महाशिवरात्रीनिमित्त अब्दुल सत्तारांचे नागेश्वर दर्शन, तरुणांकडून गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ, 'रोज सकाळी मांसाहार…'

महाशिवरात्रीनिमित्त अब्दुल सत्तारांचे नागेश्वर दर्शन, तरुणांकडून गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ, 'रोज सकाळी मांसाहार…'


Abdul Sattar: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धार्मिक स्थळावर एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रहिमाबाद भागातील नागेश्वर मंदिर हे शिवभक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर येथे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. मात्र, या दिवशी एका व्यक्तीच्या भेटीमुळे काही युवकांनी वाद उकरून काढला. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. सकाळीच त्यांनी हे दर्शन केले.सत्तार यांनी मंदिरात प्रवेश करून पूजा-अर्चना केली. यावेळी ते सामान्य भाविकांसारखे वागले.  पण काही लोकांनी सत्तारांची ही कृती रुचली नाही.  दर्शनानंतर लगेचच काही तरुणांनी सत्तार यांच्या या भेटीवर जोरदार आक्षेप घेतला. अशा व्यक्तीला मंदिरात येण्याची परवानगी देणे चुकीचे असल्याचे तरुणांनी म्हटले.  त्यांनी मंदिराच्या पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. 

आक्षेपाचे मुख्य कारण काय?

‘अब्दुल सत्तार दररोज सकाळी नाश्त्यात मांसाहारी पदार्थ खातात आणि त्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत’, असे युवकांनी सांगितले. त्यामुळे ते अपवित्र असून महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मंदिरात येणे अयोग्य असल्याचे तरुणांनी म्हटले. हे कारण धार्मिक नियम आणि वैयक्तिक सवयींशी संबंधित आहे, ज्यामुळे काही लोकांच्या मनात पूर्वग्रह दिसून येतो. असे आरोप करून युवकांनी सत्तार यांच्या जीवनशैलीवर टीका केली.

गोमुत्राने मंदिर शुद्धीकरण 

या आक्षेपानंतर युवकांनी मंदिरात गोमूत्र फवारून ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास असा की, गोमूत्राने अपवित्रता दूर होते आणि मंदिर पुन्हा पवित्र होते. ही क्रिया पारंपरिक धार्मिक प्रथेनुसार केली गेली, परंतु ती वादग्रस्त ठरली. या घटनेने समाजात धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे शांतता आणि समानतेची गरज अधोरेखित होते.





Source link

ठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड! मुंबई, नाशिकसह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; 33,64,00,00,000 रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

ठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड! मुंबई, नाशिकसह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; 33,64,00,00,000 रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प


Thane Coastal Road Project : मुंबई प्रमाणे ठाण्यातही कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील हा पहिला कोस्टल रोड आहे. यामुळे  घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून हजारो वाहन चालकांची सुटका होणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई, नाशिक सह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे.  33,64,00,00,000 रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बाळकुंभ ते गायमुख दरम्यान 13.45 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ठाणे कोस्टल रोडचे बांधकाम वेगाने सुरू आहे. 3,364 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे.  या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आठ महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले होते. आठ महिन्यांतच प्राधिकरणाने कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे 50 टक्के काम पूर्ण केले आहे. पायाभूत कामानंतर, खांबांवर पिलर कॅप्स आणि आय गर्डर्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

देशातील पहिला ग्रीनफिल्ड रोड 

एमएमआरडीएच्या मते, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोस्टल रोड प्रकल्प आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइल आणि सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देऊन, रस्त्याचा मोठा भाग
उड्डाणपूल म्हणून विकसित केला जाईल.

मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

या कोस्टल रोडवरील एका मार्गिकेवर फक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. गर्दीच्या वेळी घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब रांगा नेहमीच असतात. भिवंडी आणि कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक बाळकुंभजवळ ट्रॅफिक जाममध्ये अडकतात. जर महामार्गावर वाहन बिघाड झाला किंवा अपघात झाला तर अनेक किलोमीटर लांब रांगा लागू शकतात. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल. बाळकुंभ येथून कोस्टल रोडवर थेट प्रवेश शक्य होईल.

कोस्टल रोड महत्वांच्या मार्गांशी जोडणार

एमएमआरडीएने कोस्टल रोडला प्रस्तावित गायमुख-फाउंटन हॉटेल टनेल प्रकल्पाशी जोडण्याची योजना आखली आहे. एकदा हे प्रकल्प जोडले गेले की, वाधवान बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी होईल. याव्यतिरिक्त, कोस्टल रोड ठाणे रिंग मेट्रो आणि साकेत-अमाणे एलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडण्याची योजना आहे.

 





Source link

Mulund Metro Accident: नातीच्या लग्नाच्या मिरवणुकीऐवजी आजोबांची अंत्ययात्रा… कळव्यातील यादव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Mulund Metro Accident: नातीच्या लग्नाच्या मिरवणुकीऐवजी आजोबांची अंत्ययात्रा… कळव्यातील यादव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर


Mulund Accident: कळवा परिसरात एका कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. घर सजवले जात होते, पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि लग्नाच्या तयारीत सगळे व्यस्त होते. आजोबा आपल्या नातीच्या लग्नासाठी विशेष उत्सुक होते. सकाळपासूनच मंडप, जेवणावळ आणि स्वागताच्या तयारीत कुटुंबातील सदस्य गुंतले होते. पण काही तासांतच या आनंदावर दुःखाचे सावट आले. मुलुंडमध्ये अचानक झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर आघात झाला आणि जिथे लग्नाचे मंगलध्वनी घुमायचे होते, तिथे शोककळा पसरली. 

Add Zee News as a Preferred Source

लग्नाच्या तयारीत असताना घडली दुर्घटना
काही कामानिमित्त रामधन यादव हे 2 नातेवाईकांसह स्वतःच्या रिक्षाने मुलुंडच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरू असतानाच भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रामधन यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले दोघे जखमी अवस्थेत वाहनाखाली अडकले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना बाहेर काढले आणि जवळच्या उपासनी रुग्णालयात दाखल केले.

जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार
जखमींपैकी राजकुमार यादव हे रिक्षा चालवत होते, तर रामधन यादव आणि महेंद्र यादव मागील बाजूस बसले होते. राजकुमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तपासणीनंतर रामधन यादव यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे जिचे लग्न ठरले होते ती मुलगी राजकुमार यांचीच भाची असल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबातील आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकात बदलले.

टीव्हीवरील बातमीने नातेवाईकांना धक्का
कुटुंबातील काही सदस्यांना या अपघाताची माहिती प्रथम वृत्तवाहिनीवरून मिळाली. घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर गेल्याचे माहित असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. नंतर पोलिसांनी फोन उचलून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोहोचले.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे बाहेरच नातेवाईकांची गर्दी झाली होती. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर भागातील असून सध्या कळव्यात वास्तव्यास आहे. नातीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेले कुटुंबीय आता अंत्यसंस्काराची तयारी करत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सनई-चौघड्यांचे सूर विरले आणि घरात शोककळा पसरली.





Source link

4 डोंगरांच्या मध्ये दडलेलं गाव, गावात दोन्ही बाजूला पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर, कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

4 डोंगरांच्या मध्ये दडलेलं गाव, गावात दोन्ही बाजूला पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर, कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र


Harihareshwar Temple Konkan :  भारतात एकूण 108 तीर्थस्थाने आहेत. यापैकी अनेक तीर्थक्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत. चार डोंगरांच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले चमत्कारिक शिव मंदिर कोकणात आहे. हे शिव मंदिर कोकणातील हरिहरेश्वरमध्ये आहे. हरिहरेश्वर मंदिर हे  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. “दक्षिणकाशी” म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत आहे. दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही. कोकणातील हे ठिकाण  महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते. 

Add Zee News as a Preferred Source

सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार वसलेलं हरिहरेश्वर हे सुंदर गाव

श्री हरिहरेश्वर मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर समोर, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा अथांग समुद्र. याच समुद्र किनाऱ्याजवळ  श्री हरिहरेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे. राज्याच्या कानापोऱ्यातून भाविक येथे श्री हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी येतात.  सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळेत त्याच संगमवार हरिहरेश्वर हे सुंदर गाव वसलेले आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक मंदिरे आहेत. हरिहरेश्वरच्या दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने आहेत. देशात ऐकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते.

दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले शिवमंदिर

ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या  कुशीत हरिहरेश्वर हे गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे.  श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची मंदिरे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. हे मंदिर शिवकालीन असावे असा अंदाज आहे. बांधकामाच्या निश्चित कालखंडाची कोणतीच नोंद नाही  पहिल्या बाजीरावाने 1723 मध्ये या जोर्नोद्धार केल्याचे सांगितले जाते. देवाच्या दर्शनानंतर प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेले असले तरी कितीही मोठी आपत्ती आली तरी या मंदिराला काहीच होत नाही. 

हरिहरेश्वरला जायचे कसे

हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर तर पुण्याहून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे.  एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने येथे जाता येते. पुण्याहून मिळशी, भोरवरून महाड मार्गे, वाई वरून महाबळेश्वर मार्गे येथे जाता येते. कोकण रेल्वेने गेल्यास  माणगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
 रस्त्याने (By Road)
मुंबईहून अंतर: सुमारे 210 किमी
पुण्याहून अंतर: सुमारे 170 किमी
मुंबई – पनवेल – महाड – माणगाव – श्रीवर्धन – हरिहरेश्वर असा मार्ग घेतला जातो.
गाडीसाठी प्रशस्त रस्ता असून गाडीने 5-6 तासांचा प्रवास होतो.
 रेल्वेने (By Train)
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव (Konkan Railway)
माणगावहून हरिहरेश्वर सुमारे 60 किमी आहे. स्टेशनवरून तुम्ही कॅब, रिक्षा किंवा एसटी बस घेऊ शकता.
 बसने (By Bus)
मुंबई, पुणे, पनवेल, महाड इत्यादी ठिकाणांहून MSRTC (एसटी) किंवा खाजगी बसेस श्रीवर्धनपर्यंत उपलब्ध आहेत.
श्रीवर्धनहून हरिहरेश्वर हे अवघ्या 18-20 किमीवर आहे.
फेरी बोटने (By Ferry Route):
दापोलीहून येताना दाभोळ ते धोपावे फेरीने पार करून पुढे हरिहरेश्वरपर्यंत पोहोचता येते.

 





Source link

भयंकर! रात्री- अपरात्री स्फोट; घरांना तडे अन् नागरिकांचा जीव धोक्यात, राज्यात हे काय सुरूय?

भयंकर! रात्री- अपरात्री स्फोट; घरांना तडे अन् नागरिकांचा जीव धोक्यात, राज्यात हे काय सुरूय?


विशाल मोरे, झी मीडिया, नाशिक : अचानक होणारे स्फोट, घरांना जाणारे तडे आणि शेतीवर होणारे वाईट परिणाम यामुळं सध्या नाशिकच्या मालेगाव इथं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या स्फोटांमुळं सध्या नागरिकांमध्येसुद्धा प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मालेगावात घडतंय काय? 

मालेगाव तालुक्यातील हाताने येथे जवळपास 7 खडी क्रशरचे प्लांट असून त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्री अपरात्री या खडी स्टोन प्लांट मध्ये ब्लास्टिंग होत असून, शिवाय या प्लांटमुळं गावाचा 30 ते 35 लाख रुपयांचा महसूल बुडवला आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं वारंवार प्रकल्पाला नोटिस बजावूनसुद्धा त्यामुळे गावच्या विकासासाठी महसूलाची व्यवस्था झालेली नाही. शिवाय गावात प्रादुर्भाव पण वाढल्याने हे सर्व खडी क्रशर प्लांट बंद करण्याचा ठरावही गावानं केला. मात्र कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

खडी तयार करण्यासाठी केले जातात स्फोट… 

खडी तयार करण्यासाठी या प्लांट मध्ये दिवसा, रात्री अपरात्री मोठी ब्लास्टिंग केली जाते अर्थात स्फोट घडवून आणले जातात. यामुळे लहान मुलं, जनावरंही सतत दचकत असून या स्फोटांमुळं आणि ब्लास्टिंग मुळे गावातील घरांना तडे गेले आहेत. या खडीची वाहतूक मोठमोठ्या डंपरमधून केली जाते, या डंपरना कोणत्याही प्रकारचे कपड्याचे आवरण नसल्याने लहान शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांनासुद्धा ये-जा करण्यासाठी मोठा धोका असून अपघाताची शक्यता असल्यानं भीतीचं वातावरण आहे. 

शेतीवरही होतोय अनिष्ठ परिणाम, काय घडतंय? 

या गावात असणाऱ्या खडी क्रशरच्या प्लांटमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. प्लांटला कुठेही नेट अर्थात जाळीसुद्धा मारली नसल्या कारणाने प्लांट मधील सर्व धूळ पिकावर आल्यानं मका, कांदा, शेवगा आदी पीक घेणं शेतकऱ्यांना आव्हानात्मक होत असून असून काही शेतकऱ्यांना यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजारांचाही सामना करावा लागत आहे.

एकंदरीत स्थिती पाहचा, प्रथमदर्शनी गावच्या विकासासाठी हा प्लांट गावात आला होता. मात्र लाखोंचा महसूल बुडवल्याने गावाचा विकास देखील साधता येत नाही याउलट प्लांटमुळे गावात होणारा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांचं जीवनमान खालावलं आहे, ज्यामुळं तेव्हा हे प्लांट तात्काळ बंद करण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. मात्र आता प्रशासनाकडून गावाच्या हिताचा विचार करत प्रकल्पावर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 





Source link

उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो; महाराष्ट्रात हे चाललंय काय?

उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो; महाराष्ट्रात हे चाललंय काय?



मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp