'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO

'18 सेकंदांचा व्हिडीओ' सांगत कोकाटेंचा इशारा; रोहित पवारांनी 6 सेकंद वाढवत दिलं उत्तर; शेअर केला नवा VIDEO


Manikrao Kokate New Video: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण आयुष्यात कधीच रमी खेळलो नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?”.

“विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

“विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

कोकाटेंनी काय म्हटलं आहे?

“हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं,” असा दावा माणिकराव कोकाटेंनी केला आहे. 

“मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 





Source link

संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी नामदेव' कसे झाले? शीख धर्मावर काय आहे प्रभाव

संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी नामदेव' कसे झाले? शीख धर्मावर काय आहे प्रभाव


संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील संत पण पंचाबमध्ये ते ‘बाबाजी’ कसे झाले? महाराष्ट्र ते पंजाब हा प्रवास नेमका कसा होता. महाराष्ट्रातील संत पंजाबमध्ये भगत नामदेव किंवा बाबाजी कसे झाले? हे पाहूया. 

संत नामदेवांचा पंजाबशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी पंजाबमध्ये बराच काळ घालवला, विशेषतः गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमानमध्ये, जिथे ते सुमारे वीस वर्षे राहिले. तेथे त्यांनी भक्ती आणि कीर्तनाद्वारे लोकांना प्रबोधन केले, ज्यामुळे ते “बाबा नामदेव” म्हणून लोकप्रिय झाले. संत नामदेवां यांचे पंजाब येथील घुमानमधील निवासस्थान आहे. संत नामदेवांनी घुमानला त्यांची कर्मभूमी बनवले आणि तेथे एक मंदिर देखील आहे जे त्यांची समाधी म्हणून ओळखले जाते.

त्यांनी पंजाबी भाषा शिकली आणि ती त्यांच्या प्रवचनांमध्ये आणि भजनांमध्ये वापरली, ज्यामुळे स्थानिक लोक त्यांच्याशी जोडले गेले. एवढेच नव्हे तर संत नामदेवांनी घुमानमधील लोकांना वाईट सवयी आणि व्यसनांपासून दूर राहण्यास प्रेरित केले, ज्यामुळे गावात सकारात्मक बदल झाला.
संत नामदेवांच्या काही स्तोत्रांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये देखील आहे, जो त्यांचा प्रभाव दर्शवितो.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध प्रस्थापित करण्यात संत नामदेवांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये प्रेम आणि एकता वाढली. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख संत होते, ज्यांनी महाराष्ट्रात भक्ती चळवळ लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शिखांसाठी पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांचे ६१ श्लोक समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी दोन्ही राज्यांमध्ये एक मजबूत संबंध प्रस्थापित केला आणि आजही त्यांना पंजाबमध्ये “बाबा नामदेव” म्हणून ओळखले जातात. संत नामदेवांनी धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला आणि त्यांच्या शिकवणी आजही लोक पाळतात. संत नामदेवांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये कविता रचल्या आणि त्यांच्या काही श्लोकांचा गुरु ग्रंथ साहिबमध्येही समावेश आहे.





Source link

209 मुंबईकरांचा मृत्यू, 192 साक्षीदार असतानाही कोर्टाने 'या' 4 गोष्टींचा उल्लेख करत 12 आरोपींना निर्दोष सोडलं

209 मुंबईकरांचा मृत्यू, 192 साक्षीदार असतानाही कोर्टाने 'या' 4 गोष्टींचा उल्लेख करत 12 आरोपींना निर्दोष सोडलं


Mumbai Local Train Bomb Blast 2006 Case Update: मुंबईमध्ये 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील 12 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या तपास यंत्रणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर या चार वेगवेगळ्या तुरुंगांमधील आरोपींचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टाने म्हणणं ऐकून घेतलं होतं. 2025 जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. सत्र न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिलेल्या शिक्षेत 5 आरोपींना फाशी आणि 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. मागील 19 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आत या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने हा निकाल देताना तीन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत ते कोणते हे पाहूयात…

नेमकं घडलेलं काय?

11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. पहिल्याच स्फोटाने मुंबईकरांना सुन्न झाले. त्यानंतर 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये 209 जणांचे बळी गेले. तसेच 824 जण जखमी झाले. पश्चिम रेल्वेच्या माहिम ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे बॉम्बस्फोट झाले. प्राथमिक तपासात हे बॉम्ब पहिल्या दर्जाच्या डब्यांमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. तसेच हे बॉम्ब गोवंडीत तयार करण्यात आले असून यादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनीही त्यात मदत केल्याची माहिती समोर आली होती.

