महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये मोठा वाद; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका



रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत राजकीय भडका उडाला आहे. सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले वादाचा नवा अंक समोर आलाय. तटकरे यांनी उलटीगिनती सुरू झाली, असा थेट इशारा गोगावले यांनी दिलाय. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांचा नवा सामना सुरू झालाय. रायगडमध्ये नेमकं काय घडतंय,



Source link

…म्हणून शिंदे दिल्लीवाऱ्या करतात! UBT चा खळबळजनक दावा; 'PM मोदी, गृहमंत्री शहांची भेट घेऊन…'

…म्हणून शिंदे दिल्लीवाऱ्या करतात! UBT चा खळबळजनक दावा; 'PM मोदी, गृहमंत्री शहांची भेट घेऊन…'


Uddhav Thackeray Shivsena On Why Eknath Shinde Visits Delhi: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये अनेकदा नाराजीनाट्यच सुरु असते असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून केलेल्या या टीकेत मुख्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’ असा करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता सतत एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी का जातात याबद्दलही या लेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर

“गेल्या आठवड्यात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभाग यांनी एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढले होते. त्यावरूनही फडणवीस-मिंधे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता,” असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णयांवरुन समन्वय नसल्याकडे लक्ष वेधलं आहे. “सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते (एकनाथ शिंदे) स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’च आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो,” असा खोचक टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गाव

एकनाथ शिंदेंवर टीका करताना, “आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले. ते म्हणे थेट श्रीनगरला जाऊन बसले आहेत. श्रीनगरात ते कशासाठी गेले? एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघोरी पूजेसाठी आसाम-गुवाहाटीला जायला हवे होते. नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गावी जायला हवे होते, पण नाराज मिंधे गेले थेट श्रीनगरात. तेथे त्यांनी एका पडेल पहेलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीसह पार पाडला. उपमुख्यमंत्री असलेल्या मिध्यांकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातली मलईदार खाती आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम. त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे. 

…म्हणून शिंदे सतत दिल्लीला मोदी-शाहांना भेटायला जातात

एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत, “इथे मलिदा-मलई गोळा करायची व दिल्ली, श्रीनगर, दरे गाठायचे हाच यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या आहे. म्हणजे एकंदरीत असे की, मुख्यमंत्री फडणवीस हे मिंध्यांना असे धक्के देत असतात की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वगैरे वाचला होता. त्यांनी म्हणे पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्तीही एक प्रतीक म्हणून भेट दिली. मिंधे यांचे हे असे अधूनमधून ‘कैलास पर्वता’वर जाणे आणि तेथे आपल्या ‘नाराजीच्या जटा’ आपटणे हे काही जनतेला नवीन राहिलेले नाही,” असं लेख म्हटलं आहे.

कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी

“महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे. सत्ताधारीही नाराज आणि जनतादेखील. सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवीत आहेत, तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहेत,” असं म्हणत लेख संपवला आहे.

FAQ

1. ‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे-फडणवीस सरकारवर कोणता प्रमुख आरोप आहे?
उत्तर: सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि कुरघोड्यांचे नाट्य सुरू आहे. सरकार जनहिताची कामे करत नसून, सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि कुरबुरींमध्ये त्यांचा वेळ खर्च होतो, असा आरोप आहे.

2. एकनाथ शिंदे यांच्याबाबत अग्रलेखात काय म्हटले आहे?
उत्तर: एकनाथ शिंदे यांना सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ‘स्वयंघोषित ब्रँड अम्बेसेडर’ संबोधले आहे. त्यांना वारंवार नाराजीची ‘उचकी’ लागते आणि ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून श्रीनगरला रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यांच्याकडे मलईदार खाती (नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते) असूनही त्यात लक्ष नसल्याचा आरोप आहे.

3. एकनाथ शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्यावर अग्रलेखात काय टिप्पणी आहे?
उत्तर: शिंदे यांनी नाराजीमुळे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून श्रीनगरला रक्तदानाचा कार्यक्रम केला. त्यांनी कामाख्या मंदिर (आसाम) किंवा साताऱ्यातील ‘दरे’ गावी जाणे अपेक्षित होते, पण श्रीनगर निवडल्याबद्दल खोचक टिप्पणी आहे.

4. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत काय उल्लेख आहे?
उत्तर: शिंदे सतत दिल्लीला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना भेटून फडणवीसांविरोधात नाराजीचा पाढा वाचतात. गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्ती भेट दिली आणि ‘नाराजीच्या जटा’ आपटल्याचे लेखात म्हटले आहे.

 





Source link

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल पवार यांना 13 दिवसानंतर अटक; दादा भुसेंचे जावई

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल पवार यांना 13 दिवसानंतर अटक; दादा भुसेंचे जावई



वसई-विरारच्या माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवारांना अटक करण्यात आली आहे. अनिल पवारांसह चार जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पवारांना अटक झाली आहे. 



Source link

'आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू…'; कुत्री, कबुतर पॉलिटिक्सवरुन ठाकरेंच्या सेनेचा संताप

'आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू…'; कुत्री, कबुतर पॉलिटिक्सवरुन ठाकरेंच्या सेनेचा संताप


UBT On Supreme Court Verdict: “भारत देशात भूक, असंख्य आजार, कर्जबाजारीपणा यामुळे माणसे मरत आहेत किंवा आत्महत्या करत आहेत, पण काही लोकांना या मरणाऱ्या बांधवांची चिंता नाही. त्यांना भूतदयेची उबळ येते व कबुतरे, भटकी कुत्री, मांजरी यांच्या जगण्याची, खाण्याची चिंता अस्वस्थ करते. कबुतरे आणि भटकी कुत्री यावरून मुंबई, दिल्लीत काही लोकांनी रान उठवले आहे. मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये दाणे टाकू नयेत असे आधी उच्च न्यायालयाने व आता सर्वोच्च न्यायालयानेही बजावले तरी भूतदयावादी ऐकायला तयार नाहीत,” असा खोचक टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला तो काय त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून?

“दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना कोणीही भूतदया दाखवू नये. या कुत्र्यांना मानवी वस्त्यांपासून लांब शेल्टर होममध्ये नेऊन टाका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भारतातील सर्वच शहरांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री अंगावर धावून जातात, चावतात. अनेकदा लचके तोडतात. लहान मुलांवर भयंकर हल्ला करतात. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी तर अशा कुत्र्यांची दहशत घेतली आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत दोन कोटींवर लोकांना कुत्रा चावला. त्यात हजारावर लोक मरण पावले. काहींना कायमचे अपंगत्व आले. हे चित्र चांगले नाही. मुंबईत सध्या कबुतरे विरुद्ध माणसांचा हा असाच संघर्ष सुरू आहे. शूर महाराष्ट्राला आपले प्राण वाचवण्यासाठी कबुतरांशी लढावे लागत आहे आणि एक समाज त्या कबुतरांच्या बाजूने नुसता उभा नाही, तर “प्रसंगी कबुतरांना दाणे घालण्यासाठी हाती शस्त्र घेऊन संघर्ष करू” वगैरे भाषा त्या समाजाचे धर्मगुरू वापरत आहेत. कबुतरांना दाणे घालण्यावरून मीरा-भाईंदर, मुंबईत दंगली झाल्या. कबुतरे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत व त्यांना दाणे टाकू नयेत, कबुतरखाने बंद करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला तो काय त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

धर्म आणि श्रद्धेची भावना किती?

“मुळात मुंबईत बैलघोडा इस्पितळ पारश्यांनी सुरू केले व कबुतरांना एकाच ठिकाणी येऊन खाता यावे यासाठी जागादेखील पारश्यांनीच दिल्या. त्यामुळे कबुतरांच्या भूतदयेबाबत एखाद्या समाजाचीच भूमिका असू शकत नाही. तेव्हा मुंबईची वस्ती विरळ होती. कबुतरांची संख्या कमी होती. कबुतरांनाही शिस्त होती. त्यामुळे चालून गेले. आता कबुतरांची लाळ, विष्ठा, पिसे यामुळे अनेक आजार होतात. कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात राहणे हे फुप्फुसाच्या आरोग्यास हानिकारक आहे. कबुतरांमुळे लहान मुलांना गंभीर आजार होत आहेत व डॉ. सुजित राजन यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती उच्च न्यायालयास दिली. साठ वर्षांवरील वृद्ध, लहान मुले, महिलांमध्ये फुप्फुसाचे आजार वाढत आहेत. त्यास कबुतरांपासून होणारा संसर्ग कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील दाट मानवी वस्त्यांतील कबुतरखाने हलवावेत असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे पडले व न्यायालयाने ते स्वीकारले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन पालिका प्रशासनाने केले. कबुतरांना दाणे टाकल्याने भूतदयेचे पुण्य प्राप्त होते, अशी भूमिका जैन धर्मीयांनी घेतली. यात खरोखरच धर्म आणि श्रद्धेची भावना किती?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

प्राण्यांवर दया दाखवणारे माणसांचे जीवन कस्पटासमान समजतात

“दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले. कुत्रा आणि हिंदू धर्मातील अनेक पंथांचे नाते आहेच. म्हणून “कुत्र्यांना पकडाल तर हाती शस्त्र घेऊ” वगैरे भाषा येथील नवहिंदुत्ववाद्यांनी केल्याचे दिसत नाही. श्री दत्तगुरूंच्या पायांशी श्वान म्हणजे कुत्रा आहेच, पण शिवाचा अवतार असलेल्या काळभैरवाचे वाहनसुद्धा कुत्रा आहे. काळभैरवाच्या या वाहनाविषयी हिंदू धर्मात मान्यता आहे. काळभैरवाच्या पूजेत काळ्या कुत्र्यास विशेष महत्त्व आहे. कुत्रा हाच काळभैरवाचा घोडा आहे असे सांगतात. तसे कोठे कबुतरांविषयी सांगितले आहे काय?” असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. “पूर्वीच्या काळी कबुतरे पोस्टमनचे काम करीत. आता तसे नाही. त्यामुळे कबुतरे, कुत्रे यांच्यावरून सुरू झालेली भांडणे निरर्थक आहेत. प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’सारख्या संस्था आहेत. मनेका गांधी यांना देशभरातील भटकी कुत्री व हैदोस घालणाऱ्या माकडांची चिंता लागून राहिलेली आहे, पण दिल्लीत माकडे माणसांवर हल्ले करतात. माकडांचा चावादेखील जीवघेणा ठरतो. याचे कारण कबुतरे, माकडे, भटकी कुत्री यांच्याबाबत दया दाखवणारे माणसांचे जीवन कस्पटासमान समजतात. माणसांना चांगले जीवन जगता येत नाही. माणूस भुकेकंगाल, निकम्मा बनला आहे, मोदींच्या पाच-दहा किलो फुकट रेशनपाण्यावर भिकाऱ्यासारखा जगतोय,” असा उल्लेख लेखात आहे.

हजारो लोक वर्षाला कुत्र्या-मांजरांसारखे चिरडून मारले जातात त्याचे…

“रस्त्यावर आणि रेल्वे अपघातांत हजारो लोक वर्षाला कुत्र्या-मांजरांसारखे चिरडून मारले जातात त्याचे दुख ना सरकारला ना या भूतदयावाद्यांना. ‘माणसे मरोत, कुत्री-कबुतरे जगोत’ हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली विकृती आहे. कबुतरांच्या खाण्यासाठी एक समाज हाती शस्त्र घेण्याची भाषा करतो. भगवान महावीरांच्या विचारात हिंसेला, अशा बेभानपणाला स्थान नाही आणि चावणाऱ्या कुत्र्यांनाही सरकारचे पाच किलो धान्य द्या, असे हिंदू धर्मात सांगितले नाही. तरीही आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार सुरूच आहे.

FAQ

सर्वोच्च न्यायालयाने कबुतरांबाबत कोणता आदेश दिला आहे?
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आणि कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामागचे कारण म्हणजे कबुतरांची लाळ, विष्ठा आणि पिसे यामुळे फुप्फुसांचे आजार, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये, वाढत आहेत.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे?
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना मानवी वस्त्यांपासून दूर शेल्टर होम्समध्ये हलवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, कारण त्यांचा वावर वाढल्याने चाव्याच्या घटना आणि रेबीजमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

कबुतरांमुळे कोणते आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात?
कबुतरांची लाळ, विष्ठा आणि पिसे यामुळे फुप्फुसांचे गंभीर आजार होतात. डॉ. सुजित राजन यांच्या प्रत sworn affidavit नुसार, यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांमध्ये संसर्गजन्य आजार वाढत आहेत.

भटक्या कुत्र्यांमुळे कोणत्या समस्या उद्भवतात?
भटक्या कुत्र्यांचे हल्ले, विशेषतः लहान मुलांवर आणि सकाळच्या फिरस्तीला जाणाऱ्यांवर, वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत दोन कोटींहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावले असून, हजारो लोकांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

शिवसेनेची या निर्णयांवर काय भूमिका आहे?
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून या निर्णयांचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कबुतरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे मानवी आरोग्याला धोका आहे, आणि यावरून धार्मिक भावना भडकवणे चुकीचे आहे. मानवी जीवनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.





Source link

विठ्ठलाचं नामस्मरण, हसत-खेळत भगिनी दर्शनासाठी निघाल्या; कुंडेश्वर अपघाताचा शेवटचा व्हिडिओ समोर

विठ्ठलाचं नामस्मरण, हसत-खेळत भगिनी दर्शनासाठी निघाल्या; कुंडेश्वर अपघाताचा शेवटचा व्हिडिओ समोर


Kundeshwar Temple Tragedy:  पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या महिला भाविकांचा अपघाती मृत्य झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 10 महिलांनी जीव गमावला आहे तर 21 महिला जखमी असल्याचे सांगितले जातेय. या घटनेनंतर अपघाताला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर, या प्रकरणातील चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या 40 महिला भाविकांच्या पिकअप गाडीचा घाटाच्या मध्यावर अपघात होऊन 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय,तर 29 महिला भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेनंतर या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

कुंडेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचे झाल्यानंतर या परिसरात झालेल्या विकास कामांमधील रस्ते खड्डेमय झाले घाट तयार करताना तांत्रिक बाबी न तपासल्याने घाटाचा भाग मोठा झाला अशातच भाविकांनी घेऊन जाणारे पिकअप गाडी घाटाचा चढ चढण्याऐवजी माघारी रिटन परत खाली आली, आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली, महत्त्वाचं म्हणजे ही गाडी ओव्हरलोड असल्याची माहिती स्थानिक नागरिक सांगत असून या अपघातानंतर चालकावरती ही सदोष मनुष्यवधाचा चा गुन्हा म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल झालाय, 

या अपघाताला जबाबदार कोण याची चौकशी व्हायला हवी अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आलीये. हृषीकेश करंडे असं त्याचं नाव आहे. हृषीकेशवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विठ्ठलाचे नामस्मरण अन् भक्तिभाव…

कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या अपघाताआधीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत गाणी म्हणत, हसत-खेळत भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास क्षणात शोकांतिका ठरला. विठ्ठलाचे नामस्मरण करत निघालेल्या महिलांवर काळाचा घाला घातला. 

या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. तर, अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच, जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 





Source link

जैन समाजाने घेतला मोठा निर्णय; कबूतरखाण्या संबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल पण…

जैन समाजाने घेतला मोठा निर्णय; कबूतरखाण्या संबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल पण…



13 आगस्ट रोजी मुंबई येथे जैन समाजाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. 



Source link