Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस; पाहा राज्यातील हवामान अंदाज

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस; पाहा राज्यातील हवामान अंदाज


Maharashtra Weather News : (Monsoon) मान्सून वाऱ्यांचा वेग तुलनेनं कमी झाला असला तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये सूर्यकिरणांना झाकोळणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळत असून, राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशी 30 ते 40 किमी वेगाचत्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेच्या सोबतीनं 27 ते 31 ऑगस्टदरम्यान मराठवाज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी असेल. याशिवाय वाऱ्याच्या याच वेगासह पावसाच्या तुरळक सरींची हजेरी उत्तर मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर पावसाच्या ढगांची दाटी होणार असून, त्यामुळं पाऊस बरसणार आहेच. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानतासुद्धा कमी होणार असल्यानं प्रवासादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून, उत्तर कोकणातील जिल्ह्यांनासुद्धा हा पाऊस झोडपताना दिसणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पारघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस डोक्यावर येईल तसा पावसाचा जोर तुलनेनं कमी होताना दिसणार आहे. 

राज्यात वाढलेल्या पावसामुळं कमाल आणि किमान तापमानाच बदल होताना दिसत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये पावसानं विश्रांती घेताच आर्द्रतेचं प्रमाण वाढत असून, त्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा भेडसावत आहेत. सध्या मोसमी पाऊस हा अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत असून येत्या काळात हे पर्जन्यमान कसं आणि किती प्रमाणात कमी होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, गणेशोत्सवादरम्यान मिळणारी पावसाची साथ हीच वस्तूस्थिती आहे हे खरं. 

FAQ

राज्यात सध्या मान्सूनची स्थिती काय आहे?
मान्सून वाऱ्यांचा वेग कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे?
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

पावसाचा कालावधी आणि तीव्रता कशी असेल?
27 ते 31 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ताशी 30-40 किमी वेगाच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पडतील.





Source link

मनोज जरांगेंच्या मोर्चासंदर्भात महत्त्वाची बातमी, आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून…

मनोज जरांगेंच्या मोर्चासंदर्भात महत्त्वाची बातमी, आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून…


Maratha Reservation : मराठा बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षणासाठी आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

अशातच मनोज जरांगे पाटील हे सकाळी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने आंदोलकांसह रवाना झाले आहेत. अशातच आता जरांगे यांच्या आंदोलनाबाबत हाय कोर्टात वाद सुरु होता. 

मुंबई पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी

अशातच आता  मनोज जरागेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी, रविवारी आंदोलनाला परवानगी नसणार आहे. 

मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली असून यामध्ये 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. तसेच या आंदोलनाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

‘एका दिवसात आरक्षण द्या’

मात्र, पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत मात्र एक दिवसांचं परवानगी मान्य नसल्याचं मनोज जरांगे यावेली म्हणाले. तसेच एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आंदोलनाला एका दिवसासाठी परवानगी

– सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या नाहीत
–  आंदोलकासोबत 5 वाहनांना परवानगी
–  5 हजार आंदोलकांना परवानगी
– 7 हजार चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा
– मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही
– ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्याला मनाई
– आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ

FAQ

1. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कोणते आंदोलन जाहीर केले आहे?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गात 10% आरक्षण मिळावे यासाठी 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण आणि आंदोलन जाहीर केले आहे.

2. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे का?

होय, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसासाठी (29 ऑगस्ट 2025) सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी (30 आणि 31 ऑगस्ट) आंदोलनाला परवानगी नाही.

3. मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत? 

आंदोलनात फक्त 5,000 आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे.

आंदोलन शांततापूर्ण असावे आणि कोणत्याही प्रकारे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊ नये.

गणेशोत्सवाच्या काळात (27 ऑगस्टपासून सुरू) मुंबईतील वाहतूक आणि उत्सवात व्यत्यय येऊ नये याची काळजी घ्यावी.

आंदोलकांनी मुंबई पोलिसांनी नियुक्त केलेल्या मार्गाचे पालन करावे.





Source link

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव काळातील बोर्डाच्या परीक्षांबाबत शासनाचा मोठा निर्णय

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव काळातील बोर्डाच्या परीक्षांबाबत शासनाचा मोठा निर्णय


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

29000 KM चे खराब रस्ते तरी द्यावा लागतोय टोल; महाराष्ट्रातील खराब रस्त्यांचा आकडा तर थक्क करणारा

29000 KM चे खराब रस्ते तरी द्यावा लागतोय टोल; महाराष्ट्रातील खराब रस्त्यांचा आकडा तर थक्क करणारा



Potholes In Highway: 5 वर्षात राष्ट्रीय महामार्गावर 80 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 



Source link

महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल

महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल


Siddhivinayak Temple Mumbai : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. अनेक जण गणेशोत्सवात आवर्जून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातात. भाविकांची रीघ लागली आहे. जगभर प्रसिद्ध असलेलं मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.  भारतातील विविध राज्यातीलच नाही तर जगभरातील भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचा 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल. महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? जाणून घेऊया. 

असा आहे सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास

225 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर बांधल्याच्या नोंदी सापडतात. देऊबाई पाटील  नावाच्या महिलेने  सिद्धिविनायक मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. माटुंगा परिसरात राहणाऱ्या देऊबाई पाटील या सधन घरातील महिला होत्या. देऊबाई पाटील यांना मूल होत नव्हते. त्यांच्या घरी सिद्धिविनायक गणपतीचे छायाचित्र होते. त्या दररोज मनोभावे या तसबीरीची पूजा करायच्या. मूल झाल्यास मी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधने असा नवस त्यांनी केला. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मूल झाले.  

मूल झाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण केला. सन 1801 मध्ये त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर बांधले. याचा सर्व खर्च पाटील कुटुंबानेच केला. मूळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप लहान होते. सुरुवातीला विटांचा वापर करुन हे  घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधण्यात आले  होते. जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले.

असे जगप्रसिद्ध झाले  सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी देऊबाई पाटील  यांची इच्छा होती. अनेक महिला नवस पूर्ण झाल्याचे सांगतात. सिद्धिविनायकाच्या  दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण असे भाविक सांगतात. यामुळेच फक्त भरातातूनच नाही तर जगभरातील भक्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणताच भेदभाव केला जात नाही. या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली असतात. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. सर्व जाती धर्माचे सर्वसामान्य नागरिक ते अगदी लोकप्रिय सेलिब्रेटीं बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांना स्थान मिळाले आहे. यापैकी एक मंदिर हे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे 160 किलो सोने आहे. मंदिराचा गाभारा हा 3.7 किलो सोन्याने मढवलेला आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळते. या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे.  मंदिराला दान स्वरुपात मिळालेली देणगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी वापरली जाते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन वैद्यकिय, शैक्षणिक तसेच गरजूंनाआर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक ट्रस्ट सामान्यांच्या मदतीला धावून जातो. सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. )

FAQ

1 सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे?

सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी परिसरात (पूर्वी माटुंगा परिसरात) आहे.

2 सिद्धिविनायक मंदिर कोणी आणि कधी बांधले?

सिद्धिविनायक मंदिर 1801 मध्ये देऊबाई पाटील नावाच्या महिलेन बांधले. त्यांना मूल होत नसल्याने त्यांनी सिद्धिविनायकाचा नवस केला होता, आणि मूल झाल्यावर त्यांनी हा नवस पूर्ण करून मंदिर बांधले.

3 सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास काय आहे?

225 वर्षांपूर्वी (1801 मध्ये) देऊबाई पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला हे मंदिर लहान आणि विटांनी बांधलेले घुमटाकार रचनेचे होते. नंतर जीर्णोद्धार करून मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले.

 





Source link

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? अजित पवार म्हणतात,'या बातम्या…'

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? अजित पवार म्हणतात,'या बातम्या…'


CM Upset On PWD Officers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरायला हवा.जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात.तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदे आम्हाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पाची कामे लवकर पूर्ण करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. अशा प्रकारचा अपहार जर नगरविकास मंत्री करत असेल याचा अर्थ केंद्र व राज्य यांचे भ्रष्टाचारात संगनमत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या नगरविकासाबाबत जनतेला विश्वासात घेऊन नगर विकास खात्यात कसा भ्रष्टाचार झालेला आहे हे त्यांनी सांगायला हवे, असे राऊत म्हणाले. पन्नास वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचार काढतात असे मुख्यमंत्र्यांना वाटते मात्र तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगर विकास मंत्रीला बडतर्फ करा आणि महाराष्ट्र समोर नवा पायंडा पाडा, असेही ते पुढे म्हणाले. 

तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनदेखील यावर प्रतिक्रिया आली आहे.  मुख्यमंत्र्यांनी एका विभागावर नाराजी व्यक्त केली. त्याच स्वगत पण त्याच करणार काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

मुख्यमंत्र्यांनी नगरविकासच्या अधिकाऱ्यांना झापणं आणि त्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची टीका या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले की, खात्याविषयी पसरवले जाणारे दावे तथ्यहीन आहेत. त्यांनी सरकारच्या एकजुटीवर भर देत या बातम्या निराधार असल्याचे ठासून सांगितले. 

FAQ

प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी का व्यक्त केली?

उत्तर: मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचा निधी मार्चपूर्वी वापरण्याबाबत नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रकल्पांचा आढावा घेतात, त्यामुळे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याचे आणि केंद्राचा निधी वेळेवर वापरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रश्न: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?

उत्तर: शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अपयशी ठरवले आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, नगरविकास खात्यात भ्रष्टाचार सुरू असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगावे आणि शिंदे यांना हटवावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, नाराजी व्यक्त केल्यानंतर कारवाई करावी, अन्यथा ती केवळ स्वगत राहील.

प्रश्न: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बातम्यांवर काय म्हटले?

उत्तर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, नगरविकास विभागातील घडामोडींबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या तथ्यहीन आहेत आणि त्यांचे खंडन केले.





Source link