'लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप', सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट

'लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप', सुधीर मुनंगटीवारांचा मोठा गौप्यस्फोट


Sudhir Mungantiwar: ‘लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली,’ असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केलाय. 

2014 ते 2019 आणि 2022 ते 2024 पर्यंत सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होते. मात्र, 2024 निवडणुकीनंतर त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी  ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’  कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे.

‘मंत्रिपद का नाकारलं याबाबत मला अशी माहिती देण्यात आली की, लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे. स्वत:हून कोण पराभूत होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीर पणे सांगितले पण पराभूत व्हायचं हे कस होईल,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  

‘लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार पराभूत झालेत. तेव्हा वातावरणच तसं होतं. संविधानाच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात जे नरेटिव्ह सेट केले त्यामुळं आम्ही पराभूत झालो. उमेदवार म्हणून लढायचं नव्हतं पण उमेदवार झाल्यानंतर तर मी इतक्या कडक उन्हात फिरलो. पण मी पूर्वतयारी करु शकलो नाही. दिवस कमी होते, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

‘मंत्रिपद ज्याने कोणी काढलं असेल किंवा मला मंत्रिपद देऊ नये असं सांगितलं असेल. तर त्यावर उत्तर काय. उत्तम काम करणे. मी माझ्या जिल्ह्यात मिशन ‘ऑलिंपिक 36′ वर काम करतो. माझा उद्देश काय तर ऑलिंपिकमध्ये माझ्या जिल्ह्याचा कोणीतरी मेडल प्राप्त करेल. मी आता या ठिकाणी माझ्या जिल्ह्याच उत्तम उत्तम काम करेन. पंतप्रधानांच्या हस्ते माझ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारमध्ये 10 विषयांत नंबर एक आहोत. अजूनही खूप काम करायचंय,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मंत्रिपद गेल्याची खंत आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, ‘मी जेव्हा माझ्या नातींना मांडीवर घेतो तेव्हा सर्वात जास्त आनंद असतो. मंत्रीपद जाणे येणे हे होतंच आणि कोण पर्मनंट आहे. मंत्रीपद गेल्याची अजिबात खंत नाही,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 





Source link

पुण्यात आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मनोरुग्णालय; इथं झालाय मोठा भ्रष्टाचार

पुण्यात आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मनोरुग्णालय; इथं झालाय मोठा भ्रष्टाचार



मनोरुग्णांसाठी आधार असणाऱ्या पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रुग्णालयातल्या खरेदी प्रक्रियेत दीड ते दोन कोटींचा अपहार झाल्याचं समोर आल आहे. आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप केला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची कीड पुन्हा अधोरेखित होत आहे. 
 



Source link

Weather News : सूर्य आग ओकतानाच पावसाचा शिडकावा; महाराष्ट्रासह देशासाठी हवामानाचा अनपेक्षित इशारा जारी

Weather News : सूर्य आग ओकतानाच पावसाचा शिडकावा; महाराष्ट्रासह देशासाठी हवामानाचा अनपेक्षित इशारा जारी


Maharashtra Weather News : देश पातळीवर हवामानात कैक बदल होत असून, या बदलांमुळं आता नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. गेल्या 24 तासांतील हवामानाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी एकाएकी सायंकाळच्या वेळी पावसाची सुरुवात झाली आणि परिणामस्वरुप राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये काही अंशी तापमानात घट नोंदवण्यात आली. 

सूर्यानं आक ओकण्यास सुरुवात केलेली असतानाच उत्तर भारतातील काही भागांमध्ये झालेल्या या पावसानं नागरिकांना किमान दिलासा मिळाला असला तरीही हा दिलासा फार काळ टिकून राहणार नाही ही वस्तूस्थिती. कारण, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये 14 ते 18 मार्चदरम्यान पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात होईल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

महाराष्ट्रात विदर्भाची सर्वाधिक होरपळ 

सहसा होलिका दहनानंतर उकाडा वाढण्यास सुरुवात होते अशी महाराष्ट्रात धारणा असून, सध्या हेच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. कोकण पट्ट्यामध्ये तापमानवाढ झाली असतानाच विदर्भामध्ये पारा 40 अंशांच्या नजीक पोहोचल्यामुळं राज्यात सर्वाधिक होरपळ याच क्षेत्रात होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथं ब्रह्मपुरीमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून, या आकड्यानं उन्हाळ्याच्या पुढील दिवसांच्या चिंतेत आणखी भर टाकली. 

दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जिथं चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धामध्ये कमाल तापमानाच 1 ते 2 अंशांची वाढ अपेक्षित आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही उकाडा चांगलाच वाढला असून, नागरिकांना भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा यंत्रणा देत आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र अपवाद ठरत असून, इथं अद्यापही पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवत आहे. दिवस माथ्यावर आल्यानंतर मात्र हा गारठा नाहीसा होऊन उष्ण वारे नागरिकांना घाम फोडताना दिसत आहेत. एकंदरच महाराष्ट्रावर सध्या तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण असल्याचं दिसून आलं तरीही उष्मा मात्र वरचढ ठर्ताना दिसत आहे. 

देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये हीच स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठावरूनही उष्ण वारे वाहत असल्यानं इथंही तापमान वाढीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान बाष्पीभवनाची प्रक्रिया आणि समुद्र क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या दाबामध्ये सातत्यानं होणारे बदल पाहता तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचीही हजेरी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  तिथं उत्तरेकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मात्र पावसानं हजेरी लावली असून, हवामान विभागानं या भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर पर्वतीय भागांसाठी हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 





Source link

महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात! धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला; रुळावरुन ट्रक 500 मीटर फरफटत गेला

महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात! धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला; रुळावरुन ट्रक 500 मीटर फरफटत गेला



महाराष्ट्रात जळगावजवळ मोठा अपघात झाला आहे. धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला आहे. 



Source link

बँकेतही पैसा सुरक्षित नाही; नाशिकमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला

बँकेतही पैसा सुरक्षित नाही; नाशिकमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला


Nashik Crime News : पैसा सुरक्षित राहावं म्हणून तो आपणं बँकेत ठेवतो.. शिवाय, बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो. नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बॅंक खात्यात जमा करतात. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच तुमची फसवणूक झाली तर? हो असंच काहीसं झालंय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागात. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला आहे. 

कळवण भागातील ॲक्सिस बँकेतील कर्मचारी तुषार गोसावीनं ललिता मोरे या ग्राहकाकडून बँकेतील व्यवहारांसाठी तूषारनं एटीएम, मोबाईल बँकींगची माहीती घेतली. दरम्यान त्यांनं ग्राहकाची एकूण 15 लाखांची फसवणुक केली.
तर दुसरीकडे मालेगावमध्ये आकाश नामदेव इंडाईत यानं महिला बचत गटाचे खोटे कारण सांगून सहीचे, रक्कम नसलेले कोरे चेक घेतले. त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआय स्वरूपात मनमाड शाखा येथे भरली. त्यापैकी 19 लाख 28 हजार 407 रुपयाची रक्कम अद्याप भरली नाही.. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.

फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?

बँकेतील कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असेल तर सावधन व्हा.  तुमच्या बँकेतील अकाउंटमध्ये एफडी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील तर त्यांच्या आमिशाला बळी पडू नका. तुमचं डेबिट कार्ड आणि मोबाईल अॅप सुरू करून देण्याच्या नावानं पासवर्ड मागत असतील तर देऊ नका.
अशा प्रकरणांमध्ये लोकांचे कोट्यावधी रुपये लुटण्यात आलेत. अनेकांना अद्याप ते मिळाले नाहीत त्यामुळे बँकेतील व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा.. अन्यथा तुमचे बँक खाते साफ होण्यास वेळ लागणार नाही.





Source link

स्किन टू स्किन टच प्रकरणी वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला पुन्हा चर्चेत, आता नेमकं काय झालं?

स्किन टू स्किन टच प्रकरणी वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला पुन्हा चर्चेत, आता नेमकं काय झालं?


Pushpa Ganediwala: मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, माजी न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकेच पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. पुष्पा गनेडीवाला या त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांमुळं त्या चर्चेत आल्या होत्या. 

पुष्पा गनेडीवाला यांना पोक्सोप्रकरणात अनेक वादग्रस्त निर्णय दिल्यामुळं त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.  गनेडीवाला यांना 12 फेब्रुवारी 2022 रोजी अतिरिक्त न्यायाधीश या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून पदावन्नती (डिमोशन) करण्यात आले होते. पोक्सो कायद्यांतर्गंत लैंगिक अत्याचाराची त्यांची व्याख्या सांगितल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. 

गनेडीवाला या त्यांच्या अनेक निर्णयांमुळं चर्चेत आल्या होत्या. त्यातीलच त्यांच्या एक निर्णय म्हणजे एका 12 वर्षीय मुलीच्या छातीला स्पर्श करणाऱ्या 39 वर्षीय आरोपीला त्वचेला प्रत्यक्ष स्पर्श न झाल्याचे सांगत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत असलेल्या शिक्षेमधून मुक्त करणारा निर्णय न्या. गनेडीवाला यांनी 19 जानेवारीला दिला होता. त्यानंतर हा निर्णय सोश मीडियावर ट्रेंड झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा हात पकडणे आणि पँटची चेन खोलणे हादेखील पॉक्सोअंतर्गंत गुन्हा नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. 

जुलै 2023 मध्ये, गनेडीवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार (मूळ बाजू) यांनी 2 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या नोटीसला आव्हान दिले होते. ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पेन्शन आणि इतर लाभांसाठी पात्र/पात्र नसल्याचे घोषित केले होते.

उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पेन्शनची मागणी करताना, गणेडीवाला यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर निवृत्ती घेणे योग्य आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी नोव्हेंबर 2022 चा पत्रव्यवहार रद्द केला आणि म्हटले की गणेडीवाला फेब्रुवारी 2022 पासून उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांइतकेच पेन्शनसाठी पात्र आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर, ‘आम्ही रजिस्ट्रीला त्यांचे पेन्शन फेब्रुवारी 2022 पासून सहा टक्के व्याजदराने आजपासून दोन महिन्यांच्या आत निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.’ जुलै 2023 मध्ये याचिका दाखल करताना गणेडीवाला म्हणाले होते की, ‘मला कोणतेही पेन्शन मिळत नाही. “पेन्शन देण्यास नकार देण्याचा प्रतिवादींचा संपूर्ण दृष्टिकोन मनमानी आहे.” 2019 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. गणेडीवाला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, जानेवारी २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी त्यांचा अर्ज मंजूर केला होता. नंतर ही शिफारस मागे घेण्यात आली.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp