फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन

फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन


No match is being played.

Mar 31, 2025 | Match 12

Indian Premier League, 2025

MI

(16.2 ov) 116

VS

KKR

121/2(12.5 ov)

Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets
Full Scorecard →

Mar 31, 2025 | Match 12

Indian Premier League, 2025

KKR

(16.2 ov) 116

VS

MI

121/2(12.5 ov)

Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets
Full Scorecard →

Mar 30, 2025 | Match 11

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 182/9

VS

RR

176/6(20 ov)

Rajasthan Royals beat Chennai Super Kings by 6 runs
Full Scorecard →





Source link

फडणवीस मोदींचे वारसदार? राऊतांचं सूचक विधान; स्वत: फडणवीस म्हणाले, '2029 मध्ये…'

फडणवीस मोदींचे वारसदार? राऊतांचं सूचक विधान; स्वत: फडणवीस म्हणाले, '2029 मध्ये…'


Devendra Fadnavis on being Narenra Modi Heir: संघ नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”. 

नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार? संजय राऊतांचं मोठं विधान, ‘सरसंघचालक भागवतांनी त्यांना 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर…’

पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“नरेंद्र मोदी-मोहन भागवत यांच्या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत. नरेंद्र मोदी यांनी 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिना येत असून, देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही संघाची एक भूमिका असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपाच्या अध्यक्षपदी यावी अशी संघाची भूमिका स्पष्ट दिसत आहे”,  असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

‘…तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे’, संजय राऊतांचं मोठं विधान

 

“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,” असंही ते म्हणाले. 

राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका

दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.

राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.





Source link

औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य! जाहीर सभेत पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले

औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य! जाहीर सभेत पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले


Raj Thackeray MNS Gudhi Padwa 2025 :  छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा वाद सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात. विधानसेभतही औरंगजेबच्या कबरीवर चर्चा झाली. मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी प्रथमच जाहीर सभेत औरंगजेबच्या कबरीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुबईच्या  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या  नेमकं काय म्हणाले राज ठाकरे जाणून घेऊया. 

औरंगजेबची कबर आत्ताच का आठवली? चित्रपट पाहून जागे होणारे हे कोणते हिंदू. विकी कौशलला पाहून संभाजीराजे आठवले. अक्षय खन्नाला पाहून औरंजेबची कबर आठवली. संभाजी महाराज, औरंगजेब, औरंजेबाची कबर यावर बोलणाऱ्या वाद घालणाऱ्यांनी आधी इतिहास वाचावा. छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. देशावर केलेला संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा संस्कार आहे. हा एक विचार आहे. त्यांच्या जन्माआधी हिंद प्रांताची काय अवस्था होती.

इतिहासावर कोणीही बडबडत आहे विधानसभेत बोलतात. औरंगजेब गुजरात मध्ये जन्मला आला असं सांगत भडकावून दिलं जात आहे. इतिहासाशी काही संबंध नाही. जातीपातीत भांडण लावत आहे माथी भडकवत आहे. 300-400 वर्षाच्या इतिहासावरुन आज जाती पातीवरुन वाद सुरु आहे. 

शिवाजी महाराज यांचे वडील आदिलशाही,निजाम शाहीर गेले त्यावेळची वेगळी परिस्थिती होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट इतिहासात लिहिलेली नाही आज जातीत भांडतो.  औरंगजेब बादशाह याचे राज्य अफगाणिस्थान ते दक्षिण आणि बंगाल पर्यंत होत. शिवाजी महाराज आग्र्याहून आले.औरंगजेबाचा एक मुलगा पळून आला तेव्हा त्याला संभाजी महाराज यांनी आसरा  दिला. नरहर कुरुंदकर लेखक  म्हणाले मराठे लढाई हरत होते पण तरीही औरंगजेब जिंकत नव्हता.  औरंगजेबाला शिवाजीचा विचार मारायचा होता पण त्याला जमलं नाही.

औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. पण, औरंगजेबची सजवलेली कबर आहे तिथे मोठ्या अक्षरात बोर्ड लावा. तिथे मराठ्यांचा इतिहास लिहा. लहान मुलांच्या शाळेच्या सहली इथे घेऊन जा. मुलांना सांग हाच तो औरंगजेब… यानेच हिंदूंची मंदिरे पाडली, यानेच अत्याचार केला… येणाऱ्या पिढीला औरंगजेबचा क्रूर इतिहास सांगा ही औरंगजेबची कबर दाखवा असे राज ठाकरे म्हणाले. 

अफजल खानाची कबर आहे ती शिवाजी महाराजांना विचारून केली असेल औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 





Source link

Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात

Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात


Myanmar Earthquake : 28 मार्च रोजी म्यानमार येथे मोठा भूकंप झाला, या महाकाय भूकंपामुळे हाहाकार उडाला असून यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 1644 वर पोहोचला आहे. काही संस्थांनी हा मृत्यूचा आकडा 10 हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. म्यानमार सरकारच्या माहितीनुसार तीन हजाराहून अधिक लोक यात जखमी झाले असून 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. म्यानमार येथील भूकंपग्रस्तांना (Myanmar Earthquake) मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु करण्यात आलं असून भारतीय बचाव पथक तेथे दाखल झालं आहे. 

मृतांचा एकदा 10 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता : 

बीबीसीच्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या 1,644 झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास 3,408 लोक यात जखमी आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने म्यानमारमध्ये मृतांची संख्या 10,000 पेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्यानमारमधील भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र मंडाले, बागो, मॅग्वे, उत्तर-पूर्व शान राज्य, सागाइंग आणि नायपीडाव आहेत. तर यंगून-मंडाले महामार्गाचे खूप नुकसान झाले असल्याने मदत कार्यात अडचणीत येत आहेत. 

हेही वाचा : Weather Update : कोकणात यलो अलर्ट, तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता; एप्रिल महिना नेमका कसा?

 

भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा : 

म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा मोहीम सुरु करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त लोकांची मानवतावादी मदत करण्यासाठी ही मोहीम असून या अंतर्गत तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह 15 टन मदत सामग्री भारताकडून यंगूनला पाठवण्यात आली आहे.  भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री जवळपास 40 टन सामग्री घेऊन मदत घेऊन यंगून बंदराच्या दिशेने निघाली आहेत. भारतासह न्यूझीलंडने देखील म्यानमारला दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर चीन आणि रशियानेही  मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. 





Source link

आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल

आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्ंमहत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये सीबीआयने सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, ती आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांत प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी तिला अटकही झाली होती. पण सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने रिया चक्रवर्तीला क्लीन चीट मिळाली असून, तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. यानंतर झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीची माफी मागितली आहे. 

माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल

माध्यमांच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. जवळपास पाच वर्षांनी सुशांत प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चीट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले होते. रियावर मीडिया ट्रायल सुरु होतं, तेव्हा आम्हीही त्याचा भाग होतो. पण आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. इतका मोठेपमा दाखवण्याचं धाडस यापूर्वी कोणत्याही माध्यमाने केललं नाही. पण सुभाष चंद्रा यांच्यासारख्या व्यक्तीने माफी मागणं हे धाडसाचं पाऊल आहे. आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल असा विश्वास आम्हाला वाटत आहे. 

सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“सुशांत सिंह हत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ठोस पुराव्यांअभावी हा रिपोर्ट देण्यात आला असं मी मानतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या संशयाला वाव उरत नाही. त्यामुळेच रियाच्या विरोधात कुणलीही केस उभी राहत नाही. मागे वळून पाहताना मला वाटतं रिया चक्रवर्तीला माध्यमांद्वारे आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी मीडियाच्या काही संपादकांनी आणि पत्रकारांकडून तिला आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी न्यूजचा मार्गदर्शक म्हणून मी त्यांना सल्ला देतो की त्यांनी माफी मागण्याचं धाडस दाखवावं. यात माझा कोणताही सहभाग नसतानाही मी रियाची माफी मागतो. मी एकमुखी रुद्राक्षासारखा आहे. बाहेर आणि आतून समान. खऱ्याला नेहमी खरं म्हणतो,” असं सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी उचललेल्या या पावलाचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावतं, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी स्वागत केलं आहे. “माफी मागितली आहे ती चांगली गोष्ट आहे. यामुळे साक्षात्कार होऊन आणि खासकरुन बेछूटपणे बोलणारी व्यक्ती आहे ज्यांनी यात पुढाकार घेतला होता त्यांनी माफी मागायला हवी. हिंदी चॅनेलने अत्यंत भयानक कव्हरेज केलं होतं. रिया चक्रवर्तीला धक्काबुक्कीही झाली होती. ती इतकी त्रासली होती, की मधमाशांप्रमाणे मीडिया तुटून पडलं होतं. तिच्या भावाला परदेशात शिकायला जाता आलं नाही. तिच्या कुटुंबालाही त्रास झाला. तिचं संपूर्ण करिअर जवळपास उद्ध्वस्त झालं. मीडियाने जर अशाप्रकारे पुढाकार घेतला. अटी-शर्थी न घातला केलं तर चांगलं होईल,” असं मत हेमंत देसाई यांनी मांडलं आहे. 

“मीदेखील सुभाष चंद्रा यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. आपण माध्यमांचे घटक आहोत याची लाज वाटावी अशी स्थिती त्याकाळी होती. मी त्यावेळी सातत्याने यावर वेगवेगळ्या लिहित होते. त्यावेळी मी माध्यमांचं गिधाडीकरण झालं आहे असा शब्द वापरला होता. ज्या वाईट रितीने रियाला टार्गेट करण्यात आलं होतं, ते अस्वस्थ कऱणार होतं. आता 5 वर्षानंतर एका माध्यमाचे प्रमुख आपला थेट सहभाग नसतानाही जाहीर माफी मागतात ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी फार मोठं मन असावं लागतं. माध्यम क्षेत्रात हा अपवाद आहे,” अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी दिली आहे.

“तुम्ही जो काही दगड आकात भिरकावला आहे त्यातून काहीतरी व्हावं अशी आशा आहे. ही एकाची नाही तर सामूहिक जबाबदारी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण त्याला म्हणत असतो. अनेक देशात माध्यमांची स्थिती पाहता, लोकशाही पाठच्या स्थरावर गेली आहे. उजव्या बाजूचं राजकारण तिथे आलं आहे. आपल्या देशात गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी मी त्यावेळी काँग्रेसतर्फे बाजू मांडत होतो. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं होतं हे त्यावेळी दिसत होतं. खऱ्या अर्थाने भाजपाने याचं खालच्या स्तराचं राजकारण केलं. महाविकास आघाडी सरकारला खाली आणणं आणि बिहार निवडणुकीत फायदा व्हावा हादेखील हेतू होता,” असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत,

 





Source link

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट! क्लोजर रिपोर्टवरुन वडिलांच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट! क्लोजर रिपोर्टवरुन वडिलांच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप



Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या क्लोजर रिपोर्टवरुन दिशा सालियन यांच्या वडिलांच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp