सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
Gas Cylinder Crises : देशात सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. विधानभवनात नाना पटोले, आणि विजय वडेट्टीवारांनी आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. सरेंडर दे सिलिंडर अशाही घोषणा यावेळी दोन्ही नेत्यांनी दिल्या.
Add Zee News as a Preferred Source
इस्त्रायल-इराण युद्धाचा मोठा फटका भारताला बसलाय. भारतात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे सर्वासामान्य जनता गॅसवर आलीय. छोटे-मोठे उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय. हातात सिलिंडरचं पोस्टर घेऊन विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरेंडर दे सिलिंडर अशा घोषणा देत सरकारला धारेवर धरलं, दरम्यान याच वेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वडेट्टीवार आणि पटोले यांना प्रत्युत्तर दिलंय.
केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झालंय – नाना पाटोले
सिलिंडरच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी देखील मोदींना टार्गेट केलं, केंद्र सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झाल्याची टीका त्यांनी केलीय. सरकार सरेंडर झाल्यानं सर्वसामान्य जनतेवर त्यांचा थेट परिणाम झाल्याचं म्हणत नाना पटोले यांनी हल्लाबोल केलाय. केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झालंय, अशी नाना पटोले यांची टीका केली आहे. सरकार सरेंडर झाल्यानं त्याचा परिणाम सर्वासामान्य लोकांवर होतोय असं नाना पटोले म्हणाले.
विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधा-यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय. गॅस मिळत नाही या केवळ अफवा असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. गॅस बुकींग सुरू असून फक्त 25 दिवसांचा कालावधी त्यासाठी ठेवण्यात आल्याचं वाघ यांनी सांगितलं. तर गॅसची टंचाई निर्माण होऊ देणार नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल्याचं हसन मुश्रीफ म्हणालेत.
गॅसची टंचाई, विरोधकांची घोषणाबाजी
विरोधकांनी गॅसच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकार अमेरिका आणि इस्त्रायल पुढे सरेंडर झाल्याचा आरोप करण्यात आलाय, सरकारच्या भूमिकेमुळेच जनतेवर ही वेळ आल्याचा आरोपही नाना पटोले, विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलाय, तर दुसरीकडे विरोधकांच्या आरोपांना सत्ताधा-यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Pune Cat vs Parror Fight: पुण्यात मांजर आणि पोपटावरुन झालेला वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. मांजर आणि पोपटामुळे सख्खे शेजारी एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. या दोन प्राण्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये झालेला शाब्दिक नंतर हाणामारीपर्यंत पोहोचला. हे प्रकऱण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश रंगराव पोताबत्तोनी असं मांजराच्या मालकाचं नाव आहे. पुण्यातील ताडीवाला परिसरात ही घटना घडली आहे. परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.
Add Zee News as a Preferred Source
पुण्यातील ताडीवाला परिसरात मांजर आणि पोपटावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे. अभिषेक सिंग असं फिर्यादीचं नाव असून, त्यांनी एक पोपट पाळला आहे. त्यांनी पोपटाचा पिंजरा घऱासमोरच ठेवला आहे. दिनेश रंगराव पोताबत्तोनी हा त्यांचा शेजारी राहतो. त्याने घऱात मांजर पाळलं आहे. त्यांची मांजर इतर मांजरींप्रमाणे फक्त घरात न थांबता परिसरात फिरत असते. मात्र बाहेर फिरताना हे मांजर अनेकदा पोपटाच्या पिंजऱ्याजवळ येत त्याला त्रास देत असे.
मांजर पोपटाला त्रास देत असल्याने अभिषेक सिंग आणि दिनेश यांच्यात वाद होत होता. एकदा मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलून दिला होता. यावरुन अभिषेक संतापले होते. त्यांनी दिनेशला मांजर पोपटाच्या पिंजऱ्याकडे आली नाही पाहिजे सांगत काळजी घेण्यास सांगितलं.
दरम्यान यावरुन दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पण प्रकरण इतकं वाढलं की दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांचे कुटुंबीयही वादात सहभागी झाल्याने वाद टोकाला गेला होता. यादरम्यान एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली.
मारहाणीदरम्यान अभिषेक सिंग जखमी झाले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मांजरीचा मालक आणि आपला शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दोन प्राण्यांवरुन झालेला वाद गुन्हा दाखल होण्यापर्यंत गेल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
पुण्यात हत्या आणि आत्महत्येने खळबळ
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र काही वेळानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश डामसे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. महेशला एका तरुणीवर प्रेम होते. मात्र संबंधित तरुणीने त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. या गोष्टीचा राग मनात धरून महेशने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. ही तरुणी जुन्नरमधील एका वसतिगृहात राहत होती आणि रोजप्रमाणे ती महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी बाहेर पडली होती. त्याच वेळी महेशने तिचा पाठलाग करत तिला गाठले आणि अचानक कोयत्याने तिच्यावर हल्ला केला.
वसईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मासे विक्रेत्यानं चक्क विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर आणि आजूबाजूच्या परिसरात झुरळ मारण्यासाठी वापरला जाणारा किटकनाशक स्प्रे मारला. यात अत्यंत विषारी रसायन आहे. हा विक्रेता दिवसा ढवळ्या माशांवर किटकनाशक स्प्रेची फवारणी करताना दिसत आहे.
LPG Crisis: मुंबई, दिल्ली, अहमदाबादसह इतर शहरांमध्ये एलपीजी गॅसचे संकट वाढलंय. हे संकट अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे उद्भवल असून याचा परिणाम भारतात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती वाढण्यात आणि पुरवठा कमी होण्यात दिसतोय. केंद्र आणि राज्य सरकारांनी एलपीजी सिलेंडर बुकिंगवर निर्बंध लादले आहेत. आता एक सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसांनंतरच दुसरे बुक करता येईल. ब्लॅक मार्केटिंग आणि अतिरिक्त साठवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे गॅस एजन्सींवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. तुमच्या शहरात गॅस सिलिंडर किती रुपयांना मिळतोय? हे दर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
संकटाचे मुख्य कारण काय?
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती वाढल्यायत. भारतातही याचा प्रभाव पडलाय. तेल पुरवठ्यात अडथळे आल्याने एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झालीय. हे युद्ध जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असल्याने भारतात गॅस राशनिंग सुरू झालय, असे सरकारने म्हटलंय. लोकांना सिलेंडर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हे संकट मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे आणि इतर शहरांमध्ये दिसत आहे.
सरकारी नियम काय?
केंद्र आणि राज्य सरकारांनी एलपीजी सिलेंडर बुकिंगवर कडक नियम लागू केले आहेत. आता एक सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसांनंतरच दुसरे बुक करता येईल. हे नियम ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी आणि लोकांना साठवणूक न करण्यासाठी आहेत. इंडियन ऑइल (इंडेन गॅस), भारत पेट्रोलियम (भारत गॅस) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी गॅस) या तीन प्रमुख कंपन्या गॅस पुरवठा करतात. पीएनजी कंपन्या घराघरात पाईपद्वारे गॅस पुरवतात, पण त्यांनाही प्रभाव पडला आहे.
कोणत्या शहरांवर परिणाम?
मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि देहरादूनसारख्या शहरांमध्ये गॅस एजन्सींवर लोकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोक सिलेंडर घेण्यासाठी तासंतास थांबत आहेत. हे संकट गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढले आहे. घरगुती वापरकर्ते आणि व्यावसायिक दोघांनाही त्रास होत आहे. विशेषतः हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना कॉमर्शियल सिलेंडरच्या किंमती वाढीचा फटका बसला आहे.
कॉमर्शियल सिलेंडरवर परिणाम
सरकारने कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. हे व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर उद्योगांना याचा फटका बसला आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. हे संकट युद्धामुळे वाढले आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. लोकांना वैकल्पिक इंधन शोधावे लागत आहे.
सरकारची भूमिका काय?
11 मार्च 2026 पर्यंतच्या अपडेटनुसार, दर 7 मार्चचे आहेत. हे नियम तात्पुरते आहेत आणि परिस्थिती सुधारल्यावर बदलले जातील. लोकांना धीर धरण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गॅस कंपन्या पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत असून युद्ध संपल्यावर स्थिती सामान्य होईल, अशी आशा आहे.
प्रमुख शहरांतील घरगुती सिलेंडरच्या किंमती
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती अशा आहेत: दिल्ली-913 रुपये, कोलकाता-939 रुपये, मुंबई-912.50 रुपये, चेन्नई-928.50 रुपये, पुणे-916रुपये, बेंगळुरू-915.50 रुपये, हैदराबाद-965 रुपये, अहमदाबाद-920 रुपये, देहरादून-932 रुपये. इंडेन आणि भारत गॅसच्या वेबसाइटवर हे दर अपडेट आहेत. अद्याप घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ झालेली नाही.
नागरिकांना सूचना
लोकांनी अनावश्यक साठवणूक टाळावी आणि नियमांचे पालन करावे. वैकल्पिक इंधन किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हचा वापर करावा. हे संकट जागतिक आहे, पण भारत सरकार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकूणच, हे संकट दैनंदिन जीवनावर परिणाम करतय पण लवकरच सुधारणा अपेक्षित आहे.