by Hansraj Agrawal | Apr 7, 2025 | Trending News
Mumbai To Goa Ro Ro Ferry: मुंबई गोवा मार्गावर 180 वर्ष जुन्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. ही वाहतूक व्यवस्था म्हणजे जसमार्ग वाहतूक आहे. मुंबई गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. लवकरच मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु होणार आहे. या रो रो मधून एकाच वेळी 620 प्रवासी आणि 60 वाहने जाऊ शकतात.
145 मध्ये बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक सुरु करण्यात आली. मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ला अशी बंदरं घेत घेत ती बोट गोव्याला जायचे. 1964 नंतर ही जलवाहतूक बंद झाली. आता 180 वर्ष जुन्या पद्धतीची ही जलवाहतूक व्यवस्था पुन्हा सुरु होणार आहे. पुन्हा एकदा प्रवाशांना समुद्रमार्गे मुंबई ते गोवा हा प्रवास होणार आहे.
मुंबई ते गोवा हे अंतर 589 किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात. तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त 6 तासात शक्य होणार आहे.
जल वाहतूक सेवा देणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांन मुंबई गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खाजगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो रो फेरी असेल.
मुंबई – गोवा रो रो ची ट्रायल रन झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या चाचणीत मुंबई-गोवा प्रवास 6.5 तासांत पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. याला अंतिम मंजुरी मिळाल्या नंतर माझगाव डॉक ते पणजी जेट्टी डॉक पर्यंत फेरी सेवा सुरू होईल. परवानगीसाठी गोवा सरकारशी चर्चा सुरू आहे. 620 प्रवासी आणि 60 वाहने वाहून नेण्याची क्षमतेचे हे जहाज असेल. मार्च 2025 पर्यंत ही रो रो सेवा सुरु करण्याचे टार्गेट होते. मात्र, आता एप्रिस अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातील ही वाहतूक सुरु होऊ शकते. या रो रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही रो रो सेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 6, 2025 | Trending News
सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर : शालेय जीवनाचा काळ अविस्मरणीय असतो. पण आजही काही गावांमधल्या शाळाची अवस्था दयनीय आहे. सोलापुरातल्या सांगोलामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उदाहरण आहे.. मुलांनी शाळेत जाऊन कसं शिकायचं?? साध्या सोयीसुविधाही शाळेत नाहीत.
मुलं शाळेत गेली त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते. इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे. शाळेची दुरूस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. इमारत सुस्थितीत आहे, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.
सांगोला तालुक्यात शाळेची दुरवस्था पाहून इमारत धोकादायक, स्वच्छतागृहही नाही अशा अवस्थेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जसा माऊली बाळा…
अरेरे, पण हे काय… ही शाळा पाहिलीत.. सोलापुरातल्या सांगोला मधल्या किडे बिसरी इथलं हे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय… तुटलेल्या खिडक्या, काचाही फुटलेल्या… भिंतींना गेलेले तडे पाहून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याऐवजी मनात भीती बसली असेल..
शाळेची दुरवस्था पाहून पालकांना धास्ती लागलेली असते की, मुलं शाळेत सुरक्षित आहेत ना. ही शाळा 100 टक्के अनुदानित असूनही शाळेत मुलं-मुली, शिक्षक असूनही शौचालय नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता, इमारत पडकी, खिडक्या निखळलेल्या, काचाही फुटक्या एवढंच नव्हे तर मुलांनी खेळायचं कुठे कारण शाळेला क्रीडांगण नाही..
मुलं शाळेत गेली त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते. इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसत आहे. शाळेची दुरूस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. इमारत सुस्थितीत आहे, असा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.
विद्येच्या मंदिराची अवस्था इतकी बिकट असेल तर शाळेतल्या इतर कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय… यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी खडतर होईल.. तेव्हा लक्ष द्या…
Source link
by Hansraj Agrawal | Apr 6, 2025 | Trending News
tea seller ticket scam, CST tea vendor scam , tea seller ticket scam,CSmT tea vendor, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चहाविक्रेत्याचा घोटाळा, मुंबई बातम्या, mumbai news, mumbai local news,
Source link
by Hansraj Agrawal | Apr 5, 2025 | Trending News
राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मराठी सक्तीच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी ही मागणी केलीय. राज ठाकरे हे चिथावणी देत असून त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 5, 2025 | Trending News
Ashwini Bidre Murder: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्वीनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज शनिवारी पनवेल येथील सत्र न्यायालयात निकाल जारी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा आरोप अभय कुरुंदकर यांच्यावर आहे. त्याचबरोबर आणखी चार जणांवरही आरोप आहेत. सर्व आरोपी गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या.
अश्विनी बीद्रे या सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी काम करत होत्या. 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या होत्या मात्र नंतर त्या परतल्याच नाहीत. अश्विनी रहस्यमयरित्या घरातून गायब झाल्या होत्या. त्यानंतर 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने त्यांचे पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत 4 ऑक्टोबर 2016 रोजी याचिका दाखल करण्यात आली.
२७ ऑक्टोबर २०१६ ला न्या. ए एस ओकसाहेब आणि ए ए सय्यद साहेब यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. ३१ जानेवारी २०१७ ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर आणि त्याचा मित्र महेश फळणीकर यांनाही अटक करण्यात आली.
अश्विनी बिद्रा बेपत्ता झाल्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2018 ला अश्विनीचा खून झाल्याचं उघडकीस आले. 1 मार्च 2018 खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि 19 मे 2018 ला चार्जशीट दाखल करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर लाकूड कापायच्या मशीनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून दिले होते. मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी वसई खाडी मध्ये शोध मोहीम घेण्यात आली. परंतु कोणतेही पुरावे सापडले नाही. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. आरोपी कुरुंदकरला कोर्टात आणलं असून पनवेल सत्र न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 4, 2025 | Trending News
Valmik Karad: वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्यात येण्याची शक्यता आहे. तशी मागणीच धनंजय देशमुखांनी केलीय. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुखांनी योगेश कदमांसमोर विविध मागण्या मांडल्यात.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारासोबत पोलिसांचं संगनमत आहे, असा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदमांसमोर धनंजय देशमुखांनी तक्रारींचा पाढा वाचला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना कारागृहात विशेष सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना बीडबाहेर हलवण्याची मागणीही करण्यात आली होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणी तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. जर या प्रकरणात कारागृहातील अधिकारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलाय. कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवणार असल्याचं आश्वासन देशमुख कुटुंबीयांना दिलंय.
वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना आता यापुढे राज्यातील वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गृहविभागाच्या या निर्णयानंतर आता वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या कारागृहात हलवलं जाणार आहे. यामुळे त्यांना मिळणाऱ्या कथित व्हीआयपी सुविधांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बीड हत्येतील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट!
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी केलाय. दरम्यान यासंदर्भात देशमुख कुटुंबीयांनी जेल प्रशासनाकडे लेखी तक्रार केलीय. या तक्रारात जेलमधील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबातील सदस्य दादासाहेब खिंडकर यांनी पोलीस प्रशासनातील लोक आरोपींना मदत करत आहेत असा दावा केला. तर जेलमध्ये सर्वांना आरोपींसारखी वागणूक दिली गेली पाहिजे असे म्हटले. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला बीडमध्ये न ठेवता, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग करण्याचे आदेश आहेत. मात्र, कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन केवळ विष्णू चाटेची लातूर जेलमध्ये रवानगी केल्याची तक्रार देशमुख कुटुंबाची आहे. वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्येच ठेवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचारी सुधाकर मुंडेंनी दिली आहे. वाल्मीक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना नियमबाह्य पद्धतीने एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आल्याचाही आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे. बीड हत्येतील आरोपींच्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरुन जितेंद्र आव्हाडांनी देखील टीका केली आहे. छोट्या गुन्ह्यात वाल्मिक कराडची लोकं जेलमध्ये जातात आणि त्याची सेवा करतात असा दावा आव्हाडांनी केलाय. देशमुख कुटुंबीयांनी जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच जेलमधील सीसीटीव्ही देण्याचीही मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य होते का? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
Source link