I Love You ऐकताच अजित पवार वळले अन् केलं असं काही; व्हिडीओ तुफान व्हायरल

I Love You ऐकताच अजित पवार वळले अन् केलं असं काही; व्हिडीओ तुफान व्हायरल


Ajit Pawar Wardha Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी वर्धा दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी व ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, पाणी व्यवस्थापन, जिल्हा वार्षिक योजना, सेवा ग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या वर्धा दौऱ्यात एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 

अजित पवार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले असते. जेवणानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असता एका कार्यकर्त्याने ‘दादा आय लव्ह यू’ म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देत ”आय लव्ह यु टू” असे प्रत्युत्तर दिलं. यानंतर एकच हशा पिकला. सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर हे सर्व घडलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुनेत्रा पवारांबद्दलच्या विधानाची चर्चा

अजित पवारांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्नी सुनेत्रा पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने अजित पवारांना, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या,” असं सांगत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच, “मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?” असं खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं. 

आधी हात जोडले मग कपाळाला लावले अन्…

तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी अगदी पत्रकारांसमोर हात जोडत, “काय खरंच ना…” असं म्हटलं. नंतर कपाळाला हात लावत, “तुमचा अधिकार आहे. मात्र काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार वर्ध्यात आला आहे. आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विचारता येईल ते दिलं सोडून कुठं अजित पवार काय म्हणेल, कुठं ब्रेकिंग न्यूज देता येईल. मग अजित पवार काय म्हणाला दाखवतील. मग तुमचं काय म्हणणं म्हणत समोरच्यांचं दाखवतील. काय चाललंय?” असा सवाल अजित पवारांनी विचारत नाराजी व्यक्त केली.

अजित पवारांनी यावेळी वर्ध्यात आम्ही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश अजित पवारांनी बैठकीत दिले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर असल्याचंही स्पष्ट केलं. 





Source link

पैसा वापरुन BJP ने ठाकरे बंधूंना हरवलं? 'त्या' विधानाने खळबळ; 'मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा..'

पैसा वापरुन BJP ने ठाकरे बंधूंना हरवलं? 'त्या' विधानाने खळबळ; 'मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा..'


Mumbai Best Election Result Money Connection: बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणामधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युती करुन लढवलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधू सपशेल अपयशी ठरल्याचं दिसत आहे. या दोघांना निवडणुकीतील 21 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. या पराभवासहीत ठाकरेंनी पतपेढीवरील 9 वर्षांपासूनची सत्ता गमावली आहे. या निवडणुकीमध्ये शशांक राव आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्यानंतर ही निवडणूक पैशांच्या जोरावर जिंकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

कोणी आणि काय आरोप केलाय?

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपा आणि शशांक राव यांच्याविरोधात उमेदवार दिलेले बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. पराभव झाल्यानंतर सामंत यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. “बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमचा पराभव झाला पण जे जिंकले त्यांचं अभिनंदन! आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? 12 हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला,” असं सामंत यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

पैशाचा ओघ पाहायला मिळाला

“प्रचंड पैशाचा ओघमागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे घेतील मात्र मतदान आम्हाला करतील. पैशाच्या समोर आम्ही कमी पडलो,” असं सामंत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही त्या निवडणुकीत जिंकलेले ‘ते’ 21 जण कोण? ही घ्या संपूर्ण यादी

पराभवाची कारण काय?

निवडणुकीतील पराभवाची कारणं काय आहेत याबद्दलही सामंत बोलले आहेत. “बेस्ट वाचण्यासाठी मी प्रयत्न केले. भाजपने पैसा लावला आपल्या अधिकाराचा वापर केला. आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो,” असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

‘मला आश्चर्य वाटतं की भाजपासारखा…’

“मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवे त्यासाठी हे सगळं करतात यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे,” असं सूचक विधान सामंत यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> ‘‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर…’; भाजपाने उडवली एकही जागा न जिंकणाऱ्या ठाकरे बंधूंची खिल्ली

निवडणुकीचा निकाल काय लागला?

बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा तर भाजपच्या 7 जागा निवडून आल्या. ठाकरे बंधुच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.

FAQ

बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल काय लागला?
बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या सहकार समृद्धी पॅनलने 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. ठाकरे गटाने गेल्या 9 वर्षांपासून असलेली पतपेढीवरील सत्ता गमावली.

निवडणुकीत पैशाच्या प्रभावाबाबत कोणता आरोप झाला आहे?
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आणि उत्कर्ष पॅनलचे नेते सुहास सामंत यांनी शशांक राव आणि भाजपच्या पॅनलवर निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की, मागील आठवड्याभरात प्रचंड पैशाचा ओघ दिसून आला, आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले तरी ठाकरे गटाला मतदान करतील असं वाटलं होतं, पण पैशाच्या प्रभावासमोर ते कमी पडले.

सुहास सामंत यांनी भाजपबाबत काय सूचक विधान केलं?
सुहास सामंत यांनी म्हटलं, “मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवं त्यासाठी ते सगळं करतात, यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे.”

सुहास सामंत यांनी निकालाबाबत काय प्रतिक्रिया दिली?
सामंत यांनी पराभव स्वीकारत जिंकलेल्यांचं अभिनंदन केलं, पण त्याचवेळी विचारलं, “बारा हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव कसा झाला?” त्यांनी पराभवाचं मुख्य कारण पैशाचा प्रचंड वापर असल्याचं सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले तरी आपल्याला मतदान करतील असा विश्वास होता, पण तसं झालं नाही, असं नमूद केलं.

निवडणुकीचं राजकीय महत्त्व काय होतं?
बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली गेली. ठाकरे बंधूंची युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या प्रभावाची चाचपणी मानली गेली. त्यांचा पराभव हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे, तर शशांक राव आणि भाजपच्या विजयाने त्यांचं वर्चस्व दिसून आलं.

 





Source link

महाराष्ट्रात राज ठाकरेंसह युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका? बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 9 वर्षांची सत्ता हातातून जाणार?

महाराष्ट्रात राज ठाकरेंसह युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका? बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 9 वर्षांची सत्ता हातातून जाणार?



ठाकरे बंधूंची बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत एकहाती सत्ता येण्याची चिन्ह धूसर आहेत. भाजपसहित अनेक पॅनल मैदानात उतरल्यानं मतांचं विभाजन झाले. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला फटका बसण्याची शक्यता आहे. 



Source link

ट्रकचा वेग, त्यावरील खुणा हेरल्या; AI च्या मदतीनं राज्यात पहिल्यांदाच ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा वेगवान तपास

ट्रकचा वेग, त्यावरील खुणा हेरल्या; AI च्या मदतीनं राज्यात पहिल्यांदाच ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा वेगवान तपास


अमर काणे, झी मीडिया, नागपूर : (Nagpur Hit And Run Case News) विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पगडा दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांवर दिसून येतो आणि आता तर पोलीस तपासातही AI चं योगदान पाहायला मिळत आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी AI माध्यमातून हिट अँड रनचा अवघड तपास झटपट करत गुन्हेगाराला अटक केली आहे.

AI तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हिट अँड रन गुन्ह्याची गतिमान पद्धतीने ही उकल करण्यात आल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. अपघात करणाऱ्या ट्रक चालकाचा शोध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तब्ब्ल 700 किमीवरून करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच 10 ऑगस्टला नागपूर जबलपूर महामार्गावर अपघातानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. नागपूर–जबलपूर महामार्गावर एक व्यक्ती आपल्या मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात असल्याचा हा व्हिडिओ होता. एका ट्रकने कट मारल्यामुळे हा अपघात झाला होता, ज्यात बाईकवरस्वार ग्यारसी यादव नामक महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. मात्र, तिच्या पतीला अमित यादव याला रस्त्यात कोणत्याही वाहनचालकाकडून मदत न मिळाल्याने त्याला दुचाकीवरच पत्नीचा मृतदेह घेऊन जावे लागले होते.

अपघात नेमका कोणत्या ट्रकमुळं झाला याची काहीही कल्पना अमित यादव यांना नव्हती. मात्र त्या ट्रकवर लाल रंगाच्या पट्ट्या चितारलेल्या होत्या, ही बाब त्यांना आठवत होती. याच खुणेच्या आधारे एआयच्या मगतीनं काही मिनिटांतच पोलिसांनी त्या ट्रकची ओळख पटवली आणि सुमारे सातशे किलोमीटर दूर ग्वालियर–कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

AI च्या मदतीनं कसा मिळाला तपासाला वेग?

सत्यपाल राजेंद्र असे ट्रकचालकाचं नाव असून तो फर्रुखाबाद, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी AI ऑपरेटेड सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास केला. अपघात करणाऱ्या ट्रकचा सरासरी वेग (average speed) मिळवण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अपघात करणारा ट्रक लाल रंगाचा असल्याचं स्पष्ट झालं.

त्याच मार्गावरील हायवे सीसीटीव्ही फुटेज AI च्या माध्यमातून स्कॅन करण्यात आलं. या प्रक्रियेत एकूण नऊ ट्रक आढळले. त्यानंतर या नऊ ट्रकचा वेग आणि लोकेशन तपासल्यानंतर आरोपी सत्यपाल राजेंद्र याचा शोध लागला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याला फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश येथे अटक केली. या तपासात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी नागपूर ग्रामीण पोलिसांचे अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या कल्पनेतून पोलीस यंत्रणेला मिळालं नवं बळ

महाराष्ट्र सरकारने पोलिस तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील सर्व ताज्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व्हावा, या उद्देशाने एक सरकारी कंपनी मार्वलची स्थापना केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील अभ्यासक्रम पूर्ण केलेले आय पी एस अधिकारी हर्ष पोद्दार यांची सी ओ पदावर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ‘ब्रेन चाइल्ड’ असून या मार्वल कंपनीद्वारे जगातील सर्वोत्तम एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महिनोमहीने चालणारा तपास काही मिनिटांत पूर्ण केला जात आहे. आधुनिक पोलिसिंग मध्ये एआय चा यशस्वी वापर करणारी, ही देशातील पहिलीच अशी व्यवस्था आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणातील अनेक तासांची सीसीटीव्ही फुटेज AI मदतीने अवघ्या काही तासात माहितीचं परीक्षण आणि निरीक्षण करण्यात आलं आणि धडक मारणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेण्यात आला.

FAQ

नागपूर हिट अँड रन प्रकरणात AI ने कशी मदत केली?
नागपूर ग्रामीण पोलिसांनी MARVEL (Maharashtra Advanced Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) नावाच्या AI-संचालित सॉफ्टवेअरचा वापर करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं. यामुळे लाल रंगाच्या पट्ट्या असलेल्या ट्रकची ओळख पटवली गेली आणि 700 किमी दूर ग्वालियर-कानपूर महामार्गावर आरोपी सत्यपाल राजेंद्र याला अटक करण्यात यश मिळालं.

हिट अँड रन प्रकरण नेमकं काय होतं?
10 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर-जबलपूर महामार्गावर एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिली, ज्यामुळे ग्यारसी यादव या महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला. तिच्या पतीला, अमित यादव, कोणतीही मदत न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर घेऊन जावा लागला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरणाला गती मिळाली.

AI ने तपास कसा गतिमान केला?
AI ने रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून लाल रंगाच्या पट्ट्या असलेले नऊ ट्रक ओळखले. त्यांचा सरासरी वेग आणि लोकेशन तपासून एका ट्रकची (UP 14 MT 2190) पुष्टी झाली. या प्रक्रियेमुळे 12 तासांचं फुटेज अवघ्या 12-15 मिनिटांत तपासलं गेलं.





Source link

School Holiday: उद्या 'या' जिल्ह्यांमधील शाळा राहणार बंद, अधिकृत सुट्टी जाहीर; वाचा संपूर्ण यादी

School Holiday: उद्या 'या' जिल्ह्यांमधील शाळा राहणार बंद, अधिकृत सुट्टी जाहीर; वाचा संपूर्ण यादी


Schools Holiday in Maharashtra: हवामान खात्यानं मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच कोकणातही पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्याला पुढील चार दिवस असाच पाऊस बरसत राहील असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना खबरदारी घेण्याचे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासह अनके ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. 

‘त्या’ शाळांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना

“जिथे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी सुरु आहे, तसंच रेड आणि ऑरेंज अलर्ट असतील त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर पूराची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा,” अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. तसंच स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी आणि वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. 

 

कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, रायगडमधील शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

– मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.  भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.

– ठाणे महापालिकेने एक्सवर पोस्ट शेअर करत उद्या ठाण्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद असतील असं जाहीर केलं आहे. “ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि..18 ऑगस्ट, 2025 आणि दि. 19 ऑगस्ट, 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे,” अशी माहिती एक्सवरुन देण्यात आली आहे. 

– पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, “पालघर जिल्ह्याला 19 ऑगस्टला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देणयात आला असून, सद्यस्थितीतीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. याच कारणास्ताव जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनचे काम करावे”.

– रायगडमधील शाळा महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिपत्रक जारी केलं आहे. उद्या रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट  असून, मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 

 

FAQ

1) मुंबईत पावसामुळे शाळांना सुट्टी का जाहीर केली जाते?
मुंबईत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि कमी दृश्यमानतेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि जिल्हा प्रशासन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करते.

2) शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय कोण घेते?
मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (उदा., भूषण गगराणी) आणि ठाणे, पालघर, रायगड यासारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक महानगरपालिका (उदा., ठाणे महानगरपालिका) हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या आधारे सुट्टीचा निर्णय घेते. काहीवेळा स्थानिक पालकमंत्र्यांचे निर्देशही विचारात घेतले जातात, 

3) पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यासाठी कोणत्या परिस्थितीचा विचार केला जातो?  
हवामान विभागाचा इशारा: रेड किंवा ऑरेंज अलर्ट, जे अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवते.  
रस्त्यावरील पाणी साचणे: सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि प्रवासातील धोका.  
लोकल ट्रेनची मंदावलेली सेवा: पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावते.  
विद्यार्थ्यांची सुरक्षितता: शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावरील अडचणी आणि जोखीम.





Source link