'तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून…'

'तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून…'


Uddhav Thackeray Shivsena On CM Devendra Fadnavis: “नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार? खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला

“खोटे नरेटिव्ह निर्माण करायचे व लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजप आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात रिया चक्रवर्ती भरडली गेली. तिच्यावर ठपका ठेवून तुरुंगात ढकलले. आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले व रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली, पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची? येथेही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हे दाखल करणे, याचिका दाखल करणे वगैरे प्रकार केले, पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार भाजप व त्याच्या भाडोत्र्‍यांनी केले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका

“कंगना राणावतसारख्यांना तर मुंबईत राहणे म्हणजे पाकिस्तानात राहण्यासारखे भासत होते. मग आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवर त्यांना काय वाटते? दंगलखोरांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. तसे या ‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका. महाराष्ट्राचे समाजजीवन खतम करण्याचे काम या लोकांनी चालवले आहे. औरंगजेब, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन या मृतांचा बाजार भरवून राजकारण करण्याचा षंढपणा वाढला आहे. मुख्यमंत्री चिंता व्यक्त करतात की, नागपूरच्या दंगलीवरून राजकारण होत आहे? मुख्यमंत्री महोदय, राजकारण नक्की कोण करत आहे आणि दंगलीच्या आगीत तेल कोण टाकत आहे? याचा शोध खरेच घेतला तर सत्य समोर येईल,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

हे कसे चालेल?

“मुख्यमंत्र्यांनी पुढे जाहीर केले की, जे कोणी देशभक्त आहेत त्यांना हात लावला जात असेल तर सहन केले जाणार नाही. जे कोणी कायदा हातात घेतील, पोलिसांवर हात टाकतील त्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका कठोर आहे, पण देशभक्त कोण व देशद्रोही कोण हे ठरवायचे कोणी? औरंग्याची कबर तोडा असे सांगणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. देशभक्तीचे प्रमाणपत्र हेच लोक देणार व दंगलींना प्रोत्साहनही तेच देणार हे कसे चालेल?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

स्वतःच्या कॅबिनेटपासून कारवाई सुरू करावी

“नागपूरचा हिंसाचार ही महाराष्ट्रात मोठ्या दंगली घडवण्याची पूर्वतयारी आहे. लोकांची माथी भडकवणे व हिंसाचार करणे शक्य आहे याची राजकीय चाचपणी नागपुरात झाली. दंगलीचे रॉकेट यशस्वीपणे उडाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘दंगलखोरांना सोडणार नाही,’’ मात्र जे दंगलखोर मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांना, कायद्याला आव्हान देतात, ‘‘मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही हवा तसा धुडगूस घालू, आगी लावू, आमचे कोण काय वाकडे करणार?’’ असे उघडपणे बोलतात त्यांचे काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर मुख्यमंत्री शहाजोगपणे सांगतात की, दंगलखोरांना सोडणार नाही. खरे तर दंगलखोरांना न सोडण्याची कारवाई मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेटपासून सुरू करायला हवी,” असा खोचक सल्ला ठाकरेंच्या सेनेनं दिला आहे.

…मग तुम्ही खुर्च्या उबवताय कशाला?

“धनंजय मुंडे यांच्या लोकांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि दडपशाहीचा उत्पात माजवला व त्यातून खून, खंडण्यांचे गुन्हे वाढले. मुख्यमंत्र्यांना मुंडेंवरील कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर काय दिले? “उगाच हवेत तीर मारू नका. धनंजय मुंडेंविरोधात काही पुरावे असतील तर घेऊन या. कारवाई करतो,’’ असे ते म्हणाले. म्हणजे पोलीस काहीच करणार नाहीत. खून पडल्यावर आवाज जनतेने उठवायचा आणि पुरावेही जनतेनेच गोळा करून द्यायचे. मग तुम्ही खुर्च्या उबवताय कशाला? अदानीसारख्यांची संपत्ती वाढवायला?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

…तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक

“राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे. भ्रष्टाचारावर कारवाई नाही आणि दंगलखोरांवरही कारवाई नाही. सगळाच वरवरचा मामला. राज्याचे मुख्यमंत्री दंगलीचे गुन्हेगार काखेत घेऊन फिरत आहेत आणि पुन्हा सांगत आहेत की, दंगलखोरांवर कारवाई करू. चोर घरातच आहे आणि मालक बाहेर उगाच बोभाटा करीत आहे. दंगली भडकवणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार नसाल तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक आहे,” असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं फडणवीसांना सुनावलं आहे.





Source link

हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या…'

हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या…'



मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते. 
 



Source link

नारायण राणेंना अटकेपासून वाचवण्यासाठी शाहांचा ठाकरेंना फोन? राऊतांचा गौप्यस्फोट!

नारायण राणेंना अटकेपासून वाचवण्यासाठी शाहांचा ठाकरेंना फोन? राऊतांचा गौप्यस्फोट!



Naratyan Rane: सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरुय. 



Source link

महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम! राजस्थान कनेक्शन; सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम! राजस्थान कनेक्शन; सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड



वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणा-याविरोधात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वेबसाईट तयार करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 



Source link

Gold: 'या' राज्यात सापडली भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण! सरकार करणार सोन्याच्या खाणीचा लिलाव

Gold: 'या' राज्यात सापडली भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण! सरकार करणार सोन्याच्या खाणीचा लिलाव


Gold Mines Found In Odisha : भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण ओडिशा राज्यात सापडली आहे. ओडिशा मधील अनेक जिल्ह्यांत सोण्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकार लवकरच या  सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे. ओडिशामध्ये सापडलेल्या या खाणीमुळे देशाची आर्थिक भरभराट होणार आहे. खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत याबाबत बोलताना ओडिशाच्या वाढत्या खनिज संपत्तीवर तसेच संभाव्य आर्थिक फायद्यावर भाष्य केले.

ओडिशामधील सुंदरगड, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापूटमध्ये अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान येथे सोन्याचे मोठे साठे आढळेले आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याचे दिसून आले आहे. 

येथे आणखी सोन्याच्या खाणी शोधल्या जात आहेत. जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत आणि बदामपहार येथे नविन सोन्याचे साठे सापडले आहेत. यापूर्वी देवगडच्या आदासा-रामपल्ली परिसरात तांब्याच्या जी-२ स्तरावरील शोध दरम्यान भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI) ने सोन्याचे साठे आढळून आले.

मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आढळून आल्याने ओडिशा हे देशातील मोठ्या सोन्याच्या खाणी असलेल्या देशांच्या यादीत सामाविष्ट झाले आहे.  केओंझार जिल्ह्यातील गोपूर-गाझीपूर, मानकडचुआन, सालेकाना आणि दिमिरिमुंडा भागातही सोन्याचे साठे शोधले जात आहेत. ओडिशा देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाण ब्लॉकचा लिलाव करण्याची तयारी सुरु आहे. राज्याच्या खनिज क्षेत्रासाठी हे एक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे. 

सोने काढण्याच्या क्षमतेसाठी जीएसआय आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन केओंझारमधील मानकडचुआन, सालेकाना आणि दिमिरिमुंडा येथे संशोधन करत आहेत. व्यावसायिकीकरणाचे प्रयत्न सुरू करण्यापूर्वी तांत्रिक समित्या अंतिम अन्वेषण अहवालांचे पुनरावलोकन करणार आहेत.

मयूरभंजमधील जशीपूर, सुरियागुडा आणि बदामपहार भागात प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे. तर, देवगडमधील जलाधीही भागात जीएसआय तांबे-सोन्याचा शोध घेत आहेत. केओंझार परिसरातील गोपूर-गाझीपूर सोन्याच्या खाणीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यावर लिलाव केला जाणार आहे.  

 





Source link

ग्रामविकास मंत्र्यांकडे 3 कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका; दिला मोठा निर्णय

ग्रामविकास मंत्र्यांकडे 3 कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका; दिला मोठा निर्णय


Jaykumar Gore Extortion Case: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलेला सातारा जिल्हा न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली होती. 

पोलिसांनी काय मुद्दा मांडला?

पोलिसांनी कोठडी मागताना मांडलेले तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठाकरे. यापैकी पहिला मुद्दा ठरला तो या अटक करण्यात आलेल्या माहिलेसोबत इतर कोणी आहे का याचा तपास करायचा असल्याचं सांगण्यात आलं. सहभागी व्यक्तींचा शोध सुरु असल्याने या महिलेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. 

या दोन कारणांसाठीही मागितली कोठडी

पोलिसांनी आपला दुसरा मुद्दा मांडताना आवाजाची पडताळणी करायची असल्याचं सांगितलं. संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने तज्ज्ञांकडून घेऊन तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं न्यायालया सांगण्यात आलं. तसेच तिसरं कारण सांगताना पोलिसांनी, महिलेच्या सह्यांचे नमुने एक्सपर्टकडून तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. ही मागणी मंजूर करत आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलेला अडकवण्यात आल्याचा आरोप

मात्र संशयित महिला आरोपीचे वकील नितीन गोडसे यांनी महिलेवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जाणूनबुजून या महिलेला अडकवण्यासाठी हे सगळं केलं गेले आहे. या महिलेचे आधीचे वकील यांनीच या महिलेला फसवले आहे आणि या महिलेने कुठेही पैशांना हात लावलेला नाही, असं नितीन गोडसे म्हणाले. 

व्हिडीओत पैसे मोजताना दिसली महिला

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेनं खंडणीचं हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली. ही महिला एक कोटी रुपयांची मोजदाद करताना समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक कोटी रूपये घेताना या महिलेला रक्कमेसहीत रंगे हात अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यालाही अटक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. दहिवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अनिल सुभेदार यांना दहिवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp