थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने 'बरोबरच जाऊ', पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम

थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने 'बरोबरच जाऊ', पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम


Ajit Pawar Death In Plane Crash This Leader Was Suppose To Travel With Deputy CM: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लॅण्डींगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांसोबतच या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन वैमानिक आणि फ्लाइट अटेडंट आणि अजित पवारांच्या खासगी अंगरक्षाचा समावेश आहे. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. असं असतानाच आता अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात राज्यातील आणखीन एक मोठा नेता असता अशी माहिती समोर आली आहे. सुदैवाने वेळेत न पोहचल्याने या नेत्याला या विमानात बसता आलं नाही आणि त्याचा जीव वाचला. ही माहिती या नेत्यानेच दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तो बडा नेता कोण?

28 तारखेला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईमधील कलीना विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या अजित पवारांच्या विमानामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही प्रवास करणार होते. मात्र त्यांना वेळेत पोहचता आलं नाही आणि विमान सुटलं. हेच विमान अर्ध्या तासाने म्हणजेच 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर टेबल टॉप धावपट्टीजवळच्या खड्ड्यात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि मदतीसाठी धावलेल्या स्थानिक गावकऱ्यांनाही काही करता आलं नाही. यामध्ये अजित पवारांसहीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र या विमानातून आपणही प्रवास करणार होतो अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.  नेमकं नियोजन काय होतं याबद्दल जानकर यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.

कसं होतं प्रवासाचं नियोजन?

“अजितदादांचा मला 24, 25 आणि 26 ला सतत फोन येत होता. साताऱ्यात दादांची राष्ट्रवादी, पवारांची राष्ट्रवादी आणि माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाची युती झालेली आहे. आपण साताऱ्याच्या सभेला बरोबरच जाऊ असं दादा मला म्हणाले होते. बारामतीला मला तुमच्या एका नगरसेवकाची मदत लागणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायला तयार आहोत असं दादा म्हणाले. महाराष्ट्र नशीब खराब की काय म्हणायचं की काय कळेना. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील आणि आता अजित पवारांच्या जाण्याने भारताचं नुकसान झालं आहे. आमदार, मंत्री, खासदार होणं सोपं असतं. नेता बनणं अवघड असतं. राज्याचा आणि देशाचा विकास करणार हा माणूस होता. आमची चांगली मैत्री होती. ते मला कायम सल्ला द्यायचे,” असं जानकरांनी प्रवासाचं नियोजन कसं होतं याबद्दल अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं.

…म्हणून पकडलं नाही विमान

जानकरांना तुमचं विमान कसं सुटलं? याबद्दल विचारलं असता त्यांनी, “मला बेळगाववरुन यायला 3 वाजले पहाटेचे, त्यामुळे मी झोपलो होतो,” असं उत्तर दिलं. म्हणजेच झोप लागल्याने वेळेत विमान न पकडू शकल्याने जानकर या विमान अपघातातून बचावले असं त्यांनीच स्पष्ट केलं आहे.  





Source link

मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द, ऐनवेळी…

मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द, ऐनवेळी…


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

कधीही हरवेल वाट! धुक्यानं गाठली धोका पातळी; उकाडाही वाढतोय, पुढचे 24 तास दक्षतेचे

कधीही हरवेल वाट! धुक्यानं गाठली धोका पातळी; उकाडाही वाढतोय, पुढचे 24 तास दक्षतेचे


Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही थंडीचं वातावरण कायम असतानाच मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये मात्र वाऱ्यांची दिशा बदलली असल्यानं याचा परिणाम हवामान बदलांमध्ये दिसत आहे. परिणामी महाराष्ट्रात गारठा कमी होण्यात सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानातही चढ- उतार होण्यास सुरुवात झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यासह मुंबई शहरात कसं असेल हवामान? (Mumbai Weather)

मागील 24 तासांमध्ये राज्यात धुळ्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून इथं आकडा 10.5 अंश सेल्सिअवर स्थिरावला होता. तर, सर्वाधिक तापमानाची नोंद कोकणातील रत्नागिरी इथं करण्यात आली. जिथं पारा 34 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. ही स्थिती पाहता ढगाळ वातावरणामुळं राज्यात दमट हवामान आणि तापमानातील चढ- उतारांमध्ये पुढच्या 24 तासांमध्येही सातत्य पाहायला मिळणार आहे. 

हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानवाढील सुरुवात झाली असून, थंडी हळुहळू महाराष्ट्राची वेस ओलांडताना दिसत आहे. पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहणार असून मुंबई शहर, उपनगरांमध्ये तापमानाच 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि रायगडसह कोकणातील काही भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचीसुद्धा हजेरी असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. 

थंडी, पाऊस नव्हे, तर देशात धुक्याचा यलो अलर्ट!

केंद्रीय हवामान विभागानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादर आणि त्याचा दृश्यमानतेवर होणारा थेट परिणाम पाहता यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, महाराष्ट्रातील घाट क्षेत्रावरही दाट धुक्याची चादर कायम असल्यानं पहाटे आणि रात्री उशिरा वाट या धुक्यात हरवताना दिसेल. राजस्थान, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्हे, पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून अगदी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये दिवस माथ्यावर येऊनही धुकं मागे हटणार नसल्यानं दृश्यमानता प्रभावित होताना दिसेल. 

तिथं जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका तुलनेनं कमी होण्यास सुरुवात झाली असून, थंडी बऱ्याच प्रमाणात कमी नसली तरीही हाडं गोठवणाऱ्या स्थितीपासून या भागाला किमान दिलासा मिळत आहे हे खरं. मैदानी भागांमध्ये मात्र गारठा कायम असून, पश्चिमी झंझावाताचा परिणाम पुढील 24 तासांमध्ये इथं कशा प्रकारात पाहायला मिळते यावर हवामान विभागाचंही लक्ष असेल. 





Source link

'तुम घाटी लोग नही सुधरोगे…', मुंबईत मराठी तरुणाला बिल्डरकडून मारहाण, मनसेने दिला इशारा, 'BJP मुळे बेडकांची डराव…'

'तुम घाटी लोग नही सुधरोगे…', मुंबईत मराठी तरुणाला बिल्डरकडून मारहाण, मनसेने दिला इशारा, 'BJP मुळे बेडकांची डराव…'


Marathi Employee assaulted in Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे. याचं कारण एका मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली असून, घाटी म्हणून हिणवण्यात आलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी ही मारहाण केली आहे. ‘तुम घाटी लोग नही सुधरोगे’ अशा शब्दांत मराठी तरुणाला शिवीगाळ केल्याचा दावा आहे. यानंतर मनसेने रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा जाहीर इशारा दिला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकी घटना काय?

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तुम घाटी लोग नही सुधरोगे म्हणत सुशील रहेजा यांनी मारहाण केली. तक्रारदार तरुण सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. क्षुल्लक कारणावरुन सुशील रहेजाने या तरुणाला मारहाण केली. 

मारहाण का केली?

कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजा यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर तक्रारदार तरुणाने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. रहेजा यांच्याविरोधात कलम 115 बीएनएस 2023 सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मनसेने दिला इशारा

मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेवर संताप व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा इशाराही दिला आहे. 

“तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा कडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ…भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची …केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डर कडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच,” असं त्यांनी म्हटलं आहे. 





Source link

वैमानिकाची प्रतिभा की विज्ञानाचा चमत्कार… विमान नेमकं उडतं तरी कसं? चक्रावून टाकणारं उत्तर!

वैमानिकाची प्रतिभा की विज्ञानाचा चमत्कार… विमान नेमकं उडतं तरी कसं? चक्रावून टाकणारं उत्तर!


