by Hansraj Agrawal | Jan 6, 2026 | Trending News
Maharashtra Weather News : तापमानाचा आकडा प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांवर पोहोचलेला असतानाच आता मात्र याच तापमानात वाढ होत असून महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि रात्री अतिशय उशिरा जाणवणारा गारठा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी सूर्य डोक्यावर येताच कमाल तापमानाचा सरासरी आकडा 30 अंशांच्या घरात पोहोचत आहे. तर, काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं पावसाची हजेरी असण्याची शक्यता वाढवून जात आहे. ज्यामुळं पुढच्या 24 तासांमध्ये हवामानात हे अतिशय अनपेक्षित, बदल दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Add Zee News as a Preferred Source
का निर्माण झाली आहे हवामानाची ही स्थिती?
देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका सातत्यानं वाढत आहे, तर दक्षिणेकडे मात्र पावसासाठी पूरक स्थिती असल्यानं त्याचे थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानात दिसत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये हवामान विभागानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम प्रामुख्यानं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर होईल असं सांगण्यात येत आहे. तर, राज्यात घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये दाट धुक्याची चादर विरळ होण्यासाठी तुलनेनं अधिक वेळ घेईल, ज्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होताना दिसणार आहे.
विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, अमरावती, गोंदिया तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव इथं पुढील दोन दिवसांत 2 ते 3 अंशांची तापमान घट अपेक्षित असून, दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी दिसून येईल. लक्षद्वीपर आणि मालदीवमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या कृतीस कारणीभूत असेल.
एकाएकी कुठून आला पावसाचा इशारा?
चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम कोकण, सिंधुदुर्गापासून सांगलीपर्यंत होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं इथं वातावरण ढगाळ असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ढगांचा लपंडाव पाहायला मिळेल.
हिमालय क्षेत्रात वाढणार हिमवर्षाव…
पश्चिमी हिमालय क्षेत्रांमध्ये बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मूपासून शिमल्यापर्यंत आणि पंजाबसह हरियाणा, राजस्थानच्या काही भागांर्यंत दाट धुकं पाहायला मिळेल. पर्वतीय भागांमध्ये दरम्यानच्या काळात हिमवर्षाव वाढणार असून, पुढील 7 दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. पाऊस आणि हिमवर्षावामुळं या भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 5, 2026 | Trending News
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Jan 4, 2026 | Trending News
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी पहायला मिळाली. 43 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 4, 2026 | Trending News
वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
…Read More
Source link
by Hansraj Agrawal | Jan 3, 2026 | Trending News
Stray Dogs: अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी शिक्षकांना मुख्य जबाबदार (नोडल अधिकारी) नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार, प्रत्येक शाळेत एका शिक्षकाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या फलकावर लावावे, असे सांगण्यात आले आहे. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे दिल्याचे सांगितले जात आहे, पण त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Add Zee News as a Preferred Source
निर्णयामुळे खळबळ
हा आदेश समोर आल्यानंतर अमरावतीसह आसपासच्या भागात सर्वत्र चर्चा आणि संताप व्यक्त होतोय. शिक्षकांना शिकवण्याऐवजी कुत्र्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. या निर्णयाला शिक्षक संघटना, पालक आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे, कारण यामुळे शिक्षकांचे मुख्य काम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे, दुय्यम होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडूंचा आक्रमक पावित्रा
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना फटकारले आहे. हा आदेश लगेच रद्द करावा, अन्यथा शिक्षणमंत्र्यांच्या घरी भटकी कुत्री सोडून देऊ, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे हा विषय अधिकच चिघळला असून, सरकारवर दबाव वाढला आहे.
यशोमती ठाकूरांकडून टीका
काँग्रेस नेत्यांनी यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. पूर्णवेळ शिक्षकांना कुत्र्यांची देखरेख करण्यास सांगणे आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडणे, हेच सरकारचे शिक्षण धोरण आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षकांचा वेळ आणि ऊर्जा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरली जावी, कुत्र्यांच्या व्यवस्थेसाठी नव्हे, असे त्यांचे मत आहे.
प्रहार आणि काँग्रेसकडूनही विरोध
प्रहार जनशक्ती पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. त्यांनी सरकारला आव्हान दिले असून, हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांच्या या एकजुटीमुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे आणि सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.
राजकारण तापले
या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती शहरात राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलने आणि इशारे दिले आहेत. शिक्षक आणि पालकांच्या रोषामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, हा वादग्रस्त आदेश लवकरच मागे घेतला जाईल, अशी चर्चा आहे. आता सर्वांच्या नजरा या निर्णयाच्या भवितव्याकडे लागल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 29, 2025 | Trending News
What do you think lies in the depths of the Arctic Ocean? Just a lot of very, very cold water, right?
Wrong? There is thriving life, a vibrant ecosystem.
A multinational research team led by UiT The Arctic University of Norway, working as part of the Ocean Census Arctic Deep — EXTREME24 expedition, investigated the depths of a certain point in the ocean, barely 1,200 km from the North Pole. There, at depths of 3,640 m, are tiny mounds of gas hydrates, or iced methane. (Methane rises from below the earth’s crust, meets the cold seawater and crystallises into ice — gas hydrates.) These mounds are called methane seeps.
Below the point in the Arctic (79 degrees North and 3 degrees East) lies a methane hydrate formation called ‘Freya Hydrate Mounds’. The temperatures are very close to zero and, as you can imagine, it is very dark at such depths. There — in such an inhospitable environment — exists a world that we can only imagine.
It’s a world of chemosynthetic creatures — organisms that depend not on sunlight but methane and hydrogen sulphide for food. At the bottom of the food chain are bacteria that ‘eat’ methane (methanotropic). They form dense microbial mats — often white, grey or orange — on hydrate surfaces and seep sediments. These microbes are the primary producers, playing the role of plants on land. Other creatures — such as siboglinid tubeworms, maldanid worms, amphipods and snails — form a food chain, and you do find some fish and eel too.
After documenting this strange world, the researchers stress that this ecosystem must be protected from human activities such as deep-sea mining, so that we do not stale Nature’s infinite variety.
More Like This
Published on December 29, 2025
Source link