एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले, पण वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळालाच नाही. राज्य सरकारकडून घोर फसवणूक, येत्या तीन दिवसांत हप्त्याची रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे.
Mungantiwar vs Jorgevar: चंद्रपूर भाजपात पुन्हा एकदा ऑल इज नॉट वेल असं चित्र दिसतंय. महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी दुस-या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्याने आमदार मुनगंटीवार संतापल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार आमने-सामने आलेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आलाय. तिकीट वाटपावरून सुरू झालेला वाद, एबी फॉर्म चोरीचा आरोप, किशोर जोरगेवार समर्थक असलेले सुभाष कासनगोट्टूवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी आणि त्यानंतर महापौर पदासाठी सुरू झालेली फिल्डिंग या सगळ्या घडामोडींमुळे पक्षातील संघर्ष अधिकच तीव्र झालाय.
हा वाद मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानत संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र ऐनवेळी सारिका संदुरकर यांचा अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावरून सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केलीये.
मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर आमदार किशोर जोरगेवारांनी स्पष्टीकरण दिलंय.खांडेकरांच्या अर्जात त्रुटी निघाल्यास अडचणी येऊ नयेत म्हणून संदूरकरांचा फॉर्मा भरून घेतल्याचं जोरगेवारांनी सांगितलंय.वरिष्ठांना विचारून हा निर्णय घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणूक आणि मनपा निवडणुकीतील बंडखोरीचा विषय काढत जोरगेवारांनी मुनगंटीवारांना डिवचलंय.
या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झालाय.नेतृत्वाचा आदेश अंतिम मानला जाईल की स्थानिक राजकारण वरचढ ठरेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या नव्या संघर्षाने कार्यकर्ते आणि उमेदवार मात्र धास्तावलेत.
बीएमसीमध्ये शिवसेनेची ‘ती’ स्ट्रॅटर्जी फेल
भाजपकडून रितू तावडेंना महापौरपदाची संधी देण्यात आली तर सेनेच्या संजय घाडींना उपमहापौर पदाची उमेदवारी पण यावेळी बोलताना महापौरपद न मिळाल्याची सेनेची खदखद मात्र समोर आली. तर कोणत्या पक्षाचा महापौर होईल यापेक्षा मुंबईच्या प्रश्नांवर आता काम करणं जास्त महत्वाचं असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय. भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्याने भाजपचा महापौर होतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंनी म्हटलंय. त्यात शिवसेनेच्या मनातून न मिळालेलं महापौरपद काय जात नाहीये. आता पुढची 5 वर्ष भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत एकत्र काम करावं लागणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमीत्तानं किमान सुरुवातीचा काही काळ शिवसेनेचा महापौर व्हावा ही इच्छा पुर्ण न होता केवळ उपमहापौरपदावर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे येणा-या काळात शिवसेना भाजपचं ट्युनिंग कसं राहतं हे बघावं लागेल.
Narcotics Syndicate Near Mumbai: ठाणे पोलिसांनी ड्रग्जचं एक मोठं रॅकेट उद्धवस्त केलं आहे. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. या कारवाया खंडणी विरोधी पथक आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाने केल्या आहेत. मागील काही काळात शहरांमध्ये ताब्यात घेण्यात आलेला हा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा ठरला आहे.
Add Zee News as a Preferred Source
घोडबंदर रोडवरही कारवाई
ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 13 कोटी 80 लाखांचे हेरॉइन ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. 1 फेब्रुवारी रोजी गायमुख, मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर रोड परिसरात सापळा रचून नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 50 वर्षीय फरदीन गुलजार मुल्ला याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून सहा कोटी 86 लाखांचे दोन किलो 288 ग्रॅम वजनाचे हेरॉइन जप्त केले.
सहा कोटी 94 लाख 40 हजारांचे हेरॉइन
दरम्यान, 23 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तलत सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी 94 लाख 40 हजारांचे हेरॉइन हस्तगत केले. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे साथीदार मोहंमद खान महाडिक (67, रा. कुर्ला) यालाही 26 जानेवारी रोजी अटक केली.
टोळीचा पर्दाफाश
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, सोमनाथ पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड, मोहन परब आणि हवालदार देसाई यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
इतरही अनेक ठिकाणी छापेमारी
या कारवाईशिवाय फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला ठाणे शहर पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेल (एएनसी) आणि क्राइम ब्रँचने विविध भागांत छापे टाकून मोठ्या प्रमाणात हेरॉइन, मेप्हेड्रोन (एमडी), गांजा आणि अवैध कफ सिरप जप्त केले. हे ऑपरेशन्स अंतरराज्यीय ड्रग तस्करी नेटवर्कशी जोडलेले आहेत, आणि त्यात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने दिवा पूर्व भागात छापा टाकून सहा लाख रुपये किंमतीचा 24.2 किलो गांजा जप्त केला आणि तीन आरोपींना अटक केली.हे आरोपी अंतरराज्यीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे शहर पोलिसांच्या एएनसीने दिवा येथील ह्युमॅनिटी पब्लिक स्कूलजवळ ट्रॅप रचून दोन आरोपींना अटक केली. या आरोपींकडे 7 कोटी रुपये किंमतीचं 1.736 किलो हेरॉइन जप्त केलं. हे ड्रग एका कुप्रसिद्ध गँगस्टरशी जोडलेले असून तो 22 वर्षांपासून फरार होता.
Paithani sarees Price: राज्यातच नव्हे तर देशभरात ओळख असलेली येवल्याची पैठणी सध्या अडचणीत सापडली आहे. सोनं आणि चांदीच्या दरवाढीचा थेट फटका पैठणी उत्पादनाला बसत असून, जरीचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे पैठणी महाग होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
पैठणी साडी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. ही साडी देशभरात प्रसिद्ध आहे आणि सण-उत्सव किंवा विवाहसोहळ्यात महिलांची पहिली निवड असते. या साडीवर मोराच्या आकाराची सुंदर नक्षीकाम केले जाते, ज्यामुळे ती आणखी आकर्षक दिसते. सोने आणि चांदीच्या जरीचा वापर करून हातमागावर ही साडी विणली जाते. यामुळे साडी नेसलेली स्त्री अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. पैठणी ही जड आणि मौल्यवान साड्यांमध्ये गणली जाते, म्हणूनच ती महाराष्ट्राची खास ओळख म्हणून ओळखली जाते.
येवला हे नाशिकजवळील गाव पैठणी साड्यांचे मुख्य केंद्र आहे. इथे अनेक महिला विशेषतः पैठणी खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, सध्या येवल्यातील पैठणी उद्योग संकटात सापडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोने आणि चांदीच्या किंमतीत झालेली मोठी वाढ. खऱ्या पैठणीच्या पदरासाठी सोने-चांदीच्या जरीचा वापर होतो, ज्यामुळे उत्पादन खर्च खूप वाढला आहे. परिणामी, पैठणी साड्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी चांदीच्या जरीची किंमत प्रति किलो 3500 ते 3600 रुपये होती, परंतु आता ती 6000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीमुळे पैठणी उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला आहे. याचा थेट परिणाम साड्यांच्या विक्रीवर होत आहे. महागाईमुळे ग्राहक महागड्या पैठण्या खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यामुळे विक्री कमी झाली आहे
येवल्यात शेकडो कारागीर पिढ्यान्पिढ्या पैठणी विणण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ते करघ्यावर दिवस-रात्र मेहनत करतात. मात्र, साड्यांच्या किंमती वाढल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. परिणामी, कारागिरांच्या उत्पन्नात घट झाली आहे. काम असले तरी विक्री कमी असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला येवल्यात पैठणी खरेदीसाठी येतात. मात्र, आता किंमती वाढल्याने त्यांचा उत्साह कमी झाला आहे. गृहिणींना महाग पैठणी घेणे परवडत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. एकूणच, सोने-चांदीच्या दरवाढीमुळे पैठणी उद्योगावर मोठा फटका बसला असून, यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
Bandra Railway Station CCTV Footage: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील भांडणातून काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक असाच प्रकार घडला असून या वेळेस एका प्रवाशाला आपला डोळा गमवावा लागला आहे. किरकोळ वादावरुन एका निरपराध व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी 2026) रात्री सुमारे 11 वाजता वाद्रे स्टेशनवर एका 28 वर्षीय तरुणाला दगड लागून डाव्या डोळ्याची दृष्टी गमावली आहे.
Add Zee News as a Preferred Source
त्या डोळ्याने परत कधीच पाहता येणार नाही
डॉक्टरांनी या प्रवाशाच्या डोळ्यावर जबर मार लागला असून त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी परत येणार नाही. पीडित व्यक्तीचं नाव निशांत रत्नकुमार खत्री असून हा 28 वर्षीय तरुण दादर (पश्चिम) येथील सेनापती बापट मार्गाजवळ मनीष मार्केट येथील रहिवासी आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए पूर्ण केलेला निशांत साकिनाका येथील एका खासगी कंपनीच्या अकाउंट्स विभागात काम करतो.
दोघांच्या भांडणात कारण नसताना गमावला डोळा
पीडित निशांत रत्नकुमार खत्री सागर टेक प्लाझा येथील ऑफिसमधून काम आटोपून अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनने बुधवारी रात्री परत येत होता. ट्रेनच्या डब्यात तिसऱ्या सीटवर बसलेल्या निशांतसमोर ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये भांडण सुरू झाले. एकाने दुसऱ्याला मारण्याची धमकी दिली. वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ट्रेन थांबली तेव्हा एका प्रवाशाने रुळावर उतरून दगड उचलला आणि दुसऱ्यावर फेकला, पण तो ट्रेनला लागला. नंतर त्याने दुसरा दगड उचलून डब्यात फेकला, जो लक्ष्य चुकून निशांत यांच्या डाव्या डोळ्याला लागला. निशांत यांनी सांगितले की, डोळ्यातून रक्त येत असतानाही कोणीही मदत केली नाही. ते रक्त येत असतानाही ट्रेन चालू असतानाच उडी मारून प्लॅटफॉर्मवर उतरले आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसपर्यंत रक्त ओघळत चालत गेले. तेथे 45 मिनिटे वाट पाहावी लागली. नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये निशांतवर उपचार करण्यात आले.
आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा
घटनेनंतर स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण होते. रेल्वे पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यात दिसलेल्या इसमाबाबत गुप्त बातमीदारांना माहिती दिली असता सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा दादर येथे दिसत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण टीमने सापळा लावून त्यास दादर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचाकड़े अधिक विचापूस व चौकशी करून त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव योगेंद्र वंशराज बौध्द असं असल्याचं सांगितलं आरोपी 26 वर्षांचा आहे. आरोपी हा सध्या मुंबईत मजुरी करत असून पालघरमध्ये वास्तव्यास असला तरी मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा आहे.
Sunil Tatkare To The Point Interview: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आलेलं नाही. प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: त्यांच्या नावाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्रिपदानंतर या पदावरही विराजमान होत सूत्रं हाती घेतील अशी चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
पक्षाचं पुढे काय होणार? असं विचारलं असता सुनील तटकरेंनी सांगितलं की, “पक्ष संघटन मजबूत करणं, दादांनी जो विचार दिला त्याला पुरक काम करणं, वहिनींच्या नेत्त्वात सरकारमध्ये आहोत, त्यामुळे सरकारच्या अनेक वेगळ्या योजना पक्ष संघटना, विधानसभा, विधानपरिषदेतून जनतेपर्यंत पोहोचवणं याला गती द्यायची आहे. दादा नाहीत ही कल्पना आम्हाला कोणाला पचत नाही. पण वहिनींनी धीर दाखवला त्यासोबत राहून पुढील काम करणं कर्तव्य असून त्यादृष्टीने पुढील वाटचाल करु”.
पक्षाचं नेतृत्व कोणाचं असेल यावर त्यांनी उत्तर दिलं की, “यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या प्रयत्न झाला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत स्पष्ट केलं की, ना त्यांचं नाव चर्चेत होतं, ना त्या स्पर्धेत होतो. मीदेखील वारंवार स्पष्ट केलं आहे की, कार्यकर्ते, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे ती बाब होईल”.
“विधीमंडळ नेता निवडीपर्यंतही मला प्रश्न विचारले गेले. बैठकीची प्रक्रिया झाल्यावर मी सांगितलं. पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्या, घटकांच्या, विधीमंडळ सदस्यांच्या, कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत. पक्षाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असं सांगत त्यांनी सुनेत्रा पवार अध्यक्ष होतील की नाही यावर उत्तर दिलं. आमदारांची असेल तीच माझी भावना आहे. योग्य वेळी एकमताने निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
पार्थ पवार आणि जय पवार यांची काय भूमिका असेल? यावर ते म्हणाले, “ते दोघे तरुण आहेत. दादांचा विचार घेत ते त्यांच्या प्रतीने काम करत आहेत. अशावेळी पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना सोबत देऊन पक्ष उभारणीसाठी एकत्र काम करु. ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होईल तेव्हा त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल”.
“मला राज्यात यावं असं वाटलं नाही. दादा नाहीत हा मोठा आघात आहे. पण इथे एक चांगली फळी दादांनी आणि आम्ही निर्माण केली आहे. त्यामुळे केंद्रात लोकसभा सदस्य काम करण्यातच मला रस आहे. राज्य पातळीवर संघटन ज्याची जबाबदारी दादांनी विश्वासाने माझ्यावर सोपवली होती, ती विश्वासाने पार पाडणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जे लक्ष द्यावं लागणार आहे ते देईन. राज्याच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. सत्तेच्या राजकारणात येण्याची माझी अपेक्षा नाही. आम्ही आणि दादांनी कष्टाने उभं केलं आहे ते पुढे चालू ठेवणं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडेन,” असं तटकरेंनी म्हटलं.
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू. आमदारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडू. जर गरज असेल तेव्हा संवाद साधू असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली असल्याने योग्य वेळी चर्चा होईल आणि पक्षाची भूमिका व्यासपीठावर मांडू. ज्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्यासोबत चर्चा करु असं सांगत त्यांनी अर्थखात्यावर भाष्य करु.