Airplane fly Secret: लहानपणी आकाशात उडणारे विमान पाहून मनात प्रश्न येतो की इतके जड विमान हवेत कसे टिकते? ती जादू नाही तर हवेची ताकद, पंखांची रचना आणि विज्ञानाचे नियम यामुळे शक्य होते. हवेच्या सहाय्याने इतकी मोठी यंत्रणा नेमकी कशाप्रकारे आकाशात विहार करते? हे समजून घेतल्यावर आश्चर्य वाटेल 

Add Zee News as a Preferred Source

हवेचे रहस्य काय? 

हवा हलकी नसते, ती लहान कणांपासून बनलेली असते ज्यांचे वजन असते. हे कण सतत फिरतात आणि हवेत दाब निर्माण करतात. जेव्हा हवा वाहते तेव्हा ती ढकलते किंवा ओढते. याच शक्तीमुळे पतंग उडते, फुगा वर जातो आणि पक्षी आकाशात तरंगतात. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायॉक्साइडसारख्या वायूंचे मिश्रण असते. उडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हवेची गरज असते, कारण तिच्याशिवाय उचल किंवा संतुलन मिळत नाही.

उड्डाणाची सुरुवात

हवेला वजन असते हे 1640 मध्ये शास्त्रज्ञ एव्हेंजेलिस्टा टॉरिसेलीने सिद्ध केले. त्यांनी पाऱ्यावर प्रयोग करून दाखवले की हवा दाब देते. या शोधामुळे उड्डाणाच्या विचारात प्रगती झाली. नंतर फ्रान्सेस्को लानाने हवेच्या वजनावर आधारित एक यंत्राची कल्पना केली. त्यांनी रिकाम्या गोलाकार रचनेचे डिझाइन तयार केले ज्यातून हवा काढली जाते, जेणेकरून ते हलके होऊन वर उडेल. हे डिझाइन प्रत्यक्षात आले नाही पण हवेचे आणि वजनाचे संतुलन उड्डाणाचे आधार आहे हे स्पष्ट झाले.

गरम हवा आणि पंखांची जादू

गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते कारण ती पसरते. यामुळे गरम हवेने भरलेला फुगा वर उडतो आणि थंड झाल्यावर खाली येतो. विमानात हे तत्त्व पंखांद्वारे कार्य करते. विमानाचे पंख असे बनवले जातात की त्यांच्या वरून हवा वेगाने जाते आणि खालून हळू. वेगवान हवेचा दाब कमी असतो, तर खालचा दाब जास्त. या दाबाच्या फरकामुळे उचल शक्ती निर्माण होते, जी विमानाला हवेत उचलते.

न्यूटनचा नियम कसा लागू होतो? 

सर आयझॅक न्यूटनच्या गतीच्या तीन नियमांमुळे विमान उडण्याचे समजते. पहिला नियम सांगतो की वस्तूला ढकलल्याशिवाय ती हलत नाही. दुसरा म्हणतो की जास्त शक्तीने जास्त गती मिळते. तिसरा म्हणजे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. उड्डाणात चार मुख्य शक्ती असतात: उचल (वर उचलते), वजन (खाली ओढते), ढकल (पुढे नेते) आणि प्रतिरोध (मागे रोखते). या चौघांचे संतुलन सुरक्षित उड्डाण घडवते.

पायलटचे नियंत्रण कसे राहते?

विमान उडवणे फक्त इंजिन चालवणे नाही. पायलट विविध नियंत्रकांद्वारे ते हाताळतो. पंखांवरील एलेरॉन फिरवण्यासाठी असतात, ज्यामुळे विमान डावे-उजवे झुकते. शेपटीवरील एलिव्हेटर उंची नियंत्रित करतात, म्हणजे वर किंवा खाली. रडर दिशा बदलण्यासाठी असते. थ्रॉटल इंजिनची ताकद वाढवते किंवा कमी करते. जेव्हा हे तीन – उंची, फिरवणे आणि दिशा – एकत्र काम करतात, तेव्हा विमान योग्य मार्गावर आणि उंचीवर उडते.

ध्वनी अवरोध आणि वेगाचे प्रकार

ध्वनी हवेच्या कणांपासून तयार होतो आणि समुद्र सपाटीवर त्याचा वेग सुमारे 760 मैल प्रति तास असतो. जेव्हा विमान हा वेग गाठतो, तेव्हा हवेच्या लहरी पुढे जमा होऊन धक्का निर्माण करतात. हा धक्का तोडताना मोठा आवाज होतो, ज्याला सोनिक बूम म्हणतात. याला ध्वनी अवरोध तोडणे म्हणतात. उड्डाणाचे वेग वेगळे असतात: सामान्य धीमे उड्डाण, सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक. वेग वाढला की तंत्रज्ञान आणि साहित्य अधिक मजबूत आणि हलके होतात.





Source link

महाराष्ट्रातील कोणत्याही अत्यंत महागड्या शाळेत मिळेल मोफत प्रवेश;RTE साठी कोण करु शकतो अर्ज? A टू Z माहिती!

महाराष्ट्रातील कोणत्याही अत्यंत महागड्या शाळेत मिळेल मोफत प्रवेश;RTE साठी कोण करु शकतो अर्ज? A टू Z माहिती!


RTE Admission: शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई 2009 मध्ये लागू झाला. याअंतर्ग 6 ते 14 वर्षांच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि वंचित गटातील मुलांसाठी 25% जागा राखीव ठेवण्याची सक्ती आहे. सरकार थेट विद्यार्थ्यांची शालेय फी भरते. ज्यामुळे पालकांना कोणताही खर्च येत नाही, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शिक्षणात समानता 

दरवर्षी नर्सरी, एलकेजी किंवा पहिली वर्गासाठी प्रवेश होतात. यामुळे गरीब आणि अल्पसंख्याक समुदायातील लाखो मुलांना चांगल्या खासगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळते. या कायद्यामुळे शिक्षणातील समानता वाढून मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील दुर्बल घटकांना याचा मोठा लाभ होतो. याब 

प्रवेशासाठी पात्रता निकष

आरटीई अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलं आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असावीत, यासाठी राज्य सरकारने पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट ठरवून दिलेली असते.अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि अल्पसंख्याक गटातील मुले आरटीईसाठी पात्र असतात. अनाथ मुले, अपंग मुले, एचआयव्ही प्रभावित मुले आणि एकल पालकांच्या मुलांनाही आटीई अंतर्गत संधी मिळते. मुलाचे वय राज्याच्या नियमांनुसार नर्सरी किंवा पहिल्या वर्गासाठी योग्य असावे. एकाच श्रेणीत अनेक अर्ज असल्यास लॉटरीद्वारे निवड होते. हे निकष सरकारने ठरवलेले असतात आणि ते पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ मिळतो.

मुलांसाठी प्राधान्यक्रम

सर्व अर्जदारांना समान संधी नसते; काहींना प्राधान्य दिले जाते. अनाथ आणि निराधार मुलांना पहिले प्राधान्य मिळते. अपंग मुले, एससी-एसटी समुदायातील मुले, विधवा किंवा एकल मातांच्या मुलांना पुढे प्राधान्य असते. शाळेच्या जवळ राहणाऱ्या मुलांनाही प्राधान्य मिळू शकते. जागा कमी असल्यास प्राधान्यक्रमानुसार निवड होते आणि उरलेल्यांसाठी लॉटरी काढली जाते. यामुळे सर्वाधिक गरजू मुलांना प्रथम संधी मिळते आणि न्यायपूर्ण वाटप होते.

प्रवेश प्रक्रिया 

आरटीई प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन राज्य सरकारच्या पोर्टलवर होतात. पालक वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा. मुलाची आणि पालकांची माहिती देतात, उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करतात. जवळच्या खासगी शाळा प्राधान्यक्रमाने निवडतात. अर्ज तपासल्यानंतर लॉटरीद्वारे शाळा मिळते. निवड झाल्यास शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा असतो. शाळेतूनही फॉर्म घेऊन अर्ज करता येतो. 

आवश्यक कागदपत्रे

आरटीई अर्ज करताना विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि फोटो ही कागदपत्रे असावीत. ही प्रक्रिया सोपी असून 2026 च्या सत्रासाठी लागू आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp