'आमच्या केवळ भाषणात…', बाबासाहेबांचा उल्लेख टाळल्याने झालेल्या वादावर गिरीश महाजनांची पोस्ट, जिल्ह्यात महिला अधिकाऱ्याची चर्चा

'आमच्या केवळ भाषणात…', बाबासाहेबांचा उल्लेख टाळल्याने झालेल्या वादावर गिरीश महाजनांची पोस्ट, जिल्ह्यात महिला अधिकाऱ्याची चर्चा


Girish Maharaj Social Media Post after row over not taking Dr Babasaheb Ambedkar Name: गिरीश महाजनांनी प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन सोहळ्यात बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळल्यानं एका महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. या वनकर्मचा-याच्या आंदोलनानं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंबेडकरी संघटनांनीही या प्रकरणात आंदोलनाची भूमिका घेतलीय. तर दुसरीकडं गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला. 

Add Zee News as a Preferred Source

गिरीश महाजनांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग 40 वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे,” असं सांगत गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही जोडली आहे.

नेमकं काय झालं होतं? 

नाशिकमधील शासकीय ध्वजवंदन गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप करत माधवी जाधव या महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा पालकमंत्र्यांनी नामोल्लेख कसा टाळला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. वर्दीतल्या महिला कर्मचा-यानं केलेल्या घोषणाबाजीनं एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्याला निलंबित केलं तरी पर्वा नाही पण बाबासाहेबांचा उल्लेख टाळणं सहन केलं जाणार नाही अशी भूमिका माधवी जाधव यांनी घेतली होती.

गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला नसल्याचा मुद्दा लगेचच तापला. नाशिकमधील भीम सैनिकांनी गिरीश महाजनांविरोधात आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या माफीनाम्याचीही मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही गिरीश महाजनांवर टीकास्त्र सोडलं.

गुन्हा दाखल करा नाहीतर उपोषण करणार असा इशारा माधवी जाधव यांनी दिला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संविधानाला मानणारे लोकं नाहीत अशी टीकी केली. तर वंचितचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनी महाजन यांची ही मानसिकता असल्याची टीका केली. 

गिरीश महाजनांची दिलगिरी

माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीची चर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती. जेव्हा गिरीश महाजन यांना माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीबाबत विचारलं असता, त्यांनी भाषणाच चुकून बाबासाहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

शासकीय कर्मचारी तीही महिला अशा प्रकारचं धाडस करताना दिसत नाही. पण बाबासाहेबांचा उल्लेख भाषणात नसल्यानं थेट मंत्र्यांना जाहीर सवाल विचारण्याची हिंमत माधवी जाधव यांनी केलीय. माधवी जाधव यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा वनविभागासह शासकीय कर्मचा-यांमध्येही होती.





Source link

Eco-friendly semiconductors

Eco-friendly semiconductors


A newly discovered semiconductor property of a known self-assembling bacterial shell protein could pave the way for safe, environmentally friendly electronics — from mobile phones and smart watches to medical instruments and environmental sensors.

Traditional semiconductor materials, such as silicon, are rigid, require high-energy processing and contribute to the growing problem of electronic waste. Thus, there is increasing demand for sustainable, soft and biocompatible electronics (wearables, implantables and green sensors).

A team of scientists from the Institute of Nano Science and Technology (INST), Mohali, explored whether self-assembling bacterial shell proteins — which naturally form stable, large, flat, 2D sheets with built-in electron density patterns and aromatic residues — could be intrinsically photoactive.

Led by Dr Sharmistha Sinha, the researchers Silky Bedi and SM Rose found that when the proteins form flat, sheet-like films they absorb ultraviolet light and generate an electrical current without any added dyes, metals or external power, and act as light-driven, scaffold-free semiconductors, much like the materials used in electronic circuits and sensors.

The team discovered that the proteins naturally arrange themselves into thin, sheet-like structures. When UV light shines on them, tiny electrical charges begin to move across the protein surface. This happens because the proteins contain tyrosine, a natural amino acid that can release electrons when excited by light. “As these electrons and protons move, the protein sheet produces an electrical signal — similar to how a miniature solar cell would operate. This light-driven effect relies on the protein’s internal order and does not require any synthetic additives or high-temperature manufacturing,” says a press release.

Bots mimic microorganisms

Researchers from IIT-Bombay and IIT-Mandi have demonstrated, using a minimalist robotic model, that the complex swimming behaviour of single-celled organisms can emerge from simple physical interactions. Their study, published in Physical Review Letters, shows that the characteristic “run-and-tumble” motion seen in microorganisms such as the alga Chlamydomonas reinhardtii can be replicated at a macroscopic scale without invoking biological or hydrodynamic complexity.

In nature, Chlamydomonas swims through the synchronised beating of two flagella, producing straight “runs”, punctuated by sudden “tumbles” when the flagella fall out of phase and reorient the cell. The team used two self-propelled robots, mechanically coupled by a rigid rod, to mimic the distal fibre that connects the bases of the flagella. By varying the attachment angle and offset of the connecting rod, the researchers captured the essential mechanical ingredients behind run-and-tumble dynamics.

To emulate the physical world of microorganisms, where friction dominates and inertia is negligible, the robots were made to move on a high-friction surface, reproducing over-damped active Brownian motion. The coupled robots spontaneously exhibited long, straight runs interrupted by sharp, often 180-degree tumbles.

Theoretical analysis showed that the run state corresponds to stable configurations of the coupled system, while tumbles arise from spontaneous misalignment of the robots’ self-propulsion forces, generating torque through the connecting rod. Importantly, it shows hydrodynamic interactions are not essential for run-and-tumble motion; mechanical coupling alone is sufficient. The study has implications in designing simple, autonomous micro-scale machines.

More Like This

Published on January 26, 2026



Source link

बाजारात एकाच कंपनीचा धुमाकूळ, 5 दिवसांत केली ₹12000Cr ची कमाई!, गुंतवणूकदार मालामाल, RIL-TCS सह सर्वांना टाकलं मागे

बाजारात एकाच कंपनीचा धुमाकूळ, 5 दिवसांत केली ₹12000Cr ची कमाई!, गुंतवणूकदार मालामाल, RIL-TCS सह सर्वांना टाकलं मागे



शेअर बाजारात गेल्या आठवड्यात, सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. तथापि, फक्त एकाच कंपनीने आपली ताकद दाखवून दिली आणि केवळ पाच दिवसांत गुंतवणूकदारांना 12 हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले.
 



Source link

रविवारचा दिवस थंडीचा, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि 'इथं' मात्र उकाड्याचा… सुट्टीचे बेत फसणार? हवामान विभागाचा इशारा पाहाच…

रविवारचा दिवस थंडीचा, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि 'इथं' मात्र उकाड्याचा… सुट्टीचे बेत फसणार? हवामान विभागाचा इशारा पाहाच…


Maharashtra Weather News : हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींमुळं देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट होत असून ही घट प्रामुख्यानं उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये लक्षणीयरित्या दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागांमध्ये हिमवर्षाव सुरू असतानाच इथं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानात चढ- उतार नोंदवले जात आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार देशात पुढच्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण वाढणार असून, मध्य आणि दक्षिण भारतासह पूर्वोत्तर भारतामध्ये ही स्थिती पाहायला मिळेल. महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणात प्रामुख्यानं हवामान दमट राहणार असून आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, घाटमाथ्यावर पहाटेच्या वेळी धुकं आणि दवबिंदू अद्यापही गारठा कायम असेल असाच इशारा वर्तवत आहेत. सरासरी तापमानाच्या बाबतीत पुढील 24 तासांमध्ये काहीशी वाढ नोंदवली जाणार असून, यामुळं थंडीचं राज्यातील प्रमाण असमान असेल असा इशारा आहे. सागरी किनारपट्टी भागांमध्ये सूर्य मावळतीला गेल्यानंतर सोसाट्याचे आणि काहीसे थंड वारे वाहतील ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यात हवा कोरडी राहील. तर, सोलापूर, सातारा (पाचगणी, वाई) इथं पुढचे 24 तास गारठा कायम असेल. सध्या मध्यप्रदेशातील उत्तर पश्चिमेस चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळं बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 30 किमी वेगानं आर्द्र वारे वाहत आहेत. ज्यामुळं मागील काही दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरणाचं वर्चस्व राज्यात पाहायला मिळत आहे. 

देशातील हवामानाची स्थिती आणि महाराष्ट्रावर होणारा परिणाम

केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील 5 राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार असून, त्यामुळं तापमानात आणखी घट होणार आहे. तर, पूर्व भारतातसुद्धा हवामान बिघडू शकतं. पश्चिमी झंझावात उत्तर भारतातील अनेक राज्यांवर परिणाम करत असून, काही राज्यांत लक्षणीय तापमान घट नोंदवली जाणार आहे. 26, 27 आणि 28 जानेवारी या दिवसांमध्ये एक नवा झंझावात उत्तर भारताच्या दिशेनं येत असून स्तायेच परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसून येईल. 

जम्मू आणि हिमाचलच्या मैदानी भागांमध्ये पावसाचा इशारा इसून, वाऱ्याचा वेगही अधिक राहणार आहे. तर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अनपेक्षितपणे काही मैदानी भागांमध्येही हिमवर्षाव होणार असल्यानं इथं पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 





Source link

महाराष्ट्रात सोनं चांदीच्या किंमतीत भयानक दरवाढ! आजपर्यंत सगळे विक्रम मोडले, सोनं चांदीच्या अचानक किंमती वाढण्याचे कारण जाणून शॉक व्हाल

महाराष्ट्रात सोनं चांदीच्या किंमतीत भयानक दरवाढ! आजपर्यंत सगळे विक्रम मोडले, सोनं चांदीच्या अचानक किंमती वाढण्याचे कारण जाणून शॉक व्हाल



जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार  800 रुपये वर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 50 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. 



Source link

शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा, महापालिकेनंतर झेडपीमध्येही…; 'कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला!

शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा, महापालिकेनंतर झेडपीमध्येही…; 'कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला!


Shivsena GharaneShahi: लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका,बहुतांश नेत्यांना आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा असते. ती नाही मिळाली की सुरु होते नेत्यांची नाराजी.त्यामुळे पक्ष सुद्धा सढळ हस्ते नेत्यांच्या घरात उमेदवाऱ्या देतो.पण आता नेते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करतायत. शिंदेंच्या शिवेसनेमध्ये तर याची अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

विधानसभा लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी कार्यकर्ते राबराब राबतात.नेत्यासाठी, पक्षासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात.पालिका, जिल्हा परिषद , पंयायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. कारण इथे तरी सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुक प्रक्रियेचा भाग होता येतं, प्रतिनिधीत्व घेता येतं आणि जनतेचा कौल मिळाला तर सत्तेतही सहभागी होता येतं. पण राजकारण्यांची नेत्यांची भूक आता इतकी वाढलीये की इथे सुद्धा ते कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातल्या सदस्यांना पुढे करतायत. कुणी भावा बहिणीला पुढे करतं, कुणी मुला मुलींना, कुणी आई किंवा बायकोला. पण उमेदवारी आपल्याच घरात कशी राहिल याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही हेच चित्र दिसतंय.. घराणेशाही सर्वच पक्षांमध्ये आहे पण शिंदेंच्या शिवसेनेतच याचा विशेष बोलबाला आहे.

शिवसेनेतली ‘घराणेशाही’

अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत.दुसरा मुलगा आमेर यांना जिल्हा परिषद उमेदवारी

खासदार संदिपान भुमरेंचे चिरंजीव विलास भामरे आमदार,पुतण्या शिवराज भुमरेंना जिल्हा परिषदेत उमेदवारी

धाराशिवच्या रविंद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण सध्या उमरग्याचे नगराध्यक्ष तर पत्नी उषा यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आली

माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीला पंचायत समितीची उमेदवारी

तानाजी सावंतांचा पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी

संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत उमेदवारी

अर्जुन खोतकरांच्या मुलीलाही जालना महापालिकेत उमेदवारी

आमदार बालाजी कल्याणकरांचे चिरंजीव सुहास यांना नांदेड महापालिकेची उमेदवारी

नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंच्या मुलाला महापालिकेत उमेदवारी

आमदार संतोष बांगर यांच्या भावजय हिंगोलीच्या नगराध्यक्ष

 
आता ऐरवी सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतच फोफावलेल्या या घराणेशाहीबद्दल मात्र मंत्री शिरसाटांना काहीच वाटत नाही. इतरही पक्षात हेच चित्र असल्याचं ते सांगतात. तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी मात्र यावर टीका केलीये. 

हे झालं शिवसेनेतलं. पण सर्वपक्षांचा आपल्या घराणेशाहीसाठी कसा वापर केला जातो त्याचंही एक उदाहरण आहे. भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपकडून परभणीत नगरसेवक आहेत.मुलगा समशेर वरपुडकर, सून  प्रेरणा  आणि पुतण्या बोनी हे भाजपकडून जिल्हा परिषदेत उमेदवार आहे तर मुलगी सोनाली शिवसेना युबीटीकडून उमेदवार आहेत तर पुतण्या अनिल वरपुडकर काँग्रेसकडून उमेदवार आहे.म्हणजे पक्ष, कार्यकर्ते राहिले बाजुला पण सगळी पदं आपल्याच कुटुंबात कशी राहतील याची तजवीज महत्वाची.. त्यामुळेच एकाच घरात 6-6 पदं आहेत.

सर्वसामान्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता यावा अश्या पद्धतीने आपल्या लोकशाहीची रचना आहे. पण कार्यकर्त्याचा एकदा का प्रस्थापित नेते झाला की ते आपल्या कुटुंबातल्याच सदस्यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करतात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर हातात झेंडा घेऊन फक्त प्रचारापुरताच यांना लागतो.आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेते कुटुंबियांनाच पुढे करत असतील तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का?





Source link

YouTube
Instagram
WhatsApp