Small modular reactors to fire up nuclear goal

Small modular reactors to fire up nuclear goal


Armed with ₹20,000 crore and a mission, India’s nuclear establishment seems all set to harness the in-thing — small modular reactors. Going by what the government is telling the Parliamentary Standing Committee on Science and Technology, Environment, Forests and Climate Change, the country could come up with five SMRs by 2033, en route to the national goal of achieving 100 GW of nuclear power capacity by 2047.

While there is no global definition of an SMR, it is generally accepted that anything below 300 MW is ‘small’; there is no lower limit — even kw-scale micro reactors are possible. However, India will be developing SMRs in a range of capacities — 220 MW Bharat small reactors (BSR); 50 MW Bharat small modular reactors (BSMR); 5 MWt (thermal — about 2 MW of electrical) gas-cooled micro modular reactor (GCMMR); and other advanced technologies.

The government told the committee it would deploy the ₹20,000 crore on R&D related to fuel cycle, and the installation and commissioning of demonstration plants — namely 200 MWe loop-type BSMR; and 5 MWt gas-cooled reactor (hydrogen generator).

The Department of Atomic Energy’s three-fold focus in developing SMRs are: Repurposing ageing thermal power plants; captive power generation aimed at the energy-intensive domestic heavy industry, such as steel and aluminium, with a rated power of around 200 MW; and small power plants, typical rating of 50 MW, meant for remote locations.

Funding plan

While BSMR and SMR will be pressurised water reactors, for which India largely has the technology ready, the design of gas-cooled reactors has been initiated.

According to insiders, the committee recommended that initial funding should focus on BSMR and GCMMR demonstration plants, ahead of large-scale commercialisation.

SMRs that use light water are relatively easier to develop, owing to the proven operating experience with light water reactors worldwide.

Furthermore, international collaboration with established nuclear agencies would enable adoption of best practices in reactor design and safety protocols. Russia’s integrated nuclear power major Rosatom is a major player in this segment.

While SMRs are expected to account for about 41 GW of the targeted 100 GW by 2047, the rest will be from existing and under-construction nuclear plants. The government anticipates 22.48 GW capacity by 2031-32 — a target arrived at after several downward revisions over the years; today the country has 8.18 GW.

Perhaps recognising this, the committee has recommended phased capacity additions, with the overall goal to be divided into clear short-term (2030), medium-term (2040), and long-term (2047) milestones.

(The writer is an independent journalist)

More Like This

Published on April 20, 2025



Source link

डॉक्टर वळसंगकरांच्या सुसाईड नोटमध्ये खळबळजनक दावा, कोण आहे 'ती' महिला?

डॉक्टर वळसंगकरांच्या सुसाईड नोटमध्ये खळबळजनक दावा, कोण आहे 'ती' महिला?


Dr Shirish Valsangkar suicide case :  न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांना कोणी यासाठी प्रवृत्त केले का? यासंदर्भात पोलिस तपास वेगाने सुरु आहे. आता या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास 

वैद्यकिय क्षेत्रात नामवंत न्युरोसर्जन अशी डॉ. शिरीष वळसंगकर यांची ओळख होती. ते सोलापुरातील पहिले न्युरोलॉजिस्ट होते. फक्त सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मेंदूवरील विविध आणि अत्याधुनिक उपचारांसाठी त्यांनी इथं अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं रुग्णालय सुरू केलं होतं. न्यूरोलॉजी क्षेत्रात त्यांनी दिलेलं भरीव योगदान अनेकांना जगण्याची नवी उर्जा देणारं ठरलं. मात्र याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांना ताडकीनं रुग्णालयात नेलं. पण, उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न! खरचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न! खरचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?


Raj Thackeray  Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, यावेळी दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेचं कारण आहे, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली टाळी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी आमच्यातील भांडणं दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचं दोन्ही ठाकरेंनी म्हटलंय. 

ठाकरे बंधू एकत्र येणार अशी  सुरु झालेली चर्चा नेहमीसारखी हवा तर नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारण याआधी देखील मनसे आणि शिवसेनेची युतीसंदर्भात चर्चा झाली मात्र, काही कारणांवरुन ही युती फिस्कटली होती.

ठाकरे बंधूमध्ये युतीची चर्चा कधीकधी झाली?

27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरेंनी केली. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ‘सामना’मधून उद्धव ठाकरेंची टाळी युतीच्या चर्चा वृत्तपत्रांमधून होत नसतात म्हणत राज ठाकरेंनी इन्कार केला होता.  2014 विधानसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन केला होता. असा मनसे नेत्यांचा दावा आहे.  

2017 मध्ये महापालिका निवडणुकीवेळीही युतीची चर्चा रंगली होती.   श्रीधर पाटणकरांशी चर्चाही सुरू झाल्याचा मनसेचा दावा पुढं ही चर्चा अचानक थांबली. 2017मध्ये युतीची चर्चा झाली होती, नंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाही.  2014 विधानसभेपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी दोन्ही पक्षांमध्ये युती झाली नाही. यावर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी आपआपली मतंही व्यक्त केली आहेत

राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापन केली. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चर्चा मागील 20 वर्षापासून सुरुय. मात्र, अजूनही दोन्ही बंधू एकत्र आले नाहीत. मात्र, आता राज ठाकरेंनी टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय.  त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? की नेहमीसारखी यावेळी देखील चर्चेची हवाच आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.





Source link

लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! पाहा हौसेपोटी बळीराजानं हेलिकॉप्टरमधून काढली मुलाच्या लग्नाची वरात

लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! पाहा हौसेपोटी बळीराजानं हेलिकॉप्टरमधून काढली मुलाच्या लग्नाची वरात


Wedding Video : लग्नाची वरात… हेलिकॉप्टरनं आली दारात…ग्रँड स्वागतानं नववधू भारावली. पंचक्रोशीत या एकाच लग्नाची चर्चा… 


Updated: Apr 19, 2025, 09:26 AM IST

Dharashiv farmers son wedding barat in helicopter video goes viral watch





Source link

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?


Farmer Loan Waiver: लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.. त्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा महायुती सरकारला घेरलंय. 

महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 5 महिने उलटून गेलेत. मात्र महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कर्जमाफीचा निर्णय लांबणार असल्याचीच वक्तव्य आजवर केलीयत. आता पुन्हा एकदा याच कर्जमाफीच्या मुद्दयावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. लाडक्या बहिणींची तर काळजी घ्या मात्र लाडक्या दाजींना दिलेलं कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय. 

दुसरीकडे नाशकात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. महायुतीनं जाहीरनाम्यात थापा मारल्याचा आरोपच ठाकरेंनी केला. मागच्या सरकारमध्ये महायुतीसोबत असलेले बच्चू कडूंचे महायुतीसोबतचे संबंध कडू झाले आणि ते महायुतीतून बाहेर पडले. मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 तारखेला आंदोलनाची हाक दिलीय आणि महायुतीला शिंगावर घेतलंय. 

नाशिक जिल्ह्यातच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं शासन विरोधी जोरदार आंदोलन करत विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची होळी केली. सरकारला त्यांच्याच आश्वासनांची आठवण करुन देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. 

लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीसारख्या आश्वासनांच्या जोरावर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यानं कर्जमाफीवरुन सरकार टोलवाटोलवी करतंय. तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफीसाठी न थांबता हप्ते बरा असं स्वत: अर्थमंत्री अजित पवार सांगताहेत. त्यामुळं ज्या आश्वासनांच्या जोरावर सत्तेत आले त्या आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर बसलंय. आणि ते भूत सध्या विरोधकांच्या तोंडून प्रश्न विचारून महायुतीच्या विक्रमाला बेजार करु लागलंय.





Source link

Maharashtra Weather News : मुंबई जणू एक भट्टी, राज्यावर सूर्याचा कोप; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : मुंबई जणू एक भट्टी, राज्यावर सूर्याचा कोप; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती?


Maharashtra Weather News : कमाल तापमानात सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं महाराष्ट्रावर सूर्य कोपल्याचंच मत सामान्यांनी बनवलं आहे. राज्याच्या विदर्भ आणि उत्तर भागासह मरावाड्यातही कुठे पारा चाळीशीपार किंवा कुठे पारा चाळीशीचा आकडा गाठताना दिसत आहे. परिस्थिती इतकी भयंकर आहे, की राज्यातील गिरीस्थानांवरही तीव्र सूर्यकिरणांचा मारा होत असल्या कारणानं नागरिकांची होरपळ सुरू आहे. 

एप्रिल महिन्याचा शेवट खुणावत असताना वाढलेल्या या होरपळीतून आता नेमका दिलासा कधी मिळणार याचीच प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. पण, हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता इतक्यात दिलासा मिळणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या हिमालयात नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय असून, राजयस्थानच्या वायव्य भागापासून आणि समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावरील उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक, केरळ, तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होण्याची चिन्हं आहेत. राज्यात सध्यातही मुसळधार पावसाचा इशारा नसून, आकाश मात्र ढगाळ राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेसोबतच दमट वारे अडचणी वाढवणार असून, कोकण आणि मुंबई शहर उपनगरांमध्येही हे दमट हवामान अडचणी वाढवणार आहे. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळं उष्मा आणखी जाणवत त्यामुळंही अडचणी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. मुंबई शहरात तापमानाचा आकडा 34 ते 37 अंशांदरम्यान असलं तरीही इथं आर्द्रतेमुळं उष्ण वारे अधिकच तीव्रतेनं शहराची भट्टी करताना दिसत आहेत. त्यामुळं पुढील 48 तासांमध्ये नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp