'मी उद्या रायगडावर जातोय,' राज ठाकरेंची घोषणा! मनसैनिकांना म्हणाले, 'मार्केट, शाळा, मंदिरं, कॉलेज…'

'मी उद्या रायगडावर जातोय,' राज ठाकरेंची घोषणा! मनसैनिकांना म्हणाले, 'मार्केट, शाळा, मंदिरं, कॉलेज…'


Raj Thackeray Appeal To MNS Workers: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मनसैनिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून हे आवाहन केलं असून आपण उद्या म्हणजेच 9 मार्च 2026 रोजी पक्षाचा 20 वा वर्धापनदिन असल्याने रायगडावर जाऊन सदस्य नोंदणीला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. राज यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात अगदी जसंच्या तसं…

Add Zee News as a Preferred Source

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, 
सस्नेह जय महाराष्ट्र,

आपल्या पक्षाचा उद्या, 9 मार्च 2026 ला 20 वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरु होत आहे. उद्या 9 मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. 

आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. 

सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला 10 मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॉलेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलसं करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत ! 

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. 

तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा…

बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलच! 
स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !

धन्यवाद ! 

आपला नम्र 
राज ठाकरे

आता उद्या राज ठाकरेंसोबत रायगडावर कोणकोणते नेते सोबत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 





Source link

दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांनाच्या मदतीसाठी धावून आला मराठमोळा उद्योजक; 500 जणांना भारतात पाठवले

दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांनाच्या मदतीसाठी धावून आला मराठमोळा उद्योजक; 500 जणांना भारतात पाठवले


IPF MahaHelpline : इराण – इस्त्रालय युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने UAE मधील अमेरिकेच्या लष्करी तळावंर हल्ले केले आहेत. हजारो भारतीय नागरीक दुबईत अडकले आहेत. दुबईत राहणारा एक मराठमोळा उद्योजक दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांनाच्या मदतीसाठी धावून आला आहे. एका मोठ्या ग्रुपच्या माधय्मातून मराठी पर्यटकांना मदत केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी प्रवासी  समुदायाला मदत करण्यासाठी  IPF MahaHelpline ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  सध्या इराण–अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या प्रवासातील अडचणींमुळे  दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन म्हणून सक्रिय करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात 1200 हून अधिक प्रवाशांनी मदत मागितली आहे. दुबई येथून या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल तुळपुळे यांनी ही माहिती दिली.

पाच शहरांमध्ये मदतकार्य

महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरू असलेली IPF MahaHelpline (+971 50 365 4357) ही सेवा दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या 20 हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे २४ तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना हॉटेल मुक्काम वाढविणे, अन्न व औषधे उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे. याशिवाय, स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य पथकही कार्यरत आहे, ज्यामुळे प्रवाशांचे सुरू असलेले उपचार खंडित होऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे.

हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात

हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे.  भारतीय राजदूत आणि कॉन्सुल जनरल यांच्याकडून नियमित माहिती घेतली जात आहे. सर्व अपडेट्स दुबईत अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहचवले जात आहेत.  2 ते 6 मार्च या कालावधीत  दुबईतील विविध विमानतळांवरून तसेच ओमानमधील मस्कत येथून उपलब्ध उड्डाणांद्वारे 500 हून अधिक प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्क साधत आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रसाद पाटील हे हेल्पलाईनचे वाहतूक समन्वयक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फुजैराह आणि मस्कतसारख्या पर्यायी प्रस्थान केंद्रांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच नीलम नांदेडकर आणि श्वेता करंदीकर यांच्या नेतृत्वाखालील प्राधान्य सहाय्य पथक लहान मुले, अर्भके आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना विशेष मदत पुरवत आहे.

हवाई क्षेत्रातील अडथळ्यांमुळे IndiGo, SpiceJet आणि Air India या भारतीय विमान कंपन्यांची अनेक उड्डाणे रद्द झाल्यानंतर, राहुल तुळपुळे (प्रमुख – IPF MahaHelpline) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 400 हून अधिक प्रभावित प्रवाशांची यादी तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री. रवींद्र चव्हाण हे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या मराठी प्रवाशांना मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. त्यानंतर ही यादी कॉन्सुलेटमार्फत संबंधित विमान कंपन्यांना पाठविण्यात आली असून, उपलब्ध आसने आणि उड्डाणांच्या स्लॉटमध्ये या प्रवाशांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर भारतात पनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उड्डाणांची संख्या हळूहळू वाढत असल्याने, पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त प्रवाशांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हेल्पलाईनचे पथक महाराष्ट्र शासन, दुबईतील भारतीय कॉन्सुल जनरल कार्यालय, विमान कंपन्या आणि चार्टर ऑपरेटर्स यांच्यासोबत जवळून काम करत आहे, अशी माहिती राहुल तुळपुळे यांनी दिली. 





Source link

Pune Crime: अर्धनग्नावस्थेत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह, रात्री 11 वाजता घडली कापरे भरवणारी घटना

Pune Crime: अर्धनग्नावस्थेत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह, रात्री 11 वाजता घडली कापरे भरवणारी घटना


Pune Crime News: पुणे शहरात पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. 3 मार्च रोजी उशिरा रात्री घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. काही दिवसांतच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Add Zee News as a Preferred Source

सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना धागेदोरे

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान 29 वर्षीय प्रकाश बिभीषण माने हा संशयाच्या भोवऱ्यात आला. तो एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. फुटेजमध्ये तो काही दिवसांपासून त्या भागात फिरताना आणि संबंधित महिलेवर लक्ष ठेवताना दिसून आला.

याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची चौकशी केली. पुढील तपासात प्रकाश माने याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येऊ लागले.

महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न, त्यानंतर हल्ला

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत महिला दिवेघाटाच्या पायथ्याशी झोपत असे. आरोपीला याची माहिती होती आणि तो काही दिवसांपासून तिच्यावर लक्ष ठेवत होता.

3 मार्च रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी गेला. त्याने महिलेशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि परिस्थिती अचानक बिघडली.

संतापातून घडली भयंकर हत्या

महिलेने विरोध करत आरडाओरडा सुरू केल्याने आरोपी संतापला. आसपासच्या लोकांना आवाज जाऊ नये म्हणून त्याने तिच्यावर हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारल्याचा तसेच गळा आवळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दुसऱ्या दिवशी परिसरात मृतदेह आढळताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

मृत महिलेची ओळख अद्याप अज्ञात

या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी प्रकाश बिभीषण माने याला अटक केली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत महिलेची कोणतीच ओळख अद्याप पटलेली नाही.

हे ही वाचा: नाशिकमध्ये तरुणाची फसवणूक, परदेशात नोकरी लावून देतो म्हणत तब्बल 5 लाख 43 हजारांचा गंडा

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 6 चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी सुरू आहे. तसेच मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत.





Source link

पुणे मेट्रोमध्ये 8 मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा

पुणे मेट्रोमध्ये 8 मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा



Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने महिला आणि वृद्धांची मोठी सुविधा होणार आहे. वृद्ध आणि महिलांसाठी प्रत्येक कोचमध्ये विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. 
 



Source link

इराण-इस्रायल युद्धाचा फळ निर्यातदारांना फटका! 400 टनपेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून

इराण-इस्रायल युद्धाचा फळ निर्यातदारांना फटका! 400 टनपेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून



इराणनं आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार चांगलाच अडचणीत सापडलाय.. कारण युद्धामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाल्यामुळे शेकडो टन शेतीमाल तसाच पडून आहे.



Source link

महिलेनं पतीच्या साथीनं प्रियकराला संपवलं; नागपुरात दिवसाढवळ्या घडली रक्तरंजित घटना

महिलेनं पतीच्या साथीनं प्रियकराला संपवलं; नागपुरात दिवसाढवळ्या घडली रक्तरंजित घटना


Sayali Patil

सायली पाटील या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रांसाठी काम केलं. ‘लोकसत्ता’मधील ‘VIVA’ या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी ‘एबीपी माझा’ च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

…Read More





Source link

YouTube
Instagram
WhatsApp