राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु असतानाच आता दोन्ही शिवसेने एकत्र येणार?
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु असतानाच आता दोन्ही शिवसेने एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. जाणून गेऊया या मागचे कारण आहे.
Source link
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु असतानाच आता दोन्ही शिवसेने एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. जाणून गेऊया या मागचे कारण आहे.
Source link
Maharashtra Politics Baramati Vidhan Sabha Bypoll: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. अजित पवारांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवारांनी विधानसभेत जावं अशी सर्व पक्षांची इच्छा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून या पोटनिवडणुकीत एकही उमेदवार दिला जाणार नाही, असं युगेंद्र पवार यांनी सोमवारीच स्पष्ट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. सुनेत्रा पवारांविरोधात या ठिकाणी एक तगडा नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती पोटनिवडणूक लढणार का यासंदर्भात विचारलं असता युगेंद्र पवारांनी, “तुमच्या सर्वांची इच्छा आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील, साहेब (शरद पवार) असतील, ताई (सुप्रिया सुळे) असतील, मी असेल आमच्या कुटुंबाची सर्वांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी! ती बिनविरोध झाली पाहिजे. आमच्याकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही,” असं स्पष्टपणे सांगितलं. “आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल. कुठलाही उमेदवार आम्ही देणार नाही. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ मदत करू. साहेबांच्या, ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांविरोधात या मतदारसंघातून धनगर समाजातून उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत. यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर समाज ही निवडणूक का लढवणार आहे हे सांगितलं आहे. “बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचालींमुळे धनगर समाज आणि सकल हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर,अहिल्यादेवींच्या नावाचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत धनगर समाजाने बारामतीत तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. “अजित दादांबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु अहिल्यादेवींचे नाव पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही,”अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे,” असं सोलनकर म्हणालेत.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत तेथील कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं आहे. “बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहे,” असं हाके म्हणाले. पुढे बोलताना, “लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं,” असं हाकेंनी म्हटलं आहे. पुढील निर्णय चर्चा करुन घेतला जाईल असंही हाकेंनी म्हटलं आहे. त्यामुळे खरोखरच हाके सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Central Railway Special train From Pune Mumbai : उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येतात. यामुळे या मर्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. मध्य रेल्वेना प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहेत. मुंबई पुण्यातून उत्तर प्रदेशच्या गोरखपूर/दानापूर मार्गावर 176 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने या स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जारी केले आहे.
प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) मुंबई/पुणे ते गोरखपूर/दानापूर दरम्यान विशेष शुल्कात 176 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील दादर, CSMT, LTT या स्थानकांसह पुणे रेल्वे स्थानाकातून दैनंदिन या रेल्वे धावणार आहेत.
1 सीएसएमटी मुंबई-गोरखपूर-सीएसएमटी दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१०७९ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज रात्री २२:३० वाजता सीएसएमटीहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता गोरखपूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१०८० विशेष गाडी १२.०३.२०२६ ते ०२.०४.२०२६ पर्यंत दररोज दुपारी २.३० वाजता गोरखपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
रचना: १ एसी-२ टायर, ६ एसी-३ टायर, ९ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
2 LTT-दानापूर-LTT दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०११४३ विशेष ट्रेन १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज सकाळी १०.३० वाजता एलटीटी येथून धावेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०११४४ विशेष गाडी ११.०३.२०२६ ते ०१.०४.२०२६ पर्यंत दररोज रात्री २१:३० वाजता दानापूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: १ एसी-२ टायर, ६ एसी-३ टायर, ९ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
3 पुणे-गोरखपूर-पुणे दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१४१५ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज सकाळी ०६.५० वाजता पुणे येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०० वाजता गोरखपूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१४१६ विशेष ट्रेन ११.०३.२०२६ ते ०१.०४.२०२६ पर्यंत दररोज ५:३० वाजता गोरखपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०३:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दौंड चोर केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
रचना: १ एसी-२ टायर, ५ एसी-३ टायर, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
4 पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (44 फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४४९ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज १५:३० वाजता पुणे येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१४५० विशेष गाडी १२.०३.२०२६ ते ०२.०४.२०२६ पर्यंत दररोज सकाळी ०५:०० वाजता दानापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १८:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दौंड चोर केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: १ एसी २-टायर, ५ एसी ३-टायर, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण: वर नमूद केलेल्या विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवरुन करता येईस. अनारक्षित डबे सामान्य शुल्कात UTS प्रणालीद्वारे बुक करता येतात. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne अॅप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
Baramati Politics History : महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर बारामतीचे नाव नेहमीच केंद्रस्थानी असते. बारामती म्हंटल की पवार… अजित पवार आणि शरद पवार… याच बारामतीत सर्वांच्या मनाला चटका लावणारी घटना घडली . बारामतीचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. बारामती मतदारसंघातून अजित पवार दरवेळी विक्रमी मताधिक्यानं राजकारणातून निवडून यायचे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोट निवडणुक होणार आहे. 1967 पासून 2026 पर्यंत बारामतीत दोनच आमदार निवडणून आले ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. महाराष्ट्रातील सर्वात ‘पावर’फुल मतदारसंघाच्या इतिहास तिसऱ्यांदा आमदार बदलणार आहे.