तपास कसा झाला?

बॉम्बस्फोटांनंतर 10 दिवसांच्या आतच दहशतवादविरोधी पथक दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले होते. 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान एटीएसने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. पाकिस्तानची संस्था आयएसआयने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवल्याचे समोर आले होते. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमीशी असल्याची माहितीही मिळाली होती. 2008 मध्ये या घटनेतीच्या पार्श्वभूमीवर सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनचे नावही समोर आले होते. पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण झाली.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं प्रकरण

सुनावणीदरम्यान फेब्रुवारी 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवर स्थगिती आणली. कमाल अंसारी या आरोपीने मकोका कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली.

192 साक्षीदार पण एकही आरोपी दोषी नाही

सुनावणीदरम्यान तब्बल 192 साक्षीदार न्यायालयासमोर आले. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी, 8 डॉक्टर आणि 5 प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकाऱ्यांचा समावेश होता. या घटनेच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. तसेच यामध्ये रॉ बरोबरच आयबीचीही मदत मागितली होती. तपासादरम्यान एकूण 400 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अखेरीस 13 आरोपीमधून 12 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. मात्र आता त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने या प्रकरणामध्ये कोणत्याही आरोपीला शिक्षा होणार नाही असं स्पष्ट झालं आहे. 

आरोपींना निर्दोष मुक्त करताना काय म्हटलं?

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना, 192 साक्षीदारांचा जबाब नोंदवल्यानंतरही त्यात तथ्य आढळत नसल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. “साक्षीदाराच्या जबाबात तथ्य आढळलं नाही,” असा पहिला शेरा न्यायालयाने दिला आहे.

पुढे न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निकाल देताना, “स्फोटात बॉम्ब कोणते होते हे सांगण्यात अपयश आलं आहे,” असं सांगितलं.

सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणामध्ये सादर करण्यात आलेले बॉम्ब, बंदुका, मॅप यासारखे पुराव्यांना फारसं महत्त्वं नाही, असंही न्यायालयाने सांगितलं.

सबळ पुराव्यांच्या आभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचं सांगितलं.





Source link

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फक्त एका कृतीमुळे मोठ्या संकटात सापडले

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एकही शब्द न बोलता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फक्त एका कृतीमुळे मोठ्या संकटात सापडले


Manikrao Kokate found playing rummy in Assembly : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच. दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ शऱद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. यानंतर माणिकराव कोकाटेंवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठतेय.

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच  करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित  असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत  असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी  खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना  आणि सरकारला पीकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी  करणा-या शेतक-यांची ‘कभी गरीब किसानों कीं खेतीपर भी  आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का? रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंवर चांगलीच आगपाखड केलीय. 

राज्यात 650 शेतक-यांनी आत्महत्या केलीय..  मात्र, कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यक्त असल्याची टीका राऊतांनी केलीय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मात्र, कोकाटेंचं समर्थन करताना एक अजब वक्तव्य केलंय. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा वादात सापडले नाहीयेत. या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यासह त्यांच्या पक्षाची कोंडी झालीय. मात्र, पुन्हा एकदा कोकाटे वादात सापडले आहेत. त्यामुळे विरोधकांना देखील त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे.

काँग्रेसनं देखील माणिकराव कोकाटेंना धारेवर धरलंय. शेतकरी मरतोय आणि कृषीमंत्री रमी खेळतोय असं म्हणत वडेट्टीवारांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी मंत्रिमंडळाची अवस्था झाल्याचा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी केला आहे. दरम्यान या सर्व वादावर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंय.मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती ती स्कीप करतानाचा तो व्हिडिओ आहे. तसंच माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील माणिकराव कोकाटेंनी केला आहे. 

जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना लोकशाहिच्या मंदिरात पाठवलं जात. त्याच लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळत असतील तर जनतेनं कोणाकडून अपेक्षा करायच्यात. राज्यात शेतक-यांना खतं मिळत नाहीयेत. कुठे पाऊस न पडल्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय. तर कुठे शेतकरी आत्महत्या करतोय. मात्र, राज्याचे कृषीमंत्र्यांचं याकडे लक्ष नसून ते विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे माय-बाप शेतक-यांनी कुणाकडून अपेक्षा करायच्यात असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.





Source link

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबद्दल उद्धव ठाकरेंची मोठं विधान; 'स्थानिक पातळीवर…'

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबद्दल उद्धव ठाकरेंची मोठं विधान; 'स्थानिक पातळीवर…'


Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असणार की नाही, याबद्दल सामानाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय.  

महापालिका निवडणुकीत एकाला चलो रे?

ठाणे, मुंबईसह येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत आम्ही जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरणार असल्याचही एल्गार उद्धव ठाकरेंनी केला आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असेल की नाही याबद्दलही उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगून टाकलं. ते म्हणाले की, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं, ते म्हणाले की, कदाचित ते स्थानिक पातळीवर विषय सोडतील. ठिक मग तसं असेल तर तसं करु. मी मुंबईला राजकीयदृष्ट्या पण महाराष्ट्रपासून वेगळी समजणार नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार होऊ शकतं नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत, त्यांची स्वत:ची स्वायत्तता आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्या त्या पक्षाला जे योग्य वाटत असेल तसं करायचं असेल तसं करू, लढायचं तर नक्कीच आहे. 

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा!

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. मराठी माणसाच्या हातात मुंबई राहू नये, हा त्यांचा केवीलवाना प्रयत्न आहे. म्हणून मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीय अशा लोकांकडून आम्हाला म्हणजे मराठी लोकांना मराठी भाषिकांना पेटवण्यासाठी आवाहानाची भाषा करतात. त्यांच्या या गोष्टींचा काही फरकच पडत नाही. इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते गुणागोविंदाने राहत आहेत. अगदी रक्तदान शिबिर जे शिवसेना करते ते आम्ही कोणत्या भाषिक करत आहे असं काही पाहत नाहीत. 

मुख्यमंत्र्यांना हा माझा टोमणा नाही तर…

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी गुच्छा दिला होता, तेव्हाच आणि तेवढीच भेट झाली. आता सध्या त्यांच्या सहकारी, मंत्र्यांचा जे काही भानगंडी लफडी सुरु आहेत, ती मुख्यमंत्र्यांनी मोडीत काढली पाहिजे. हे मी त्यांनी कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय की, हा टोमणा नाही सल्ला आहे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही आजूबाजूला चालले आहे, अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारी कामं आहेत. बॅगेतील पैसे, कुठे धक्काबुक्की तर कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, हे सगळं जे काही चाललं आहे, याचे प्रमुख म्हणून बदनाम शेवटी देवेंद्र फडणवीस होत आहे. आपण जे म्हणतो नो दिव्या खाली अंधार तसा हा प्रकार आहे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र जसा लोकसभेच्या वेळी जागा झाला होता, तसा तो परत जागा झाला पाहिजे. नाही तर त्यावेळी आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर काढला जातोय. आता जाग नाही आली तर आपले डोळे कधीच उघडणार नाही.  





Source link

PF अकाऊंटमध्ये पैसे असो वा नसो…, मृत्यूनंतर तुमच्या परिवाराला मिळेल 'इतकी' मोठी रक्कम!

PF अकाऊंटमध्ये पैसे असो वा नसो…, मृत्यूनंतर तुमच्या परिवाराला मिळेल 'इतकी' मोठी रक्कम!


EPFO Rules: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संगठित क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले EPFO खाते सक्रिय ठेवणे आणि त्याची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आता कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा मिळेल. मग कर्मचाऱ्याच्या PF खात्यात पैसे असो वा नसो. नोकरीत 60 दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

नवीन नियम काय सांगतात?

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EDLI योजनेत बदल करताना महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी EDLI योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याच्या PF खात्यात किमान 50,000 रुपये असणे आवश्यक होते. आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपये विम्याची रक्कम मिळेल. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 12 महिने नोकरी केली असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. नव्या नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर 60 दिवसांपेक्षा कमी असेल, तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळेल. याचा अर्थ, दोन नोकऱ्यांमधील कमी कालावधीचा खंड असला तरीही कर्मचारी EDLI योजनेच्या विम्याच्या लाभासाठी पात्र ठरेल.

जर कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून PF कपात झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत झाला, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला, त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे.  

EDLI योजना म्हणजे काय?

कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) अंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश संगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसांना एकरकमी आर्थिक मदत दिली जाते. विशेष बाब म्हणजे, या योजनेसाठी कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. विम्याचा हप्ता पूर्णपणे नियोक्त्याकडून भरला जातो. 

कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसा होईल फायदा?

या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांच्या PF खात्यात जास्त शिल्लक नसते, त्यांना या योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे. तसेच, नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळेल, यामुळे कर्मचाऱ्यांना लवचिकता मिळेल. याशिवाय, शेवटच्या पगारानंतर 6 महिन्यांपर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूद ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.





Source link