शरद पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता का व्यक्त केली नाही? मिटकरींनी सांगितलं नेमकं कारण
Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash: ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडतो. मुरलीधर मोहोळ यांनी पहाटे धुकं होतं, पण स्पष्ट सूर्यप्रकाश होता सांगितलं. विमान कोसळण्यापूर्वी एक स्फोट झाला आणि नंतर एक स्फोट झाला त्यामुळे शंकेला वाव होता. महाराष्ट्राच्या मनातील जनभावना मी विचारत आहे. माझं मन म्हणतंय की दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. झी 24 तासच्या ‘टू द पॉइंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत त्यांनी अनेक शंका बोलून दाखवल्या आहेत.
“आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. थोड्या वेळाने शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हा विमान अपघात आहे असं सांगितलं. कारण परिस्थिती तशी होती. त्यांनी घातपात असल्याचा संशय आहे असं सांगितलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळला असता. पक्षालाही शंका होती म्हणून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलं. जर घातपात सिद्ध झाला आणि कोणी आढळलं, तर कार्यकर्ता आणि सुनेत्रा पवार सोडणार नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
‘दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच’
“ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडतो. मुरलीधर मोहोळ यांनी पहाटे धुकं होतं, पण स्पष्ट सूर्यप्रकाश होता सांगितलं. विमान कोसळण्यापूर्वी एक स्फोट झाला आणि नंतर एक स्फोट झाला त्यामुळे शंकेला वाव होता. महाराष्ट्राच्या मनातील जनभावना मी विचारत आहे. माझं मन म्हणतंय की दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच आहे,” असं ते ठाणपणे म्हणाले.
‘रेड एअरवेजवर एएआयबीने छापा टाकला, मग व्हीयएआरवर का नाही?’
“लोकप्रतिनिधीला भावना असतात. जनतेच्या मनातील भावना समजून घ्या. मी जनतेचा प्रतिनिधी आहे, मला अजित पवारंनी तिथे बसवलं आहे. ते फार जागरुक होते आणि सहकाऱ्यांचीही काळजी घेत होते. पुरावे नाही, पण तर्क मांडण्यास काही हरकत नाही. साहिल मदन आणि यश कुठे आहेत, सीसीटीव्ही कुठे आहे? काल रेड एअरवेजवर एएआयबीने छापा टाकला, मग व्हीयएआरवर का नाही?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
‘हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना…’
“महाराष्ट्राचा बापमाणूस गेला आहे. महाराष्ट्राला व्हिजन देणार माणूस गेला आहे. माझी फक्त एक शंका आहे, साहिल मदन कुठे आहे? त्यावेळी ट्राफिकमध्ये कुठे अडकला होता? मग तो गेला कुठे? महाराष्ट्राच्या मनाला पडलेले हे प्रश्न मी विचारत आहे. व्हीएसआरच्या पायलटवर 50 कोटींचा विमा उतरवल्याचा आरोप केला तो त्यांना खोडता का आला नाही? सुसाईड बॉम्बर म्हणून सुमित कपूरला पाठवला नसेल का? तर्कात बसत नसतील तर 50 कोटींचे विमे उतरवले खोटं असेल तर व्हीएसआरने खुलासा करावा. जर तू गेला तर कुटुंबाला पोसतो सांगितलं असेल. हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना…गूढ उकललं नाही तर मुंडे, सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. जर अजित पवार काचेची बाटली वापरु लागले असतील तर त्यांना कोणीतरी धोका करु शकतो अशी भीती वाटत होती,” असंही ते म्हणाले.
‘सुनेत्रा पवार सोडणार नाहीत’
“सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवला नसले हे कशावरुन? त्याची बॉडी कुठे आहे? काही जण म्हणतात तो कॅलिफोर्नियात मुलीला भेटत आहे. प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे. अजित पवारांसारखा नेता गमावल्याचं दुख महाराष्ट्राला आहे. या गोष्टीची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीअंती सगळं सिद्ध होईल. जो कणी गद्दार असेल त्याला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत. बदला घेतल्य़ाशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“गद्दार कुठलाही असतो. आंतरबाह्य गद्दार असतात, घरातीलच असावा असं नाही. माझा रोख कोणाकडे नाही. ही महाराष्ट्राच्या मनातील जनभावना आहे. हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत. काही लोक स्पष्ट भूमिका मांडत नसतील, मी मांडतो. बाकीच्यांना बोलावं न बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. ऑफ रेकॉर्ड ते बोलतात, पण मीडियासमोर बोलत नाहीत. माझं अभिनंदनही करतात की तुम्ही चांगली बूमिका घेता. एकतर दवाबाखाली असतील किंवा प्रश्न विचारायची हिंमत नसावी. तुमच्या मतदारसंघातील जनता उद्या तुम्हाला हे प्रश्न विचारेल. ते धक्क्यातून सावरलेले नसतील म्हणूनत बोलत नसतील,” असं ते म्हणाले आहेत.