'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…', नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!

'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…', नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!


Nitesh Rane: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसल्याचे नितेश राणेंनी म्हटले. दरम्यान त्यांनी निधी वाटपावरुन एक वादग्रस्त विधान केलंय. याबद्दल जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महायुतीचे सगळे उमेदवार ठासून येणार 

या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसला आहे.​म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा, त्यांना उमेदवार पण साधे हक्काचे मिळत नाहीयेत, असे नितेश राणे म्हणाले. त्यांना एवढ्या वर्षांनी जनतेने सत्ता देऊन पाहिली. 2014 पासून ते 2024 पर्यंत ठाकरे सेनेकडेच ही सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते. काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी? कुठला विकास आणला? किती मुलांना रोजगार दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल असल्यामुळे, जो काही विजयाचा झंझावात राणे साहेबांच्या नेतृत्वात सुरू झालेला आहे. महायुतीचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.

एआर रहेमानवर टीका 

​एआर रहेमान कपिल शर्मा शोमध्ये बोलावल्यावरुन नितेश राणेंनी टीका केलीय.  असंच कोणी पाकिस्तानच्या विरोधात, कराचीच्या विरोधात, बांगलादेशच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं असतं तर त्या त्या इस्लामिक राष्ट्राने त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का? की कापून बाहेर फेकलं असतं? ​मग आम्ही अशा लोकांना आपण ‘कपिल शर्मा’ सारख्या शोला का बोलवतोय? जे देशविरोधी वक्तव्य करतात, भूमिका घेतात. म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच व्यासपीठावर बोलवू नये, बहिष्कार टाकला पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या देशाच्या विरोधात, हिंदू समाजाच्या, हिंदू राष्ट्राच्या विरोधात कोणीही चुकीचं बोलण्याची हिम्मत करणार नाही, एवढी भीती निर्माण केली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. 

ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गात जोरदार धक्का

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती .एकेकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर आरोप करत राणेंची साथ सोडली होती. आज सर्व मतभेद विसरून सतीश सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती घेतलाय. 

पालकमंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

विकासाचा निधी मीच देणार कारण तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत, असे विधान भाजप मंत्री नितेश राणेंनी केलंय. निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार, असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी पण परत मागे घेणार. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या,असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित खळा बैठकीत नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळाले.





Source link

'अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?', NCP नेत्याला वेगळीच शंका, विचारले 5 प्रश्न, म्हणतो 'सहावी व्यक्ती…'

'अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?', NCP नेत्याला वेगळीच शंका, विचारले 5 प्रश्न, म्हणतो 'सहावी व्यक्ती…'


Amol Mitkari 5 Questions over Ajit Pawar Plane Crash in Baramati: अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याने एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने अमोल मिटकरींना प्रचंड मोठा धक्का बसला असून ते अक्षरश: कोलमडले आहेत. यादरम्यान त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारत त्यांची उत्तरं मागितली आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? अशी विचारणा करत अमोल मिटकरी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.  एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???  एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असेही प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारत आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असंही त्यांनी अखेरीस स्पष्ट केलं आहे. 

अमोल मिटकरींची पोस्ट जशीच्या तशी

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

‘Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली?’

यानंतर त्यांनी अजून एक पोस्ट शेअऱ केली असून त्यात लिहिलं आहे की, “उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली—याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?”

जय पवार खासदार होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याबाबत भाजपा अनुकूल नाही. मात्र जय पवार यांच्या नावावर सहमती आहे. त्यामुळे जय पवार यांना राज्यसभा खासदार केलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंबईत पक्ष कार्यालयात पार्थ पवार दाखल झाले आहेत

प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पियुष गोयल यांचा दावा

यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा भाजपा नेते पियुष गोयल यांनी केला आहे. 





Source link

विलीनीकरणाचा मुद्दा अजित पवारांसोबतच विलीन झाला; राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

विलीनीकरणाचा मुद्दा अजित पवारांसोबतच विलीन झाला; राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य



महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. 



Source link

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली


Big responsibility on Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे सत्ताकेंद्र कुणाकडे जाणार, कोणती महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांकडे असलेली प्रभावी पदे आणि महत्त्वाची खाती पुढे कोण सांभाळणार, यावर चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. काही काळापासून राजकीय पडद्याआड गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बंद दाराआड चर्चेनंतर अवघ्या 24 तासांत मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला जोर आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? 

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासूत्रे पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. पक्षात फूट पडू नये आणि संघटना एकसंध राहावी यासाठी नेतृत्व पवार कुटुंबातच असावे, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

अर्थ खाते कोणाकडे जाणार?

अजित पवारांकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कोणाकडे सोपवायची, यावर सध्या राजकीय पातळीवर मोठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेने राजकीय चर्चांना अधिक उधाण आणले आहे.

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढे मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे याना पुन्हा संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरताना मुंडेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

मुंडेंचा राजीनामा कशामुळे झाला होता?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. राजकीय दबाव वाढल्यानंतरत्यांनी राजीनामा दिलाही परंतु  प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलताना दिसत असून, त्यांच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती.

पार्थ पवारांनाही संधी?

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरही चर्चा रंगली आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा सत्ताकेंद्र तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.





Source link

मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री, उद्या 5 वाजता पार पडणार शपथविधी

मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री, उद्या 5 वाजता पार पडणार शपथविधी


Sunetra Pawar Will take Oath as DCM tomorrow: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रुपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तयारीसाठी स्वर्गीय अजित पवारांची प्रशासकीय टीम बारामतीहून मुंबईकडे रवाना झाली आहे. सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता बारामतीहून स्पेशल हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

शपथविधी होण्याआधी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक पार पडेल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडेल.

‘मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार निर्णय’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “उद्या दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सुनेत्रा पवारांशी आम्ही रात्री संवाद साधणार आहोत. पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद सदस्य आणि खासदार उपस्थित राहतील. जो निर्णय घेऊ त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे”. 

उद्या 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार शपथ

उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे. 

ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नसून, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल अशी माहिती आहे. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. 

छगन भुजबळांनीही दिली होती शपथविधीची कल्पना 

“दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.





Source link

इशारा! महाराष्ट्रात एकाएकी दिल्लीसारखं हवामान? पहाटे अन् मावळतीच्या वेळी असं काय घडणार?

इशारा! महाराष्ट्रात एकाएकी दिल्लीसारखं हवामान? पहाटे अन् मावळतीच्या वेळी असं काय घडणार?


Maharashtra Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असणारं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र आता दूर सरलं असून काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. राज्यात हिवाळ्यानं अखेरच्या टप्प्यात प्रवेश केला असून, त्यामुळं हवेतील उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही एक अनपेक्षित स्थिती राज्यातील हवामानात पाहायला मिळेल. 

Add Zee News as a Preferred Source

हिवाळा सरणार, पण मग नेमकं काय घडणार? 

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमीजास्त होत असला तरीही आता महाराष्ट्रावर मात्र या स्थितीचा फारसा परिणाम दिसून येत नाहीय. राज्यात पुढील काही दिवस पहाटेच्या वेळी आणि रात्री उशीरानं दुर्गम गावखेड्यांमध्ये धुक्याची स्थिती पाहायला मिळेल. घाटमाथ्यावरील परिसर, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भागसुद्धा इथं अपवाद ठरणार नाही. या धुक्याचा थेट दृश्यमानतेवर परिणाम होणार असल्यामुळं दिल्ली- हरियाणातील धुक्याच्या चादरीप्रमाणंच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही ओढावताना दिसेल. 

किनारपट्टी भाग आणि मुंबईसाठी कोणता इशारा?

राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबईत हवामान अंशत: दमट आणि कोरडं असेल. आकाश बहुतांशी निरभ्र असून कमाल सरासरी तापमान 30 अंशांदरम्यान आणि किमान तापमान 24 अंशांदरम्यान असेल. दरम्यानच्या काळात कुठंही पावसाचा इशारा मात्र नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातही तापमानवाढीस सुरुवात झाली असून सातारा, सांगली, कोल्हापुरात आकाश काही भागांमध्ये अंशत: ढगाळ असेल, थंडीचा कडाका कमी झाला असला तरीही इथं हवेत गारठा मात्र कायम असेल. जिथं सरासरी कमाल तापमान 30 ते 32 अंश आणि किमान सरासरी तापमान 18 ते 20 अंशांदरम्यान असेल असा अंदाज आहे. 

कोणत्या राज्यांना बसणार पावसाचा तडाखा?

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील 8 राज्यांना भीषण थंडीचा इशारा असून, यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढचा समावेश आहे. तर, 5 राज्यांना पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये राजस्थान, हिमाचलचा काही भाग, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. या पावसाच्या अंदाजातच ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, त्यामुळं काही अडचणी उद्भवू शकतात, ज्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना यंत्रणांनी केल्या आहेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp