शरद पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता का व्यक्त केली नाही? मिटकरींनी सांगितलं नेमकं कारण

शरद पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता का व्यक्त केली नाही? मिटकरींनी सांगितलं नेमकं कारण


Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडतो. मुरलीधर मोहोळ यांनी पहाटे धुकं होतं, पण स्पष्ट सूर्यप्रकाश होता सांगितलं. विमान कोसळण्यापूर्वी एक स्फोट झाला आणि नंतर एक स्फोट झाला त्यामुळे शंकेला वाव होता. महाराष्ट्राच्या मनातील जनभावना मी विचारत आहे. माझं मन म्हणतंय की दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. झी 24 तासच्या ‘टू द पॉइंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत त्यांनी अनेक शंका बोलून दाखवल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source

“आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. थोड्या वेळाने शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हा विमान अपघात आहे असं सांगितलं. कारण परिस्थिती तशी होती. त्यांनी घातपात असल्याचा संशय आहे असं सांगितलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळला असता. पक्षालाही शंका होती म्हणून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलं. जर घातपात सिद्ध झाला आणि कोणी आढळलं, तर कार्यकर्ता आणि सुनेत्रा पवार सोडणार नाहीत,” असं त्यांनी सांगितलं. 

‘दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच’

“ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडतो. मुरलीधर मोहोळ यांनी पहाटे धुकं होतं, पण स्पष्ट सूर्यप्रकाश होता सांगितलं. विमान कोसळण्यापूर्वी एक स्फोट झाला आणि नंतर एक स्फोट झाला त्यामुळे शंकेला वाव होता. महाराष्ट्राच्या मनातील जनभावना मी विचारत आहे. माझं मन म्हणतंय की दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच आहे,” असं ते ठाणपणे म्हणाले. 

 

‘रेड एअरवेजवर एएआयबीने छापा टाकला, मग व्हीयएआरवर का नाही?’

“लोकप्रतिनिधीला भावना असतात. जनतेच्या मनातील भावना समजून घ्या. मी जनतेचा प्रतिनिधी आहे, मला अजित पवारंनी तिथे बसवलं आहे. ते फार जागरुक होते आणि सहकाऱ्यांचीही काळजी घेत होते. पुरावे नाही, पण तर्क मांडण्यास काही हरकत नाही. साहिल मदन आणि यश कुठे आहेत, सीसीटीव्ही कुठे आहे? काल रेड एअरवेजवर एएआयबीने छापा टाकला, मग व्हीयएआरवर का नाही?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.  

‘हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना…’

“महाराष्ट्राचा बापमाणूस गेला आहे. महाराष्ट्राला व्हिजन देणार माणूस गेला आहे. माझी फक्त एक शंका आहे, साहिल मदन कुठे आहे? त्यावेळी ट्राफिकमध्ये कुठे अडकला होता? मग तो गेला कुठे? महाराष्ट्राच्या मनाला पडलेले हे प्रश्न मी विचारत आहे. व्हीएसआरच्या पायलटवर 50 कोटींचा विमा उतरवल्याचा आरोप केला तो त्यांना खोडता का आला नाही? सुसाईड बॉम्बर म्हणून सुमित कपूरला पाठवला नसेल का? तर्कात बसत नसतील तर 50 कोटींचे विमे उतरवले खोटं असेल तर व्हीएसआरने खुलासा करावा. जर तू गेला तर कुटुंबाला पोसतो सांगितलं असेल. हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना…गूढ उकललं नाही तर मुंडे, सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. जर अजित पवार काचेची बाटली वापरु लागले असतील तर त्यांना कोणीतरी धोका करु शकतो अशी भीती वाटत होती,” असंही ते म्हणाले.  

 

‘सुनेत्रा पवार सोडणार नाहीत’

“सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवला नसले हे कशावरुन? त्याची बॉडी कुठे आहे?  काही जण म्हणतात तो कॅलिफोर्नियात मुलीला भेटत आहे. प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे. अजित पवारांसारखा नेता गमावल्याचं दुख महाराष्ट्राला आहे. या गोष्टीची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीअंती सगळं सिद्ध होईल. जो कणी गद्दार असेल त्याला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत. बदला घेतल्य़ाशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

“गद्दार कुठलाही असतो. आंतरबाह्य गद्दार असतात, घरातीलच असावा असं नाही. माझा रोख कोणाकडे नाही.  ही महाराष्ट्राच्या मनातील जनभावना आहे. हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत. काही लोक स्पष्ट भूमिका मांडत नसतील, मी मांडतो. बाकीच्यांना बोलावं न बोलावं  तो त्यांचा प्रश्न आहे. ऑफ रेकॉर्ड ते बोलतात, पण मीडियासमोर बोलत नाहीत. माझं अभिनंदनही करतात की तुम्ही चांगली बूमिका घेता. एकतर दवाबाखाली असतील किंवा प्रश्न विचारायची हिंमत नसावी. तुमच्या मतदारसंघातील जनता उद्या तुम्हाला हे प्रश्न विचारेल. ते धक्क्यातून सावरलेले नसतील म्हणूनत बोलत नसतील,” असं ते म्हणाले आहेत.





Source link

भुमरेंच्या ड्रायव्हरची दानवेंना कायदेशीर नोटीस, 1150 कोटींच्या संशयाचं भूत कोणाच्या मानेवर बसणार?

भुमरेंच्या ड्रायव्हरची दानवेंना कायदेशीर नोटीस, 1150 कोटींच्या संशयाचं भूत कोणाच्या मानेवर बसणार?


विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरच्या राजकारणात सध्या दानवे आणि भुमरे यांच्या चांगलीच जुंपली आहे. आणि याचं कारण ठरलंय समृद्धीची जमीन आणि त्याचा मिळणारा मोबदला. भुमरेंनी 1150 कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. आणि यासाठी चालक जावेदची मदत घेतली असा दानवे यांचा आरोप आहे. याच आरोपांवरून आता भुमरे आणि त्यांचा चालक दोघेही संतापलेत. खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी अंबादास दानवे यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. दानवेंनी सात दिवसात जाहीर माफी मा गावी अन्यथा एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दानवेंच्याविरोधात ठोकणार असल्याचा इशारा जावेद शेख यांनी नोटिसीतून दिलाय.

Add Zee News as a Preferred Source

 

जावेद शेख यांच्या नोटीसमध्ये काय म्हटलंय?

– कोणतेही खात्री न करता जावेद शेख यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यात आले.

– सात दिवसांच्या आत आपण केलेले विधान वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यामातून परत घ्यावे

– वर्तमान पत्रात जाहीर प्रगटनाद्वारे दिलीगिरी व्यक्त करावी

– वक्तव्य परत घेऊन दिलगिरी व्यक्त न केल्यास आपल्याविरोधात एक कोटी रुपयाचा अबुनुकासानीचा दावा दाखल करण्यात येईल

दानवे-शिरसाट यांच्यात उत्तर-प्रत्युत्तर 

या नोटीसला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी भुमरेंचा अक्षरशः समाचार घेतला आहे. “अब्रू असणाऱ्यांनी नुकसानीची नोटीस पाठवावी,” असा बोचरा टोला लगावत दानवेंनी भुमरेंच्या इभ्रतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ही नोटीस मी माझ्या वकिलांकडे दिली असून, त्याला कायद्याच्या भाषेत चोख उत्तर दिले जाईल, असं दानवेंनी म्हटलंय. तर याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सावध भूमिका घेत, आरोप करणं सोपं आहे. सिद्ध करणं कठीण आहे असा टोला लगावला आहे. 

जावेद शेखच्या कायदेशीर कचाट्यात दानवे अडकणार का? 

आता सर्वांच्या नजरा 8 दिवसांच्या मुदतीकडे लागल्या आहेत. भुमरे खरंच 1 कोटींचा दावा ठोकणार की दानवे नवी कागदपत्रं बाहेर काढून भुमरेंची अडचण वाढवणार… ड्रायव्हरच्या नावावर झालेली जमीन प्रकरण आणि त्यातून उभे राहिलेले 1150 कोटींचे संशयाचं भूत आता भुमरेंची पाठ सोडणार की दानवेंना या कायदेशीर कचाट्यात अडकवणार, या संघर्षानं जिल्ह्याचं राजकीय वातावरण कमालीचे तापलंय.





Source link

रत्नागिरी आणि रायगड मार्गांवर देखील मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरु होणार; कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी

रत्नागिरी आणि रायगड मार्गांवर देखील मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरु होणार; कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी



रत्नागिरी आणि रायगड मार्गांवर देखील मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरु होणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे.



Source link

'आरोपी असल्यास बचाव कसा करावा? AIला प्रश्न विचारणे तरुणाला पडले महागात; उपाय सापडला नाही पण…

'आरोपी असल्यास बचाव कसा करावा? AIला प्रश्न विचारणे तरुणाला पडले महागात; उपाय सापडला नाही पण…


Bhandara Theft Case: भंडाऱ्याच्या गोबरवाहीमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी प्रमोद आणि कुणाल भोरगडे यांची नावे संशयित म्हणून तक्रारीत नमूद करण्यात आली होती. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने ‘संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?’ असा प्रश्न AIला विचारला. हीच सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावला. दरम्यान, संशयित आरोपीने पोलीसांनी त्याला गंभीर मारहाणा केल्याचा आरोप केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

 

नेमकी घटना काय घडली?

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी खंदाळ येथील रहिवासी विजय भोरगडे यांच्या घरी चोरी झाली. त्यांनी याची तक्रार गोबरवाही पोलिसात दिली. या चोरीचा संशय घेत त्यांनी गावातील तिघांचा नाव घेतलं. त्यात प्रमोद बोरघरे, व कुणाल बोरघरे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने ‘संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?’ असा प्रश्न गुगलवर शोधला. ही सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावला. 

 

पोलीसांवर गंभीर मारहाण केल्याचा आरोप 

चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा त्याने पत्रकार परिषदेत केला. हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीच्या खुणा असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्या नाकात काहीतरी टाकून त्रास दिला व जबरदस्तीने कबुली देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी कोणताही गुन्हा नोंद नसतानाही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

AIला कोणते प्रश्न विचारणे टाळावे? 

1. स्फोटक किंवा बेकायदेशीर गोष्टींची निर्मिती: कोणतेही जबाबदार एआय तुम्हाला बेकायदेशीर कृत्यांमध्ये मदत करणार नाही. स्फोटके किंवा विष, ड्रग्स कसे तयार करायचे? असे प्रश्न विचारल्याने तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते. 

2. अनेकदा लोक गंमत म्हणून असे प्रश्न एआयला विचारतात पण त्याने दिलेली माहिती चुकीची असू शकते. त्या माहितीच्या आधारे एखाद्या घातक रसायनाचे मिश्रण चुकीचे झाल्यास, तुम्ही त्याचे सेवन केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. 

3. तसेच जर एखाद्या वापरकर्त्याने वारंवार असे घातक प्रश्न विचारले तर, एआय सिस्टीम त्याला फ्लॅग करते. यामुळे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होऊ शकते. 





Source link

'सकाळी दूधवालाही उठतो', अजित पवारांवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना तटकरेंचं उत्तर, म्हणाले 'लोकांच्या….'

'सकाळी दूधवालाही उठतो', अजित पवारांवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना तटकरेंचं उत्तर, म्हणाले 'लोकांच्या….'


Sunil Tatkare on Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर एकमताने सर्वांनी हात उचलून पाठिंबा दिला. तसंच सुनील तटकरे यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने सुनेत्रा पवारांसह सर्व नेत्यांनी भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील तटकरेंनी यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं. 

Add Zee News as a Preferred Source

‘…मग आम्ही एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला’

“2014 साली भाजपाला पाठिंबा द्या हे शरद पवार यांनीच सांगितलं. 2023 साली दादा एकटे होते त्यावेळेस आम्ही दादांना साथ दिली. अजितदादा आम्हाला म्हणाले होते मी एक निर्णय घेणार आहे तुम्ही मला साथ देणार का? तेव्हा आम्ही सगळे नेते दादा यांच्या पाठीमागे उभे होतो. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे अनेक नेते दादांसोबत उभे राहिले, कारण महाराष्ट्र घडवण्याची ताकद त्यांच्यात होती. दादांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आणि मग 3 जुलै रोजी एनडीएमध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला,” असं सुनील तटकरेंनी यावेळी सांगितलं.  

 

‘दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले’

“एनडीमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी आणि राज्यासाठी किती महत्वाचा आहे हे दादांनी स्पष्ट केले होते. आपल्याला लोकसभेत पराभव स्विकारावा लागला. मात्र दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले आणि सांगितल तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलांना एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जायचे आहे. मी दिल्लीला जाण्यापूर्वी माझ्या सर्वस्वी असलेल्या अजितदादा यांना भेटलो आणि नंतर दिल्लीला निघालो,” अशी माहिती त्यांनी दिली.

 

 

‘दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी’

“त्या काळात दादांना हिणवलं गेलं की दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला देखील सकाळी उठतो. तेव्हा टीका करणाऱ्यांना मी सांगितल दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी लवकर उठतात. आता टीका कोणी केली हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे,” असं त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता म्हटलं.

नियतीने आपल्यावर दुर्दैवी वेळ आणली आणि त्यातून आज आपण वहिनीची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करत आहोत असं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आता बोलण्याचे थांबा अथवा अनेक गोष्टी सांगता येईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 

‘हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार’

बारामतीमध्ये दादांनी एक भाषण केले होते, त्यात ते म्हणाले होते मला जरी एकटं पाडलं गेलं असेल तरी मी आज एकटा नाही. त्यावेळी दादांवर ही परिस्थिती आणली गेली मात्र आपण सगळे दादांसोबत उभे राहिलो. ट्रोल करणाऱ्यांनी पैसे देऊन आम्हाला ट्रोल करावे मात्र आमची निष्ठा साफ आहे. मी आज महाराष्ट्राला सांगतोय, होय आज पासून राज्यात सुनेत्रा पर्व सुरू झाले आहे. हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार आहे असं सांगत तटकरेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर हल्लाबोल केला. 





Source link

'घातपाताचा संशय बळावला, दादांच्या अपघाताचा FIR का नाही, न्याय का नाही?'; अपयशी चर्चेनंतर रोहित पवारांचा आक्रोश

'घातपाताचा संशय बळावला, दादांच्या अपघाताचा FIR का नाही, न्याय का नाही?'; अपयशी चर्चेनंतर रोहित पवारांचा आक्रोश


Rohit Pawar on Ajit pawar Baramati Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा घातपात असल्याची शंका व्यक्त, करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रकरण उचलून धरलं आणि एफआयआर दाखल करून घेण्यासाठी थेट बारामती गाठली. जिथं दोन तास पोलिसांची चर्चा केल्यानंतर एफआयआर दाखल का करून घेता येणार नाही, पोलिसांनी यावर कोणती भूमिका मांडली, याबाबत खंत व्यक्त करणारी भूमिका माध्यमांशी संवाद साधताना मांडली. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले रोहित पवार?

‘दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक अहवाल आला, 24 फेब्रुवारीचा हा अहवाल असून. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 ला आम्ही पदाधिकारी, समर्थकांसह मरीन ड्राईव पोलीस स्टेशनला एफआईआर दाखल करायला गेलो होतो. पण काहींनी शंका उपस्थित करत, मी मुंबईला एफआयआर करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. झिरो एफआयआर कॉन्सेप्टअंतर्गत ही एफआयआर दाख करता येऊ शकते. मुंबईत हे शक्य होतं पण ते स्वीकारलं नाही, म्हणून आज आम्ही बारामती पोलीस स्टेशन ला आलोय’, असं सांगत कायद्यातील कलम आणि कायद्यांचा दाखला देत रोहित पवार यांनी तक्रार करण्याचा आपला अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. 

डिजीसीए रिपोर्टनुसारच व्हीएसआर विमान कंपनीवर ठपका ठेवला गेलाय असं सांगत त्याच आधारे आम्ही एफआईआर दाखल करण्याचा आग्रह धरतोय असं ते म्हणाले. ‘दादा ज्या विमानानं बारामतीला गेले ते लेअर जेट प्रकारातलं होतं हे विमान नॉन कम्लायन्स होतं मग तरीही अजित दादांना खराब असलेलं विमान का दिलं? असा आमचा सवाल हे म्हणूनच आम्ही या गलथान कारभाराला जबाबदार असलेल्या व्हिएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे हाच मुद्दा त्यांनी सातत्यानं उपस्थित केला. 

पाचही विमान ग्राऊंड, मग अजित पवारांना बिघाड झालेलं विमान दिलेलं?

24 तारखेच्या डीजीसीएच्या आदेशानुसार व्हीएसआरचे पाचही विमान ग्राऊंड करत त्यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली. नॉन कम्लायन्स कंपनीनं मान्य केला मग, मी पोलिसांसमोर हा प्रश्न केला की , पाचही विमानं ग्राऊंड करतात तर, अजित पवारांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिसं गेलं की मुद्दाम? यासाठीचाच एफआयआर करण्यासाठी आलेलो. जो व्हीएसआर कंपनीच्या मालकांविरोधातील असेल. मात्र, अजित पवारांचं विमान चांगल्या स्थितीत आहे, या अहवालावर कोणी सह्या केल्या? त्यांना शोधा अशी मागणी करणारा दुसरा एफआयआर आम्ही करणार होतो. विमान कोणतं द्यावं, ते उडण्यास सक्षम आहे की नाही, दृश्यमानता आहे की नाही इथपासून इतर सर्व गोष्टींची जबाबदारी आहे Arrow नावाच्या कंपनीकडे. एका व्हॉट्सअप चॅटनुसार एका पवार नावाच्या इसमानं हवामान योग्य असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर दादांच्या पीएनं दादांना सांगितल्यानंतर ते कारमधून विमानात बसले. या कंपनीवर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report

‘कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करायचा की नाही ते सांगू. अॅक्सिडेंट रिपोर्ट फाईल झाल्यामुळं एफआयआर दाखल करता येणार नाही असं पोलीस सांगत आहेत’ असं म्हणताना दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report झाला आहे, मात्र यातील गुन्हेगारी दृष्टीकोनाचं काय? असा सवाल रोहित पवारांनी केला. आपला अधिकारच इथं नाकारला जात असल्याचा नाराजीचा तीव्र सूर त्यांनी आळवला. कबुतरं चोरीला गेल्याचा एफआयआर होतो आणि अपघाताचा एफआयआर का नाही, असं म्हणताना रोहित पवारांनी कातरत्या पण तितक्याच आक्रोशानं शासनावर ताशेरे ओढले. आम्ही मांडलेले मुद्दे चुकीचे असतील तर जेलमध्ये टाका… पण, कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का?’ असं म्हणत रोहित पवारांनी उपस्थित केले उद्विग्न प्रश्न. 

आमचा हक्क का नाकारला जातोय?

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार सर्व नागरिकांना एफआयआर  दाखल करण्याचा अधिकार आहे मग तरीही आमचा हक्क का नाकारला जातोय असाच उद्विग्न प्रश्न त्यांनी पस्थित करत विमानासंदर्भातील माहिती ज्या Whats App चॅटमध्ये होते हे चॅट आहे आपण आधीच दाखवले असून, त्या ग्रुपमध्ये काही मोठे अधिकारी होते असं सांगत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं हा अपघात झाला आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीही एफआयआर आम्ही करण्याची मागणी धरली असल्याचं रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. मात्र पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर मिळालेला नकार हा त्यांच्या संतापात भर टाकताना दिसला. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp