Explainer: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पडणाऱ्या पावासचे कनेक्शन थेट अमेरिकेशी! बिल गेट्स यांच्या प्रयोगामुळे भारतात पडतोय मुसळधार पाऊस

Explainer: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पडणाऱ्या पावासचे कनेक्शन थेट अमेरिकेशी! बिल गेट्स यांच्या प्रयोगामुळे भारतात पडतोय मुसळधार पाऊस


Pune Rain : पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पडणाऱ्या पावासचे कनेक्शन थेट अमेरिकेशी जाडले जात आहे.  बिल गेट्स यांच्या प्रयोगामुळे  भारतात  मुसळधार पाऊस पडतोय असा दावा केला जात आहे. सोशल मिडियावर बिल गेट्स यांच्या प्रयोगाची जोरदार चर्चा आहे. या संदर्भातील अने व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. जाणून घेऊया बिल गेट्स यांचा हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

Add Zee News as a Preferred Source

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि हजारो व्हॉट्सॲप ग्रुप्सवर एक भारतात पडणाऱ्या अवकाळी पावसासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 2007 पासून बिल गेट्स एक विज्ञान प्रयोग करत आहेत. सौर भू-अभियांत्रिकी (solar geoengineering) या प्रयोगाचा संबंध या पावसाशी जोडला जात आहे. सत्य काय आहे ते जाणून घ्या.
भारतात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे. 

मार्च महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये झालेल्या पावसाने आणि थंडीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. पण एकीकडे लोक हवामानाचा आनंद घेत आहेत, तर दुसरीकडे त्याबद्दलचे विविध दावे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्राम, रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवरील असंख्य पोस्टमध्ये पावसाबाबत दावा केला जात आहे. हा पाऊस नैसर्गिक नसून “कृत्रिम” आहे. काही वापरकर्ते याचा संबंध तथाकथित “हवामान प्रयोगाशी” जोडत आहेत आणि बिल गेट्स यांनाही यात गोवत आहेत . व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘सौर भू-अभियांत्रिकी’द्वारे हवामानावर नियंत्रण ठेवले जात आहे. तसेच, सूर्यप्रकाश रोखण्यासाठी आणि तापमान कमी करण्यासाठी विमानांमधून कॅल्शियम कार्बोनेटसारखे कण सोडले जात असल्याचाही दावा त्यात करण्यात आला आहे. काही पोस्ट्समध्ये तर असेही सुचवले आहे की, आता निसर्ग नव्हे, तर खाजगी कंपन्या हवामानावर नियंत्रण ठेवत आहेत. या दाव्यांमध्ये ‘SCoPEx’ प्रकल्पाचाही उल्लेख आहे. या प्रयोगांसाठी भारताचा वापर केला जात असून, अलीकडील पाऊस हा त्याचाच पुरावा आहे, अशी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे.

 SCoPEx प्रकल्प काय आहे?

SCoPEx (Stratospheric Controlled Perturbation Experiment) हा एक वैज्ञानिक संशोधन प्रकल्प आहे.  सूर्याचा काही प्रकाश अवकाशात परत परावर्तित करून पृथ्वीचे तापमान कमी करता येते का, हे समजून घेण्यासाठी या प्रयोग केला जात आहे. ही कल्पना ‘सौर भू-अभियांत्रिकी’शी संबंधित आहे. शास्त्रज्ञांना स्ट्रॅटोस्फियरमध्ये अत्यंत कमी प्रमाणात कण सोडून त्यांच्या परिणामांचा अभ्यास करायचा होता. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा केवळ संशोधन-स्तरावरील प्रयोग आहे, कोणतीही मोठ्या प्रमाणावरील हवामान बदलाची योजना नाही. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणीय समस्यांमुळे तो थांबवण्यातही आला होता. स्पष्टपणे, हा काही ‘गुप्त हवामान नियंत्रण प्रकल्प’ नाही.

पावसामागचे खरे कारण काय आहे?

हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात अलीकडे झालेल्या पावसामागे आणि थंडीमागे पश्चिमी विक्षोभ हे खरे कारण आहे. ही एक सामान्य हवामान प्रणाली आहे, जी पश्चिमेकडील देशांकडून भारतात येते आणि पाऊस, ढग व थंड वारे घेऊन येते. या वर्षीची पश्चिमी विक्षोभ प्रणाली थोडी वेगळी होती. त्यामुळे अफगाणिस्तानपासून पाकिस्तानमार्गे भारतापर्यंत एक लांब कमी दाबाची रेषा तयार झाली होती. परिणामी, मार्च महिन्यात पाऊस पडला आणि तापमानातही घट झाली.

SCoPEx प्रकल्पाचा संपूर्ण तपशील 

या संशोधनाशी संबंधित प्रकल्पांपैकी एक SCoPEx होता. वातावरणात कॅल्शियम कार्बोनेटसारखे धुळीचे कण फवारून सूर्यप्रकाश अवकाशात परत परावर्तित करता येतो का, हे समजून घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. बिल गेट्स यांनी या प्रकल्पाला निधी दिला होता. तथापि, याची मोठ्या प्रमाणावर कधीच अंमलबजावणी झाली नाही आणि 2024  मध्ये तो बंद करण्यात आला. शिवाय, त्याचा भारताशी काहीही संबंध नव्हता. भारतातील हवामान बदल  नैसर्गिक हवामान बदल असला तरी, सोशल मीडियावर षडयंत्राचे सिद्धांत वेगाने पसरत आहे.  सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

पश्चिमी वारे 

अलीकडील पाऊस आणि थंडी ही पूर्णपणे नैसर्गिक कारणांमुळे आहे. याला ‘हवामान प्रयोग’ किंवा ‘कृत्रिम पाऊस’ म्हणणे दिशाभूल करणारे आहे. पश्चिमी वारे  ही  नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. यात भूमध्य सागरी प्रदेशाच्या आसपास तयार होतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत भारतात पोहोचतात. त्या आर्द्रता, ढग आणि थंड वारे घेऊन येतात. जेव्हा या प्रणाली अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमार्गे उत्तर भारतात प्रवेश करतात, तेव्हा त्या येथील वाऱ्यांशी टक्कर होऊन ढग तयार करतात. यामुळे डोंगराळ भागात पाऊस, गारा आणि हिमवृष्टी होते. पश्चिमी वारे साधारणपणे हिवाळ्यात अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पाऊस आणि हिमवृष्टी होते. मात्र, यावेळी ते मार्च महिन्यातही सक्रिय होते, परिणामी हवामानात अचानक बदल झाला आणि उन्हाळ्याच्या उष्णतेत गारवा जाणवला. शहरांमध्ये आणि गावांमध्ये याचा परिणाम वेगवेगळा असतो. शहरांमध्ये यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी कधीकधी हानिकारक ठरू शकते.





Source link

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवरील कारवाईच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची पोस्ट; म्हणाले 'इतक्या मोठ्या नेत्यांना…'

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवरील कारवाईच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची पोस्ट; म्हणाले 'इतक्या मोठ्या नेत्यांना…'


Parth Pawar on Sunil Tatkare and Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूल आयोगाला पत्र पाठवून आधीची पत्रं ग्राह्य धरु नका असं सांगितलं. दरम्यान हे पत्र समोर आलं असून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नसल्याने त्यांच्याकडून पद काढून घेतलंय का? अशी विचारणाही होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार दिल्लीत 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत आहेत. सुनेत्रा पवार बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय आहे. याअगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते होते उपस्थित होते. 

 

अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळत होती. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता आपण मतदार संघात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच आपण दिल्लीत असतो तर भेटलो असतो असं सांगितलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

पार्थ पवारांची पोस्ट

या सर्व घडामोडी आणि चर्चांदरम्यान पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या सर्व रिपोर्ट निराधार आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे, तसंच ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख केला आहे. 

“प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार रिपोर्ट आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित गोष्टी म्हणजे निव्वळ काल्पनिक आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काय?

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रव्यवहार केल्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका म्हणून सांगितलं होतं. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते. 

या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती आहे. 





Source link

दादर – रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा नवा मार्ग; वेस्टर्न लाइनवरून वसई ते पनवेल मार्गे कोकणात जाणार

दादर – रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनचा नवा मार्ग; वेस्टर्न लाइनवरून वसई ते पनवेल मार्गे कोकणात जाणार



दादर – रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन नवीन मार्गावरुन धावणार आहे.  दादर – रत्नागिरी पॅसेंजर वेस्टर्न लाइनवरून वसई ते पनवेल मार्गे कोकणात जाणार आहे.   



Source link

ऐन उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वे गळपटली! विशेष गाडयांच्या संख्येत घट, तुम्हीही तिकीट काढलंय का?

ऐन उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वे गळपटली! विशेष गाडयांच्या संख्येत घट, तुम्हीही तिकीट काढलंय का?



Konkan Railway : कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात उन्हाळी सुट्टीच्याच दरम्यान बदल. रेल्वेगाड्यांच्या संख्येत घट करण्यात आल्यामुळं अनेक प्रवाशांना होऊ शकतो मनस्ताप. गावाला जाण्यासाठी दुसरा पर्याय तयार ठेवा… 
 



Source link

महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्तेत असणारा IAS अधिकारी; 21 वर्षांच्या सेवेत 24 वेळा बदली

महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्तेत असणारा IAS अधिकारी; 21 वर्षांच्या सेवेत 24 वेळा बदली


IAS Officer Tukaram Mundhe Story: महाराष्ट्र सरकाराने प्रशानात मोठे फेरबदल केले आहेत. एकावेळी 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ही बदली प्रक्रिया चर्चेत आली आहे ती सनदी अधिकारी तुकाराम मुंढे  ( IAS Tukaram Mundhe) यांच्यामुळे.  21 वर्षात मुंढेंची 24वी बदली आहे.  मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन विभागात  आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. महसूल आणि वनविभागाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 21 वर्षांच्या सेवेत 24 वेळा बदली झाली आहे.  जाणून घेऊया तुकाराम मुंढे कोण आहेत

Add Zee News as a Preferred Source

IAS अधिकारी तुकाराम मुंढे कोण आहेत?

तुकाराम मुंडे हे महाराष्ट्र केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1975 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्या गावात झाला. ते वंजारी समाजाचे आहेत, जो समाज ओबीसी प्रवर्गात येतो. तुकाराम मुंढे यांनी 1996 मध्ये इतिहासात बीए पदवी मिळवली. त्यानंतर ते  पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांनी राज्यशास्त्रात एमए पदवी मिळवली. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. ते पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. अखेरीस 2005 मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ते यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनले. त्यांची पहिली नियुक्ती सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून झाली, जिथे त्यांनी अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून खळबळ उडवून दिली होती. 

तुकाराम मुंडे हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या कार्यशैलीचे सामान्य जनतेकडून कौतुक केले जाते, परंतु कर्मचाऱ्यांवरील त्यांची कडक शिस्त आणि काही राजकारण्यांशी असलेले त्यांचे संघर्ष हे सर्वश्रुत आहे.

21वर्षात तुकाराम मुंढे यांची २४ वेळा बदली

ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 – सीईओ, वाशिम.
जून 2010 – सीईओ, कल्याण.
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 
जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 – असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025 – दिव्यांग कल्याण विभाग
मार्च 2026 – आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग





Source link

कोट्यावधींचा झोल… सरकारी प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच जमीन खरेदी; खरातला टीप कोणी दिली?

कोट्यावधींचा झोल… सरकारी प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच जमीन खरेदी; खरातला टीप कोणी दिली?



Ashok Kharat Land Scams: अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे 8 आणि आर्थिक तसेच जमिनीची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे नोंदवलेले असतानाच एसआयटीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp