राज ठाकरेंच्या मनसेला फक्त 2 ते 5 जागा मिळणार, उद्धव ठाकरेंची शिवसेना 'इतक्या' जागा जिंकणार; एक्झिट पोलची खळबळजनक आकडेवारी

राज ठाकरेंच्या मनसेला फक्त 2 ते 5 जागा मिळणार, उद्धव ठाकरेंची शिवसेना 'इतक्या' जागा जिंकणार; एक्झिट पोलची खळबळजनक आकडेवारी


BMC Election Exit Poll 2026 : महाराष्ट्रातील 26 महानरपालिकांसाठी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. मुंबई महापालिकेचे निवडणुक चर्चेत आहे ती ठाकरे बंधूच्या युतीमुळे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS Chief Raj Thackeray)  निवडणुकीच्या रिंगमात उतरली आहे. ठाकरे बंधू किती जागा जिंकणार याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. अशातच  एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. भाजप, शिवसने रिपाई यांच्या महायुतीने 100 च्या पुढे आकडा गाठल्याचे दिसत आहे. तर, ठाकरेंची शिवसेना-मनसे 80 पर्यंत पोहचल्याचे दिसत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना-मनसेची युती 100 चा आकडा गाठू शकत नसल्याचे या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. अशातच जेव्हीसीच्या एक्झिट पोलची आकडेवारी खूपच खळबळजनक आहे. मनसेला फक्त 2 ते 5 जागा मिळू शकतात असा जेव्हीसीच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. 

JVCच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला 138 जागा मिळू शकतात
ठाकरेंची शिवसेना-मनसेला 59 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 23 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबईत इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज

जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार कोणता पक्ष किती जागा जिंकणार?
भाजप –  97–108
एकनाथ शिंदे शिवसेना –  32–38
उद्धव ठाकरे शिवसेना –  52–59
मनसे –  2–5
काँग्रेस –  21–25
इतर – 6–9

DV रिसर्चच्या पोलनुसार महायुतीला 107-122 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 68-83 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचित मिळून 18-25 जागांचा अंदाज
मुंबईत इतरांना 8-15 जागा मिळण्याचा अंदाज

जनमतच्या पोलनुसार मुंबईत महायुतीला 198 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 62 जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस-वंचितला 20 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबई इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज

अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना 58-68 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 12-16 जागांचा अंदाज
अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा





Source link

शिवसेनेचे 99 नगरसेवक निवडून आले, 45 पक्ष सोडून गेले, मनसेचा एकही नगरसेवक नाही; दोन्ही ठाकरेंचे किती नगरसवेक जिंकणार?

शिवसेनेचे 99 नगरसेवक निवडून आले, 45 पक्ष सोडून गेले, मनसेचा एकही नगरसेवक नाही; दोन्ही ठाकरेंचे किती नगरसवेक जिंकणार?



उद्धव ठाकरेंकडे सध्या 54 नगरसेवक आहेत. तर, राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही नगरसेवक नाही. दोन्ही ठाकरेंचे  किती नगरसवेक जिंकणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच भाजप नेत्याने ठाकरेंचे किती नगरसेवक जिंकून येणार याचा आकडा सांगितला आहे. 



Source link

'अण्णामलाई स्वत: पराभूत उमेदवार, ते काय इथल्या तमिळींना…'; मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने झापलं

'अण्णामलाई स्वत: पराभूत उमेदवार, ते काय इथल्या तमिळींना…'; मुंबईकर तमिळीयन व्यक्तीने झापलं


Mumbaikar Tamilian Slams Annamalai:  “बॉम्बे हे महाराष्ट्रातील शहर नसून अंतरराष्ट्रीय शहर आहे,” असं वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतामधील नेते के. अण्णामलाई सध्या मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. के. अण्णामलाई यांच्या विधानामुळे मराठी विरुद्ध दक्षिण भारतीय म्हणजेच तमीळ असे गट पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे शीव येथील आमदार सेल्वन यांनी के. अण्णामलाई यांची पाठराणख केली आहे. मात्र त्याचवेळी एका तमिळ व्यक्तीने के. अण्णामलाई यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. के. अण्णामलाई यांना स्वत:च्या राज्यात जिंकता आलं नाही अशी बोचरी आठवण या व्यक्तीने आपल्या फेसबुक पोस्टमधून करुन दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

तमिळ लोकांनाही लाज वाटतेय

“के. अण्णामलाई हा माणूस तमिळ मुंबईकरांना कोणाला मतदान करायचे हे का सांगत आहे?” असा सवाल पोस्टच्या पहिल्याच वाक्यात राजकीय विश्लेषक अशी स्वत:ची ओळख करुन देणाऱ्या सुजित नायर यांनी विचारला आहे. “अन्नामलाई यांना मुंबईत येऊन अनावश्यक, चिथावणीखोर विधाने करण्याचा काही अधिकार नव्हता. हा केवळ पक्षीय राजकारणाबद्दलचा विषय नाही. यामुळे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली आहे आणि मुंबईत अनेक दशकांपासून अभिमानाने आणि सन्मानाने राहणाऱ्या तमिळ लोकांनाही लाज वाटत आहे,” असं परखड मत नायर यांनी व्यक्त केलं आहे. 

नेतृत्व नाही राजकीय अहंकार

“स्थानिक निवडणुकांवर लोकांना व्याख्यान देण्यासाठी दुसऱ्या राज्यातील नेत्याने हे अशा प्रकारे येऊन वक्तव्य करावी अशी अपेक्षा कोणी का करेल? तमिळ भाषिक मुंबईकरांना बाहेरून राजकीय सूचनांची आवश्यकता नाही. त्यांच्या वॉर्डात आणि त्यांच्या शहरात कोण त्यांच्या मतदानासाठी पात्र आहेत हे ठरवण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत.अधिक महत्त्वाचे म्हणजे, अन्नामलाईंच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांच्याच राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकू शकलेली नाही. ते स्वतः सुद्धा निवडणूक हरलेत असं असताना तामिळनाडूच्या या राजकारण्याला इतरत्र जाऊन मतदारांना सल्ला देण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? या साऱ्यामुळेच हे नेतृत्व म्हणून नाही तर राजकीय अहंकार म्हणून समोर येत असल्यासारखं वाटतंय,” असंही नायर यांनी म्हटलं आहे.

राजकीय दादागिरीने नव्हे तर…

“मुंबई हे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय शहर आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. हे महाराष्ट्रातील लोकांचे आहे आणि येथे काम करण्यासाठी, जगण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी आलेल्या प्रत्येक भारतीयाचेही ते तितकेच आहे. राजकीय दादागिरीने नव्हे तर परस्पर आदराने हा समतोल साधला गेला आहे. प्रथम, आपण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला पाहिला आहे, मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांमध्ये शांतपणे हलवले गेले. आता आपल्याला अनावश्यक राजकीय हस्तक्षेप दिसतो ज्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याचा धोका आहे. ही सारी पद्धत फार त्रासदायक आहे,” असं विश्लेषणही नायर यांनी केलं आहे.

‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका.

“महाराष्ट्रातील लोक आदरातिथ्य करणारे आणि सहिष्णु आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे शांततेत आणि सन्मानाने राहतात कारण हे शहर सर्वांना जागा देते. कृपया फुटीरतावादी राजकारण किंवा ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ अशा मानसिकतेने विषारी वातावरणाला तयार करु नका. मुंबईला श्वास घेऊ द्या आणि आम्हाला शांततेत जगत राहू द्या,” असं नायर यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

गल्लीतला वाद दिल्लीपर्यंत गाजवणार; अजित पवारांची दिल्लीवारी? फडणवीस तिकीट काढणार?

गल्लीतला वाद दिल्लीपर्यंत गाजवणार; अजित पवारांची दिल्लीवारी? फडणवीस तिकीट काढणार?


चंद्रकांत फुंदे झी 24 तास पुणे : पुण्यातल्या भाजप-राष्ट्रवादीमधला वाद थेट दिल्लीत जाणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिल्यानंतर वार-पलटवार सुरू झाले आहेत. दादांच्या दिल्लीवारीच्या संकेतानंतर फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान यानंतर अजित पवारांनीही त्यांच्याखास शैलीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांची
दिल्लीवारी?
फडणवीसांची टोलेबाजी

गल्लीतला वाद
दिल्लीपर्यंत
गाजवणार?

अजितदादा दिल्ली
जाणार, फडणवीस
तिकीट काढणार?

पिंपरी-चिंचवड पालिकेवरून अजित पवारांनी भाजपवर आरोपांची राळ उठवलीय. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी-भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भाजपनं देखील अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत थेट इशारा दिलाय, मात्र, राष्ट्रवादीमधला हा वाद दिल्ली दरबारी जाणार असल्याचे संकेत झी २४ तासच्या टू द पॉईंटमधून अजित पवारांनी दिली होते, दरम्यान यानंतर फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या या वक्तव्यावर टोले लगावले आहेत. अजित पवारांनी जरूर दिल्लीत जावं त्यांचं तिकीटही मीच काढून देतो, मात्र त्यांनी भाजप नेत्यांकडेच जावं दुसरीकडे गेल्यास विचार करावा लागेल असं सूचक विधान त्यांनी
केलंय. 

दादांच्या दिल्लीचं तिकीट फडणवीस काढणार? 

भाजपनं युतीधर्म पाळला,
राष्ट्रवादीनं पाळलेला नाही

फडणवीस यांच्यासोबतही
चर्चा करू, दिल्लीतही जाऊ

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावल्यानंतर दादा थोडीच मागे राहणार आहेत. अजित पवारांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर पलटवार केलाय, पुणेकर, पिंपरी-चिंचवडकर असा रिझल्ट देतील आम्हाला कुठे जाण्याची गरज नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

टू द पॉईंटमधून अजित पवारांनी भाजप-राष्ट्रवादी वादासंदर्भात दिल्लीत जाण्याचे संकेत दिल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलंय, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावत सूचक इशारा दिला, तर दादांनी देखील फडणवीसांवर पलटवार करत थेट उत्तर दिलं.





Source link

'दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार,' मतदानाला 2 दिवस शिल्लक असतानाच अमित ठाकरेंचा जाहीर इशारा

'दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार,' मतदानाला 2 दिवस शिल्लक असतानाच अमित ठाकरेंचा जाहीर इशारा


Amit Thackeray Warning to Double Voters: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत दुबार मतदार करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. दुबार मतदार दिसला तर फोडणारच असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे प्रत्येक सभेतून दुबार मतदारांना थोबडवण्याचा इशारा देत असताना, आता अमित ठाकरेही तीच भाषा बोलताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांपासूनच महाविकास आघाडीचे नेते दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसे त्यांना फटके लगावणार असल्याचं सांगत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

“दुबार मतदारांना तिथल्या तिथे फोडणार असं अमित ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ते म्हणाले की, “दुबार मतदारांना आम्ही तिथल्या तिथे फोडणार. अनधिकृतपणे तुमच्यासोबत रांगेत उभं राहून मतदान करणार. मग तुमच्या आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? आपल्या मतदानाची काय किंमत राहिली?,” अशी विचारणा अमित ठाकरेंनी केली आहे. 

“जर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्यालाच सांगणार असतील की, हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही 40 लाख मतदार घुसवलेत. विकास केल्यानंतरही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून. हे छान चालू आहे तुमचं,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

राज ठाकरेंचंही सावध राहण्याचं आवाहन

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेत भाषण करताना दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच आवाहन केलं होतं. माझं सगळ्यांना सांगणं आहे की, बेसावध राहू नका. ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे बीएलए सकाळी सहा वाजता मला मतदान केंद्रावर हवे आहेत. या सगळ्यांनी दुबार मतदारांबाबत सतर्क राहावे. अजिबात बेसावध राहू नका. एखादा दुबार मतदार तिकडे आला तर, सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ठाण्यातील सभेतही त्यांनी भाषणाच्या शेवटी दुबार मतदान करायला आले तर तिथेच थोबडवा असं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. 

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, आम्ही मतदान केंद्रावरील आमच्या बीएलओंना दुबार मतदारासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत लाल रंगाचे निशाण असलेला मतदार आला की, बाहेर ‘गोंद्या आला रे आला’, असा मेसेज द्या. दुबार मतदार दोन पायांवर चालत येईल, पण परत जाताना स्ट्रेचरवरुन जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.





Source link

'गौतम अदानींनी बंदुकीचा धाक दाखवत…', राज ठाकरेंचा आतापर्यंतचा खळबळजनक दावा, विमानतळावरील 'तो' व्हिडीओच दाखवला

'गौतम अदानींनी बंदुकीचा धाक दाखवत…', राज ठाकरेंचा आतापर्यंतचा खळबळजनक दावा, विमानतळावरील 'तो' व्हिडीओच दाखवला


Raj Thackeray Allegations on Gautam Adani: नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ठाण्यातील शिवशक्तीच्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानी मागील 10 वर्षात कसे मोठे झाले याचा पाढाच वाचला. 

