MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा


No match is being played.

Apr 16, 2025 | Match 32

Indian Premier League, 2025

RR

(20 ov) 188/5

VS

DC

188/4(20 ov)

Delhi Capitals tied with Rajasthan Royals (Delhi Capitals win Super Over by 2 wickets)
Full Scorecard →

Apr 15, 2025 | Match 31

Indian Premier League, 2025

KKR

(15.3 ov) 111

VS

PBKS

95(15.1 ov)

Punjab Kings beat Kolkata Knight Riders by 16 runs
Full Scorecard →

Apr 14, 2025 | Match 30

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 166/7

VS

LSG

168/5(19.3 ov)

Chennai Super Kings beat Lucknow Super Giants by 5 wickets
Full Scorecard →





Source link

भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा

भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा


वाल्मिक जोशी (प्रतिनिधी) भुसावळ : भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांमुळे भुसावळकरांची घाबरगुंडी उडाली आहे. कधी कुणाला कुठे भटका कुत्रा चावा घेईल याचा काही नेम नाहीये. कारण वर्षभरात भुसावळमध्ये तब्बल 4 हजार 477 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. म्हणजे दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. 

जळगावच्या भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना अक्षरक्षा जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय.. याचं कारण म्हणजे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालतायत. भुसावळमध्ये वर्षभरात तब्बल 4 हजार 477 जणांना भटक्या कुत्र्यांने चावा घेतला आहे. त्यामुळे भुसावळमध्ये दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटके कुत्रे चावा घेताहेत.  भटक्या कुत्र्यांचा शहरात एवढा धुमाकुळ सुरू असताना नगर परिषद प्रशासन काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र नगर परिषद प्रशासनाचं या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे लक्ष नाही आहे.

हेही वाचा : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

 

भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : 

भुसावळमधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत असून दिवसाला सरासरी 12 ते 13 जणांवर कुत्र्यांचा हल्ला होतो. लहान मुलांना चावा घेतल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण दोन महिन्यांपासून रखडलंय. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 30 लाखांचा निधी मंजूर असून निर्बिजीकरणाचं ठेकेदाराला दिलेलं काम तांत्रिक अडचणीमुळे रखडलं आहे. 

आतापर्यंत वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी साडे चार हजार नागरिकांना चावा घेतलाय. मात्र पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीय. सांगलीत संभाजी भिडे यांनी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. तसंच भुसावळ पालिकाही कोण्या मोठ्या नामांकीत व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यावरच याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न भुसावळकर विचारत आहेत. 





Source link

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र, मुघलांचा वंशज म्हणतो 'भारताने 1972 मध्ये….'

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र, मुघलांचा वंशज म्हणतो 'भारताने 1972 मध्ये….'



औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्यावरुन नागपुरात हिंसाचार (Nagpur Violence) झाल्याच्या एका महिन्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं आहे. 
 



Source link

एकनाथ शिंदे – राज ठाकरेंची युती?, मुंबई महापालिकेपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

एकनाथ शिंदे – राज ठाकरेंची युती?, मुंबई महापालिकेपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?


Eknath Shinde Meet MNS Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकननाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर युतीची चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनसाठी गेले होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.

अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल.

शिंदे-ठाकरेंमधील संबंधातील चढउतार

माहीमच्या विधानसभा उमेदवारीवरुन तणाव
अमित ठाकरेंचा पराभव राज यांच्या जिव्हारी
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर केलेली टीका
गंगेच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
राज ठाकरेंची शिंदेंवर सातत्यानं टीका

एकनाथ शिंदे भेटीचं राज काय? 
 

महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून भेट
उद्धव विरोधात तगडं आव्हान उभं करण्याचा डाव
महायुतीत सामील होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता
राज सोबत आल्यास उद्धव यांच्याबाबत सहानुभूती कमी
राज महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना उधाण
ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा जवळीक वाढली
विधानसभेतल्या सरवणकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती
त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा घेतली भेट
राज ठाकरेंचं गंगेबाबत वक्तव्य, सरवणकरांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातो. आमच्या फाईल्स अर्थखात्याकडून अडवल्या जातात, अशी तक्रार अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे केली असल्याचं बोललं जातंय. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अशा अनेक घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.





Source link

'मुलीने स्वत:च्या इच्छेने…'; 15 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला मुंबई HC कडून जामीन

'मुलीने स्वत:च्या इच्छेने…'; 15 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला मुंबई HC कडून जामीन


Grants Bail To Man Booked For Raping 15 Year Old Girl: मुंबई हायकोर्टाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. प्रकरणातील तथ्यांनुसार, पीडित मुलीला ती काय करत आहे याची पुरेशी जाणीव होती आणि तिने स्वत:च्या इच्छेने त्या व्यक्तीचा सहवास स्वीकारला होता. तसेच, तिच्या कुटुंबाला तिच्या आणि आरोपीच्या नात्याची माहिती होती, असं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.

मे 2021 पासून तुरुंगात

न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव यांच्या एकल खंडपीठाने 9 एप्रिल रोजी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल असलेल्या 25 वर्षीय तरुणाच्या जामीन अर्जावर त्याला जामीन मंजूर करत असल्याचा आदेश दिला. या तरुणाला मे 2021 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगातच होता.

…म्हणून जामीन मंजूर

आरोपी गेल्या 3 वर्षे आणि 11 महिन्यांपासून कारागृहात आहे आणि “नजीकच्या भविष्यात खटला सुरू होण्याची किंवा निकाल लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात येत आहे,” असं न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटलं आहे. 

मुलगी घरातून निघून गेली

या प्रकरणात ऑगस्ट 2020 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी जुलै 2020 मध्ये ती घरातून निघून गेली आणि परत आली नाही, अशी तक्रार दाखल केली होती. अर्जदाराशी (आरोपी) तिचा संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांनी अर्जदाराशी संपर्क साधला, परंतु त्यांनी पीडितेच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे म्हटलं होतं. मात्र दोन दिवसांनंतर, पीडितेने वडिलांना सांगितले की, ती अर्जदारासोबत दुसऱ्या राज्यातील त्याच्या मूळ गावी आहे.

15 वर्ष 3 महिन्यांची असताना गरोदर राहिली

मे 2021 मध्ये, पीडितेने (तेव्हा तिचं वय 15 वर्षे आणि 3 महिने इतकं होतं) तिच्या वडिलांना तिच्या गरोदरपणाबद्दल आणि अर्जदाराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल सांगितले, त्यानंतर तिला महाराष्ट्रात परत आणण्यात आले. आपल्या जबाबात मुलीने म्हटले होते की, ती 2019 पासून अर्जदाराला ओळखते. त्याच वर्षी त्याने तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या, तिने त्याला होकारार्थी उत्तर दिले होते. तेव्हापासून ते नियमितपणे भेटत होते, जे तिच्या पालकांना मान्य नव्हते.

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

मुलीने असा दावा केला आहे की, आरोपीने मार्च 2020 मध्ये तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र नंतर कोविडच्या साथीच्या काळात तो त्याच्या मूळ गावी गेला होता. नंतर, जुलै 2020 मध्ये महाराष्ट्राबाहेर असताना, त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली होती.

तरुणाकडून काय युक्तिवाद करण्यात आला?

अर्जदार तरुणाचे वकील मतीन कुरेशी यांनी असा युक्तिवाद केला की, मुलगी स्वतःहून मे 2021 पर्यंत 10 महिने अर्जदारासोबत राहिली होती आणि दरम्यान, तिने अर्जदाराविरुद्ध जबरदस्ती किंवा जबरदस्तीचा कोणताही आरोप केलेला नाही. कुरेशी म्हणाले की, वडिलांना तिच्या ठिकाणाची माहिती असूनही, त्यांनी तिला ताब्यात घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे सरकारी वकिलांचा खटला ‘अत्यंत संशयास्पद’ आबे. न्यायालयाने खटल्याच्या प्रलंबित दीर्घ तुरुंगवासाचाही उल्लेख केला आणि आरोपी जामिनावर सुटण्यासाठी पात्र असल्याचे म्हटले.





Source link

पुणे – जुन्नरमध्ये कांदा, टोमॅटो, रब्बी पिकांचं नुकसान; गारपीटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

पुणे – जुन्नरमध्ये कांदा, टोमॅटो, रब्बी पिकांचं नुकसान; गारपीटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू



पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीनं धुमाकूळ घातला. यात कांदा टोमॅटोसह अनेक रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp