New Rules: 17 एप्रिलपासून बदलतोय वाहतुकीचा नियम, माहिती नसेल तर बसेल 10 हजार रुपयांचा दंड!

New Rules: 17 एप्रिलपासून बदलतोय वाहतुकीचा नियम, माहिती नसेल तर बसेल 10 हजार रुपयांचा दंड!


New Traffic Rules: महाराष्ट्रातील वाहन मालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 17 एप्रिलपासून सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. ज्यांनी अद्याप ही विशेष नंबर प्लेट बसवली नाही, त्यांना मोठी अडचण येणार आहे. विना HSRP प्लेटच्या गाड्यांना दंड तर बसणारच, शिवाय आरटीओशी संबंधित अनेक कामेही अडकून बसतील. आता प्रत्येक वाहन मालकाने तातडीने प्लेट बसवून घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

काय आहे हा नवा नियम?

17 एप्रिल 2026 पासून HSRP नंबर प्लेट सक्तीची झाली आहे. यापूर्वी अनेक वाहनांवर जुनी प्लेट होती, पण आता ती बदलणे गरजेचे झाले आहे. शुक्रवारपासून म्हणजे 17 एप्रिलनंतर पोलिस किंवा आरटीओ अधिकारी तपासणी करताना ही प्लेट न दिसल्यास कारवाई होईल. सरकारने यासाठी कडक धोरण आखले आहे. ज्यांना अद्याप प्लेट नाही, त्यांनी आता त्वरित अर्ज करावा. उशीर झाल्यास आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागेल. ही नियमावली दुचाकी, चारचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना लागू आहे.

HSRP प्लेट म्हणजे नेमके काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही सामान्य नंबर प्लेटपेक्षा खूप वेगळी आणि सुरक्षित असते. तिच्यात खास कोड, होलोग्राम आणि उच्च दर्जाचे साहित्य वापरले जाते. यामुळे वाहन चोरी, बनावट प्लेट किंवा अपघातात नंबर बदलणे कठीण होते. प्रत्येक प्लेटवर वाहनाची माहिती सुरक्षितपणे कोरली जाते. सरकारने ही प्लेट सुरक्षिततेसाठी आणि वाहन ओळखण्यासाठी अनिवार्य केली आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ती बसवली आहे, पण अजूनही काही जणांकडे जुनी प्लेटच आहे. ही प्लेट बसवल्याने वाहन सुरक्षित राहते आणि सरकारला देखरेख सोपी होते.

दंडाची रक्कम किती?

विना HSRP प्लेटच्या वाहनावर 10 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. याशिवाय प्रदूषण प्रमाणपत्र (PUCC) न दिल्यास स्वतंत्र दंडही होऊ शकतो. उदाहरणार्थ, पहिल्या वेळी 1 हजार, दुसऱ्या वेळी 2 हजार आणि वारंवार उल्लंघन झाल्यास 10 हजार दंड आकारला जातो. HSRP नसल्यास 5 हजार रुपयांचा वेगळा दंडही होऊ शकतो. दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास एकूण दंड आणखी वाढू शकतो. हे दंड टाळण्यासाठी आता वेळ आहे. दंडाची रक्कम भरणे टाळण्यासाठी ताबडतोब प्लेट बसवावी, असे वाहन विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीओ कामे कशी अडकतील?

HSRP प्लेट नसल्यास गाडीशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे थांबतील. उदाहरणार्थ, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUCC) मिळणार नाही. विमा नूतनीकरण, फिटनेस प्रमाणपत्र, कागदपत्र तपासणी अशा सर्व गोष्टींमध्ये अडथळा येईल. आरटीओ कार्यालयात जाऊनही काम पूर्ण होणार नाही. यामुळे वाहन मालकांना रोजच्या रोज अडचण येईल. विमा कंपन्याही HSRP नसल्यास नूतनीकरण करणार नाहीत. म्हणून १७ एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

HSRP प्लेट कशी मिळवावी? 

प्लेट बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे सोपे आहे. महाराष्ट्र वाहतूक विभागाच्या वेबसाइटवर https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या लिंकवर जा. तिथे वाहनाचा नंबर, मॉडेल, मालकाची माहिती भरा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तारीख आणि वेळ कळवली जाईल. त्यानुसार अधिकृत केंद्रावर जाऊन प्लेट बसवता येईल. घरी बसूनही ऑर्डर करता येते. फक्त काही मिनिटांत अर्ज पूर्ण होतो. जास्त गर्दी टाळण्यासाठी आता लगेच अर्ज करा.

वाहन मालकांसाठी सल्ला 

सर्व वाहन मालकांनी आता तातडीने HSRP प्लेट बसवून घ्यावी. शेवटच्या क्षणी गर्दी होईल आणि काम रखडेल. दंड वाचवण्यासाठी आणि गाडीचे कामे सहज चालू ठेवण्यासाठी ही प्लेट आवश्यक आहे. सरकारने याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ज्यांनी अद्याप प्लेट नाही, त्यांनी त्वरित वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. सुरक्षित आणि कायदेशीररीत्या गाडी चालवण्यासाठी हा नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.





Source link

CM फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्रात आणली ₹6,00,000,000,00,000 ची प्रचंड गुंतवणूक; कोणाला होणार फायदा हेसुद्धा सांगितलं

CM फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्रात आणली ₹6,00,000,000,00,000 ची प्रचंड गुंतवणूक; कोणाला होणार फायदा हेसुद्धा सांगितलं


Sayali Patil

सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

…Read More





Source link

'स्वातंत्र्यवीर'ही पदवी कोणी दिली? सावरकरांच्या पणतूंनी उलटतपासणीवेळी कोर्टात काय सांगितलं?

'स्वातंत्र्यवीर'ही पदवी कोणी दिली? सावरकरांच्या पणतूंनी उलटतपासणीवेळी कोर्टात काय सांगितलं?


Satyaki Savarkar On Swatantryaveer Title: पुणे विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी झाली. सात्यकी यांनी न्यायालयात अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले सात्यकी?

विनायक दामोदर सावरकर यांनी काही पुस्तके इतर लोकांच्या नावाने प्रसिद्ध केली होती, असे सात्यकी सावरकर यांनी कोर्टात स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर काही पुस्तके इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने छापली असण्याची शक्यता त्यांनी पूर्णपणे नाकारली नाही. शिवाय सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लेखन-प्रकाशनांबद्दल स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी यांनी हे सगळे खुलासे केले.

ऐतिहासिक चर्चेला नवीन वळण

‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सरकारने दिलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात कबूल केले. त्यांनी सांगितले की, ‘ही पदवी जनतेकडून लोकप्रिय झाली असावी. पण याबाबत कोणताही सरकारी किंवा अधिकृत कागदपत्री पुरावा उपलब्ध नाहीट, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कबुलीने ऐतिहासिक चर्चेला नवीन वळण मिळाले आहे.

पदवी जनमानसातून उद्भवली

‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी प्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी आपल्या चरित्रग्रंथात वापरली होती. रानडे यांनी ही पदवी आपल्या स्वतःच्या कल्पनेतून आणि आवडीतून दिली होती. यामागे कोणतीही सरकारी किंवा संस्थात्मक मंजुरी होती की नाही, हे मला माहीत नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही पदवी जनमानसातून उद्भवली असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

ऐतिहासिक दाव्यांवर भाष्य

या उलटतपासणीत सात्यकी सावरकर यांनी अनेक ऐतिहासिक दाव्यांवरही भाष्य केले. त्यांनी पुस्तक-प्रकाशन आणि लेखन याबाबत आपल्या मर्यादित ज्ञानाची कबुली दिली. राहुल गांधी यांच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सावरकरांच्या जीवनातील काही पैलूंबाबतही नवीन माहिती दिली. यामुळे खटल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवीन दृष्टिकोन समोर 

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात झालेली ही सुनावणी आता तहकूब झाली आहे. पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या खटल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही पैलू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सात्यकी सावरकर यांच्या कबुलीमुळे ‘स्वातंत्र्यवीर’ पदवीच्या मुळाबद्दल आणि सावरकरांच्या लेखन-कार्याबद्दल नवीन दृष्टिकोन समोर आला आहे.





Source link

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवाराचे नाव जाणून शॉक व्हाल; 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवाराचे नाव जाणून शॉक व्हाल; 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

Explainer: मुंबईतील IT पार्क 8,55,00,00,000 रुपयांना विकला; IT पार्कचा मालक प्रसिद्ध अभिनेता, 15,12,00,00,000 रुपयांची अफाट संपत्ती

Explainer: मुंबईतील IT पार्क 8,55,00,00,000 रुपयांना विकला; IT पार्कचा मालक प्रसिद्ध अभिनेता, 15,12,00,00,000 रुपयांची अफाट संपत्ती


Jitendra Property Deal: मुंबई हे फक्त भरातातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत मालमत्तांचे अनेक मोठे व्यवहार होतात. हे मोठे व्यवहार नेहमीच चर्चेत येतात. यात निवासी मालमत्तांसह कर्मिशीयल मालमत्तांचा देखील समावेश असतो. अशातच  मुंबईतील बालाजी IT पार्क ची डील चर्चेत आली आहे. मुंबईतील बालाजी IT पार्क 8,55,00,00,000 रुपयांना विकला आहे. या  IT पार्कचा मालक प्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता 15,12,00,00,000 रुपयांच्या अफाट संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया हा अभिनेता कोण आहे?    

Add Zee News as a Preferred Source

मुंबईतील बालाजी IT पार्क चा मालक दुसरा तिसरा कुणी नसून प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेता जितेंद्र कपूर आहे.  जून 2025 मध्ये जितेंद्र यांनी एक मोठा व्यवहार केला. जितेंद्र यांनी मुंबईतील बालाजी IT पार्क 855 कोटी रुपयांना विकला आहे. विक्रेते पॅन्थिऑन बिल्डकॉन आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपन्या असून, त्या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत.

जितेंद्र यांनी 855 कोटी रुपयांना हा IT पार्क विकला. जितेंद्रचा मुलगा, तुषार कपूर याने ही जमीन विकली. केवळ मुद्रांक शुल्कापोटी 8.96 कोटी रुपये आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले. 

जितेंद्र यांचा मुंबईतील IT पार्क कोणी विकत घेतला?

जितेंद्र कपूर यांचा बालाजी IT पार्क मुंबईतील अंधेरी परिसरात आहे.  या IT पार्कमध्ये 3 इमारती आहेत.  एकूण 9,664.68 चौ.मी भूखंडावर बालाजी आयटी पार्क आहे.  नामांकित डेटा कंपनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ही मालमत्ता खरेदी केली आहे. अंधेरी हा मुंबईतील सर्वात हायप्रोफाईल एरिया आहे. येथे अनेक बड्या कंपन्या तसेच हायप्रोफाईल व्यक्तींचा निवासस्थाने आहेत. यामुळे   जितेंद्र कपूर यांचा बालाजी IT पार्कची डील ही सर्वात महागडी डील ठरली आहे.  यापूर्वी एनटीटी डेटाची उपकंपनी असलेल्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडियाला जितेंद्र यांनी एक मोठी व्यावसायिक मालमत्ता 559.25 कोटी रुपयांना (अंदाजे ५६.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) विकली होती. 

मुंबईत IT सेक्टर बूस्ट घेणार

जितेंद्र यांच्या बालाजी IT सेंटरचा हाव्यवहार भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. डिजिटल सेवा, क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भारतात डेटा सेंटर्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. बँकिंग, ई-कॉमर्स, टेलिकॉम आणि सरकारी संस्था यांसारखे उद्योग या मागणीला चालना देत आहेत. मुंबई, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद यांसारखी शहरे त्यांच्या मजबूत डिजिटल कनेक्टिव्हिटी, भक्कम पायाभूत सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे प्रमुख डेटा सेंटर हब बनत आहेत. एनटीटी ग्लोबल ही एक प्रमुख जपानी कंपनी आहे. सकारात्मक सरकारी धोरणे, सुधारित वीजपुरवठा आणि परदेशी व देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती रुची यांमुळेही या क्षेत्राला चालना मिळत आहे. हे सर्व घटक भारताला जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देत आहेत. जितेंद्र यांच्या कंपनीसोबत झालेला व्यवहार हा मुंबईच्या IT सेक्टर बूस्ट देणार आहे.  एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया ही एक प्रमुख जपानी कंपनी आहे.  जी डेटा सेंटर आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवते. ही कंपनी सार्वजनिक आणि खाजगी क्लाउड सेवा, होस्टिंग, डेटा व्यवस्थापन, ॲप डेव्हलपमेंट, धोक्यांचे निरीक्षण, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स आणि चाचणी यांसारख्या सेवा देते. ही कंपनी जगभरातील ग्राहकांना सेवा देते.

जितेंद्र यांच्याकडे अफाट संपत्ती 

जितेंद्र यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  त्यांची मुलगी एकता कपूर छोट्या पडद्यावर अभिराज्य गाजवते. ती प्रसिद्धा निर्माता असून अनेक मालिका तिने काढल्या आहेत. बालाजी प्रॉडक्शन्स चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांची निर्मिती करते. त्यांचा मुलगा, तुषार कपूर, चित्रपट निर्मितीसोबतच कौटुंबिक व्यवसायही सांभाळतो. जितेंद्र यांची एकूण संपत्ती 1512 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 

 

 





Source link

अशोक खरातच्या संपर्कात आलेली महाराष्ट्रातील बडी महिला अधिकारी कोण? मोठं पद मिळवण्यासाठी गेली होती खरातच्या कार्यालयात

अशोक खरातच्या संपर्कात आलेली महाराष्ट्रातील बडी महिला अधिकारी कोण? मोठं पद मिळवण्यासाठी गेली होती खरातच्या कार्यालयात



अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. अशोक खरात हा बदल्यांचंही रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक बड्या अधिका-यांना हवी ती पोस्टिंग खरातनं मिळवून दिल्याची माहिती आहे, त्याबद्दल खरात अधिका-यांकडून मोठी रक्कमही घेत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp