Breaking News: 'त्या' 5 लाख 'लाडक्या बहिणीं'ना मे चा हफ्ता मिळालाच नाही; शेकडो कोटी रुपये सरकारकडे पडून
Ladki Bahin Yojana Scheme Updates: मे महिन्याचा हफ्ता येण्यास सुरुवात झालेली असतानाच ही नवीन माहिती समोर आली आहे.
Source link
Ladki Bahin Yojana Scheme Updates: मे महिन्याचा हफ्ता येण्यास सुरुवात झालेली असतानाच ही नवीन माहिती समोर आली आहे.
Source link
ICC CWC League 2, 2023-27
Jun 04, 2025 | Match 75
ICC CWC League 2, 2023-27
|
NED (49.1 ov) 225 |
VS |
NEP 226/5(47.1 ov) |
| Nepal beat Netherlands by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Jun 03, 2025 | Final
Indian Premier League, 2025
|
RCB (20 ov) 190/9 |
VS |
PBKS 184/7(20 ov) |
| Royal Challengers Bengaluru beat Punjab Kings by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
Jun 03, 2025 | 3rd ODI
West Indies in England, 3 ODI Series, 2025
|
WI (40 ov) 251/9 |
VS |
ENG 246/3(29.4 ov) |
| England beat West Indies by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
Mumbai Auto Driver Earning Rahul Rupani: मुंबईमधील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमवतो असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? एवढी कमाई तर अनेक आयटी कंपन्यांमधील डायरेक्टर्स, सीए किंवा सीएस अथवा आयआयटीमधून पास झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही नसते. बरं आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्याही राईड बुकिंग अॅप्लिकेशनवरुन, शेअर मार्केटमधून किंवा रिक्षा चालवून करत नाही तर केवळ एका जागी बसून करतो असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाही. पण हे खरं आहे. हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कॉर्परेट परिसर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसी येथे आहे. हा रिक्षावाला काय करतो ते वाचल्यानंतर तुम्ही खऱोखरच त्याच्या डोकॅलिटीला सलाम कराल यात शंका नाही.
हा रिक्षावाला बीकेसीमधील अमेरिकन काऊन्सिलेटच्या बाहेर उभा असतो. त्याचा बिझनेस मॉडेल अगदी सोपा आहे. तो कोणतंही अॅप्लिकेशन, आर्थिक सहाय्य किंवा इतर कोणतंही तंत्रज्ञान वापरत नाही. काऊन्सिलेटमध्ये येणाऱ्या व्यक्तींचं समान सांभाळण्याचं साधं काम तो करतो. लेन्सकार्टमध्ये प्रोडक्ट लीडर म्हणून काम करणाऱ्या राहुल रुपाणी यांनी स्वत: या रिक्षावाल्याची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लिंक्डइनवर या रिक्षावाल्याच्या बिझनेस मॉडेलची स्टोरी सविस्तरपणे पोस्ट केली आहे. अमेरिकी व्हिसासाठी काऊन्सिलेटमध्ये भेट दिलेल्या रुपाणी यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि हा रिक्षावाला काय काम करतो हे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
“सुरक्षारक्षकांनी मला सांगितलं की मला माझी बॅग काऊन्सिलेटमध्ये नेता येणार नाही. आतमध्ये लॉकर किंवा इतर कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावेळी काय करावं हे मला कळेना. गोंधळून मी फुटपाथवर उभा असताना एका रिक्षाचालकाने मला अगदी सोपा पर्याय सुचवला. “सर बॅग माझ्याकडे द्या. मी ती सुरक्षित ठेवतो. हे माझं रोजचं काम आहे. मी हजार रुपये घेईन” असं रिक्षाचालक मला म्हणाला,” अशी माहिती रुपाणी यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
मात्र नंतर रुपाणी यांना हा रिक्षावाला या माध्यमातून बक्कळ कमाई करत असल्याचं समजलं. हा रिक्षावाला रोज अमेरिकी काऊन्सिलेटबाहेर रिक्षा पार्क करतो आणि येथे येणाऱ्यांना जेव्हा सोबत सामान, बॅग आत नेऊ शकत नाही असं सांगितलं जातं तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावतो. तो प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेतो. दिवसभरात त्याला असे 20 ते 30 ग्राहक सहज मिळतात. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई 20 ते 30 हजार रुपये आहेत. म्हणजेच रिक्षा एका जागी उभी करुन हा रिक्षा चालक महिन्याचे पाच ते आठ लाख रुपये कमवतो.
रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये हा रिक्षावाला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेत असल्याचं म्हटलं आहे. “त्याला एकाच वेळी रिक्षात 30 बॅग ठेवता येणार नाहीत. त्यामुळे तो स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतो. या पोलीस अधिकाऱ्यांना लॉकर सुविधा देण्यात आलेली असते. या बॅग तिथेच ठेवल्या जातात. ही कायदेशीर, सुरक्षित आणि जास्त ताप नसलेली पद्धत आहे. रिक्षा हे केवळ माध्यम आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचं या रिक्षाचालकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असल्याचं रुपाणी यांनी नमूद केलं आहे. “तो एमबीए शिकलेला नाही, त्याचं कोणतं स्टार्टअप नाही केवळ त्याच्याकडे तत्काळ उद्भवणाऱ्या समस्येचं सोल्यूशन आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे.
“अशा गोष्टींबद्दल उद्योगांसंदर्भातील पुस्तकांमध्ये शिकवलं जात नाही. मात्र याबद्दल आधीच शिकवलं असतं तर बरं झालं असतं असं नक्कीच वाटतं. खाऱ्या उद्योजकांला कायम काही प्रस्ताव मांडण्यासाठी मंचाची आवश्यकता असते असं नाही कल्पना असेल तर तुम्हाला पार्किंग लॉटही पुरेसा आहे,” असं रुपाणी यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले.
Source link
मैत्रेय ग्रुप प्रकरणात 29 लाख 87 हजार 422 गुंतवणूकदारांची सुमारे 2500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे
Source link
Beed News : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात… यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत… त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्य ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला. मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं. पण जेव्हा मी सत्य तपासलं, तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या. आपण याबद्दल थोडंस जाणून घेऊया… ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी 2019 पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच. जर कोणत्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची पुर्वपरवानगी घेवुनच तपासणी करून मग गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते अस चित्रा वाघ यांनी सांगितले.
या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे, वेगवेगळ्या वर्षांत झाल्या आहेत. 2019 पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बिड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही.
यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टबर 2024 या कालावधीत बिडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पुर्वीच झालेल्या आहेत. त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे: महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी बीडची ओखळ. या जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, 1 हजार 523 महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.