Praniti Shinde Emotional: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामती येथे लाखो जनसमुदाच्या साक्षीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते. सर्वांनी अजित पवारांना भावपूर्ण निरोप दिला. अजित दादांचं असं अकाली जाणं हे साऱ्यांसाठी धक्कादायक होतं. या धक्क्यातून अजूनही कोणी सावरु शकलं नाहीय. अजित पवारांच्या आठवणी सांगताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे भावूक झालेल्या दिसल्या. त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
महाराष्ट्राचे दादा आपल्यातून निघून गेलेत विश्वास बसत नाही. सकाळी अपघाताचे वृत्त आले. दादा त्यात नसावेत, अशी प्रार्थना सुरु होती. असतील तर सुखरुप असावेत असं सारख वाटत होतं पण अत्यंत धक्कादायक बातमी कानावर आली. अंगावर शहारा आला. मी त्यांच्यासाठी लहान बहीणीसारखी होती. आमच कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापुर्वीच भाचीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला गेलो होतो. माझ्या मतदार संघासाठी दादांनी खास निधी दिली होता. मी निवडून आली तेव्हा त्यांनी फोन करुन अभिनंदन केलं. काय गं प्रणिती… असं ते म्हणायचे.
अजित पवार दिलखुलास जगत होते. जिल्हा परिषद निवडणुकीत मेहनत घेत होते. 9 ची मिटींग असेल तर 10 मिनिट आधी ते पोहोचायचे. हेक्टीक लाईफस्टाईल. बारामतीत त्यांचे विमान क्रॅश झाले. स्वत:च्या गावात विमान क्रॅश झालं. चॉपर समजू शकते पण विमान लॅंडींगवेळी क्रॅश होणं हे खूप धक्कादायक आहे. विमान ट्विन इंजिन असायला हवं असं आपण म्हणतो पण ते त्याबाबतीत दक्ष होते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
मी पहिल्यांदा आमदार झाले. दादांनी मला पाहीलं, त्यांना अभिमान वाटला आणि ते आनंदी झाले. मुख्यमंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. कधीकधी आम्ही मुख्यमत्रीऐवजी त्यांच्याकडे जास्तवेळा जायचो. बोलायचे. कामासाठी निधी द्यायचे. बोरामणी एअरपोर्टसाठी 20 कोटी निधी देतो असं थेट सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा जीआर निघायचा. जे काही असेल ते दिलखुलास बोलायचे. विरोधी पक्षातील असले तरी त्यांचे काम करायचे. मोठी पोकळी निर्माण झालीय, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झीरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना उत्तराधिकाऱ्याबद्दल विधान केलं आहे. “अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात,” असं झीरवाळ यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असं नरहरी झीरवाळ म्हणाले आहेत. “आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच,” असल्याचंही झीरवाळ म्हणालेत. “आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथुन पुढे एकत्रच असणार यात शंका नाही,” असंही झीरवाळ यांनी नमूद केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार?
दोन्ही राष्ट्रवादी विलीन होण्यासंदर्भात दोन्ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा पर्याय निवडला होता. शरद पवार जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील तरच हे सर्व त्यांना साथ देतील अशी शक्यता आहे. अन्य़था ते शरद पवारांचं नेतृत्व स्विकारणार नाहीत. अनेक नेते, आमदारांची शरद पवारांसोबत जाऊन विरोधी पक्षात बसावं अशी इच्छा नाही अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील काही दिवसात खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. पण सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा राजकीय अनुभव नसल्याने ती अडचण ठरु शकते. मुलगा पार्थ आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्व सोपवण्याइतका अनुभव नाही.
Ajit Pawar Plane Crash News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान अपघातानंतर, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने तपास सुरू केला आहे. हे विमान VSR कंपनी चालवत होती. AAIB चे अधिकारी दिल्लीतील VSR कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सील केली. मिळालेल्या माहितीनुसार, AAIB चे तीन अधिकारी येथे पोहोचले होते.
