BMC Election: भाजपाची मोठी कारवाई! तब्बल 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन, वाचा यादी

BMC Election: भाजपाची मोठी कारवाई! तब्बल 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन, वाचा यादी



BJP Suspends 26 from Party: मुंबईत महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना, भाजपाने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. भाजपाने 26 जणांना पक्षातून हाकललं आहे. 
 



Source link

शिंदेंचा बिनविरोधचा मास्टर प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; उपमुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच कशी दिली शह? एकदा वाचाच

शिंदेंचा बिनविरोधचा मास्टर प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; उपमुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच कशी दिली शह? एकदा वाचाच



Thane Politics Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन उमेदवार सहज बिनविरोध निवडून येणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी एक डाव टाकला आणि सारा खेळ फिरला…



Source link

2,71,85,00,000 रुपयांची संपत्ती! मुंबई नाही तर 'या' जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल

2,71,85,00,000 रुपयांची संपत्ती! मुंबई नाही तर 'या' जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल


Maharashtra Municipal Election :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माजी महापौर व माजी नगरसेवक कोट्याधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. यात अनेकांच्या संपत्तीत दुपटीने ते पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार गडगंज असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
शिवसेना शिंदे गटातील उमेदवार समाधान सरवणकर यांची सद्याची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 46 कोटी 59 लाख रुपये आहे. त्यांची 2017 ला 9 कोटी 43 लाख रुपये होती. ते व्य़ावसायिक आहेत. शिवसेना (ठाकरे) गटाच्या श्रदधा जाधव यांची मालमत्ता 46 कोटी रुपये होती. त्यांची 2024 ला 44 कोटी रुपये मालमत्ता होती म्हणजे एका वर्षात साडेतीन कोटीने वाढली आहे.

Add Zee News as a Preferred Source

 भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांची सध्याची संपत्ती 17 कोटी 63 लाख रुपये आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची 5 कोटी 26 लाख रुपये आहे. 2017 साली 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार शैलेश फणसे यांची स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 25 कोटी रुपये एवढी आहे. शिवसेना (शिंदे) पक्षातील दिप्ती वायकर यांची संपत्ती 22 कोटी 1 लाख 71 हजार इतकी आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उमेदवार रवी राजा यांची स्थावर व जंगम मालमत्ता सद्याची मालमत्ता 10 कोटी 12 लाख 17 हजार इतकी आहे. 2017 साली ती 5 कोटी 12 लाख 84 हजार इतकी होती. म्हणजे 8 वर्षात दुपटीने वाढली आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना स्वतःची, पत्नीची तसेच अवलंबितांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक ठेवी, शेअर्स, दागिने आणि कर्जाची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत काही माजी नगरसेवकांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घर, फ्लॅट, व्यावसायिक गाळे, भूखंड यासह बँक ठेवी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याची नोंद आहे. काही माजी नगरसेवकांनी उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न आणि पगार असल्याचे नमूद केले असले तरी, मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

 ‘या’ जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबईत गडगंज श्रीमंत उमेदवार असले तरी पुण्यातील श्रीमंत उमेदवारांसह बरोबरी करु शकत नाही. पुण्यात 41 जागांसाठी 1166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 271.85 कोटींच्या आसपास आहे. तर, सायली वांजळे या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 77.12 कोटींच्या आसपास आहे. 
मुंबईत कोणाची किती संपत्ती वाढली
माजी महापौर किशोरी पेडणेकर एकूण मालमत्ता – यांची 5 कोटी 26 लाख
2017 साली –  1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती.

माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक 202)
एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : 46 कोटी
विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता 44 कोटी होती
वाढ : एका वर्षात 2 कोटी

माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. 191)
स्थावर – जंगम मालमत्ता: 21 कोटी 83 लाख
2017  मध्ये : 14 कोटी 37 लाख
वाढ : 7 कोटी

यामिनी जाधव (प्रभाग 209)
एकूण मालमत्ता : 14 कोटी 57 लाख
विधानसभा 2024 लढवली : 10 कोटी 10  लाख
वाढ : 1 वर्षात 4 कोटी

नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. 107)
एकूण मालमत्ता : 9 कोटी
२०१७ मध्ये : 1 कोटी 99 लाख
वाढ : 8 वर्षात 7 कोटी

तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. 2)
 एकूण मालमत्ता : 5 कोटी
२०१७ मध्ये : 25 लाख
वाढ : 8 वर्षात 4. 75 कोटी

शैलेश फणसे – एकूण मालमत्ता 25 कोटी
दीप्ती वायकर  – 22 कोटी 1 लाख 71 हजार

समाधान सरवणकर – 46 कोटी 59 लाख
2017 मध्ये – 9 कोटी 43 लाख

यशवंत किल्लेदार एकूण मालमत्ता – 7 कोटी 5 लाख

रवी राजा एकूण मालमत्ता – 10 कोटी 12 लाख 17 हजार
2017  मध्ये – 5 कोटी 12 लाख 84 हजार

भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे एकूण मालमत्ता – 17 कोटी 63 लाख रुपये





Source link

महाराष्ट्र हादरला! काँग्रेस नेत्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू; मशिदीबाहेर पाऊल टाकताच…

महाराष्ट्र हादरला! काँग्रेस नेत्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू; मशिदीबाहेर पाऊल टाकताच…



Congress Leader Stabbed To Death Outside Mosque: मशिदीमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणांमध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



Source link

'विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या' विधानावरुन गदारोळ असतानाच ओवेसींची अमित देशमुखांवर सणसणीत टीका, 'मोठ्या बापाचा…'

'विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या' विधानावरुन गदारोळ असतानाच ओवेसींची अमित देशमुखांवर सणसणीत टीका, 'मोठ्या बापाचा…'


Asaduddin Owaisi targets Amit Deshmukh: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमित देशमुखांनी वारशावरुन अमित देशमुखांवर निशाणा साधला आहे. मी वारसा नाही, काम सांगतो म्हणत ओवेसींनी अमित देशमुखांना जाहीर आव्हानच दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मीदेखील मोठ्या बापाचा मुलगा आहे, माझे वडील सहा वेळा आमदार होते. पण मी त्यांचा वारसा सांगत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे जनतेसमोर मांडतो,” असा हल्लाबोल एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्यावर केला आहे.

“लातूर शहरातील मूलभूत समस्या आजही जैसे थे असल्याने, केवळ वारसा सांगून राजकारण करण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. मोठमोठ्या राजांचे महाल ओसाड पडले, मग तुम्ही कोणता वारसा सांगता?,” असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे. 

रवींद्र चव्हाणांनी काय म्हटलं आहे?

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तापू लागला आहे. प्रचाराच्या धामधुमीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील असं वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

वादानंतर व्यक्त केली दिलगिरी

मी विलासरावांवर टीका टिप्पणी केली नाही. ते मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. विलासरावांवर लक्ष्य केंद्रीत करुन काँग्रेस तिथं मत मागत आहे, म्हणून आम्ही मोदींचे काम पाहा म्हटले. तरीसुद्धा त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. राजकीय दृष्टीने पाहू नका असं नंतर त्यांनी म्हटलं .

देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, “रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, स्पष्टीकरण ही दिले आहे. विलासराव यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे, त्यांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत. कुणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही त्यांनी  केलं आहे”.

जयंत पाटलांकडून वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला. स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

जयंत पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही.





Source link

काही तासांचा गारठा, पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात 24 तासांत हवामानात असंख्य बदल! उत्तरेकडे 7 दिवस…

काही तासांचा गारठा, पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात 24 तासांत हवामानात असंख्य बदल! उत्तरेकडे 7 दिवस…


Maharashtra Weather News : तापमानाचा आकडा प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांवर पोहोचलेला असतानाच आता मात्र याच तापमानात वाढ होत असून महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि रात्री अतिशय उशिरा जाणवणारा गारठा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी सूर्य डोक्यावर येताच कमाल तापमानाचा सरासरी आकडा 30 अंशांच्या घरात पोहोचत आहे. तर, काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं पावसाची हजेरी असण्याची शक्यता वाढवून जात आहे. ज्यामुळं पुढच्या 24 तासांमध्ये हवामानात हे अतिशय अनपेक्षित, बदल दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

का निर्माण झाली आहे हवामानाची ही स्थिती? 

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका सातत्यानं वाढत आहे, तर दक्षिणेकडे मात्र पावसासाठी पूरक स्थिती असल्यानं त्याचे थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानात दिसत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये हवामान विभागानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम प्रामुख्यानं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर होईल असं सांगण्यात येत आहे. तर, राज्यात घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये दाट धुक्याची चादर विरळ होण्यासाठी तुलनेनं अधिक वेळ घेईल, ज्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होताना दिसणार आहे. 

विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, अमरावती, गोंदिया तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव इथं पुढील दोन दिवसांत 2 ते 3 अंशांची तापमान घट अपेक्षित असून, दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी दिसून येईल. लक्षद्वीपर आणि मालदीवमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या कृतीस कारणीभूत असेल. 

एकाएकी कुठून आला पावसाचा इशारा? 

चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम कोकण, सिंधुदुर्गापासून सांगलीपर्यंत होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं इथं वातावरण ढगाळ असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ढगांचा लपंडाव पाहायला मिळेल. 

हिमालय क्षेत्रात वाढणार हिमवर्षाव… 

पश्चिमी हिमालय क्षेत्रांमध्ये बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मूपासून शिमल्यापर्यंत आणि पंजाबसह हरियाणा, राजस्थानच्या काही भागांर्यंत दाट धुकं पाहायला मिळेल. पर्वतीय भागांमध्ये दरम्यानच्या काळात हिमवर्षाव वाढणार असून, पुढील 7 दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. पाऊस आणि हिमवर्षावामुळं या भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp