Maharashtra Day : महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र नव्हे तर….

Maharashtra Day : महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र नव्हे तर….


65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. 1960 मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य स्थापन करण्यात आला. 106 हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला प्राणांची आहुती दिली. अशा पद्धतीने महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालं. आज महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण अभिमान बाळगतो पण महाराष्ट्र हे नाव कसं देण्यात आलं. 

कुठून आलं महाराष्ट्र हे नाव? 

महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्रीय प्राकृती भाषा होती. महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत. ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला.

(हे पण वाचा – शालिवानपासून चालत आलेल्या महाराष्ट्राचा भारावणारा प्रवास 8 मुद्यांमध्ये) 

या भाषेवरुन महाराष्ट्र हे नाव राज्याला देण्यात आलं आहे. तसेच रट्टे नावाचे लोक महाराष्ट्रात होते. त्या रटट्यांचा प्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’ असा देखील उल्लेख इतिहासात सापडतो.  

(हे पण वाचा – Maharashtra Din Wishes in Marathi: सह्याद्रीचा सिंह गर्जतो… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा) 

महाराष्ट्र नावाचा अर्थ काय? 

महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’ हे नाव कसे पडले, याबाबत अनेक मतं आहेत. काही जण म्हणतात की, महाराष्ट्रातील ‘महारठ्ठ’ किंवा ‘मराठा’ या क्षत्रिय वंशावरून हे नाव आले आहे. ‘महारठ्ठ’ म्हणजे ‘महाराज’ किंवा ‘महान राष्ट्र’ असा अर्थ होतो. काही इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञ ‘राष्ट्र’ या शब्दाचा संबंध ‘महान’ किंवा ‘मोठा’ या अर्थाशी जोडतात, तर काही जण ‘महाकांतार’ या शब्दाचा अपभ्रंश म्हणून ‘महाराष्ट्र’ नावाची व्याख्या करतात. 





Source link

1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या

1 मे रोजी बँका बंद असतील की सुरू, शेअर बाजार बंद असणार का? जाणून घ्या


Bank Holiday on May 1: 1 मेच्या दिवशी तुम्ही बँकेचे कोणते काम करण्यासाठी जात असाल तर आत्ताच ही बातमी वाचा. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँक बंद राहणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकानुसार 1 मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, मेमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असणार आहेत. यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि 4 रविवार यांचाही समावेश आहे. RBIच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुट्टीच्या यादीत वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात येतात. 

महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यातही बँका बंद

1 मे रोजी कामगार दिन असल्यामुळं महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरही राज्यात बँका बंद असणार आहेत. बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पटना आणि थिरुअनंतापुरम या राज्यातही बँका बंद असतील. 

1 मेला शेअर बाजारही बंद 

1 मे रोजी BSE आणि NSE देखील बंद असणार आहेत. या दिवशी शेअर बाजाराचे कोणतेही काम होणार नाही. शेअर बाजार बंद असणार आहे.  

30 मे रोजीही बँका बंद

30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बेंगळुरूत बँका बंद असणार होत्या. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं या दिवशी सराफा दुकानात मोठी गर्दी होते. 





Source link

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार

IRCTC ची 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' हेरिटेज टूर; 5 दिवसांचा दौरा अन् किंमत… 'या' दिवशी सुरू होणार


Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: लवकरच महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही रेल्वे टूर सुरू करण्यात येत आहे. आयआरटीसीकडून भारत गौरव ट्रेनअंतर्गंत ही टूर सुरू होणार आहे. या टूरच्या माध्यमातून तुम्ही महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून ही टूर भारत गौरव पर्यटक ट्रेनअंतर्गंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत प्रमुख ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूरची किंमत किती आणि कोणती स्थळे पाहता येणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही टूर मुंबईतील सीएसएमटी येथून सुरू होईल आणि तिथूनच या टूरची सांगता होणार आहे. मात्र प्रवासी दादर, ठाणे येथेही बोर्डिंग करु शकणार आहात. आयआरटीसीकडून या टूरची सविस्तर माहिती समोर आली आहे.

या स्थळांना भेट देऊ शकणार

रायगड किल्लाः स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक स्थळ

पुण्यातील लाल महाल आणि कसबा गणपतीः छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यात गेले. तर, कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता ग्रामदेवता आहे.

शिवनेरी किल्लाः शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला

प्रतापगड किल्लाः सातारा जिल्ह्यात हा किल्ला असून येथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला

पन्हाळा किल्लाः हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. 

कोल्हापूरातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचादेखील या टूर पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ही संपूर्ण यात्रा पाच दिवसांची असून सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. तर, प्रमुख स्थळांमध्ये मुंबई, रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापुर, पन्हाळा या शहरांचा समावेश आहे. 

या टूरमध्ये तीर्थक्षेत्रांचाही समावेश

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 

कोल्हापूरः महालक्ष्मी मंदिराला पौराणिक महत्त्व असून स्थानिक अंबाबाईच्या रुपात पुजतात. 

टूरची किंमत किती?

ही टूर तीन श्रेणींमध्ये असणार आहे. 

इकोनॉमी (स्लीपर क्लास): 13,155 रुपये 
कम्फर्ट (3AC): 19,840 रुपये
सुपीरियर (2AC): 27,365 रुपये

पॅकेजच्या आधारेच AC/Non Ac हॉटेलमध्ये नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. ऑनबॉर्ड आणि ऑफबोर्ड असताना शाकाहरी जेवण देण्यात येणार आहे.





Source link

'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'

'आमच्या फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत,' नितेश राणेंच्या टीकेला योगेश कदमांचं प्रत्युत्तर, 'मला शहाणपणा…'



कोकणातील दोन मंत्री नितेश राणे आणि योगेश कदम आपापसात भिडले आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे. 
 



Source link

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….

'ती येत नाही तोपर्यंत…', इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….


वाल्मिक जोशी, झी मीडिया

Jalgaon Crime News: जळगावात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. प्रेमभंग झाल्याच्या कारणातून विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारातच गळफास घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थी सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटसदेखील या तरुणाने पोस्ट केले होते. जळगाव येथे ही भयंकर घटना घडली आहे. सत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

प्रेमभंगाच्या दुःखातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट जळगावच्या सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सत्तू कोळी असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील एका दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी सत्तू कोळी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटस देखील पोस्ट केले होते.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने स्टेटसदेखील ठेवले होते. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला खाली उतरवू नका आणि माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असा व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्याने महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. सकाळी कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

जळगावात बापाकडून मुलीची हत्या

जन्मदात्या बापानेच मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. त्याच रागातून मुलीच्या बापाने तिच्यासह जावयावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती पाठीत गोळी घुसल्याने गंभीर जखमी झाला आहे, त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मयत 24 वर्षीय तरुणीचे नाव असून अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव असून ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp