by Hansraj Agrawal | Mar 8, 2025 | Trending News
औरंगजेबाची कबर हटवावी हे सरकारचं मत आहे. पण कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औरंगजेबाच्या कबरीबाबत मोठं विधान केले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 8, 2025 | Trending News
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यातच त्याला वन्य जीवांच्या मासाची आवड होती असेही समोर आले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 7, 2025 | Trending News
Living Will: लिव्हिंग विल करू इच्छिणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारद्वारे यंत्रणा उपलब्ध केली.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 7, 2025 | Trending News
Sanjay Raut Demands ED Inquiry: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवत ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थेचे नवे उपाध्यक्ष असतील. या निर्णयासंदर्भात विचारलं असता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘अजय अशर देश सोडून पळाले असल्याची माहिती आपल्याकडे आहे’, असं म्हटलं आहे.
आमदार फोडताना आशरनेच पैशांची देवाणघेवाण केली…
“देवेंद्रजींच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो,” असं संजय राऊत यांनी या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता म्हटलं. तसेच राऊतांनी, प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर याचं आम्ही स्वागत करतो, असंही म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी “शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केला,” असा दावा केला आहे.
अजय आशरने देशातून पलायन केलं
“अजय आशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला, त्याचे उद्योग सर्वांना माहीत आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केली. हजारो कोटींची संपत्ती त्यांनी बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीत त्याने देशातून पलायन केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> ‘प्रशांत कोरटकरचा वावर देशाच्या गृहमंत्र्यांपासून…’, राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘सोलापूरकर RSS च्या…’
आशर आणि त्याच्या आकाची ईडी चौकशी केली पाहिजे
“राणा नावाच्या अतिरेक्याला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत यांना कधी परत आणणार? अजय आशर याला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि पैसा गोळा केला याची माहिती घेतली पाहिजे. दहा हजार कोटी घेऊन तो परदेशात स्थायिक झाला आहे. अजय आशर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी राऊतांनी केली.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 6, 2025 | Trending News
Shaktipith Mahamarg: शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत विसंगती पाहायला मिळतेय.कारण एका बाजूला अंबादास दानवे हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताय. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव हे या महामार्गाला पाठिंबा देताय.
शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय.नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला भास्कर जाधव यांनी समर्थन दिलं आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटंलय.
भास्कर जाधव यांनी शक्तिपीठ महामार्गाला दिलेल्या समर्थनानंतर शक्तिपीठ महामार्गाचे गिरीश फोंडे यांनी भास्कर जाधवांवर टीका केलीय. भास्कर जाधव अज्ञानी असल्याचा टोला त्यांनी लगावला.
विकासाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, सत्तेत बसलेले लोकच या महामार्गाला विरोध करत होते.आता तेच लोक निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतय, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.दरम्यान ज्या शक्तीपीठ महामार्गावरुन वाद निर्माण होतोय..
तो शक्तिपीठ महामार्गाचं प्रकरण काय.
शक्तिपीठ महामार्गाचा काय आहे वाद!
नागपूर ते गोवा शक्तीपीठी महामार्गाची लांबी ही 802 किलोमीटर आहे. प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च सुमारे 86 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी या तीन शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. शक्तिपीठ महामार्ग एकूण 12 देवस्थानांना जोडणार आहे. या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसंच राज्यातील अनेक पक्षांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय.मात्र, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत या महामार्गाबाबत नेत्यांचं एकमत नसल्याचं समोर आलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 6, 2025 | Trending News
Mahendra Thorve On Sunil Tatkare : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले हे दोघेही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खबबळ उडाली आहे.
शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत. त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे. आमच्या आमदारांमुळे ते खासदार झाले आहेत. आता लोकसभा आम्ही लढवणार आहोत. सुनील तटकरे यांना ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही असे आव्हान थेट सुनील तटकरे यांना महेंद्र थोरवे यांनी दिलं आहे. अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते
यावेळी क्रिकेटचे उदाहरण देत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीका केली. क्रिकेटच्या खेळात पंचांचा निर्णय अंतिम असतो. कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते असं ते म्हणाले. जरी कॅप्टन कूल असला तरी त्याने सोबतच्या खेळाडूंना प्राधान्य देणे गरजेचे असते. त्यामुळे आपण कॅप्टन व्हायला चाललो आहे. माझीच मुलगी खेळाडू, माझाच मुलगा खेळाडू, सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात असं चालणार नाही. पंचांनी निर्णय दिला असला तरी आज क्रिकेट पुढे गेलं असून यामध्ये थर्ड अंपायर आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजीत केलेल्या दमदार आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आमदार बांगर बॅट घेवून मैदानात उतरले. यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. आमदार महेंद्र थोरवे यांनी गोलंदाजी केली. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.
Source link