांमध्येसुद्धा उकाडा कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण पट्ट्यामध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, तर किनारपट्टी भागांमध्ये उष्ण वारे अंगाची लाही लाही करतील. उत्तर महाराष्ट्रसुद्धा या उष्ण हवामानास अपवाद ठरणार नाही. थोडक्यात पुढील 24 तास राज्यात उष्णतेच्या लाटेसम वातावरण राहील असाच प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशभरात हवामान बदलांना वेग
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या राज्यांत मैदानी क्षेत्रामध्ये वादळी वारे आणि पाऊस तर, याच राज्यांच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान तापमानात घट अपेक्षित असल्यामुळं पर्यटनाच्य दृष्टीनं या राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्यांनी हवामान वृत्ताचा आढावा घ्यावा असंही आवाहन करण्यात येत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 12, 2026 | Trending News
Asha Bhosle Death : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. अति थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यानं काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्या त्या लहान बहीण होत्या. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या एका भाषणात आशा भोसले यांच्याबद्दलचा उल्लेख केला होता. जुना व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Mns Chief Raj Thackeray) यांच्या पुढाकाराने मनसेतर्फे आयोजीत केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमातील हा किस्सा आहे. मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पुस्तक प्रदर्शनासोबतच कवितांची मैफीलही रंगली. या कार्यक्रमासाठी जावेद अख्तर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी भारतीय गायनविश्वातील प्रख्यात गायिका म्हणजे आशा भोसले यांनीही कविता वाचन केलं. तसेच आजारी होते, पण दोस्त राज ठाकरेंसाठी कार्यक्रमात आले, असंही त्यांनी म्हटलं. मला घरी 15 मोठे पापलेट पाठवले. राज ठाकरे माझा दोस्त आहे. दोस्ताला कसं नाही म्हणणार असं आशाईतांईनी सांगितले.
राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
Source link
by Hansraj Agrawal | Apr 11, 2026 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Apr 11, 2026 | Trending News
Pune Crime News : पुणे पोलिस दलात खळबळजनक घडामोड घडली आहे. पुण्यातील रिल स्टार पोलीस सोनाली हिंगे आणि तिच्या दोन साथीदार पोलिसांचं अखेर निलंबन झाले आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघातिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या तिघांनी नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून सात लाखांची खंडणी उकळली होती. संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे.
Add Zee News as a Preferred Source
पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे, पोलिस उपनिरीक्षक बडे हे सद्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर देखील रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुदाम तायडे हे देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. पोलिसांच्या या खंडणीखोरीच्या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तसेच गंभीर बाब म्हणजे महिलांच्या रक्षणासाठी निर्माण केलेल्या दामिनी पथकातील पोलिस यात असल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीचे काही कागदपत्र महाविद्यालयात अडकले होते. त्यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली. मात्र पोलिसांनी याचाच फायदा उचलला आणि थेट विद्यार्थीनीला सोबत घेऊन प्रचार्यांना जाब विचारला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या महाविद्यालयाच्या तरुणीला हाती धरुन प्राचार्य आणि महाविद्यालयात आपला छळ होतोय अशी तक्रार द्यायला लावली. तक्रार दिल्याचं कळत्यावर हिंगे, अजित बडे आणि सुदाम तायदे यांनी प्राचार्यांना धमकवायला सुरुवात केली.
प्रकरण गंभीर आहे… अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. आता जर ही तक्रार दाखल झाली तर तुमच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करु आणि महाविद्यालयाचं नाव खराब करु म्हणत थेट 10 लाखांची मागणी केली. भीतीपोटी प्राचार्यांनी 10 नाही तर सात लाख दिले. पण नंतर… या तिघांनी सात लाख वाटून घेतले होते. विद्याथीनी हे सगळं काय घडतंय हे बघत होती. त्यावेळी तिला काहीतरी चुकीचं करत असल्याचं जाणवलं. तिने थेट पोलिसांना येऊन खोटी तक्रार द्यायला सांगितला असा प्रकार बोलून दाखवल. पालकांना विश्वासात घेऊन तरुणीने सगळा धीर दाखवला. या पद्धतीने पोलिसांनी तक्रारीची तपासणी केली आणि त्यात असा प्रकार घडण्याचं समोर आलं. त्यानंतर पुन्हा या तीन पोलिसांवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोण आहे सोनाली हिंगे?
सोनाली हिंगे ही कबड्डीपट्टू , रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकातील पोलीस मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ती विशेष चर्चेत आली. कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलेल्या सोनाली हिंगेनं स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास केला. गेल्या 12 वर्षांपासून ती पुणे पोलिसांत कार्यरत आहे. वाहतूक विभाग, कोंढवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर इथं तीनं कर्तव्य बजावल आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 10, 2026 | Trending News
वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. झोपडपट्टी भागातल्या औद्योगिक पट्ट्याच्या पुनर्विकासासाठी MIDCनं काढलेल्या निविदांवर वन मंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 10, 2026 | Trending News
Eknath Shinde On Meeting With 8 MP of Uddhav Thackeray Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार असल्याची बातमी एका वृत्तपत्राने छापल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असतानाच आता या विषयावर स्वत: एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी या बातमीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चांवर अगदी स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य करत नेमकं यामागील सत्य काय आहे हे सांगितलं आहे. शिंदे नक्की काय म्हणाले हे पाहूयात पण त्यापूर्वी ही बातमी काय होती ते जाणून घेऊयात…
Add Zee News as a Preferred Source
बातमीत काय दावा करण्यात आलेला?
शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या बैठकीत या सर्व खासदारांनी पक्षांतर करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेखही बातमीत आहे. ठाणे येथे एका गुप्त आणि तटस्थ ठिकाणी ही बैठक झाल्याचं बातमीमध्ये नमूद केलं आहे. या बैठकीत शिंदे यांनी सहा खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> ठाकरेंना सोडून सावंत शिंदेंसोबत? प्रेस कॉन्फरन्समध्येच लिहिलेल्या पत्रात नेमकं म्हटलंय काय? वाचा संपूर्ण मजकूर
ते आठ खासदार कोण?
कोणते खासदार बैठकीला होते असा दावा करण्यात आलाय?
> अरविंद सावंत
> संजय पाटील
> संजय देशमुख
> नागेश पाटील
> राजाराम वाकचुरे
> ओम राजेनिंबाळकर
> राजाभाऊ वाजे
> संजय जाधव
कोणत्या खासदाराचं नाव नाही?
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 8 खासदारांनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचा दावा बातमीत करण्यात आला असला तरी यामध्ये एका खासदाराचं नाव नाहीये. ज्या ठाकरेंच्या खासदारांचं नाव या यादीत नाही ते आहेत, अनिल देसाई!
नक्की वाचा >> ठाकरेंचे 8 खासदार फुटून शिंदेंसोबत? राऊत अगदी स्पष्टच बोलले, ‘माझं आणि आदित्य साहेबांचंही…’
शिंदे काय म्हणाले?
ठाकरेंचे खासदार खरोखरच शिंदेसोबत जाणार की काय? अशी चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरु असतानचा तीन दिवसांसाठी साताऱ्यामधील आपल्या दरे गावी गेलेल्या शिंदेंनी या साऱ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे,” असं शिंदेंनी म्हटलं आहे. शिंदेंनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सदर प्रकरणावर पडदा टाकला आहे.
Source link