Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…

Shivsena Symbol : प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली…


Pramod Mahajan on Shivsena: पण ही गोष्ट आहे ती तब्बल 20 वर्षांपुर्वीची. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजनांना (Rajdeep Sardesai and Pramod Mahajan) एक प्रश्न विचारला होता. 


Updated: Feb 18, 2023, 01:12 PM IST





Source link

EC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष

EC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष


EC Shiv Sena Result BJP Post: निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.


Updated: Feb 17, 2023, 10:51 PM IST





Source link

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?


Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group)  केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे. नबाम रेबिया प्रकरणात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं निकाल दिला होता. या निकालानुसार विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकत नाही. ( Maharashtra Political News) याबाबत पुनर्विचार करण्यासाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करावं अशी मागणी ठाकरे गटानं केलीय. तीन दिवसांच्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवण्यात आला असून आज याबाबत निर्णय येणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासोबत कृष्ण मुरारी, शाह, हिमा कोहली, नरसिम्हा हे जजेस निकाल देणार आहेत. ( Political News in Marathi ) 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 5 नाही तर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. यावर निकाल येणार आहे. गेले तीन दिवस 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. यावेळी नबाम रेबिया खटल्याचा (Nabam Rebia Verdict) संदर्भावर युक्तीवाद झाला.  

शिंदे गटाचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपले गेले तर संपूर्ण प्रक्रियेसाठीच 8 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये पाच न्यायाधीशांच्या बेंचने अरुणाचल प्रदेशामध्ये नबाम रेबिया प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला होता. या निकालानुसर अविश्वास ठरावाच्या दरम्यान सदनाच्या अध्यक्षांकडे कोणतेही अधिकार नसतात. याचधर्तीवर शिंदे गटाने केलेल्या दाव्यानुसार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आमदारांना अपात्र ठरवण्याचे किंवा त्यांना निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. 

 ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद

उद्धव ठाकरे गटाच्यावतीने वकिलांनी हा निर्णय फेरविचारासाठी मोठ्या खंडपीठाकडे पाठवावा, असा युक्तिवाद केला, तर शिंदे गटाचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र प्रकरणात निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने तसे करण्याची गरज नाही. येथे अपात्रतेचा सामना करणाऱ्या आमदारांना मतदानही करावे लागले नाही. उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तेच सरकार पडण्यास जबाबदार आहेत, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. तर  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडले, असे म्हटले. गुवाहटीत बसून महाराष्ट्र सरकारसंदर्भात निर्णय होऊ शकत नाही. तसेच आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो. असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात करत राजस्थानच्या केसचा दाखला दिला .





Source link

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी

Shiv Jayanti : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी


Shiv Jayanti : पुण्यातील (Pune) जुन्नर येथील शिवनेरी (Shvineri Fort) किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्य सरकारतर्फेही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थिक राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. शिवनेरीकडे जाणाऱ्या तिन्ही टोल नाक्यावर (Toll Plaza) शिवजयतींनिमित्त वाहनांना सरकारने टोल न आकरण्याचा निर्णय घेतला आहे.

खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना शिवजयंतीच्या दिवशी टोलमाफी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात शिवभक्ती शिवनेरीवर जमणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शिवभक्तांसाठी हा निर्णय घेतला आहे.

जुन्नर परिसरातील वाहतुकीत बदल 

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.

गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





Source link

Water Supply : पाणी जपून वापरा! ‘या’ शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Water Supply : पाणी जपून वापरा! ‘या’ शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद


Pune Water Supply News in marathi : दिवसाची सुरुवात पाण्याचा बातमीने करुयात…आज आणि उद्या पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  महापालिकेकडून समान पाणी योजगेंतर्गत पाण्याचं ऑडिट करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. त्या कामांसाठी पुण्यात आज 16 फेब्रुवारी आणि उद्या 17 फेब्रुवारीला शहरात काही भागांमध्ये पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जाणून घ्या कुठल्या भागांचा यात समावेश आहे. (Pune Water Supply News off for 48 hours and In which areas will the water supply be shut off in marathi)

‘या’ भागात पाणीपुरवठा बंद 

चतुश्रुंगी टाकी परिसर 
बोपोडी
अनगळ पार्क
खडकी
सहारा हॉटेल
राजभवन
पंचवटी
औंध
खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी

अभिमानश्री सोसायटी

एसएनडीटी टाकी परिसर 

शिवाजीनगर
भोसलेनगर
घोले रोड
सेनापती बापट रोड
हनुमाननगर
जनवाडी
वैदुवाडी
मॉडेल कॉलनी
वडारवाडी
रेव्हेन्यू कॉलनी
पोलीस लाइन
गोखलेनगर
भांडारकर रोड

परिसर पद्मावती टाकी परिसर

बिबवेवाडी 
अप्पर व सुपर इंदिरानगर
संभाजीनगर 
काशीनाथ पाटीलनगर
लोअर इंदिरानगर
चिंतामणीनगर
स्टेट बॅंकनगर लेक टाउन
गंगाधाम
बिबवेवाडी
कोंढवा रस्ता
विद्यासागर कॉलनी
सॅलिसबरी पार्क
महर्षीनगर
डायस प्लॉट
मार्केट यार्ड
धनकवडी
गुलाबनगर
चैतन्यनगर
तळजाई वसाहत परिसर

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र 

 ससाणेनगर
काळे बोराटेनगर
हडपसर गावठाण
 ग्लायडिंग सेंटर
 फुरसुंगी
सय्यदनगर
सातववाडी
इंद्रप्रस्थ
मगरपट्टा
वानवडी
चंदननगर
खराडी
रामटेकडी
माळवाडी
भोसले गार्डन
15 नंबर आकाशवाणी
लक्ष्मी कॉलनी
महादेवनगर
मगरपट्टा परिसर

त्यामुळे महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत. 





Source link

Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली

Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली



आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News). 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp