दिवस उजाडला… पण नावापुरता! पावसाच्या ढगांमुळं मुंबईपासून कोकणापर्यंत काळोख, सतर्कतेचा इशारा जारी

दिवस उजाडला… पण नावापुरता! पावसाच्या ढगांमुळं मुंबईपासून कोकणापर्यंत काळोख, सतर्कतेचा इशारा जारी


Maharashtra Weather News : जवळपास गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात बरसणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसून, कैक दिवसांपारून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यकिरणांनीही दर्शन दिलेलं नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरासह विदर्भातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्याच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण घाटमाथा या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून, मुंबईसह या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस हे चित्र कायम राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघरला पाऊस झोडपणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्याच्या समुद्र किनारी भागांमध्येसुद्धा पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवत दरम्यानच्या काळात समुद्र खवळलेला असल्या कारणानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

दोन नव्हे, चार दिवस पावसाचे…. 

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यामुळं पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य भारतावर आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून त्याच्याच प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात 18, 19 ऑगस्टदगरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांसह, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. 

FAQ

महाराष्ट्रात सध्या पावसाची स्थिती काय आहे?
सध्या महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोणत्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे?
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण घाटमाथा या भागांसाठी पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि कोकणातील काही भागांचा समावेश आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी कोणता अलर्ट आहे?
मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.





Source link

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 296 विशेष रेल्वे; ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 296 विशेष रेल्वे; ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा


Konkan Railway Ganpati Special Train 2025 : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. गणेशभक्तांच्या सोईसाई मध्य रेल्वे तर्फे अतिरिक्त ट्रेनची सुविधा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतर्फे एकूण 296 गणपती विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत.   गणेश चतुर्थी दरम्यान उत्सवाच्या गर्दीला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने 44 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे, ज्यामुळे गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या 296 झाली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवांचा समावेश आहे. या रेल्वे 28 आणि 31 ऑगस्ट आणि 4 आणि 7 सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवर धावतील. एलटीटी-सावंतवाडी विशेष (ट्रेन क्रमांक 01131) सकाळी 8:45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:20  वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल. परतीची सेवा (ट्रेन क्रमांक 01132) सावंतवाडी रोडवरून रात्री 11:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वे ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग यासारख्या प्रमुख कोकण पट्ट्यातील स्थानकांवर थांबतील. या कोचमध्ये एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड-क्लास कोच असतील.

याव्यतिरिक्त, मध्य रेल्वे दिवा आणि खेड दरम्यान 36 अनारक्षित मेमू सेवा चालवेल. 22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान दररोज या दोन्ही दिशेने 18 फेऱ्या चालवल्या जातील. दिवा-खेड ट्रेन दुपारी 1:40  वाजता सुटेल, तर खेडहून परतीची सेवा सकाळी 8 वाजता सुटेल. दरम्यान, दिवा-चिपळूण मेमू सेवा, जी मूळतः 38 फेऱ्यांसाठी होती, ती आता 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 40 फेऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

गणेशोत्सवानमित्त यंदा कोकणवासीयांसाठी विशेष मोदी एक्स्प्रेसची मोफत सुविधा मिळणार आहे. सालाबादाप्रमाणे मंत्री नितेश राणेंनी यंदाही ही सेवा उपलब्ध करुन दिल्याची माहिती दिलीय . या उपक्रमाचं हे 13वं वर्ष आहे, 23 आणि 24 ऑगस्टला मुबंईतील दादरमधून सुटणारी या ट्रेन सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. 18 ऑगस्टपासून या ट्रेनची मोफत तिकीटं मिळण्यास सुरुवात होणार आहे. 

गणेशोत्सवानमित्त यंदा कोकणवासीयांसाठी विशेष मोदी एक्स्प्रेसची मोफत सुविधा मिळणार आहे. सालाबादाप्रमाणे मंत्री नितेश राणेंनी यंदाही ही सेवा उपलब्ध करुन दिल्याची माहिती दिलीय . या उपक्रमाचं हे 13वं वर्ष आहे, 23 आणि 24 ऑगस्टला मुबंईतील दादरमधून सुटणारी या ट्रेन सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. 18 ऑगस्टपासून या ट्रेनची मोफत तिकीटं मिळण्यास सुरुवात होणार आहे. 

 





Source link

Ahilyanagar Crime: बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून चार चिमुकल्यांसह बापाने जीवन संपवले

Ahilyanagar Crime: बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून चार चिमुकल्यांसह बापाने जीवन संपवले


प्रतिनीधी कुणाल जामदाडे- Ahilyanagar Crime:  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून एक बापाने आपल्या चार चिमुकल्या मुलांसह आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कैलास काळे (वय 30, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी पती-पत्नीतील वादामुळे माहेरी येवला येथे गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून अरुण यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी कोहाळे शिवारात एका विहिरीत चार चिमुकल्यांचे आणि वडिलांचा मृतदेह दिसून आला. अरुण यांनी स्वतःच आपला एक हात आणि एक पाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतल्याचे दिसून येत आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत स्थानिक पोलीस सध्या तपास करत आहेत.

अजून दोन मुलांचा शोध सुरु 

मयतांची नावे पुढील प्रमाणे आहेत.  शिवानी अरुण काळे (वय 8). प्रेम अरुण काळे (वय 7). वीर अरुण काळे (वय 6). कबीर अरुण काळे (वय 5). अरुण काळे (वय 30). यापैकी अरुण काळे आणि दोन मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि गावकऱ्यांना यश आले असून उर्वरित दोन मुलांचा शोध सुरू आहे.

विहिरीत एकाच कुटुंबातील मृतदेह दिसताच उपस्थित गावकरी आणि नातेवाईकांचा हंबरडा फूटला. घटनास्थळापासून काही अंतरावर अरुण यांची मोटारसायकल आढळली असून त्यावरूनच ही घटना घडल्याचा संशय लावला जात आहे.

पती-पत्नीच्या वादामुळे चार मुलांचा बळी

पत्नी नांदायला येत नाही म्हणून चार निरागस जीवांचा बळी गेला ही बाब अत्यंत हृदय पिळवून टाकणारी आहे. छोट्याशा वादामुळे एका कुटुंबाचे अस्तित्व संपुष्टात आले असून यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.

FAQ

कोहाळे शिवारात काय घटना घडली?

कोहाळे शिवारात एका बापाने कौटुंबिक वादातून आपल्या चार चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ही घटना कधी आणि कुठे घडली?

ही घटना 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात घडली.

या घटनेचे कारण काय होते?

प्राथमिक माहितीनुसार, अरुण यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी वादामुळे माहेरी गेली होती आणि ती नांदायला येत नसल्याने अरुण यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला.





Source link

…म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, DYSP चं स्पष्टीकरण, म्हणाले 'महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर…'

…म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, DYSP चं स्पष्टीकरण, म्हणाले 'महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर…'


Jalna News : स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एक विचित्र प्रकार घडला. पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. (Jalna police viral video of officer kicking protester sparks public outrage dysp anant kulkarni clarification)

DYSP अनंत कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण

DYSP अनंत कुलकर्णी म्हणालेत की, गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं करून देखील 15 ऑगस्टला पंकजा मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टकरण दिलं आहे. 

काय आहे प्रकरण?

जालना शहरातील चौधरी कुटूंबातील सून ही लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली. एवढंच नाही तर तिने दुसरं लग्न ही केलं याची तक्रार कुटूंबातील पती गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसात केली होती. मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरूनच चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचं गुन्ह्यामुळे चौधरी कुटुंबानी गेल्या अनेक दिवसापासून सुनासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनाचा पावित्र घेतला. मात्र कुणाचं दाद देत नसल्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील आंदोलकांने पंकजा यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

त्याचवेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतानाच जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चक्क पाठीमागून येऊन ताब्यात घेतलं. यावेळी  DYSP अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कंबरेत पाठीमागून धावत येत फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे आंदोलकांप्रमाणेच सामान्यांमध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

FAQ

1. जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणता कार्यक्रम झाला?

स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.

2. या कार्यक्रमादरम्यान कोणता विचित्र प्रकार घडला?

पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून गोपाल चौधरी नावाच्या आंदोलकाने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, यावेळी DYSP अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली, जी घटना व्हायरल झाली.

3. DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर काय स्पष्टीकरण दिलं?

DYSP अनंत कुलकर्णी यांनी सांगितलं की, गोपाल चौधरी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांनी पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर रॉकेल टाकलं, म्हणून बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलं.

4. या प्रकरणाचं मूळ कारण काय आहे?

चौधरी कुटुंबातील सून लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली आणि तिने दुसरं लग्न केलं. याबाबत गोपाल आणि रमेश चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी सुनेच्या तक्रारीवरून चौधरी कुटुंबावरच कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल केला. यामुळे चौधरी कुटुंबाने सुनेच्या आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केलं.





Source link

महाराष्ट्रातील सर्वात थरारक दहीहंडी! खोल विहिरीवर बांधलेली उंच दहीहंडी उडी मारुन फोडतात; पाहताना अंगावर काटा येईल

महाराष्ट्रातील सर्वात थरारक दहीहंडी! खोल विहिरीवर बांधलेली उंच दहीहंडी उडी मारुन फोडतात; पाहताना अंगावर काटा येईल


No match is being played.

Aug 12, 2025 | 3rd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

WI

(50 ov) 294/6

VS

PAK

92(29.2 ov)

West Indies beat Pakistan by 202 runs
Full Scorecard →

Aug 12, 2025 | 2nd T20

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

SA

(20 ov) 218/7

VS

AUS

165(17.4 ov)

South Africa beat Australia by 53 runs
Full Scorecard →

Aug 10, 2025 | 2nd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

PAK

(37 ov) 171/7

VS

WI

184/5(33.2 ov)

West Indies beat Pakistan by 5 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

मुंबईच्या हातावर तुरी; विदर्भ कोकणात मात्र मुसळधार, पाऊस कुठे- कधी जास्त बरसणार? पाहा

मुंबईच्या हातावर तुरी; विदर्भ कोकणात मात्र मुसळधार, पाऊस कुठे- कधी जास्त बरसणार? पाहा


Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरासमवेत अरबी समुद्रामध्येसुद्धा निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि एकंदर कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांना 13 ते 19 ऑगस्टदरम्यान मान्सून झोडपणार असल्याचं म्हटलं गेलं. मात्र काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण वगळता पावसानं फारशी समाधानकारक हजेरी लावली नाही. 

पुढील 24 तासांमध्ये कसं असेल राज्यातील पर्जन्यमान? 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं कोकण विभाग, घाटमाथ्यावरील क्षेत्र, विदर्भ आणि संलग्न मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. जिथं काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊसधारा बरसतील तर, काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असेल. 

दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर भागात शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यानंतर रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह आणि मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

FAQ

कोकणात कसं असेल हवामान? 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह (30-40 किमी/तास) जोरदार पावसाची शक्यता.

घाटमाथ्यासाठीचा अंदाज… 
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. भूस्खलनाचा धोका असू शकतो.

विदर्भात कोणत्या भागांना पाऊस झोडपणार? 
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वारे.





Source link