आता स्वित्झर्लंड, युरोपप्रमाणेच मुंबईतही….; 1 मेपासून नागरिकांना मिळणार ही सुविधा
Mumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Source link
Mumbai News Today: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सुखाचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Source link
Center for Sterilizing Monkeys: कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी नाईक बोलत होत. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर.एम. रामानुजम, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, पत्रकार मिलिंद लिमये, वन्य जीव अभ्यासक संतोष महाजन आदी यावेळी उपस्थित होते. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिश्वास, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दापोली तालुक्यात रानडुकर, माकड व वानरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून आता माकडे व वानरे ही गावात येऊन घरातील वस्तूंचेही नुकसान करत असल्याचै महाजन यांनी सांगितले.
कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे, वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.
रानडुकरांमुळे फळबागा तसेच भातशेतीचे नुकसान होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी. तसेच शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्र, हे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार परवाने देण्याचे निर्देशही वन मंत्री नाईक यांनी यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी. तसेच साळिंद्र या प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश यामध्ये करण्याची मागणी केली.
Maharashtra Weather Today: उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळत आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिली आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाची काहिली कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. आजचे हवामान कसे असेल जाणून घेऊया.
बिहार आणि आजूबाजूच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगड, पूर्व विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या अखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळं राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पारा तर 45 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरे आहेत.
आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे.
यंदा थंडी कमी होती त्यामुळे गव्हाची वाढ पूर्णपणे झाली नाही त्यामुळे हलक्या प्रतीच्या गावांचे आवक जास्त होत आहे. त्यामुळे गव्हाला कीड लागण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला बसल्याने पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गव्हाची आवक कमी झाली आहे. 15 एप्रिल नंतर गव्हाची आवक होती मात्र यंदा 15 मार्च नंतर गव्हाची आवक सुरू झाली. सध्या गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथूनच गहू येतोय.
विदर्भात सर्वाधिक तापमान पुन्हा चंद्रपूरमध्ये.
चंद्रपूर –45.8
ब्रह्मपुरी –45.2
नागपूर -44.2
अकोला— 44.8
अमरावती–44.4
यवतमाळ -44.0
वर्धा –44.2
वाशिम-43.5
गडचिरोली-44. 0
बुलडाणा –40.4
गोंदिया-42.7
मराठवाडा – तापमान
छत्रपती संभाजीनगर – 40.9
धाराशिव – 39
जालना – 42
नांदेड – 42
परभणी – 42.2
बीड – 41.7
लातूर – 39
हिंगोली – 43
कोकण – तापमान
मुंबई शहर जिल्हा – 33.4
मुंबई उपनगर जिल्हा- 33.6
ठाणे जिल्हा – 35
पालघर जिल्हा-34
रायगड जिल्हा-32
रत्नागिरी जिल्हा- 33.8
सिंधुदुर्ग जिल्हा- 32
उत्तर महाराष्ट्रातील – तापमान
नाशिक – 38.4
नंदुरबार: 40
धुळे: 41
जळगाव- 42
पश्चिम महाराष्ट्र- तापमान
सांगली, 37.7
सातारा, – 39.3
कोल्हापूर,35.8
अहमदनगर , 38
पुणे,38
सोलापूर – 43
महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी या निर्णयावर नाराजी जाहीर केली असून, सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान अखेर राज्य सरकारने या निर्णयावर एक पाऊल मागे घेतलं आहे. हिंदी शिकणं अनिवार्य नसून, ऐच्छिक ठेवणार असल्याचा खुलासा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय लवकरच जारी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
हिंदीच्या सक्तीवर ते म्हणाले की, “हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात असल्याची जी चर्चा सुरु आहे तसं काही नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषेच्या संदर्भातला जे काय आहे त्यात तीन भाषेचे सूत्रीकरण केले आहे. तुमच्यावर थोपविले जात आहे असे कुठेही लिहिले नाही”. 9 सप्टेंबर 2024 ला सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तृतीय भाषा हिंदी म्हणून समावेश करण्याचा निर्णय झाला अशी माहिती त्यांनी दिली.
“मराठी भाषा अनिवार्य आणि अंमलबजावणी कशी केली जाईल हे आधीच सांगितलं आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त बंगाली, उर्दू, हिंदी, ज्या इतर शाळा आहेत त्या भाषेला प्राधान्य देतात. मराठी बंधनकारक आहे आणि तिसरी इंग्रजी नाहीतर अन्य निवडतात. अशाप्रकारे तीन भाषांचं शिक्षण दिलं जातं. आपण इंग्रजी स्विकारलं आहे पण हिंदी का? याचे उत्तर देतो. आपल्या मुलांना सोप्या पद्धतीने शिकायला होईल देवनागरी लिपी समान आहे. शिक्षकांना हिंदी शिकवणं अवघड नाही,” असं ते म्हणाले
” दोन क्रमांकाला इंग्रजी आपण स्वीकारलं आहे तर तिसऱ्या नंबरला हिंदी हे शासन भाषा म्हणून स्वीकारायला हरकत नाही. या हिंदीचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, शिक्षकांना शिकवायला सोपं आहे. हिंदी अनेकदा कानावर येत असते त्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी शिकायला सोपं आहे. म्हणून हिंदीचा विचार करण्यात आला आहे,” अशी बाजू त्यांनी मांडली.
“राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हिंदीचा बहुभाषिक म्हणून पुरस्कार केला आहे. हिंदी अभिषेक केंद्र शासनाने बंधनकारक केलं नाही. आपल्या राज्याच्या सुकाणू समितीने पहिली मराठी, दुसरी इंग्रजी. तृतीय भाषा म्हणून हिंदी त्या ठिकाणी स्वीकारली आहे. याच गोष्टीच्या आधारावर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनिवार्य या शब्दामुळे गोंधळ झाला आहे. काही वेगळ्या भाषा शिकण्यासंदर्भात पण मागणी आहे. हिंदी शिकणं ऐच्छिक ठेवणार आहोत. पहिली मराठी, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी ऐच्छिक आहेत त्यांनाच शिकवली जाईल,” असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. हिंदी बाबतचा पुढचा शासन निर्णय सुधारित लवकरच जारी केला जाईल असंही ते म्हणाले आहेत. इतर भाषेसंदर्भात त्या वर्गातून किती विद्यार्थ्यांची मागणी येते त्याचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत.
Beed Crime News : बीडच्या मस्साजोगमधील देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर असल्याची खळबजनक बाब समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे माझ्याकडे पुरावे असल्याचं म्हणत एका महिलेनं ठाण मांडलं होतं. मात्र, पोलीस आल्यानंतर सदर महिला बसमध्ये बसून पसार झालीये. याप्रकरणी पोलीस सदर महिलेबाबत चौकशी करत असल्याची माहिती आहे.
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला ठाण मांडून बसली होती. कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा ही महिला करत होती. ही अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तीने केला. मात्र पोलिस आल्यानंतर तीने नाव सांगण्यास देखील नकार दिला.
या महिलेने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशीही मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता. यानंतर ती देशमुखांचा घराच्या परिसरात बसुन राहिली. रात्रभर पॅंडॉलमध्ये झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसुन निघुन गेली.
ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तीची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावर पंकजा मुडेंनी मोठं विधान केले. अशा घटना सर्व घडत असतात असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. बीडमध्येच अशा घटना घटतात असं नाही असंह पंकजा मुंडे म्हणाल्यात. मी जालन्याची पालकमंत्री आहे तिथेही अशा घटना घडत असतात असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मुंडे म्हणाल्यात..
No match is being played.
Apr 21, 2025 | Match 4
North American Cup, 2025
|
BER (20 ov) 137/5 |
VS |
CAY 107/8(20 ov) |
| Bermuda beat Cayman Islands by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
Apr 20, 2025 | 3rd Place Play-off
Central American Cricket Championships, 2025
|
TCI (20 ov) 127/7 |
VS |
CRC 68/0(9 ov) |
| Costa Rica beat Turks and Caicos Islands by 2 runs (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
Apr 20, 2025 | Match 3
North American Cup, 2025