Add Zee News as a Preferred Source
दुर्घटनाग्रस्त विमान प्रकरणात तपासाचा वेग वाढला आहे. AAIB चे अधिकारी आज VRS व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. कंपनीतील कोणाशीही संपर्क साधण्यात आला नाही. द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, एएआयबीच्या अधिकाऱ्यांनी विमान चालवणाऱ्या खाजगी चार्टर कंपनी व्हीएसआर एव्हिएशनच्या महिपालपूर कार्यालयाला भेट दिली. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातून अचानक अनेक लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या सकाळी पोहोचलेले लोकही बेपत्ता होते.
व्हीएसआर कंपनीच्या कार्यालयात पोहोचलेल्या एएआयबी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर तैनात असलेल्या एका गेटकीपरची चौकशी केली. त्यांची ओळख पडताळण्यासाठी त्यांचे आधार कार्ड मागितले. एका अधिकाऱ्याने गेटकीपरला सांगितले की जर त्याने तपासात सहकार्य केले तर त्याला काहीही होणार नाही. तथापि, गेटकीपरने वारंवार बेपत्ता व्यक्तींबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे नाकारले. वृत्तानुसार, अधिकारी आज सकाळी 11:30 च्या सुमारास परिसरात पोहोचले.
गेटकीपरची चौकशी केल्यानंतर अधिकारी आत गेल्याचे वृत्त आहे. असे वृत्त आहे की जेव्हा एएआयबीचे अधिकारी कार्यालयाच्या दाराशी पोहोचले तेव्हा त्यांना ते आतून बंद आढळले. त्यामुळे आत कोणीही नसताना दरवाजा आतून कसा बंद केला जाऊ शकतो असा प्रश्न निर्माण होतो. ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी काही वेळ तिथेच राहिले. मोठ्या संख्येने एएआयबी अधिकाऱ्यांनी ऑफिसमधील फायली सील केल्याचे वृत्त आहे. एएआयबीचे तीन अधिकारी उपस्थित होते. तथापि, कंपनीतील कोणीही पुन्हा संपर्क साधत नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी हुज्जत घातली.
अपघाताबाबत एअरलाइन कंपनीचे निवेदन
अजित पवार हे व्हीएसआर व्हेंचर्स विमानात होते. हे विमान अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर, एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी केले. व्हीएसआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की पायलट धावपट्टीवरून चुकला. पायलटला अंदाजे 16,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सह-वैमानिकाला अंदाजे 1,500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. विमानात कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती. कंपनीने सांगितले की त्यांच्याकडे अजूनही सात विमाने सेवेत आहेत. ते कोणतेही विमान ग्राउंड करत नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. 66 वर्षीय अजित पवारांसहीत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अजित पवारांसोबत सावलीसारखे फिरणारे त्यांचे बॉडीगार्ड विदीप दिलीप जाधव यांचाही समावेश आहे. जाधव यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. विटाव्याचे सुपुत्र असलेले विदीप हे मुंबई पोलीस दलातील सन 2009 बॅच पोलीस शिपाई होते. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ म्हणजेच पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत असताना विमान अपघात मृत्यू झाला आहे.
Add Zee News as a Preferred Source
गावकरी हळहळले
ठाण्यातील कळवा येथे राहणारे अजित दादांचे विश्वासू बॉडीगार्ड विदीप हे सुद्धा अपघात झाला तेव्हा अजित पवारांसोबत विमानात होते. सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहणारे विदीप यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यनिष्ठा, निष्ठा आणि शांत स्वभाव यांचं जिवंत उदाहरण असलेले विदिप जाधव यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विदिप ज्या विटावा गावातून येतात तेथील नागरिक हादरुन गेले आहेत. संपूर्ण गावासाठी विदिप यांचं असं आकस्मिक जाणं धक्का देणारं ठरलं आहे. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावान जवान, एक कर्तव्यदक्ष योद्धा आणि एक उत्तम माणूस हरपला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या कठीण प्रसंगी जाधव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना असं गावकऱ्यांनी जाधव कुटुंबाचं सांत्वन करताना म्हटलं आहे.
ते 5 जण कोण होते?
विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने कोणीही वाचू शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांसहीत एकूण 5 जण प्रवास करत होते. या सर्वांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अजित पवारांसह एकूण 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते.
तीन मृतदेह घटनास्थळी सापडले
पुणे पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बारामतीमधील विमान अपघाताची माहिती दिली. तीन मृतदेह घटनास्थळी सापडल्याची माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. अपघात स्थळी तीन मृतदेह सापडले असून तीनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले.
Lonar Lake Water Level Risen By 20 Feet : महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले लोणार सरोवर गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले हे सरोवर केवळ एक दुर्मिळ भूगर्भीय निर्मितीच नाही तर मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक उदाहरणांपैकी एक मानले जाते. याच तलावाचे पाणी अचानक 20 फूटांनी वाढले आहे.
Add Zee News as a Preferred Source
तलावात मासे सापडल्याने खळबळ
या तलावात मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा मिसळल्याने संतुलन वेगाने बिघडत आहे. रामसर स्थळ म्हणून संरक्षित असलेले, लोणार सरोवर त्याच्या अत्यंत क्षारीय स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. बराच काळ, त्याची pH पातळी 11.5 च्या आसपास राहिली, ज्यामुळे मासे तिथे टिकू शकले नाहीत, ज्यामुळे केवळ विशिष्ट सूक्ष्मजीव आणि जैवविविधता वाढू शकली. तथापि, अलीकडेच, पहिल्यांदाच तलावात माशांची उपस्थिती नोंदवण्यात आली, ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि प्रशासन दोघेही आश्चर्यचकित झाले.
मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. तलावाच्या काठावर असलेल्या 15 प्राचीन मंदिरांपैकी नऊ मंदिरे आता अंशतः किंवा पूर्णपणे बुडाली आहेत. कमलाजा देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यामुळे स्थानिक लोकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि जलभूगर्भशास्त्रज्ञ अशोक तेजनकर यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत तलावाच्या पाण्याची पातळी सुमारे 20 फूटांनी वाढली आहे. त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की आजूबाजूच्या भागात 600 ते 700 फूट खोल असलेल्या बोअरवेलमुळे बेसाल्ट खडकांच्या नैसर्गिक पाणी साठवून ठेवणाऱ्या थरांना भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे भूजल थेट तलावात वाहू लागले आहे.
पूर्वी, तलावात फक्त दोनच गोड्या पाण्याचे स्रोत होते. धार (गोमुख) आणि सीतानहनी असे हो स्त्रोत होते. आता, राम गया आणि पापेश्वर हे दोन नवीन झरे सक्रिय झाले आहेत, जे सतत मोठ्या प्रमाणात पाणी तलावात टाकत आहेत. यामुळे तलावाची pH पातळी सुमारे 8.5 पर्यंत घसरली आहे, ज्यामुळे त्याचे अद्वितीय रासायनिक गुणधर्म नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विडंबन म्हणजे तलाव पाण्याने भरत असताना, लोणार शहर पाण्याच्या संकटाशी झुंजत आहे. गावाला महिन्यातून एकदाच नळाचे पाणी मिळते आणि रहिवासी टँकर आणि बोअरवेलवर अवलंबून असतात.
तलावात वाहणारे झरेचे पाणी अडवून शुद्धीकरणानंतर गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरावे. यामुळे तलावाची पातळी कमी होईल आणि स्थानिक लोकांना कायमस्वरूपी उपाय मिळेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की संवर्धन योजना कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. संशोधन आणि संवर्धनासाठी प्रस्तावित भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. वन विभागाचे म्हणणे आहे की ते उपाय शोधत आहेत, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यांना मर्यादा आहेत. लोणार सरोवराचे भविष्य आता विकास, संवर्धन आणि स्थानिक उपजीविका यांच्यात कसे संतुलन साधले जाते यावर अवलंबून आहे.
Close Leader of Eknath Shinde Will Join BJP Says Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून एक बडा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचं भाकित केलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या मुद्द्यापासून ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमधील सत्ताधाऱ्यांच्या प्रचार दौऱ्यांवरुनही निशाणा साधला आहे. राऊत यांनी नेमका कोणता नेता भाजपामध्ये जाणार आहे याबद्दल काय म्हटलं आहे जे जाणून घेऊयात…
Add Zee News as a Preferred Source
‘शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाहीत, त्यांना…’
शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेकवांची गट नोंदणी होत असल्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी, “बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. मोदी, शहा त्यांना वंदनीय आहेत. बाळासाहेब म्हणजे विचार आणि पुढे गेले असते. मुंबई तोडण्याची कारस्थाने सुरू आहेत. बाळासाहेब वंदनीय आहेत हा बाळासाहेबांचा मराठी जनांचा अपमान करण्यासारखं आहे,” असं म्हटलं आहे.
किती रुसून रुसून रुसणार?
“शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसून रुसून रुसणार? काहीतरी साडी चोळी पदरात पाडून घेईल. महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल. मुंबईवर ताबा मिळविण्याचं काम करतील आणि अडीच वर्षानंतर वगैरे काही मिळणार नाही,” असं राऊत म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचारावरुन टोला
“जिल्हा परिषद निवडणुका नेते लढत नाहीत. जिल्ह्यातले स्थानिक प्रमुख नेते लढतात. त्यांना काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचे आहे पण ते करतात का? पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकांत गुंतले आहेत,” असा टोला राऊत यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारा दौऱ्यावरुन लगावला आहे. “आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा. आम्ही पक्षाचा बळी देऊ शकत नाही. ते 50 सभा घेतील त्यांना काम काय आहे त्यांच्याकडे चार्टर्ड प्लेन आहे. हेलिकॉप्टर आहे. पैशाने भरलेले कंटेनर आहेत. राज्याचं हिताचं एक तरी काम केलं आहे का? निवडणुका लढवणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही त्यांची लोकसेवा आहे,” असा टोला राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
हा नेता शिंदेंना सोडून जाणार
उदय सामंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे. “स्वतः उदय सामंत भाजपात चालले आहेत. दावोसमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का?” असा सवाल राऊतांनी केला आहे.
Girish Maharaj Social Media Post after row over not taking Dr Babasaheb Ambedkar Name: गिरीश महाजनांनी प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन सोहळ्यात बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळल्यानं एका महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. या वनकर्मचा-याच्या आंदोलनानं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंबेडकरी संघटनांनीही या प्रकरणात आंदोलनाची भूमिका घेतलीय. तर दुसरीकडं गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला.
Add Zee News as a Preferred Source
गिरीश महाजनांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग 40 वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे,” असं सांगत गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही जोडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत !
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात… pic.twitter.com/qNuZ3BcbOy
नाशिकमधील शासकीय ध्वजवंदन गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप करत माधवी जाधव या महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा पालकमंत्र्यांनी नामोल्लेख कसा टाळला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. वर्दीतल्या महिला कर्मचा-यानं केलेल्या घोषणाबाजीनं एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्याला निलंबित केलं तरी पर्वा नाही पण बाबासाहेबांचा उल्लेख टाळणं सहन केलं जाणार नाही अशी भूमिका माधवी जाधव यांनी घेतली होती.
गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला नसल्याचा मुद्दा लगेचच तापला. नाशिकमधील भीम सैनिकांनी गिरीश महाजनांविरोधात आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या माफीनाम्याचीही मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही गिरीश महाजनांवर टीकास्त्र सोडलं.
गुन्हा दाखल करा नाहीतर उपोषण करणार असा इशारा माधवी जाधव यांनी दिला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संविधानाला मानणारे लोकं नाहीत अशी टीकी केली. तर वंचितचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनी महाजन यांची ही मानसिकता असल्याची टीका केली.
गिरीश महाजनांची दिलगिरी
माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीची चर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती. जेव्हा गिरीश महाजन यांना माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीबाबत विचारलं असता, त्यांनी भाषणाच चुकून बाबासाहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शासकीय कर्मचारी तीही महिला अशा प्रकारचं धाडस करताना दिसत नाही. पण बाबासाहेबांचा उल्लेख भाषणात नसल्यानं थेट मंत्र्यांना जाहीर सवाल विचारण्याची हिंमत माधवी जाधव यांनी केलीय. माधवी जाधव यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा वनविभागासह शासकीय कर्मचा-यांमध्येही होती.