by Hansraj Agrawal | Jan 18, 2026 | Trending News
पुणे ते सातारा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. पुण्यातून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. नवी बोगदा बांधण्यात आला आहे. यामुळे 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 18, 2026 | Trending News
Maharashtra Politics Crrupt Money: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तिन्ही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे. ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावला आहे. “महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लुटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली,” असं राऊत म्हणालेत.
Add Zee News as a Preferred Source
1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी
“भाजपने त्यांचे सरकार (1999) असताना 100 कोटींचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी ‘पार्टी फंड’ म्हणून वळवले. या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले. पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा झाला. योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली. ही वाढवलेली किंमत होती. 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली. 1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी. भाजपने सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले व अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला. ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला. गणेश नाईक यांच्या शब्दांत सांगायचे तर हा हरामाचा पैसा आहे,” असं राऊत म्हणालेत.
पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला
“अजित पवार, भाजप आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा आहे. हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करीत आहेत. तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला व मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. “भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे!” असे सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला. शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे.
खरे राजकारण पुढेच घडणार
“भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही महानगरपालिका निवडणूक लक्षात राहील. त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवले. हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं वाहून गेली. मराठी माणूस, मुंबईच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधूं’नी झुंज दिली. हा अस्मितेच्या लढय़ाचा इतिहास नव्याने लिहिला जाईल. महापालिका निवडणुका संपल्या, निकाल लागले. खरे राजकारण पुढेच घडणार आहे,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2026 | Trending News
Pune News : 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुणे शहरात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते या स्पर्धेकरिता काही काळासाठी बंद ठेवले जाणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ शकते. यामुळे विद्यार्थांना याचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Add Zee News as a Preferred Source
19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरात सायकल रॅली पार पडणार आहे. या निमित्त जंगली महाराज आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक आठ तास सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे. दरम्यान शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून, कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्यात यावी अथवा मेट्रो व अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा
बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे येथे आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.
पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार
पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत, या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले. जगभरातील किमान 35 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे, तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून, कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2026 | Trending News
Amit Thackeray On MNS Poor Performance In BMC Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. मनसेला दोन आकडी नगरसेवकही महापालिकेवर निवडून पाठवता आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करुन लढलेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत. मराठी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारा यासारख्या भावनिक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरे गेलेल्या ठाकरे बंधूंच्या हाती निराशाच पडली. या निकालाने मनसैनिकांना धक्का बसला असला तरी आता मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सुरु झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंनीही मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर भाष्य करताना एक शब्द दिला आहे.
Add Zee News as a Preferred Source
माझं आणि तुमचं नातं फक्त…
अमित ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईच्या निकालासंदर्भात एक पोस्ट केली आहे. “मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील! निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटणापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील,’ अशी कॅप्शन देत अमित ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका गमावली? ‘ती’ एक कृती ठरली कारणीभूत? खळबळजनक दावा
‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच…
तसेच, “तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा!” असं अमित ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे विसरायचं नाही, राज ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मराठीसाठी लढत राहणार असल्याचं पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही,” असं राज यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2026 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Jan 16, 2026 | Trending News
Thane TMC Election Results 2026 Top 10 Big Fights: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये काय निकाल लागणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला ठाण्यात आव्हान तयार होईल अशी एक शक्यता व्यक्त करण्यात आलेली. शिंदेंना ठाण्यात धक्का बसेल यासाठी अजून एक कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे बंडखोर उमेदवार. ठाण्यातील 10 अव्वल लढायांकडे पाहिलं तरी त्यामधील चार जागांवर बंडखोरच सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचं स्पष्ट होतंय. (ठाण्यातील मतमोजणीसंदर्भातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
Add Zee News as a Preferred Source
बडे बंडखोर कोण?
ठाण्यातील प्रतिष्ठित लढतींमध्ये सेना बंडखोर रवी घरात, भूषण भोईर, किरण नाकती आणि प्रमिला केणी यासारखे बंडखोर मित्रपक्षांना आणि थेट शिंदेंच्या सेनेला आव्हान देतील असं मानलं जात आहे. या स्थानिक नेत्यांचं आपआपल्या प्रभागांमध्ये प्रबाल्य असून त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
नक्की वाचा >> ठाण्यात तुफान राडा! EVM शी छेडछाड केल्याचा शिंदे सेनेचा आरोप; आयोगाच्या बस आडवून…
ठाण्यात एका ठिकाणी अजित पवारांचा पक्ष विरुद्ध शरद पवारांचा पक्ष अशी थेट लढत असून प्रभाग क्रमांक 31 (ब) हा सामना रंगतोय. तर प्रभाग क्रमांक 2 (ब) मध्ये भाजपा आणि मनसेमध्ये थेट लढत आहे. ठाण्यातील 10 प्रतिष्ठेच्या लढती पुढील प्रमाणे आहेत
1) प्रभाग क्रमांक 1(ड )
सिद्धार्थ ओवळेकर – सेना (शिंदे गट )
vs
रवी घरात –( सेना बंडखोर )
————————————————————————————————————————-
2) प्रभाग क्रमांक 2 (ब )
मनोहर डुंबरे (भाजप )
vs
रवींद्र मोरे (मनसे )
————————————————————————————————————————
3) प्रभाग क्रमांक 3 (ब )
विक्रांत वायचळ सेना (शिंदे गट )
vs
भूषण भोईर (सेना बंडखोर )
———————————————————————————————————————-
4) प्रभाग क्रमांक 20 (ब )
नम्रता पमनाणी सेना (शिंदे गट )
vs
राजेश्री नाईक (मनसे )
———————————————————————————————————————-
5) प्रभाग क्रमांक 21 (ब)
सुनेत जोशी (भाजपा)
vs
किरण नाकती (सेना बंडखोर)
नक्की वाचा >> ठाण्यात EVM पळवलं? शिंदेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावरवरील मतदारकेंद्रातून अचानक…; पोलिसांना काही कळण्याआधीच…
———————————————————————————————————————-
6) प्रभाग क्रमांक 7 (क)
विक्रांत चव्हाण (काँग्रेस)
vs
वैभव कदम (भाजप )
———————————————————————————————————————-
7) प्रभाग क्रमांक 31 (ब)
सुधीर भगत (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस
vs
मोरेश्वर किणे (अजित पवार) राष्ट्रवादी काँग्रेस
———————————————————————————————————————-
8) प्रभाग क्रमांक 23 (अ )
मिलिंद पाटील (सेना शिंदे )
vs
प्रकाश पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार _
———————————————————————————————————————–
9) उमेश पाटील (शिंदे सेना )
vs
अभिजित पवार (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस )
————————————————————————————————————————
10) मनाली पाटील (शिंदे सेना )
vs
प्रमिला केणी ( बंड खोर सेना शिंदे गट )
Source link