182 मध्ये अजित पवार साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आले. 1991 ला बारामतीतून त्यांनी खासदारपदही भूषवलं. 1991 मध्ये अजित पवार यांनी खासदारीकाचा राजीनामा दिला आणि पोटनिवणूक लढवली. पोटनिवडणूक जिंकत अजित पवार पहिल्यांदा बारामातीचे आमदार झाले. 35 वर्षानंतर बारामतीत पुन्हा एकदा पोटनिवणूक लागली आहे ती अजित पवार यांच्या निधनामुळे. अजितदादांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधच होणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सुनेत्रा पवारच पोटनिवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
1952 मध्ये गुलाबराव मुळीक, 1957 मध्ये नानासाहेब जगताप हे बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 1962 मध्ये काँग्रेसच्या मालतीबाई शिरोले यांनी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूृण आल्या. त्यानंतर 1967 मध्ये शरद पवार बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शरद पवार यांनी बारामतीला महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदार संघ बनवले. 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 असे सलग सहा टर्म शरद पवार काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.
1991 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बारामतीत निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 1995 मध्येही अजीत पवार काँग्रेसच्या तिकीटावर बारामतीत विजयी झाले. 1999 मध्ये शरद पवार हे काँग्रेसपासून वेगळे झाले अन् त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) ची स्थापना केली, आणि अजित पवार एनसीपीच्या तिकीटावर बारामतीत निवडणूक लढवून विजयी झाले. 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग 8 वेळा अजित पवार हे बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले. विधानसभा निवडणुकांमध्येही अजीत पवार एनसीपीच्या तिकीटावर सतत विजयी झाले.
शरद पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली. जनतेशी सुसंगतता, मतदार संघातील विविध पायाभूत सुविधांचा विकास, सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि अन्य आधारभूत संरचनांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. अजित पवार सतत मतदार संघातील नागिरांच्या संपर्कात असायचे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपच्या गोपीचंद पडलकर यांना मोठ्या फरकाने हरवले. अजित पवार यांना 1,95,641 मते मिळाली, तर पडलकर यांना फक्त 30,376 मते मिळाली. या आकडेवारीवरुनच बारामतीत एनसीपीचा प्रभाव आणि अजित पवार यांची लोकप्रियता किती प्रबळ आहे हे स्पष्ट होते.
2010मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले
2012मध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2019मध्ये तिस-यांदा फडणवीस सरकारमध्ये अडीच दिवसांसाठी उपमुख्यमंत्री
30 नोव्हेंबर 2019मध्ये उद्धव ठाकरेंसोबत चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2023 मध्ये एकनाथ शिंदे सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
2024 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
60 वर्षानंतर तिसऱ्यांदा बारामतीचा आमदार बदलणार
1967 पासून 2026 पर्यंत बारामतीत शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच आमदार म्हणून निवडून आले. 60 वर्षानंतर तिसऱ्यांदा बारामतीचा आमदार बदलणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोट निवडणुक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. सुनेत्रा पवार या बारामतीच्या पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री देखील आहेत.
बारामतीत पोटनिवडणुक जाहीर झाल्यावर रोहित पवार यांनी सोशल मिडियावर एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली..
कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!
सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.