Add Zee News as a Preferred Source

‘अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही’

“मी काल जे दाखवलं ते इतकं भयनाक भीषण आहे. ज्या वेळी या महाराष्ट्रात, मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगैरे पाहणार नाही. अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. ते काल दाखवलं त्याचं गांभीर्य समजून घ्या. हा माणूस कधी सिमेंटमध्ये नव्हता, आता दोन नंबरचा व्यापारी आहे. आज सगळी विमानतळं आहेत. हे जे डाव रचत आहेत त्याविरोधात इथळ्या गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. पण हे मुद्दामून गोष्टी करत आहेत. आता सहा ते आठ विमानतळं त्यांना दिली आहेत. नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली तर व्यापार ठप्प, वीज निर्माण करणारा गौतम अदानी गेला तर सगळे अंधारात. मग तक्रार कोणाकडे करायची?,” असा प्रश्न त्यांनी विचारला. 

 

‘भवितव्य अदानी ठरवणार’

“महिन्याभरापूर्वी इंडिगोच्या विमानाचा स्ट्राइक झाला. हवाई वाहतुकीमधील 65 टक्के हवाई वाहतूक इंडिगोकडे दिली आहे. त्यांनी स्ट्राइक केला, कारणं दिली नाही. अख्खा देश ठप्प झाला. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करु शकते. अदानींच्या हातात सिमेंट, वीज, विमानतळं, पोर्ट्स आहेत. उद्या जर हे भाव वाढवू लागले तर घरांच्या किमती वाढणार. तुमचं भवितव्य अदानी ठरवणार. ह एक माणूस या देशात फक्त 2014-2025 मध्ये 10 वर्षात मोठा होतो. इतका मोठा, श्रीमंत, उद्योग उभारलेला दुसरा माणूस नाही. टाटा, बिर्ला यांना 50, 100 वर्ष लागली,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

‘बाकीचे उद्योगपती मेले का?’

“मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवत कशाप्रकारे मतदान होत आहे दाखवलं. वाढवणला विमानतळ होत आहे. सांताक्रूझ विमानतळ नवी मुंबईला नेणार आणि नंतर विकायला काढणार. आता अदानीकडे आहे. या देशात उद्योगपती मोठे व्हावेत पण एक नाही तर सगळे. या देशात उद्योग, पैसा आला पाहिजे. रोजगार निर्माण होतो, त्यांची घऱं उभी राहतात. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. पण एकावरच मेहरबानी का हे विचारणारा आहे. बाकीचे उद्योगपती मेले का? मग या माणसाला पुढे करायचं आणि वेगळे डाव आखायचे. महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा भुगोल पाहा. वाढवणच्या पुढे लगेच गुजरात लागतं. ही आपली मराठी शहरं, याचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 

‘जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे’

“भाषावर प्रांतरचचना झाली तेव्हा प्रत्येत भाषेचं एक राज्य निर्माण झालं. 107 हुतात्म्यांच्या लढ्यानंतर मुंबई मिळाली. मुंबईत महाराष्ट्राची असतानाही ओरबाडत होते. प्रत्येक राज्याची एक भाषा, स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला नख लावत आहात. नवरात्रीच गरबा खेळला जातो. आपलेही लोक जातात. चांगली गोष्ट आहे. पण तो आनंदाचा, सणाचा विषय आहे. पण मुंबई विमानतळावर जेव्हा गौतम अदानीने ताब्यात घेतलं, तुम्हाला काय सांगायच होतं त्यातून ही कृती केली. मुंबई विमानतळावर गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची आहे. गणपतीमध्ये ढोल लेझीम वाजवले का? जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे. ही मुंबई, ठाणे मराठी माणसाचं आहे. कपाट दुरुस्त करायला याचं आणि बाकोवर नजर टाकायची हे चालणार नाही,” असं त्यांनी खडसावलं. 

‘एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे?’

“घोडबंदरला एक हजार एक जमीन उद्योजकाला विकत आहेत. गणेश नाईकांना होऊ देणार नाही संगितलं ही आनंदाची बाब आहे. एकनाथ शिंदेंना हे करायचं आहे. त्यांच्या ओळखीतलाच आहे. जी दिसले ती जमीन घ्यायची आहे. वरुन पाठवणार आणि या उद्योगपतीला द्या सांगणार. ताडोबाची जमीन खाणींना दिली. उद्योगपती आला आणि सह्या द्यायला सांगितलं. जिथे गौतम अदानी पाहणार ती जमीन देत आहेत. एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे? ही सर्व शहरं गुजरातला मिळवायची आहेत. ठाणे, पालघर हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही. भौगोलिकदृष्ट्या काय सुरु आहे. त्यामुळे ते करत आहेत. आपण या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp